Category: मुंबई

Mumbai news

महाराष्ट्रात दोन दिवसात पंतप्रधान मोदींच्या ६ सभा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत 29 व 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  सहा सभा होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी दिली. श्री.मोदी यांच्या…

सांगा हे पैशे कुणाचे ?

मुंबई : महाराष्ट्रात आदर्श लोकसभा लागू होताच निवडणूक आयोगाकडून त्याची कडक अंमबाजवाणी सुरु आहे.  निवडणूकीच्या काळात पन्नास हजार रुपायांहून अधिकची कॅश सोबत बाळगण्यास बंदी आहे. आणि ती सोबत असेल तर त्याबाबतची संबधित कागदपत्र सोबत असणे…

महायुतीत जागावाटपाचा तीढा कायम

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली असली तरी अजुनही महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीच्या पाच जागांवरील उमेदवारांची घोषणा अद्याप ही बाकी आहे. दक्षिण मुंबईतून…

भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर

राज्यात ठाकरे, पवारांसाठी सहानुभूतीची लाट मुंबई: आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमीच चर्चेत असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज महायुतीलाच घरचा आहेर दिला.आहे. निवडणूक एन टप्यात असतानाच राज्यात उध्दव ठाकरे आणि शरद पवार…

सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त  सत्कार

मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक  कार्यकर्ते मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता खात्यातील इलेक्ट्रिक सेक्शनचे चार्जमन, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे मॅनेजिंग कमिटी मेंबर व धडाडीचे कार्यकर्ते  सतीश शंकर तुपे हे मुंबई पोर्ट ट्रस्टमधून ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० एप्रिल २०२४  पासून सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त वर्कशॉपमधील कामगारांनी  माझगाव येथील वर्कशॉपमध्ये सतीश तुपे  व  पत्नी श्रद्धा तुपे यांचा  २६ एप्रिल २०२४ रोजी शाल, श्रीफळ,  पुष्पगुच्छ  व भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार केला. त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, विविध खात्यातील कामगार, नातेवाईक, माझगाव डॉक, फ्लोटीला वर्कशॉप यांच्यावतीने सतीश तुपे यांचा सत्कार करण्यात आला. सतीश तुपे हे प्रामाणिक, आदर्श व निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते आहेत.  युनियनच्या प्रत्येक आंदोलनात ते नेहमी अग्रभागी होते. त्यांनी कामगारांचे दैनंदिन प्रश्न, हॉस्पिटलला मदत, पेन्शन असे अनेक  प्रश्न पाठपुरावा करून यशस्वीपणे सोडविले. त्यांना उदंड आयुष्य आणि चांगले आरोग्य लाभो,  तसेच त्यांच्याकडून यापुढेही कामगारांची चांगली सेवा घडो. अशी शुभेच्छापर भाषणे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे  पदाधिकारी सुधाकर अपराज, विद्याधर राणे, दत्ता खेसे, विजय रणदिवे, विकास नलावडे, निसार युनूस, मारुती विश्वासराव,  विजय पंदीरकर,  आप्पा सूर्यवंशी, पोर्ट ट्रस्टचे  विद्युत अभियंता राजेश वाधवाणी,  सहाय्यक विद्युत अभियंता इकबाल बामणे, दत्तात्रेय सुगवेकर, संध्या सुगवेकर, स्मिता चंदने आदी मान्यवरांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनियनचे कमिटी मेंबर  श्रीकृष्ण पडेलकर यांनी केले. कार्यक्रमास मुलगी मधुरा तुपे व मुलगा साईराज तुपे उपस्थित होते. सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी विष्णू पोळ, योगेश चौले, विजय बामगुडे,  सुनील गायकर,  नितीन रायकर,  नारायण पालव,  मेलविन डिसोझा,  संजय आरगडे,  रिझवान शेख,  श्रीकृष्ण पास्ते,  राजेश वाडेकर,  जावेद सोलकर,  टी. एलांगोवन, वाघमारे आदी कामगार कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत

