Category: पालघर

palghar news

 ह्रदयरोग व मधुमेहाबाबत आगरी महोत्सवात जनजागृती

डॉ. प्रवीण घाडीगावकर यांनी केले मार्गदर्शन   डोंबिवली : डोंबिवलीत हजारो नागरिकांची गर्दी झालेल्या अखिल भारतीय आगरी महोत्सवात सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबरच उत्तम आरोग्यासाठी ह्रदयरोग व मधुमेहाबाबतही जनजागृती करण्यात आली. माधवबाग क्लिनिकचे डॉ. प्रवीण घाडीगावकर यांनी तारुण्यातही ह्रदयरोगाचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन केले. आगरी युथ फोरमतर्फे डोंबिवलीतील संत सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात सुरू असलेल्या आगरी महोत्सवातील सातव्या दिवशी डॉ. प्रवीण घाडीगावकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले. बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या ह्रदयरोग व मधुमेहाचा धोका वाढला आहे. एखादी व्यक्ती फिट दिसत असतानाही, त्याला अचानक ह्रदयरोगाचे निदान होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने काळजी घेण्याची गरज आहे. ह्रदयाच्या कार्यात अडथळा आणण्यासाठी मोठे शत्रू हे वजन, वाढलेला रक्तदाब आणि साखर आहेत. ते नियंत्रणात न आल्यास पुढील चार ते पाच वर्षात ह्रदयाचा त्रास होऊ शकतो.त्यामुळे आजारी पडण्याआधीच ह्रदयरोग व मधुमेह होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. घाडीगावकर यांनी केले. दररोज दोन किलोमीटर अंतर अर्ध्या तासात चालल्यानंतर तुम्हाला धाप लागल्यास ह्रदयाची तपासणी आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. घाडीगावकर यांनी केले. ह्रदयविकाराचा ह्रदयाकडून सिग्नल दिला जातो. तो ओळखून वेळीच उपचार करावेत. चालताना लागलेली धाप, छातीत वेदना आणि पायावरील सूज येत असल्यास तुमच्या ह्रदयातील ताकद कमी झाल्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत ह्रदयविकाराचा धक्का बसल्यास जीवावर बेतू शकते, ते ध्यानात घेऊन प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यावी. दररोज चालण्याबरोबरच आहारात बदल करावेत. वजन वाढणार नाही, असा आहार घ्यावा. मीठ, साखर, मैदा व तेलाचे प्रमाण कमी करावे. आपल्या जीवनशैलीत बदल केल्यास ह्रदयरोग व मधुमेहाला दूर ठेवता येईल, असे आवाहन डॉ. घाडीगावकर यांनी केले. भारत ही मधुमेहाची राजधानी झाली आहे. शत्रू राष्ट्राने हल्ला करण्यापेक्षा भविष्यात मधुमेहामुळे नागरिकांना अनेक व्याधींचा सामना करावा लागेल, अशी भीती डॉ. घाडीगावकर यांनी व्यक्त केली. या महोत्सवासाठी आगरी युथ फोरमच्या पदाधिकाऱ्यांसोबत दिलीप देसले, संतोष संते, गुरुनाथ म्हात्रे, कांता पाटील, अशोक पाटील, सदा म्हात्रे, नारायण म्हात्रे, जयेंद्र पाटील यांच्याकडून मेहनत घेतली जात आहे. 000

बांग्लादेशी दाम्पत्याची कल्याणात घुसखोरी

डोंबिवली : भारताचे पारपत्र (पासपोर्ट) आणि व्हिसाविना गेल्या आठ वर्षांपासून कल्याण पूर्वेकडे असलेल्या विठ्ठलवाडीतील जुनी सोनिया कॉलनीत वास्तव्य करणाऱ्या दोघा बांग्लादेशी घुसखोर दाम्पत्याला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी…

