Category: पालघर

palghar news

रक्षेतून वृक्षारोपणाने दिवंगताला श्रद्धांजली

मुरबाड : शहरालगतच्या टेंभरे (बु.) गावचे जेष्ठ ग्रामस्थ नंदा गौरू गायकवाड यांचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, तीन जावई, दोन मुले, दोन पुतणी, दोन पुतणे व नऊ नातवंडे असा कटुंब असून तालुक्यात गायकवाड कुटुंबाचा मोठा गोतावळा असल्याने अंत्यविधी कार्याला मोठ्याप्रमाणात गर्दी होती. गावच्या वेशीवरील मुरबाडी नदीकाठी त्यांचा अंत्यविधी उरकल्यावर प्रेताची रक्षा नदीत न वाहता गायकवाड कुटुंबीयांनी सदर राखेतून पर्यावरण पूरक निर्णय घेतला. एरवी गावच्या स्मशानभूमीत दहन केलेल्या प्रेताची राख स्मशानभूमीच्या शेजारील मुरबाडी नदीत सोडली जाते. सदर नदीचा पाणी गावात दैनंदिन कामांसाठी वापरला जातो. तसेच गावातील जनावरे दररोज नदीवर पाणी पिण्यासाठी येत असून गावातील महिलांची दिवसभर कपडे धुवण्यासाठी नदीवर गर्दी असते. त्यामुळे प्रेताच्या राखेने नदीपात्र दूषित होण्याची संभावना असल्याने ती राख व वाहिलेली हार, फुले गोणींमध्ये भरून गायकवाड कुटुंबीयांनी नदीपात्रात न टाकता नदीकाठी खड्डे करून उपस्थितीतांच्या हस्ते त्यात जांभूळ, आंबा, वड, पिंपळ, फणस, करंज, कदंब अशा विविध वृक्षांचे रोपण करण्यासाठी वापरली. त्यामुळे रोपांना खत मिळून निसर्ग संवर्धनासाठी हातभार लागेल व हीच बाबांना श्रद्धांजली ठरेल अशी भावना गायकवाड कटुंबियांनी व्यक्त केली. तर या निर्णयाने जुन्या अनिष्ट प्रथांचा नायनाट होण्यास मदत होऊन तालुक्यातून एक सामाजिक तथा वैज्ञानिक प्रबोधनाचा संदेश सर्वत्र जाईल व एका नवीन नैसर्गिक विचारसरणीचा पाया मुरबाड तालुक्यातून रोवला जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा पालघरमध्ये निषेध

खासदार सवरा यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने योगेश चांदेकर पालघरः लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत भारत विरोधी केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने विक्रमगड येथील छत्रपती शिवाजी चौकात निषेध करण्यात आला. डॉ. हेमंत सवरा यांच्या नेतृत्वाखाली या वेळी आंदोलन करण्यात आले. अमेरिकेने रशियाची शकले केली. रशियानंतर भारत हा जगातील मोठी शक्ती असून, तिला भारताची शकले करायची आहेत. राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन अमेरिकेच्या या कूट कारस्थानाला हातभार लावण्याचे काम केले, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा या वेळी खा. सवरा यांनी काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६१ मध्ये देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आरक्षण रद्द करण्यासंदर्भात पाठवण्यात आलेल्या पत्राचा संदर्भ देऊन डॉ. सवरा यांनी पंडित नेहरू यांचा हा विचार विरोधामुळे कसा रद्द करावा लागला, हे सांगितले. पंडित नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत काँग्रेसचे सर्वच नेते कसे आरक्षण विरोधी आहेत आणि त्यांची नाटक कंपनी देशात एक आणि परदेशात वेगळेच नाटक कसे करत आहे, हे सांगून जनतेला आता काँग्रेसचा खरा चेहरा सांगितला पाहिजे, असे ते म्हणाले. संविधान डोक्यावर घेणाऱ्यांचे ढोंग उघडे राहुल गांधी लोकसभेत येताना संविधान डोक्यावर घेऊन येतात आणि लोकसभेच्या निवडणुकीत आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही कसे वचनबद्ध आहोत असे सांगतात. हे त्यांचे ढोंग अमेरिकेतील त्यांच्या वक्तव्याने उघडे पाडले आहे. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ आणि २०१९मध्ये प्रचंड बहुमत असतानाही आरक्षणाला कसा धक्का लागू दिला नाही, याचा उल्लेख करून खा. सवरा म्हणाले, की मोदी यांनी स्वतःच लोकसभेत सांगितले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर जरी पुन्हा अवतरले, तरी आरक्षण बदलू शकत नाही, एवढे आरक्षण भक्कम आहे. विधानसभेत आरक्षणविरोधकांची सत्ता येऊ देणार नाही भारतात किंवा महाराष्ट्रात काँग्रेस आणि त्यांच्या समविचारी पक्षांची सत्ता येऊ द्यायची नसेल, तर त्या विरोधात जनजागृती करावी लागेल. जनतेला विश्वासात घ्यावे लागेल आणि आरक्षण संपवण्यास निघालेल्या या पक्षांना घरी बसवावे लागेल, असा इशारा डॉ. सवरा यांनी दिला. काँग्रेसचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असून त्याचा मुखवटा टराटरा पाडून आरक्षणाला विरोध करणाऱ्या या पक्षाला धडा शिकवला पाहिजे, असा ठाम निर्धार या वेळी त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता घरोघर जाऊन काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा कसा आहे, हे जनतेला पटवून द्यावे आणि आरक्षण विरोधक आता सत्तेत नको, अशी मानसिकता जनतेची तयार करायला हवी. अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षण रद्द करायला निघालेल्या या काँग्रेसला आता कधीच सत्तेत येणार नाहीत, अशी व्यवस्था निर्माण करावी लागेल, असे ते म्हणाले.

