Category: मुंबई

Mumbai news

शिक्षण हक्क कायदयाचे अध्वर्यू राजर्षि छत्रपती शाहू महाराज’ – अभिजीत कांबळे

अशोक गायकवाड   नवी मुंबई : शिक्षणामुळेच माणसाचा उत्कर्ष होतो हा ठाम विश्वास ठेवत राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा क्रांतीकारी कायदा केला आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. त्याचाच विस्तार सर्वदूर झालेला असून छत्रपती शाहू महाराजांचा हा शैक्षणिक दृष्टीकोन आपण समजून घेतला पाहिजे व त्यांनी आखून दिलेली पायवाट अधिक व्यापक केली पाहिजे असे मत व्याख्याते, संपादक अभिजीत कांबळे यांनी व्यक्त केले. राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून से.१५ ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेमध्ये ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे दूरदृष्टीचे शैक्षणिक विचार’ या विषयावर बीबीसी मराठीचे संपादक तथा व्याख्याते अभिजीत कांबळे यांनी श्रोत्यांशी संवाद साधत छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांचे महत्व विशद केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण, वाचन, माहिती व ज्ञान यांना महत्व देणाऱ्या विचारांवर आधारित नवी मुंबई महानगरपालिकेने उभे केलेले हे स्मारक खऱ्या अर्थाने ज्ञानस्मारक असून येथील अतिशय संपन्न ग्रंथालय अभ्यासकांसाठी तसेच बाबासाहेबांचे विचार समजून घेण्यासाठी अतिशय उल्लेखनीय असल्याचे मत अभिजीत कांबळे यांनी नोंदविले. आपले महाराष्ट्र राज्य पुरोगामी असण्याचे मूळ शिक्षणात असून महात्मा फुले यांनी शिक्षणाला महत्व देत शाळा सुरु केल्या, शाहू महाराजांनी शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचा कायदा केला आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात तशी तरतूद केली हा आपला समृध्द वारसाच प्रगतीचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारांचा अभ्यास करताना पाच महत्वाचे मुद्दे जाणवले असे सांगत त्यांनी शाहू महाराजांनी राबविलेला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा क्रांतीकारी कायदा, स्त्री शिक्षणासाठी सुरू केलेले उपक्रम व कायदे, तत्कालीन अस्पृश्य समाजाच्या विकासासाठी राबविलेले शैक्षणिक उपक्रम व कायदे, संस्थानाच्या अर्थसंकल्पात शिक्षणावरील खर्चाला सहा टक्के इतके दिलेले प्राधान्य तसेच वसतीगृहाच्या चळवळीमुळे गरजू व होतकरु मुलांना खुली झालेली शिक्षणाची दारे या पाच मुद्दयांच्या अनुषंगाने छत्रपती शाहू महाराजांचा शैक्षणिक दृष्टीकोन विविध उदाहरणे देत मांडला. शिक्षण हक्क कायदयाचे अध्वर्यू राजर्षि छत्रपती शाहू महाराज हे असून त्यांनी राबविलेली शैक्षणिक धोरणे, उपक्रम हे आजच्या काळालाही सुसंगत असून त्यांच्या शैक्षणिक विचारांचा उपयोग आजच्या काळात कसा करुन घेता येऊ शकतो या दृष्टीने विचारमंथन व्हायला हवे असे ते म्हणाले. शिक्षणामुळे सुजाण व चांगला माणूस घडू शकतो आणि शिक्षण हे समाजाला परस्परांशी सद्भावनेने रहायला शिकवते त्यामुळे शिक्षणाला सर्वाधिक महत्व देण्याची गरज असून त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक विकासाच्या नजरेतून पहायला हवे असे अभिजीत कांबळे यांनी स्पष्ट केले. नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आपल्या मनोगतात अडीच वर्षात अडीच लाखाहून अधिक नागरिकांनी व मान्यवरांनी स्मारकाला भेट देत येथील सुविधांची मुक्तकंठाने प्रशंसा केली असल्याचा आनंद व्यक्त करीत ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेच्या माध्यमातून महानगरपालिका सांस्कृतिक व वैचारिक परंपरा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. आत्तापर्यंत या व्याख्यानमालेत दिग्गज व्याख्यात्यांनी मौलिक विचारधन दिलेले असून व्याख्यानांना श्रोत्यांचाही उत्तम प्रतिसाद लाभतो याबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. सदर व्याख्यानाप्रसंगी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड, उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे व किसनराव पलांडे, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, लेट्स रिड फाऊंडेशनचे प्रमुख प्रफुल्ल वानखेडे, सुधाकर सोनवणे, श्रीम.हेमांगी व अंकुश सोनावणे व इतर श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्ताधाऱ्यांनी राजकारण गलिच्छ केले – सुप्रिया सुळे

मुंबई : घरे फोडा, पक्ष फोडा, पैसे वाटा अशी कटकारस्थाने करीत सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राचे राजकारण अतिशय गलिच्छ केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ५० खोके वाल्यांना केव्हाच रिजेक्ट केले. देवेंद्र फडणवीस आमच्या घरापाशी येऊन म्हणाले होते, पहिल्या पंधरा दिवसात…