आता चौकशी करणार फ्लेमिंगोच्या मृत्यूची मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना नवी मुंबईतील १० फ्लेमिंगोच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. नवी मुंबईतील खाडीत एका आठवड्यात १० फ्लेमिंगोचा मृत्यू झाला होता.  याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पर्यावरण संस्था नॅटकनेक्ट फाऊंडेशनने केली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंढे यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राहिलेले तुकाराम मुंढे हे सध्या महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाचे सचिव आहेत. कडक आणि प्रामाणिक IAS अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची प्रतिमा आहे. त्यांच्या 18 वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत 20 वेळा बदली करण्यात आली आहे, अशा प्रामाणिक अधिकाऱ्याकडे चौकशी दिली याचा आम्हाला आनंद आहे, आम्हाला आनंद आहे, असे नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार यांनी सांगितले. नवी मुंबईतील डीपीएस तलावाभोवती 10 फ्लेमिंगो मरण पावले  व  पाच फ्लेमिंगो जखमी झाले आहेत. फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी नवी मुंबईतील हा एक महत्त्वाचा सरोवर पाणथळ प्रदेश म्हणून ओळखला जातो. नवी मुंबई महापालिकेने स्वतः पाणथळ जागा फ्लेमिंगोचे निवासस्थान आणि पर्यटकांचे आकर्षण म्हणून संरक्षित करण्याची आवश्यकता होती. त्यासाठी पर्यावरण संस्था नॅटकनेक्ट फाऊंडेशन सहकार्य करणार होते. मात्र सिडकोने आतापर्यंत हे काम महापालिकेकडे देण्यास नकार दिला आहे. सिडकोने सुमारे 25 तलाव नागरी संस्थेकडे हस्तांतरित केले आहेत परंतु डीपीएस फ्लेमिंगो तलाव, एनआरआय आणि टीएस चाणक्य पाणथळ जागा राखून ठेवल्या आहेत.या जागा राखीव ठेवल्या आहेत. असे नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार यांनी सांगितले.

पाकिस्तानला जगासमोर उघडे पडणाऱ्या अँड. उज्वल निकम यांची उमेदवारी म्हणजे मुंबईकरांचा सन्मान

रमेश औताडे मुंबई : मुंबईत रेल्वेत बाँम्ब ब्लास्ट करुन मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या याकूब मेमनला फाशी व्हावी म्हणून न्यायालयात युक्तिवाद करणारे, मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबला फाशी व्हावी म्हणून आवश्यक पुरावे व या कटातील पाकिस्तानचा सहभाग उघड करुन जगासमोर पाकिस्तानला उघडे पाडणारे अँड उज्वल निकम यांना लोकसभेची  उमेदवारी म्हणजे मुंबईकरांसाठी लढणाऱ्या सच्चा मुंबईकरांचा हा सन्मान असून उज्वल निकम हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार  अँड आशिष शेलार यांनी व्यक्त केला. उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार ज्येष्ठ विधितज्ञ अँड उज्वल निकम यांचा पक्ष प्रवेश करुन त्यांचे जोरदार स्वागत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केले. अँड उज्वल निकम म्हणजे एक सच्चा मुंबईकर आणि योध्दा निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत, अशी प्रतिक्रिया अँड आशिष शेलार यांनी दिली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अँड उज्वल निकम यांचे उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे विलेपार्ले येथील कार्यालयात ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी अँड पराग अळवणी, शिवसेना नेते डॉ दीपक सावंत, विवेक पवार, माजी आमदार तृप्ती सावंत यांच्यासह युतीचे सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. उज्वल निकम यांनी आपल्या भाषणात ,  संधी देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रीय, प्रदेश अध्यक्ष आणि भाजपा मुंबई अध्यक्षांचे आभार मानले. ज्या पध्दतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाच्या विकासासाठी काम करीत आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा बहुमान त्यांनी वाढवला ते पाहून आपल्याला त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळणे हा माझा बहुमान समजतो, अशी भावना निकम यांनी व्यक्त केली.

