Category: मुंबई

Mumbai news

राज्यातील २१२ गृहप्रकल्पांबाबत महारेरा साशंक

प्रकल्प सुरू झाले की नाही याची माहितीच महारेराकडे नाही मुंबई : महारेराकडे जानेवारी ते एप्रिल २०२३ दरम्यान नोंदणी झालेल्या २१२ प्रकल्पांबाबत महारेराच साशंक आहे. हे प्रकल्प सुरु झाले आहेत का? या प्रकल्पांची सद्यस्थिती काय याबाबतची कोणतीही माहिती या प्रकल्पांतील विकासकांनी महारेराकडे सादर केलेली नाही. प्रकल्प महारेराकडे नोंदविल्यानंतर दर तीन महिन्याला महारेराकडे त्रैमासिक प्रगती अहवाल विहित प्रपत्रात सादर करून तो संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. असे असताना विकासकांनी माहितीच दिली नसल्याचे उघड झाले आहे. जानेवारी ते एप्रिल २०२३ दरम्यान महारेराकडे नोंदविलेल्या २३६९ प्रकल्पांपैकी ८८६ प्रकल्पांनी त्रैमासिक प्रगती अहवाल सादर केले नव्हते. त्यामुळे हे प्रकल्प स्थगित करून त्याचे बँक खाते गोठवणारी, प्रकल्पाच्या सर्व व्यवहारांवर बंदी आणण्यासाठीची कलम ७ अंतर्गत ३० दिवसांची नोटीस दिली होती. शिवाय वेळोवेळी दूरध्वनीवरून आवाहनही केले होते. त्यानंतर यापैकी ६७२ प्रकल्पांनी दंडाची रक्कम भरली. त्यातील २४४ प्रकल्पांनी रक्कम भरूनही त्रैमासिक प्रगती अहवालाची पूर्तता केलेली नाही. त्यांच्याकडून हे अहवाल अद्ययावत करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी जानेवारीतील ६०, फेब्रुवारीतील ५८, मार्चमधील ४० आणि एप्रिलमधील ५६ अशा एकूण २१२ प्रकल्पांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. हे प्रकल्प सुरू झाले आहेत की नाही, त्यांची सद्यस्थिती काय याचीही माहिती नाही. त्यामुळे अशा प्रकल्पांची यादी महारेराने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे घर खरेदी करताना ही यादी तपासावी असे आवाहन महारेराने केले आहे.

वसुंधरा दिनानिमित्त सागरी किनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम

नवी मुंबई : 22 एप्रिल या ‘वसुंधरा दिवस’ (Earth Day) निमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी पर्यावरण संवर्धक विविध उपक्रम राबविण्यात आले. या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ.राहुल गेठे, परिमंडळ 1 चे उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे व बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल  यांच्या नियंत्रणाखाली बेलापूर विभाग कार्यक्षेत्रात टी. एस. चाणक्य सागरी किनाऱ्यापाठीमागील भागात नवी मुंबई महानगरपालिका व टी एस चाणक्य युनिव्हर्सिटीचे  विद्यार्थी यांनी संयुक्तपणे स्वच्छता मोहीम हाती घेऊन किनाऱ्याची स्वच्छता केली. या मोहिमेत स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, साफसफाई कर्मचारी व टी एस चाणक्याचे विद्यार्थी सहभागी होते. यावेळी उपस्थितांना जागतिक पृथ्वी दिनाच्या निमित्त माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचमहाभूतांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची माहिती सांगण्यात आली तसेच पर्यावरण संवर्धनाची माझी वसुंधरा शपथ सामुहिकरित्या घेण्यात आली.