डोंबिवली वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे बदलापूरमधील चोरीची रिक्षा सापडली

डोंबिवली : बदलापूरमधून गेल्या महिन्यात चोरीला गेलेली रिक्षा डोंबिवली वाहतूक विभागाच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाली आहे. चोरीच्या रिक्षेवरील चालक विना गणवेश डोंबिवली पूर्वेत रामनगर भागात रिक्षा चालवत होता. डोंबिवली वाहतूक विभागाच्या…

सरकारच्या अनास्थेमुळे नाभिक समाजाने उपसले आंदोलनाचे हत्यार

उल्हासनगर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात विविध योजनांची अंमलबजावणी होत असून सर्वच स्तरावरील समाज घटकांसाठी शासन अनेक योजना राबवित आहे.मात्र,नाभिक समाजाला आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आजही संघर्ष करावा लागतोय…

कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ जिन्याच्या मार्गात बेकायदा गाळ्यांची उभारणी

डोंबिवली: गणेशोत्सवाच्या काळात कल्याण डोंबिवली पालिकेला असलेली सुट्टी, त्यानंतर पालिका अधिकारी गणपती विसर्जन कार्यक्रमात व्यस्त राहत असल्याने त्याचा गैरफायदा घेत, कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ (आयरे बाजू) भूमाफियांनी रेल्वेच्या जिन्याच्या समोर…

गणेशोत्सवाच्या कालावधीत डोंबिवलीतील माणकोली पुलावरील वाहतूक बंद

डोंबिवली : डोंबिवलीतील गणपती बाप्पांचे विसर्जन माणकोली उड्डाण पुलाजवळील मोठागाव रेती मंदिर खाडी किनारी होणार आहे. या विसर्जन कालावधीत डोंबिवली पश्चिम येथील रस्त्यांवर वाहन कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने…

शासनाने आनंदाच्या शिध्याला लावली कात्री, हजारो कुटुंब शिध्यापासुन राहणार वंचित!

पालघर : गोरगरिबांना आनंदात सणं साजरा करता यावा. सणाला त्यांना ही गोडधोड खायला मिळावे म्हणून आनंदाचा शिधा ही योजना महायुती सरकार ने आणली आहे. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवाला शासनाकडून राज्यातील लाभार्थी…

कल्याण- डोंबिवलीत दीड दिवसांच्या गणरायांना निरोप

१३ हजार ८० घरगुती तर १ सार्वजनिक गणपतीचे विसर्जन   डोंबिवली : गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चा करून दीड दिवस मनोभावे भक्ति करून आज गणरायांना भक्तिभावात निरोप देण्यात…

उल्हासनगरात वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकांकडून मारहाण

  उल्हासनगर : महिलेच्या ऍक्टिव्हा गाडीला लागलेल्या धडकेचा जाब रिक्षाचालकाला विचारताच, रिक्षाचालकांनी वाहतूक पोलीस मोहन पाटील यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक करून…

वनविभागाच्या जागेवर नगरपंचायतचा कब्जा

 संबंधित वनअधिकाऱ्यांवर कारवाई होईल का? राजीव चंदने   मुरबाड : शहरातील शेळकेपाडा येथील वन विभागाच्या राखीव जागेत मुरबाड नगरपंचायतीने बिनदिक्कत बिनदास्तपणे चक्क २९ लाख १६ हजार रुपयांचा निधी खर्ची लावून…