काँग्रेस आणि वंचित एकत्र विधानसभा लढू शकतात, आता वंचितला मदत करा – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते, तेव्हा नाराजी काढा आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. आचारसंहिता असतानाही केंद्र शासनाने त्याचे उल्लंघन केले आहे आणि इथेनॉलवरील बंदी हटवली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 20 टक्के इथेनॉल वापरायची परवानगी काही वर्षांपूर्वी देण्यात आली होती. पण साखरेचे उत्पादन कमी होईल या नावाखाली इथेनॉल  तयार करण्याची परवानगी काही जणांना देण्यात आली होती. याचे राजकारण आम्ही इचलकरंजी येथील सभेत मांडल्यानंतर त्याचा परिणाम आता दिसायला लागला असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या प्रमाणे दुसऱ्या टप्प्यात विदर्भात आणि मराठवाड्यात आम्हाला पाठिंबा मिळाला आहे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश या भागात मिळत आहे. मुंबईमध्ये दोन दिवसांत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार आहोत. मी असे म्हणेन की, काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलेली आहे, पण त्यांचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून उमेदवारी दिलेली आहे. वर्षा गायकवाड यांच्यासंदर्भात म्हणावे लागेल की, बळी का बकरा काँग्रेसकडून दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उध्दव ठाकरे शिवसेना असे काही मतदारसंघ आहेत. त्यामध्ये काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करत नाही आणि शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांचे काम करत नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतदार हा आमच्याकडे वळला असल्याची परिस्थिती आहे.असे त्यांनी सांगितले. ॲड. आंबेडकरांनी भाजप आणि मोदी यांच्यावर ही निशाणा साधला ते म्हणाले की, 2014 पासून ते आतापर्यंत 17 लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे, असे सरकार स्वतःच म्हणत आहे. आम्ही असे म्हणतो की, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत, तर गुजरातचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे लोकांनी आता धडा घ्यावा. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका चालू होत्या, त्यावेळी याच चर्चेला सुरुवात झाली होती. नवीन सर्व्हेनुसार भाजप कुठेही 200 पार करत आहे, असे दिसत नाही. अमित शहा यांनी समान नागरी कायदा लागू करणार असे वक्तव्य एका सभेत केले होते यावर ॲड. आंबेडकर यांनी समान नागरी कायदा भाजपने करूनच दाखवावा. भाजप आणि आरएसएस स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेईल असे मला वाटत नाही. तो संसदेचा कायदा आहे. संविधानाने प्रत्येक धर्माला सुरक्षा दिलेली आहे. असे सांगितले.

माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवणार – उद्धव ठाकरे

रमेश औताडे मुंबई : देशात हुकूमशाही येता कामा नये, घटना बदलण्याचे काम सुरू असून त्याचे रक्षण करण्यासाठी ही लढाई आहे. महाविकास आघाडीचे राज्यात व देशात इंडिया आघाडीचे सरकार आले पाहिजे. माजी मंत्री वर्षाताई गायकवाड या मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत त्या कुठूनही लढू शकतात, वर्षा गायकवाड यांना माझे मत मिळणार आहे, पंजाच्या हातात मशाल आहे व त्यानंतर तुतारी वाजवणार असे म्हणत वर्षाताई गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवणार, असा विश्वास माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या मुंबई विभागीय अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, मातोश्री व ठाकरे यांच्याशी पूर्वीपासूनचे चांगले संबंध आहेत, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काम केले असून त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी ही भेट घेतली. मुंबईतील महाविकास आघाडीच्या सहाही जागांवर विजय मिळवू असा विश्वास असून २००४ च्या लोकसभा निकालाची पुनरावृत्ती होईल, असे वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले.

आठ अधिकाऱ्यांना मिळाले पोलिस महासंचालक पदक

नवी मुंबई : महाराष्ट्र पोलिस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल राज्यातील पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक, पोलिस पदक आणि पोलिस शौर्य पदकासह पोलिस महासंचालकांचे बोधचिन्ह, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्राने सन्मानित करण्यात येते. त्याअनुषंगाने २०२३ या वर्षातील उल्लेखनीय सेवेबद्दल महाराष्ट्रातील तब्बल ८०० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे पदक (सन्मानचिन्ह) जाहीर झाले आहे. यामध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील आठ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर झालेल्यांमध्ये नवी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेतील सहायक पोलिस आयुक्त मयूर भुजबळ, सहायक पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल दगडू सापते, पोलिस हवालदार संदीप मनोहर ढवळे, गिरीष रामचंद्र किंद्रे, सतीश दत्तात्रय साळुंखे, गिरीष विनायक चौधरी, कृष्णा जयराम गावित आणि दत्तात्रय किसन भगत यांचा समावेश आहे. या सर्वांनी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन त्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त कळंबोली येथे पोलिस मुख्यालय येथे होणाऱ्या पथसंचालनावेळी या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.