दिवंगत आर.आर.पाटील यांच्या सूचनेकडे गृहविभागाचे अद्यापही दुर्लक्ष

रमेश औताडे मुंबई : दक्षिण मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या महिला प्रसाधनगृहात घुसून एका वकील महिलेचा विनयभंग करणारा सरकारकडे अद्यावत माहिती नसलेला परप्रांतीय सुरक्षा रक्षक संदीप पांडे याला पोलिसांनी अटक केली. याअगोदर अशा घटना घडल्या आहेत. त्यातील 99 टक्के सुरक्षा रक्षक परप्रांतीय आहेत. परराज्यातून  तडीपार केलेले हे गुंड महाराष्ट्रात नोकरी करतातच कसे ? या  तक्रारीवरून दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी राज्यातील सर्व सुरक्षा रक्षकांची एकत्रित माहिती गोळा करून त्याचा एकत्रित डाटा एका क्लिकवर मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. मात्र पुढे त्यावर सरकारने व गृहविभागाने अद्यापही गांभिर्याने काहीच केले नसल्याने परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून महिलांच्या विनयभंगाच्या घटना सुरूच आहेत व त्या सुरूच राहतील अशी भीती महिला संघटना करत आहेत. तीन दिवसांपूर्वी झालेल्या ताज्या घटनेतील महिला वकील असून ती खासगी लॉ फर्ममध्ये कामाला आहे. ती एका शॉपिंग सेंटरच्या वॉशरूममध्ये गेली होती. त्यावेळी आरोपी सुरक्षा रक्षक संदीप पांडे हा महिलांच्या वॉशरूममध्ये तिला दिसला. महिला प्रसाधनगृहात तुझे काम काय ? असे तिने त्याला विचारले. त्यानंतर पांडे हा घाबरला व तो बाहेर पळाला. त्यानंतर पीडितेने प्रसाधनगृहाच्या आतून कडी लावली. तेव्हा पांडे तिला पुन्हा आत दिसला. पीडितेने मदतीसाठी धावा सुरू केला. तेव्हा पांडे याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला बुक्का मारून लाथ मारली. त्यानंतर पांडे हा प्रसाधनगृहातून बाहेर पडला. या प्रकरणानंतर संबंधित आरोपीविरोधात पीडितेने आझाद मैदान पोलिसात तक्रार नोंदवली गेली. आता तपास सुरू होईल व त्याला शिक्षा होईल व पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती होईल. मात्र यावर कायम स्वरुपी तोडगा निघणार आहे की नाही ? असा सवाल महिला करत आहेत. खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सी चे मालक मंत्रालयात बिनधास्तपणे फिरत असतात.  त्यांना कोणाचा आशीर्वाद असतो ? १९८१ साली सरकारने सुरक्षा रक्षक कायदा केला. सरकारचा हा कायदा असा आहे की , अनेक कंपन्या , मॉल , बँका , आस्थापना , कारखाने , महामंडळे इतर सरकारी कार्यालयात महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक नियुक्त केले पाहिजेत. किंव्हा त्या त्या कंपन्यांचे सुरक्षा रक्षक त्यांनी नियुक्त केले पाहिजेत. जर सुरक्षा मंडळाकडे सुरक्षा रक्षक नसतील तर तसे हमी पत्र घेऊन खाजगी सुरक्षा रक्षक कंपनीने सूट प्राप्त अर्ज करून त्या ठिकाणी आपली सुरक्षा यंत्रणा कार्यरत करावी.असे आदेश आहेत.कायदा आहे. मात्र मंत्रालयात  सर्वत्र आलबेल आनंदी आनंद असल्याने खाजगी सुरक्षा रक्षक कंपनीचे मालक बिन्धास्त मोकाट मंत्रालयात फिरत आहेत. सरकारी सुरक्षा रक्षक मंडळातील कोरोना काळात ऑन ड्युटी मृत सुरक्षा रक्षकांच्या विधवा पत्नी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत असताना व दिवंगत आर आर पाटील यांच्या सूचनेला दाखवलेली केराची टोपली सामान्य जनतेला आच्छे दीन कधी आणणार असा सवाल महिला वर्ग करत आहेत.

बहाई धर्मीय समाज रिझवान महोत्सव

मुंबई : मुंबईसह जगभरातील बहाई धर्मीय समुदाय आणि त्यांचे अनुयायी एप्रिल महिन्याच्या शेवटी आणि मे महिन्याच्या सुरूवातीला येणारे दिवस मिळून 12 दिवस त्यांचा रिझवान महोत्सव उत्सव साजरा करतील अशी माहिती…

आरटीई अंतर्गत बदलांचा फटका विद्यार्थ्यांना?

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) सरकारने विद्यार्थ्यांना आठवीपर्यंतचे शिक्षण देणे अनिवार्य आहे. मात्र, राज्यातील बहुतांश अनुदानित शाळा, शासकीय-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा चौथी किंवा सातवीपर्यंतच आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचे काय, असा सवाल आप…

दक्षिण मुंबईचा तिढा दोन दिवसांत सुटणार

मुंबई : महाविकास आघाडीकडून दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवर उध्दव ठाकरेयांच्या शिवसेनेने अरविंद सावंत यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. याचपार्श्वभूमीवर काल (शनिवारी) रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दक्षिण मुंबईच्या जागेवरुन मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीनंतर दक्षिण मुंबई…

ठाकरेंचे निवडणूक आयोगाला चँलेज; जयभवानी बोलणार म्हणजे बोलणारच

मुंबई : उध्दव ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगाला चँलेज दिले. हवे तर तुम्ही आमच्यावर कारवाई करा पण जय भवानी बोलणार म्हणजे बोलणारच असे ठाकरे यांनी निवडणूक आयोगाल ठणकावले.  शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मशाल गीतातील ‘जय भवानी’ शब्द काढण्यासाठी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली…

मुंबईतील भाजप मुख्यालयाला आग

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या नरिमन पाईंट येथील मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये आग लागली. किचनमध्ये वेल्डिंगचं काम सुरू असताना ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी…

राष्ट्रवादीच्या जाहिरनामा आज प्रसिद्द होणार

राष्ट्रवादीच्या जाहिरनामा समितीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील जाहिरानामाच्या अंतिम मसुद्यावर शेवटचा हात फिरवताना. सोबत पक्षाचे माध्यम सल्लागार व समितीचे सदस्य संजय मिस्कीन. मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहिरनामा आज (सोमवारी)…

तेजस ठाकरेंची ‘वाईल्ड लाईफ’ची फोर्ब्स मासिकाने घेतली दखल

मुंबई : उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांच्या वाईल्ड लाईफ क्षेत्रातील कामगिरीची आंतरराष्ट्रीय मासिक फोर्ब्सने दखल घेतली आहे. तेजस ठाकरे यांच्या वाईल्ड लाईफ फाउंडेशनने पालीच्या नव्या दोन प्रजातींचा शोध लावला होता. ठाकरे…