उल्हासनगरातील 28 मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेंशन

आयुक्त विकास ढाकणे यांचा पुढाकार   उल्हासनगर : महाराष्ट्र शासनाच्या अंशदायी निवृत्ती वेतन(डिसीपीएस)योजनेअंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेच्या सेवेत असताना मृत पावलेल्या 2005 नंतरच्या 28 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेंशन लागू करण्यात आली आहे. त्यासाठी आयुक्त विकास ढाकणे यांनी पुढाकार घेतला असून मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे,मुख्यलेखापरिक्षक शरद देशमुख,सामान्य प्रशासनाचे उपायुक्त डॉ.विजय खेडकर,लेखाअधिकारी संजय वायदंडे,विलास नागदिवे,दीपक धनगर यांनी कागदोपत्रांची पूर्तता केली आहे. यापूर्वी या योजनेची ठोस तरतूद नव्हती.अशावेळी महाराष्ट्र शासनाने 2005 नंतर कामाला लागलेल्या व सेवेत असताना मयत झालेल्यांच्या कुटुंबीयांचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून त्यांना फॅमिली पेंशन लागू करण्याचा निर्णय घेतला. तसा शासन निर्णयाचा आदेश प्राप्त होताच आयुक्त विकास ढाकणे यांनी या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश लेखा कार्यालयाला दिले.त्यानुसार मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे,मुख्यलेखापरिक्षक शरद देशमुख,सामान्य प्रशासनाचे उपायुक्त डॉ.विजय खेडकर,लेखाअधिकारी संजय वायदंडे,विलास नागदिवे,दीपक धनगर यांनी कागदोपत्रांची पडताळणी केली असता, महानगरपालिकेत 2005 मध्ये नंतर कामाला लागलेले एकूण 28 कर्मचारी हे मृत झाल्याचे आकडेवारी समोर आली.हे कर्मचारी जेंव्हा मृत पावले तेंव्हा त्यांचे मासिक बेसिक किती होते त्याअनुषंगाने त्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेंशन मिळणार आहे. 0000

 मार्केटिंगच्या नवनव्या तंत्राची आगरी महोत्सवात तरुणांना ओळख

 प्रसिद्ध यूट्यूबर निकुंज लोटिया -बीयुनीक यांचा टॉक शो   डोंबिवली : डोंबिवलीत सुरू असलेल्या आगरी महोत्सवात प्रसिद्ध यूट्यूबर निकुंज लोटिया-बीयुनीक यांच्या टॉक-शो मध्ये नव्या पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच मार्केटिंगच्या तंत्राची ओळख करुन देण्यात आली. आता सोशल मीडियात `एआय’ची नवी क्रांती येणार असून, नव्या पिढीने `एआय’ तंत्र आत्मसात केल्यास भविष्य उज्जवल होईल, असे आवाहन निकुंज यांनी केले. आगरी समाजाबरोबरच राज्यातील तरुणांना सोशल मीडियाबाबत मार्गदर्शन मिळावे, यासाठी आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, सरचिटणीस रामकृष्ण पाटील यांच्यासह पांडुरंग म्हात्रे, रंगनाथ ठाकूर, दत्ता वझे, जालिंदर पाटील, गजानन मंगरूळकर, बंडू पाटील, भास्कर पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीकर रहिवाशी व लाखो फॉलोअर्स असलेल्या निकुंज लोटिया-बीयुनीक यांना निमंत्रित केले होते. मंडळाचे ज्येष्ठ सदस्य शरद पाटील यांनी खुमासदार शैलीत निकुंज यांची मुलाखत घेत सोशल मीडियातील आव्हाने, कार्य आणि अपेक्षित उत्पन्नाबाबत तरुणांच्या विविध प्रश्नांना उत्तरे मिळवून दिली. डोंबिवलीतील रहिवाशी असलेल्या निकुंज लोटिया यांचे जगभर लाखो फॉलोअर आहेत. त्यांची प्रत्यक्ष मुलाखत ऐकण्यासाठी आगरी महोत्सवात तरुणांची गर्दी झाली होती. अत्यंत साध्या सोप्या शैलीत निकुंज यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. आम्ही दहा वर्षांपूर्वी सोशल मीडियावर काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी यूट्यूब हे माध्यम नवीन होते. पण मेहनतीने आम्ही आता स्थिरावलो. पण दररोज आव्हाने उभी आहेत. दर्शकांच्या अपेक्षा वाढत आहेत. सोशल मीडियामध्ये करिअरसाठी येणाऱ्या तरुणांनी आपल्याला अन्य मार्गाने निश्चित उत्पन्न मिळेल, याची तरतूद करावी. त्यानंतर सोशल मीडियात काम सुरू करावे. आता सोशल मीडियात सध्या असलेल्या माध्यमांऐवजी भविष्यात `एआय’ तंत्रज्ञानाचा बोलबाला असेल. त्यात तरुणांनी एकाग्रता व मेहनत घेऊन दररोज एक तास व्हिडिओ पाहून नवे तंत्र आत्समात करावे. नोकिया ही सर्वश्रेष्ठ मोबाईल कंपनी होती. पण अॅड्राईड आल्यानंतर त्यांनी बदल न केल्यामुळे ते नामशेष झाले. त्यामुळे जीवनात बदल हे करीत राहावे, असे आवाहन निकुंज यांनी केले. तुम्ही करीत असलेल्या व्हिडीओमुळे किती जणांचे समाधान होते, ते महत्वाचे आहे. दर्शकांना होणाऱ्या फायद्यातून तुमचे त्यांच्या मनातील स्थान पक्के होईल. दर्शक (व्ह्यूअर्स) वाढविणे, हे टार्गेट ठेवू नये. तुम्ही कामामध्ये उत्साह व नवनव्या कल्पना मांडल्यास तुम्हाला यश मिळेल, असा मंत्र निकुंज यांनी दिला. अविनाश-विश्वजीतच्या संगीताने रसिक मंत्रमुग्ध प्रसिद्ध मराठी चित्रपटातील संगीतकार अविनाश-विश्वजीत यांनी सादर केलेल्या संगीताने रसिक मंत्रमुग्ध झाले. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या प्रायोजकत्वाखाली या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका जुईली जोगळेकर, रोहित राऊत, मनिष राजगिरे, रवींद्र खोमणे, संजना अरुण, प्रणव देहेरकर, साक्षी चौहान यांची सुमधुर गीते, हास्यकलाकार सुप्रिया पाठारे, गौरव मोरे, दिगंबर नाईक आणि प्रणव रावराणे यांच्या विनोदी किस्स्याने हास्याचे फवारे उडाले. अमिशिक कामठे व आरती पानसरे यांनी सादर केलेल्या लावण्यांना `वन्स मोअर’ मिळाला. दीप्ती भागवत यांनी संगीत रजनीचे सूत्रसंचालन केले.

डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई

 नागरिकांनी व्यक्त केले समाधान   डोंबिवली : डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करणाऱ्या हातगाडी चालक, रिक्षा चालक यांच्याविरुध्द रामनगर, विष्णुनगर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे डोंबिवली रेल्वे स्थानक भागात रिक्षा वाहनतळ सोडून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांना चाप बसला आहे. पदपथ अडवून हातगाडीवर खाद्य पदार्थ विक्री करणारे विक्रेते या कारवाईमुळे अस्वस्थ आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानक भागात अनेक रिक्षा चालक रिक्षा वाहनतळ सोडून रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारावर येऊन नियमबाह्यपणे प्रवासी वाहतूक करतात. या रिक्षांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर भागात हा प्रकार नेहमीच प्रवाशांना पाहण्यास मिळतो. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे हवालदार किरण फड आणि त्यांचे सहकारी डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात गस्त घालत होते. ठाकुरवाडी भागात राहणाऱ्या एक रिक्षा चालकाने आपली रिक्षा डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने उभी केली होती. या रिक्षा चालकाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव बालाजी गार्डन भागात एक भंगार विक्रेता वर्दळीच्या रस्त्यावर भंगार सामानाची हातगाडी उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत होता. ही बाब रामनगर पोलीस ठाण्यातील गस्तीवरील हवालदार प्रसाद चोरमुले आणि सहकाऱ्यांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी भंगार विक्रेत्या विरुध्द गुन्हा दाखल केला. न्यू आयरेगाव साईबाबा मंदिराजवळ एक वडापाव विक्रेता वर्दळीच्या रस्त्यावर हातगाडी लावून उभा होता. हातगाडीवर सिलिंडरला जोडलेली शेगडी होती. विक्रेत्याने मानवी जीवितास धोक होईल अशा ठिकाणी सिलिंडर, शेगडी ठेवली म्हणून हवालदार सुभाष नलावडे यांनी वडापाव विक्रेत्या विरुध्द गुन्हा दाखल केला. डोंबिवली रेल्वे स्थानकामुळे सार्वजनिक ठिकाणी गॅस सिलिंडर, शेगडीचा वापर करून चहा विक्री व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्या विरुध्द रामनगर पोलीस ठाण्याचे हवालदार वेणु कळसे यांनी गुन्हा दाखल केला. राजाजी रस्त्यावरील कुडाळ देशकर सभागृहाच्या बाजुला दुरुस्तीसाठीची वाहने रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा आणला म्हणून हवालदार वेणु कळसे यांनी कार्यशाळा चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला. दत्तनगर चौकात हातगाडीवर सिलिंडरच्या माध्यमातून शेगडी पेटवून चायनिज पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी रस्ते, पदपथ अडविणाऱ्या, खाद्य पदार्थ विक्रीच्या ठिकाणी ज्वालाग्रही सामान ठेवणाऱ्या विक्रेते, चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, पालिकेच्या फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी फेरीवाल्यांना हटविण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. रस्ते, पदपथ फेरीवाला मुक्त झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. 00000

