Category: पालघर

palghar news

माजी सैनिक डॉ. भाऊराव तायडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

माजी सैनिक डॉ. भाऊराव तायडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण पालघर : माजी सैनिक डॉ. भाऊराव पुंडलिक तायडे (रा. पालघर) यांनी मालमत्ता कर माफी व मालमत्ता नोंदीतील त्रुटींच्या विरोधात जिल्हाधिकारी…

 पालघरमधील आदिवासी सुरांचा देश पातळीवर सन्मान

पालघरमधील आदिवासी सुरांचा देश पातळीवर सन्मान भिकल्या धिंडा यांना पद्मश्री जाहीर योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील आदिवासी मातीतील सुरांची आज देश पातळीवर दखल घेतली गेली. केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीत पालघर जिल्ह्यातील आदिवासी कलाकार भिकल्या धिंडा यांचे नाव जाहीर झाले आहे. तारपा वाद्याच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती जगभर पोहोचवणाऱ्या भिकल्या धिंडा यांचा सन्मान झाल्याने संपूर्ण आदिवासी समाजालाच हा आपला सन्मान वाटत आहे. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारामध्ये पालघर जिल्ह्याचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. ९२ वर्षीय भिकल्या धिंडा यांच्या वाद्यातून निर्माण होणारे स्वर हे केवळ संगीत नसून, वारली आदिवासी संस्कृतीची ओळख नाळ आणि आत्मा आहेत. चार पिढ्या धिंडा कुटुंबांने तारपा वाजण्याची परंपरा कायम ठेवली आहे. ऐंशी वर्षे तारपा वाजनात भिकल्या धिंडा यांना वयाच्या दहाव्या वर्षापासून तारपा वाजवण्याचा छंद लागला. त्यांच्या घरात तारपा वाजवणारी ही चौथी पिढी आहे, असे ते सांगतात. गुराढोरा सोबतच रानावनात भटकताना तारपा वाजवण्याचा छंद मला लागला. तो छंद आदिवासी संस्कृती जोपासण्यासाठी मी आजही जपतो, केवळ मीच तारपा वाजवून थांबत नाही, तर अनेक तरुणांनाही तारपा वाद्य वाजवायला शिकवले आहे. आजच्या मोबाईलच्या युगात तरुण आपल्या संस्कृतीकडे लक्ष देत नाहीत, हे खरे असले, तरी मी मात्र तरुणांना आदिवासी संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतोय, असे ते विनयाने सांगतात. दहा फूट लांबीचा तारपा वाजवणे हे वैशिष्टय भिकल्या धिंडा हे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावचे रहिवासी आहेत. ते वारली आदिवासी संस्कृतीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य असले, तरी त्यांनी आपली संस्कृती प्राणपणाने जोपासली आहे. दीडशे वर्षाची तारपा वादाची परंपरा जपत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे. साधारणपणे तारपा हे वाद्य बांबू आणि सुक्या भोपळ्यापासून बनवले जाते; मात्र भिकल्या धिंडा यांची याबाबतही एक विशेष ओळख आहे. ते दहा फूट लांबीचा अवाढव्य तारपा अत्यंत सहजतेने वाजवतात .इतक्या मोठ्या तारपासाठी लागणारी फुफ्फुसाची ताकद, श्वासावरचे नियंत्रण आणि कलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून सर्वच जण थक्क होतात. हातात काठी आणि सोबतीला तारपा वाद्य घेऊन भिकल्या धिंडा हे वयाच्या दहाव्या वर्षापासून तास न तास सराव करायचे. सुमारे ऐंशी वर्ष ते तारपा वाजवत असून त्यांची सुरावरील पकड आजही तितकीच घट्ट आहे. शरीर थकले, तरी उत्साह कायम तारपा हेच आपले दैवत आहे, असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात. आदिवासी संस्कृतीमध्ये तारपा नृत्याला आणि वाद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आत्तापर्यंत त्यांना शेकडो स्थानिक आणि राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे; मात्र पद्मश्री हा या सर्व सन्मानात मोठा सन्मान असून आता ही कला केवळ आपल्या पुरती मर्यादित न ठेवता पुढच्या पिढीने ती जपली पाहिजे असे भावनिक आवाहन पद्मश्री सन्मान जाहीर झाल्यानंतर त्यांनी केले. वयोमानानुसार शरीर थकले असले, तरी तारपा फुंकताना त्यांच्यात येणारा उत्साह आजही थक्क करणारा आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारात आपले नाव आल्याचे त्यांना दिल्लीवरून कळवले, तेव्हा त्यांना हा आदिवासी संस्कृतीचा सन्मान आहे आपण निमित्त मात्र आहोत अशी विनयाची भावना ते व्यक्त करतात. कुटुंबात २२ माणसे आहेत. आठ गुंठे जमीन आहे. दुसरा व्यवसाय नाही. नोकरी नाही, तरी त्यांची जगण्याची धडपड अजून थांबलेली नाही. त्याबाबत ते कुणालाही दोष देत नाहीत. लहानशा झोपडीत आजही ते राहतात. पुरस्कारातून बांधले घर महाराष्ट्र सरकारने तसेच केंद्र सरकारने दिलेल्या पुरस्काराच्या काही रकमेतून त्यांनी हे घर बांधले आहे. त्यांना आत्तापर्यंत शेकडो पुरस्कार मिळाले असले, तरी एकतारा गुरुकुल तर्फे देण्यात आलेली तारपा शिरोमणी पदवी, सांस्कृतिक सेनानी सन्मान, राष्ट्रीय संगीत नृत्य आणि नाटक अकादमीकडून दिला गेलेला संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार, पालघर भूषण पुरस्कार, पालघर जिल्हा परिषदेचे ब्रँड पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पद्मश्री पुरस्काराने या सन्मानांचाच आणखी सन्मान झाला आहे. कोट ‘आदिवासी कलेची केंद्र सरकारने दखल घेतली. पद्मश्री जाहीर झाला. कलेनेच मला मोठे केले. माझी जागतिक पातळीवर दखल घेतली गेली. ही कला, संस्कृती टिकली पाहिजे. भिकल्या धिंडा, पद्मश्री सन्मान प्राप्त कलाकार

