Category: मुंबई

Mumbai news

संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा समाजाचा आंदोलनाचा इशारा

रमेश औताडे मुंबई : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी व्हावी तसेच त्या प्रकरणातील आरोपी तसेच सह आरोपींना अटक व्हावी यासाठी सकळ मराठा समाजाच्या वतीने २८ डिसेंबर रोजी बिड जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा मराठा समाजाचे नेते अंकुश कदम व नरेंद्र पाटील यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. बीड जिल्हयातील मसाजांग या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकळ मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांना आंदोलनाचा  इशारा दिला असून मारेक-यांना कठोर शिक्षा होत नाही तसेच राजकीय वरदहस्त असणा-या नेत्याची हकलपट्टी होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असे अंकुश कदम यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी आमदार नरेंद्र पाटील,रघुनाथ पाटील, महेश डोंगरे ,धनंजय जाधव  आदी मराठा समाजाचे नेते उपस्थित होते. बिड जिल्ह्याचा बिहार होऊ नये व संतोष देशमुख यांना न्याय मिळे पर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून काढून टाकावे. धनजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मिकी कराड यांच्यावर ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल

सानपाड्यात सर्वपक्षीयांनी मोर्चा काढून गृहमंत्री अमित शहा यांचा केला जाहीर निषेध

नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी  १७ डिसेंबर २०२४ रोजी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या अपमान जनक द्वेषपूर्ण वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नवी मुंबईतील सानपाडा येथील…

शतक महोत्सवी वर्षात श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर संघाची विजयी  सलामी

मुंबई : सांताक्रूझ येथील  १४ व १५ डिसेंबर २०२४ रोजी साने गुरुजी आरोग्य मंदिर  आयोजित ४० वी कै. भाऊसाहेब रानडे नवोदित मल्लखांब स्पर्धेत, श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर या संस्थेच्या मुलींच्या संघाने…

 पायाभूत प्रकल्पांसाठी आदिवासींचे बळी

आमदार राजेंद्र गावित यांची चौकशीची मागणी नुकसान भरपाई न देता आदिवासींना केले बेघर योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी या जिल्ह्यातील आदिवासी बांधव सकारात्मक आहेत; परंतु त्यांना कोणतीही नुकसान भरपाई न देता बेघर केले जाते. त्यांची घरे, जमिनी हडपल्या जातात. त्यातून एका आदिवासी महिलेने आत्महत्या केली असून, या प्रकरणाची चौकशी करावी आणि संबंधित प्रांताधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार राजेंद्र गावित यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर झालेल्या चर्चेत केली. विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या विधिमंडळाच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात आ. गावित यांनी पालघर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी होणारे भूसंपादन आणि त्यात आदिवासींवर होणारा अन्याय विधानसभेत मांडून विधानसभेच्या अध्यक्षांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले. प्रशासनाकडून आदिवासींचा छळ तलासरी येथील कोचाई, बोरमाळ, आणि धानीवरी या ठिकाणी भूसंपादन करताना प्रांताधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी कसा जाच केला, याचे पाढे आ. गावित यांनी विधानसभेत वाचले. ते म्हणाले, की पालघर जिल्ह्यातून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग, मुंबई दिल्ली कॉरिडॉर, मेट्रो प्रकल्प, टेक्सटाईल पार्क, वाढवण बंदर आदींसाठी भूसंपादन केले जात आहे. भूसंपादन करण्याला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही; उलट विकासासठी या भागातील आदिवासींची भूमिका सकारात्मक आहे. नुकसान भरपाई न देताच जागांचा ताबा वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या ज्या जमिनी आदिवासी बांधव कसत आहेत आणि ज्या जागेवर ते राहत आहेत, त्या जागा दांडगाई करून प्रशासन ताब्यात घेत आहे. कोणतीही नुकसान भरपाई न देता या जमिनी प्रशासनाने ताब्यात घेतल्या असून त्यामुळे आदिवासी बेघर आणि भूमिहीन झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रचंड पोलिस फौजफाटा   बरोबर घेऊन प्रांताधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी आदिवासी बांधवांच्या घरांवर बुलडोझर चालवले. त्यांच्या जमिनी संपादित केल्या. घरे पाडली, असे गावित यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. सहा वर्षे पाठपुरावा करूनही भरपाई नाही गेल्या सहा वर्षांपासून आदिवासी बांधव नुकसान भरपईसाठी डहाणू येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. पत्रव्यवहार करत आहेत; परंतु तरीही प्रशासन कोणतीच दाद द्यायला तयार नाही. या प्रकरणात पोलिस आणि प्रशासन कायदा हातात घेऊन आदिवासी बांधवांना बेघर करत त्यांना भूमिहीन करत आहेत. प्रशासन कायदा हातात घेत आहे, असे त्यांनी निदर्शनास आणले. आत्महत्येस भाग पाडल्याचा गुन्हा दाखल करा शासनाने आता या प्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या दडपशाहीला आणि दांडगाईला कंटाळून आदिवासी महिला लखमी बरफ यांनी आत्महत्या केली प्रशासनावर आदिवासी महिलेला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली आहे.