गंजाड ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार प्रशासनाचे दुर्लक्ष

सरपंचांकडून वारसा नोंदीचे दाखले, उपसरपंचांची नियमबाह्य ठेकेदारी ‘लक्षवेधी’च्या वृत्ताची दखल योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू असून सरपंच आणि उपसरपंच नियम डावलून कारभार करत आहेत. ते…

 उल्हासनगरात दिड लाखाचा गुटखा जप्त

 ६ जणावर गुन्हा, तिघांना अटक   उल्हासनगर : स्टेशन परिसरातुन काही व्यक्ती सफारी बॅगमध्ये प्रतिबंधित गुटखा बुधवारी सकाळी घेऊन जाणार असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवून एकूण ६ जणांना ताब्यात घेतले. एकूण १ लाख ६५ हजाराचा गुटखा जप्त केला असून ताब्यात घेतलेल्या ६ मध्ये ३ महिलांनाचा समावेश आहे. उल्हासनगरात गेल्या आठवड्यात मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडी टाकून ३० पेक्षा जास्त जणांना अटक केली. तर विठ्ठलवाडी पोलिसांनी बुधवारी सकाळी उल्हासनगर स्टेशनला परिसरातून एका बॅग मध्ये गुटखा घेऊन जाणाऱ्या एका टोळीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. ताब्यात घेतलेल्या सहा जणा मध्ये ३ महिलांचा समावेश असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. ताब्यात घेतलेल्या टोळीवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गुटखा कुठून आणला व कुठे नेण्यात येत होता. याबाबतची चौकशी पोलीस करीत होते. जप्त केलेल्या गुटक्याची किंमत १ लाख ६५ हजार रुपयाची असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. अटक केलेल्या ३ पुरुष आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.

उल्हासनगरमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्या टेलरला नागरिकांकडून चोप

उल्हासनगर  – जीन्स पॅन्टचे अल्टरेशन करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी संतप्त जमावाने टेलरला भररस्त्यात मारहाण केली. याप्रकरणी टेलरवर विनयभंगाचा तर ५ नागरिकांवर टेलरला मारहाण केल्याचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात…

मुरबाडच्या लेखणीचा गोवा राज्याच्या राजधानीत सन्मान…

राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यात गेली 20 वर्षांपासून पत्रकारिते मध्ये काम करत ,समता सामाजिक फाउंडेशनआणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत संघाचे प्रदेश अध्यक्ष, वसंतराव मुंडे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली  राज्यभर सामाजिक काम करणारे, शांत संयमी, अभ्यासु पत्रकार शंकर करडे  त्यांच्या कामाची दखल घेत,गोवा बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया, एशियन आर्ट सोसायटीच्या विद्यमाने 2024 चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार गोवा राज्याची राजधानी पणजी येथील संस्कृती भवन येथे,माजी केंद्रीय राज्यमंत्री रमाकांत खलप यांच्या शुभहस्ते  सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी गोव्याचे आमदार रोडोल्फा फर्नांडिस, आरपीआय आठवले गटाचे,अध्यक्ष दिनेश उघडे, रमेश देसले, समाजसेवक भगवान भालेराव, दयानंद रातांबे, संतोष उघडे, ज्येष्ठ पत्रकार संजय बोरगे, तसेच देशातुन व राज्यातून मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे आयोजन गोवा बुक ऑफ रेकॉर्डचे अध्यक्ष डॉ.बी एन खरात,यांनी केले होते. करडे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्या बद्दल मुरबाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार किसन कथोरे आणि वडखळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी त्याचें विशेष कौतुक करत शुभेच्छा दिल्या. ०००००

दिवा-भिवंडी-विक्रमगड नवा लोहमार्ग टाकण्याची खासदार सवरा यांची मागणी

रेल्वेमंत्र्यांचे विविध मागण्यांकडे वेधले लक्ष योगेश चांदेकर पालघरः दिवा-भिवंडी-अंबाडी-कुडूस-वाडा-विक्रमगड असा नवा लोहमार्ग टाकण्याची मागणी खासदार डॉ. हेमंत सरवा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. पालघर जिल्ह्यातील रेल्वेच्या अन्य प्रश्नाकडेही त्यांनी…