मुरबाड नगरीत भव्य अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन

मुरबाड नगरीत भव्य अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन राजीव चंदने मुरबाड : गुरूप्रतिपदेच्या पर्वकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात  मुरबाड तालुका भागवत वारकरी समाजसेवा मंडळाच्या विद्यमाने भव्य  अखंड हरिनाम सप्ताह सोमवार, २ फेब्रुवारी ते सोमवार, ९ फेब्रुवारी या कालखंडात आयोजित करण्यात आला आहे. इ.स. १९९८ साली गुरुवर्य वैकुंठवासी श्रीराम दादा जोशी यांनी अनुष्ठानपूर्वक सामुदायिक श्रीज्ञानेश्वरी पारायणाची मुहूर्तमेढ मुरबाडच्या मातीत रोवली. यावर्षी पारायण सोहळ्याचे एकोणतीसावे वर्ष आहे. आचार्य अशोकभाई खरे , निलेश जोशी आणि योगी फुलनाथ महाराज यांच्या पावन उपस्थितीत पारायण सोहळ्याचा प्रारंभ होईल.पारायण नेतृत्व श्रीमहंत प्रमोद महाराज जगताप आणि पारायणाचार्य,एकनाथ महाराज कोष्टी करणार आहेत.सदर उत्सवात पुणे येथील वेदमूर्ती शमंदारशास्त्री खळदकर यांची दररोज सायंकाळी चार ते सहा या वेळेत श्रीरामरक्षा या विषयावर प्रवचने होणार आहेत.रोज रात्री आठ ते दहा या वेळेत सर्वश्री विक्रांत महाराज पोंडेकर,जयेश महाराज भाग्यवंत,सुभाष महाराज गेठे,माधवदास महाराज राठी,भगीरथ महाराज काळे,ओंकार महाराज दुडे,आचार्य डॉ.रामकृष्णमहाराज लहवितकर यांची कीर्तने होणार आहेत.दिनांक आठ फेब्रुवारीला भव्य पालखी सोहळा आणि दिव्य असा दीपोत्सव संपन्न होईल. सोमवार दिनांक नऊ रोजी वैष्णवभूषण श्रीमहंत प्रमोद महाराज जगताप यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे.या महोत्सवात हजारो भाविकांना अन्नदान करण्यात येणार आहे.या  धर्मकार्यात भाविकांनी सर्वतोपरी सहकार्य करावे तसेच सोहळ्यात उपस्थित राहून भक्तिसुखाचा आनंद लुटावा असे आवाहन उपरोक्त मंडळाने केले आहे.