अमेरिकन आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट संमेलनात उल्हासनगर पालिकेचा सहभाग 

उल्हासनगर : चौथ्या अमेरिकन काँक्रीट इन्स्टिट्यूट आर.एन्.रायकर आंतरराष्ट्रीय संमेलन तसेच परिसंवाद मध्ये उल्हासनगर महानगरपालिकेच्या टीमने सहभाग घेतल्याबद्दल आयुक्त विकास ढाकणे यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.मुंबई मधील एका…

मुंबईत महिनाअखेरीपर्यंत गारठा कायम राहणार

मुंबई : राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणे पहाटेच्या वेळी गोठवणारा गारठा मुंबईत फारसा नसला तरी मागील दोन तीन दिवसांपासून गारवा जाणवत आहे. तापमानातील ही घट डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज…

– वरळीतील महिलांचा शौचालयासाठी आंदोलनाचा इशारा

 सागरी किनारा बांधून होतो, पण शौचालयाला मुहूर्त नाही मुंबई : वरळीतील महात्मा फुले नगरमधील झोपडपट्टीवासियांनी सार्वजनिक शौचालयाच्या मागणीसाठी रविवारी आंदोलन केले. विशेष म्हणजे ही झोपडपट्टी सागरी किनारा मार्गाला लागूनच आहे. एकाबाजूला महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून सागरी किनारा बांधला, तर दुसरीकडे वर्षभरापासून झोपडपट्टीवासियांसाठी शौचालय बांधण्याचे काम होऊ शकलेले नाही. त्यामुळे हा विरोधाभास रविवारी या आंदोलनाच्या निमित्ताने स्पष्ट दिसून आला. वरळी येथील महात्मा फुले नगरमधील झोपडपट्टीत सुमारे बाराशे कुटुंबे राहतात. या परिसरातील शौचालयाचे बांधकाम मुंबई महापालिकेने वर्षभरापूर्वी बंद केले. येथील रहिवाशांसाठी मुंबई महापालिकेने एक तात्पुरते फिरते शौचालय दिले आहे. मात्र या शौचालयाची स्वच्छता केली जात नाही, या शौचालयात पाण्याची सुविधा नाही, तसेच शौचालयाचा परिसरही अस्वच्छ आहे. त्यामुळे या परिसरात रोगराई पसरण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीला कंटाळून येथील रहिवाशांनी रविवारी या परिसरात मोर्चाचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी न दिल्यामुळे रहिवाशांनी पोलिस ठाण्यात निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. या शौचालयाचे काम तीन दिवसांत सुरू करावे आणि एक महिन्याच्या आत शौचालयाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी या परिसरातील महिलांनी केली आहे. मुंबईतील ६० टक्के जनता झोपडपट्टीत राहते. येथील नागरिकांना सार्वजनिक शौचालयांशिवाय (कम्युनिटी टॉयलेट) पर्याय नसतो. मात्र बहुतांशी ठिकाणच्या शौचालयांची दूरवस्था झाली आहे. काही ठिकाणी शौचालये मोडकळीस आली आहेत. त्यामुळे दुर्घटना होण्याचीही शक्यता असते. शौचकूपांची संख्या कमी असल्यामुळे एकेका शौचकूपाचा वापर मोठ्या संख्येने होतो. यावर उपाय म्हणून पालिकेने वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत वस्त्यांमधील शौचालयांची संख्या वाढवण्याचे ठरवले आहे. गेल्यावर्षी पालिकेने लॉट ११ या उपक्रमांतर्गत २२ हजार शौचकूप बांधण्याचा संकल्प सोडला होता. त्यापैकी बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी लॉट १२ अंतर्गत आणखी शौचालये बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. म्हाडाचीही शौचालये ताब्यात घेण्यात येणार असून त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे. एकमजली शौचालयांची पुनर्बांधणीही करून त्याजागी दुमजली शौचालये बांधण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी नव्याने शौचालय बांधले जाणार आहे. त्याकरीता लॉट १२ अंतर्गत पहिल्या टप्प्यात ५५९ शौचालये बांधण्यात येणार असून त्यामुळे संपूर्ण मुंबईत एकूण १४,१६६ नवीन शौचकूपांचे बांधकाम केले जाणार आहे. मात्र काही ठिकाणी कंत्राटदार शौचालय बांधणीसाठी उशीर करतात व त्यामुळे रहिवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागतो.

पर्यटकांच्या स्वागतासाठी माथेरान सज्ज !

माथेरान : शाळांना सुटट्या पडायला लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटक सहकुटूंब पर्यटनासाठी घराबाहेर पडण्याच्या तयारीत आहेत.मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांसाठी रायगड जिल्ह्यातील सर्वात आवडते ठिकाण म्हणजे माथेरान होय आहे.हिवाळ्यात नाताळच्या सुट्टीमध्ये येणार्‍या…

‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन’ यशस्वी

– सहा हजारहून अधिक नागरिकांच्या उत्साही सहभागातून नवी मुंबई : स्वच्छतेमधील नवी मुंबईचे मानांकन उंचाविण्याचा निर्धार करीत 6 हजाराहून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत पामबीच मार्गावर आयोजित स्वच्छ नवी मुंबई…

गीता व ज्ञानेश्वरीवर आधारित व्याख्यान

डॉ. रवींद्र थत्ते यांचे २५ डिसेंबरला मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने गीता व ज्ञानेश्वरीवर आधारित डॉ. रवींद्र थत्ते यांचे `तत्वज्ञान सोपे आहे’  हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कै.…