अनेकांचे डोळे उघडण्याची गरज – राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रात अनेकांचे डोळे उघडण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज ठाकरे यांनी केले आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांनी हे विधान नेमकं कोणाला उद्देषून केले…

“कितीही चिखल असला तरी वरळीत कमळ फुलू देणार नाही’’

आदित्य ठाकरेंचा विरोधकांना टोला मुंबई : लोकसभा निवडणूकीत वरळीतून कमी मताधिक्य मिळाल्याने आदित्य ठाकरे वरळी मतदार संघ सोडणार असे भाकीत शिंदे सेनेचे खासदर श्रीकांत शिंदे यांनी केले होते. यावर भाष्य करताना वरळीत कितीही…

काही लोकांना बांबू लावला पाहिजे – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांना टोला लगावला. राऊतांचे नाव न घेता या कार्यक्रमामध्ये बांबूचं महत्त्व पटवून देताना मुख्यमंत्र्यांनी काही लोकांना बांबू लावला पाहिजे, असं विधान केलं. एकनाथ शिंदे म्हणाले…

सावधान ! 30 जूनपर्यंत जोरदार पावसाचा इशारा

मुंबई :  आजपासून जूनच्या या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे 30 जून पर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसापासून म्हणजे 1८ जूनपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग…

आरक्षण ओबीसी कोट्यातूनच हवे

जरांगे पाटलांचा सरकारला इशारा जालना : आम्हाच्या कुणबी नोंदीना कायद्याचा आधार आहे. आमच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळं मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला पाहिजे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळं सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र…

मराठा महासंघाचा जरांगेना पाठींबा

फडणवीसांचं कौतुक, भुजबळांवर टीका नागपूर : आरक्षणावरून महाराष्ट्रात मराठा विरुध्द ओबीसी वाद चिघळवला जात असताना आता अखिल भारतीय मराठा महासंघाने मनोज जरांगेंच्या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला आहे.  अखिल भारतीय मराठा महासंघाला पुढच्या वर्षी 125 वर्षे…

देशात ‘शैक्षणिक आणीबाणी’

नीट, युजीसी नेट नंतर १२ तास आधी नीट पीजी परिक्षाही पेपरफुटीच्या भीतीने रद्द मुंबई : देशात वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट, युजीसी नेट परिक्षांचे पेपर फुटल्याने विर्द्यार्थी चिंतेत असतानाच आता केंद्र सरकारने परीक्षेला अवघे 12 तास…

 पेपर फुटीला आळा घालण्यासाठी दक्षता कक्ष स्थापन करा

पदवीधर निवडणुकीत मविआचे ऐक्य मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि सरकारी नोकरभरती परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांना पायबंद बसावा तसेच या प्रकरणांचा तपास जलदगतीने होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्रपणे विशेष दक्षता आणि तपास कक्ष स्थापन करावा, अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार ॲड. अनिल परब यांनी केली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या तयारी सदंर्भात रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची चेंबूर येथे बैठक पार पडली.बैठकीला काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा व उत्तर- मध्य मुंबईच्या खासदार प्रा. वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. यावेळी ॲड. अनिल परब म्हणाले की, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थी आणि पदवीधरांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे. वैद्यकीयची नीट, प्राध्यापकासाठीची नेट, महसूल विभागाची तलाठी, पीएचडीची सीईटी, इयत्ता १२ वी बोर्ड आदी परीक्षांचे पेपर फुटत आहेत. पेपर फुटीमुळे परिक्षार्थींचे शैक्षणिक जीवन उध्वस्त होत आहे. पदवीधरांचे प्रतिनिधी असलेल्या विधान परिषदेच्या आमदारांसमोरचा हा ज्वलंत विषय राहिला पाहिजे. दक्षता कक्ष स्थापन करुन त्याचे संयोजन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे दिल्यास या प्रकरणांना आळा बसेल, असा दावा त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुकांना सामोरे जात आहे. काँग्रेस कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. या निवडणुकीतही मविआचे ऐक्य दिसेल. मविआ उमेदवार ॲड. अनिल परब मुंबई पदवीधर मतदारसंघातून सहज विजयी होईल, असा विश्वास काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी बैठकीत व्यक्त केला. विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक महाविकास आघाडी एकत्रपणे लढवत आहे. मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक अशा दोन जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) लढवत आहे. तर कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा दोन जागा काँग्रेस लढवत आहे. मुंबई पदवीधरचे उमेदवार ॲड. अनिल परब यांच्या वचननाम्याचे शिवसेना नेते व युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि शिक्षणतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते शनिवारी प्रकाशन झाले. २६ जून रोजी मतदानअसून गेली ३० वर्षे मुंबई पदवीधरमधून शिवसेना सातत्याने मोठ्या मताधिक्क्याने विजयी होत आलेली आहे.