 भुवन शाळेच्या खेळाडूंवर ग्रामस्थांकडून भेटवस्तूंचा वर्षाव…

भुवन शाळेच्या खेळाडूंवर ग्रामस्थांकडून भेटवस्तूंचा वर्षाव… प्रजासत्ताकदीनी पोलीस निरिक्षक दादासो एडके यांच्या हस्ते शाळेच्या खेळाडूंचा गौरव! राजीव चंदने मुरबाड : जिल्हा स्तरावर लंगडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल जि. प. भुवन शाळेच्या खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या सर्व विद्यार्थ्यांवर ग्रामस्थांकडून व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुरबाड कडून विशेष भेटवस्तू,ड्रेस, शैक्षणिक साहित्य, गौरवचिन्ह देऊन विशेष कौतुक करण्यात आले. हा कौतुक सोहळा मुरबाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दादासाहेब एडके, प्रसिद्ध समाजसेवक व दानशूर व्यक्तिमत्व मेहबूबभाई पैठणकर, गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड, रघुनाथ बांगर यांच्या शुभहस्ते पार पडला. प्रथमच जिल्हा परिषद भुवन शाळेच्या खेळाडूंना जिल्हा स्तरावर प्रथम बक्षीस भेटल्यामुळे सर्व ग्रामस्थांना व शिक्षकांना अत्यानंद झाला आहे.विजेत्या संघाचे ढोलताश्याच्या गजरात मिरवणूक काढून ग्रामस्थांनी स्वागतही करण्यात आले. आज प्रजासत्ताक दीनाचे औचित्य साधून सर्व ग्रामस्थांनी या खेळाडूंचे गोड कौतुक करत, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत शैक्षणिक साहित्याची भेट दिली आहे.तसेच यामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतिनेही दप्तर, वह्या, ट्रॉफी देऊन या मुलींना प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस निरिक्षक दादासाहेब एडके, यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, दररोज होणारे अपघात या विषयी मार्गदर्शन करून शाळेचे शिक्षक व खेळाडूंना पुढील भावी शैक्षणिक वाटचालीस  शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी पोलीस निरिक्षक दादासो एडके, गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड, समाजसेवक मेहबूबभाई पैठणकर,  सरपंच भुमिका बांगर,उपसरपंच सुनिल बांगर, माजी सरपंच रघुनाथ बांगर,दर्शना बांगर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप बांगर,ग्रामसेविका सौ. सिंघासने, रिपाईचे दिनेश उघडे, अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे अण्णा साळवे, लोकक्रांतीचे नरेश मोरे, रमेश देसले, जितेंद्र पंडित,सुधाकर शेळके, पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शंकर करडे, तालुका अध्यक्ष दिलीप पवार, सचिव संजय बोरगे, संतोष राऊत,मिडियासेलचे चेतन पोतदार, राजिव चंदने,शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जखमी कासवावर उपचार करून सोडले समुद्रात

