ठाकरेंनी लालबाग-परळचा किल्ला अभेद्य राखला
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना विजयाकडे घोडदौड करीत असताना लालबाग परळने ठाकरे बंधूंना हात दिला. लालबाग-परळच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंचाच भगवा फडकल्याचं पाहायला मिळाले. गिरणगावचा गड ठाकरे बंधूंनी राखला. गिरण गावातील सातपैकी सहा जागांवर ठाकरे बंधूंचा विजय झाला, तर एका जागेवर समाजवादी पक्षाचा विजय झाला. श्रद्धा जाधव, पेडणेकर, किरण तावडे यांच्यासह ठाकरे बंधूंच्या युतीच्या सहा उमेदवारांनी विजय मिळवला. मुंबई शिवसेनेची आणि शिवसेना मुंबईची ही बाळासाहेब ठाकरेंची टॅगलाईन असायची. यात उद्धव ठाकरेंनी…
मुंबईत भाजपा तर ठाण्यात शिंदे नंबर १
मुंबईत २५ वर्षानंतर ठाकरेंची सत्ता संपुष्टात मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणावर दुरागामी परिणाम करणाऱ्या या २९ महानगर पालिकेच्या निवडणूकीत भाजपा महायुतीने आपाला विजयी अश्व चौखुर उधळलाच पण मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेसह सत्ताही आणली. तब्बल…
महाराष्ट्रात एकच ब्रँड ! डी फॉर देवेंद्र, डी फॉर डेव्हलपमेंट
स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकींच्या निकालानंतर महाराष्ट्रात आता फक्त एकच ब्रँड डी फॉर देवेंद्र, डी फॉर डेव्हलपमेंट असल्याचे आज सिध्द झाले. राज्यातील भाजप व महायुतीच्या विजयामागे फडणविसांचा विकासाचा अजेंडा आणि डबल इंजिन सरकारचा विश्वास असल्याचे निकालातून दिसून आले. “डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट हाच आज महाराष्ट्राचा ब्रँड बनला आहे,”. केवळ शहरी भागातीलच नव्हे…
महाराष्ट्रात एकच ब्रँड ! डी फॉर देवेंद्र, डी फॉर डेव्हलपमेंट
स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकींच्या निकालानंतर महाराष्ट्रात आता फक्त एकच ब्रँड डी फॉर देवेंद्र, डी फॉर डेव्हलपमेंट असल्याचे आज सिध्द झाले. राज्यातील भाजप व महायुतीच्या विजयामागे फडणविसांचा विकासाचा अजेंडा आणि डबल इंजिन सरकारचा विश्वास असल्याचे निकालातून दिसून आले. “डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट हाच आज महाराष्ट्राचा ब्रँड बनला आहे,”. केवळ शहरी भागातीलच नव्हे…
‘सर्वद स्टार पुरस्कार’ २०२६
सर्वद फाउंडेशन आयोजित ‘सर्वद स्टार पुरस्कार’ २०२६ मुंबई: सर्वद फाऊंडेशनच्या वतीने सर्वद स्टार पुरस्कार २०२६ दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख २१…
‘माझी भाषा, माझी शाळा’ कार्यक्रमातून शाळा आणि पालकांची जबाबदारी होणार अधोरेखित
‘माझी भाषा, माझी शाळा’ कार्यक्रमातून शाळा आणि पालकांची जबाबदारी होणार अधोरेखित साने गुरुजी जयंती आणि मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मराठी अभ्यास केंद्र आणि साने गुरुजी बालविकास मंदिर यांचा…
‘दिलखुलास’मध्ये डॉ. विजय कंदेवाड यांची मुलाखत
सिकलसेल ॲनिमियाविरोधात ‘अरुणोदय’ जनजागृती मोहिमेनिमित्ताने ‘दिलखुलास’मध्ये डॉ. विजय कंदेवाड यांची मुलाखत मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष जनजागृती मोहीम’ या विषयावर आरोग्य संचालक डॉ.…
देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू
देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल-बोर्डीकर मुंबई: महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. असे सार्वजनिक…
निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा : उद्धव ठाकरे
मुंबई : मतदानाच्या दिवशीच टपाली मतपेट्या उघडल्या. ही कसली लोकशाही आहे? विरोधक रडीचा डाव खेळतायेत असं मुख्यमंत्री म्हणतात मग निवडणूक आयुक्त त्यांचे घरगडी म्हणून काम करतायेत का? लोकशाहीची थट्टा करणाऱ्या या निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. साम, दाम, दंड भेद याचा वापर सगळीकडे सुरू आहे. महायुतीकडे कर्तृत्व काहीच नाही त्यामुळे निवडणुकीत वाट्टेल ते करा अशी परिस्थिती झाली असल्याचा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, गणेश नाईक यांचे मतदान केंद्रच फरार झाले. ४ तास मतदान केंद्र शोधायला लागले. ही एका मंत्र्यांची अवस्था आहे. या सगळ्या गोष्टीवर इलाज नसेल तर निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खातायेत आणि सत्ताधाऱ्यांसमोर लाचारी करतायेत. पुरुष मतदारां समोर महिलांचा फोटो आहे. मतदान केंद्रावर भाजपा उमेदवाराच्या पाट्याच दिसतायेत. हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे. वन नेशन, वन इलेक्शन त्यासाठी मोदींना हवं. एकाच वेळी सगळीकडे गोंधळ घालून काही वाटेल ते करा पण सत्ता काबीज करा अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे. निवडणूक आयुक्तांवर कारवाई झालीच पाहिजे. निवडणूक आयोगाचा संपूर्ण स्टाफ रोज काय करत असतो त्याचा छडा लावला पाहिजे. बसल्या जागी पगार खातायेत. त्यांच्या कार्यालयात राजकीय पक्षांचे प्रतिनिधी ठेवावे लागतील. तुमचा रोजचा लेखाजोखा जनतेसमोर आणावा लागेल. कोर्टात जाऊन करणार काय, एकदा कोर्टात गेले की पुढे ४ ते ५ वर्ष सुरूच राहते. निवडणूक आयोग झोपेचे सोंग करतंय. हा प्रश्न गंभीर आहे तो गांभीर्याने घेतला पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