जखमी कासवावर उपचार करून सोडले समुद्रात धवल लक्ष्मी हे स्थानिक नावही दिले कासवाने केला १८४७ किलोमीटरचा प्रवास योगेश चांदेकर पालघरः अरबी समुद्रालगत डहाणू येथे वन विभागांतर्गत सागरी कासव संक्रमण उपचार केंद्र आहे. या केंद्रात समुद्रात जखमी झालेल्या कासवांवर उपचार केले जातात. गेल्या काही महिन्यांपूर्वी दक्षिण मध्य समुद्रात वावरणारे कासव डहाणूनजीक आढळले. हे कासव जखमी असल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याला फिजिओथेरपी देण्यात आली. समुद्रात ते पोहण्यास सक्षम आहे, की नाही याचा विचार करून नंतर ते समुद्रात सोडण्यात आले. धवल लक्ष्मी हे कासव दक्षिण मध्य समुद्रात पोहोचले आहे. डहाणू येथील सागरी कासव संक्रमण केंद्र कासवांवरील उपचारासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ओलिव्ह रीडले, ग्रीन सी, लॉगर हेड, हॉक्सबीन यासारख्या कासवाच्या प्रजाती आढळतात. असंख्य समुद्र कासवांना जीवदान देण्याचे कार्य डहाणूच्या समुद्रालगत असलेल्या कासव संक्रमण उपचार केंद्रात केले जातात. फिजिओथेरपीने उपचार दहा ऑगस्ट रोजी ओलिव्ह रीले जातीचे कासव जखमी अवस्थेत आढळले होते. अशक्त व जखमी अवस्थेत कासव पाहिल्यानंतर तेथील मच्छीमारांनी वनविभागाला कळवले. वनविभागाच्या ‘रेस्क्यू टीम’ने या जखमी कासवाला सागरी कासव उपचार केंद्रात दाखल केले. कासवावर फिजिओथेरपी तसेच अन्य औषधोपचार करण्यात आले. स्टमक ट्यूबच्या मदतीने त्याला खाद्य देण्यात आले. जखमांवर योग्य ते उपचार आणि योग्य काळजी घेतली गेली. २९.६ किलो वजनाचे हे कासव महाराष्ट्रात प्रथमच आढळले. ते पोहण्यास सक्षम झाल्यानंतर त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. अशा प्रकारचा हा प्रयोगही महाराष्ट्रात पहिलाच होता. सॅटेलाईट टॅगच्या मदतीने लक्ष या कासवाचा समुद्रातील प्रवास कसा असेल, यावर देखरेख ठेवण्यासाठी संशोधकांनी भारतीय वन्य जीवन संस्थेच्या मदतीने सॅटेलाईट टॅग बसवला. मादी जातीच्या या कासवाचे नाव धवललक्ष्मी असे ठेवण्यात आले. धवल कंसारा यांचे  ४ फेब्रुवारी २०२३ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर त्यांची आठवण म्हणून तसेच डहाणूला असलेल्या महालक्ष्मी देवीमुळे या कासवाचे नाव धवल लक्ष्मी असे ठेवण्यात आले. वीस नोव्हेंबरला हे कासव समुद्रात सोडण्यात आले. धवल कंसारा यांनीच ‘ॲनिमल सेविंग ग्रुप’ स्थापन केला होता. त्यामुळे त्याचेच नाव या कासवाला देण्यात आले. आता ते समुद्रात सोडण्यात आले असून, त्याची अचूक दिशा सॅटेलाईटमधून कळते. सध्या ते डहाणूपासून १८४७ किलोमीटर अंतरावर दक्षिण मध्य समुदात आहे. कासवावर बसवलेले सॅटेलाईटची कालावधी एक वर्ष इतके आहे. त्यातील यंत्रणा ही कासव पाण्याच्या पृष्ठभागाबाहेर पडल्यास कासवाची अचूक दिशा दाखवते. मासेमारांच्या जाळ्यात अडकून जखमी डॉ. दिनेश व्हिनेरकर व डॉ.जानवी जाधव, टीटीसीमधील प्राणी रक्षक रेमंड डिसोझा व प्रतिक वाहुरवाघ आणि ‘वाईल्ड लाईफ कन्झरवेशन’ आणि ॲनिमल वेलफिअर असोसिएशन’ चे सर्व सदस्य एरिक ताडवाला, पूर्वेश तांडेल, मानद वन्यजीव रक्षक हार्दिक सोनी व संपूर्ण वन अधिकाऱ्यांनी या कासवावर उपचार करून लक्ष ठेवले. सागरी कासव हे मुळात समुद्रात असलेल्या गाळ स्वच्छ करण्याचे काम करतात. अनेकदा ते मच्छीमारांच्या मासे पकडण्याच्या जाळ्यात पडतात. अशावेळी त्यांची सुटका जाळ्यातून होत नाही. त्यांना अंतर्बाह्य जखमा होऊ शकतात. बरेच मच्छीमार ही वेगवेगळी जाळी वापरत असतात. त्याला घोस्ट नेटजाळी’ म्हणतात. श्वास घेता न आल्याने त्याला जखमा होतात. त्याला ‘ल्फोटिंग सिंड्रोम’ असे म्हणतात. त्याच्या पोटात बऱ्याचदा प्लास्टिक दिसते. धवल प्राणीप्रेमी धवल लक्ष्मी नावामागे एक खूप मोठे कारण आहे, ज्या सागरी बचावासाठी व सागरी कासव केंद्र उभारणी करण्यामागे त्याने पहिले पाऊल उचलले. वन्यजीव रक्षक धवल कंसारा म्हणून नामांकित असा एक वन्यजीव प्रेमी होता. तो आज जगात नाही. त्यांच्या आठवणी टिकून राहाव्यात, म्हणून धवल असे व लक्ष्मी म्हणजे डहाणूमध्ये सुप्रसिद्ध असलेली महालक्ष्मी मंदिर आहे. त्याला अनुसरून धवल लक्ष्मी असे नाव त्या कासवाला देण्यात आले.

जल,जंगल,जमीनसाठी आदिवासीर रस्त्यावर

जल,जंगल,जमीनसाठी आदिवासीर रस्त्यावर पालघर : जल,जंगल आणि जमीनीसाठी आदिवासी आता रस्त्यावर उतरली आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या जमिनी संदर्भातील प्रश्न तसेच रोजगार हमी, प्रलंबित वन हक्क दावे, स्मार्ट मीटर संदर्भातील समस्या, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, रेशन, शिक्षण, आरोग्य, रोजगार व पेसा अंतर्गत नोकर भरती सारखे प्रश्न सुटले नाही तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला लॉंग मार्च रुपी आंदोलन अनिश्चित काळापर्यंत सुरू ठेवण्याची असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे यांनी दिला. पालघर जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या वाढवण व मुरबे बंदर, सागरी विमानतळ, चौथी मुंबई सारख्या प्रकल्पांमुळे अदानी व मूठभर धनाड्यांचा लाभ होणार असून हजारो शेतकरी मच्छिमार व आदिवासी कुटुंब देशोधडीला लागतील असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. अशोक ढवळे यांनी पालघर येथे केले. चारोटी (डहाणू) येथून काल (सोमवारी) दुपारी सुरू झालेला लॉंग मार्च मोर्चा आज सायंकाळी उशिरा आले पालघर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाला. या मोर्चामध्ये ३५ हजार पेक्षा अधिक नागरिकांचा उस्फूर्त सहभाग लाभला होता. सन २०१८ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नाशिक – मुंबई दरम्यान काढलेल्या लॉंग मार्च प्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान सभा सोबत केलेल्या मागण्यांबाबत करारनामा केला होता. मात्र त्यामधील समाविष्ट बहुतांश मागण्यांची अंमलबजावण झाली नसल्याने कम्युनिस्ट पक्षाने वेळोवेळी लढे दिले, मोर्चे व आंदोलनाचे ठिकठिकाणी आयोजन केले होते. मात्र या आंदोलनाची दखल न घेतली गेल्याने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉंग मार्च चे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली.

भ्रष्ट्राचाराची जिल्हा परिषदेने घेतली दखल

बित्तंबातमी इम्पॅक्ट : पालघर पोषण आहार भ्रष्ट्राचाराची जिल्हा परिषदेने घेतली दखल स्लग- शिक्षकासह विस्तार अधिकाऱ्यांना नोटीस ० तात्काळ अहवाल सादर करण्याचे गटशिक्षण अधिकाऱ्याला आदेश० शाळेत पोषण आहाराएवेजी थेट तांदाळाचे केले होते वाटप…

शालेय राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत पुणे विभागाच्या मुलांचा तर नाशिक विभागाच्या मुलींचा विजय अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांची प्रमुख उपस्थिती

शालेय राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत पुणे विभागाच्या मुलांचा तर नाशिक विभागाच्या मुलींचा विजय अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांची प्रमुख उपस्थिती अशोक गायकवाड पालघर :सफाळे येथे आयोजित शालेय राज्यस्तरीय १९ वर्षांखालील…

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

आदिवासी विद्यार्थ्यांची सुरक्षा राम भरोसे शासकीय आश्रमशाळेत रूपांतर करण्याची मागणी राजीव चंदने मुरबाड : तालुक्यातील अनुदानीत आदिवासी आश्रमशाळेतील एका दहावी इयत्तेत शिकणार्‍या  विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलीआहे.…

३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

धिर्ती अहिरवालला जलतरणात सुवर्णपदक हलदवानी : पालघरच्या धीर्ती अहिरवाल हिने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरणच्या २०० मिटर बटरफ्लाय प्रकारात महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम केला. धिर्तिने २ मिनिटे २३.८० सेकंद वेळेसह सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. कर्नाटकची सुहासिनी घोष व आसामची अस्था चौधरी यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. रीलेमध्ये रौप्य व कांस्य! जलतरणातील महिलांच्या ४ बाय २०० मिटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राला रौप्य पदक मिळाले, तर पुरुषांच्या ४ बाय २०० मिटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राला कांस्यपदक मिळाले. महिला गटात अन्वी देशवाल, सान्वी देशवाल, धिर्ति अहिरवाल व अदिती हेगडे या चौकडीने ९ मिनिटे ९.३७ सेकंद वेळेसह रूपेरी यशाला मिठी मारली. कर्नाटक संघाने सुवर्णपदक पटकाविले, तमिळनाडूला कांस्यपदक मिळाले. पुरुष गटात शुभम धायगुडे, ओम साटम, ऋषी भगत व ऋषभ दास या चौघांनी ७ मिनिटे ५५.६२ सेकंद वेळेसह कांस्यपदकाची कमाई केली.  कर्नाटक व गुजरात संघाने अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकाविले.