Category: रायगड

raigad news and updates

विचुंबे येथील गाढी नदीवर नवीन पुलाचे लोकार्पण;

  नागरिकांनी मानले नामदार रवींद्र चव्हाण व आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार पनवेल : तालुक्यातील विचुंबे गावाजवळील गाढी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पण भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते…

लाडक्या बहिणींच्या बसला रायगडमध्ये अपघात

 बस दरीत २० फुट घसरली ०सहा जखमी रायगड :   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  वचनपूर्ती सोहळ्याचा तिसऱ्या टप्पा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात जाणाऱ्या लाडक्या बहिणींच्या…

विचुंबेतील गाढी नदीवरील पुलाच्या उद्घाटनाला येणाऱ्या राज्यमंत्र्यांचे अनोखे स्वागत

 हुकुमशाही विरोधात लोकशाहीचे विचूंबे ग्रामस्थांचे झळकले बॅनर राज भंडारी पनवेल : नवीन पनवेल ते विचुंबे येथील गाढी नदीवरील जुना पुल जीर्ण झाला असल्यामुळे याठिकाणी नव्याने पुलाची उभारणी करण्यात आली. या पुलाचे…

मागील निवडणुकीत महेश बालदींसोबत कुणाचे साटेलोटे होते ?

 महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत  – महेंद्रशेठ घरत   पनवेल : रायगडमध्ये महाविकास आघाडी एकसंघ असून त्यात कोणतीही बिघाडी होणार नाही, असा ठाम आत्मविश्वास रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी…

उरणमध्ये झळकले युवा सपोर्टचे बॅनर

पनवेल : उरण विधानसभा क्षेत्रात सध्या राजकारण तापले आहे. शेतकरी कामगार पक्षाने नुकताच पदाधिकारी नियुक्ती मेळावा निमित्ताने युवाशक्तीला एकत्रित करून विधानसभा क्षेत्रात 300 पेक्षा जास्त युवा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती भविष्यात येणाऱ्या…

सत्कार हा व्यक्तीचा नसतो तर त्याच्या कर्तुत्वाचा असतो-नारायण राणे

कुडाळ :’सत्कार हा व्यक्तीचा नसतो तर त्याच्या गुणांचा आणि केलेल्या कर्तृत्वाचा असतो आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करणे आणि लोकांना न्याय मिळवून देणे महत्त्वाचे असते ‘ अशा शब्दात भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड संग्राम देसाई यांचा गौरव केला. देसाई यांची बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी नुकतीच मुंबईत निवड झाली.यानिमित्ताने कुडाळ शहर वासियांतर्फे त्यांचा नागर सत्कार करण्यात आला.या सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना राणे म्हणाले, संग्राम देसाई यांनी माणसे जोडण्याचे काम केले आहे.लोकांना  न्याय मिळवून देण्यासाठी ते कशाप्रकारे लढतात हे मी पाहिले आहे. राणे यांच्या हस्ते यावेळी देसाई यांचा  मानपत्र तसेच स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कौन्सिलचे सदस्य ॲड जयंत जायभावे, ॲड गजानन चव्हाण, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड परिमल नाईक, कुडाळ नगराध्यक्ष अक्षता खटावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, गोव्याचे ॲड विवेक घाडगे, सत्कार समिती अध्यक्ष अमित सामंत, भाजपचे सरचिटणीस रणजीत देसाई तसेच जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड विवेक मांडकुलकर, काका कुडाळकर, अभय शिरसाट, धीरज परब, संतोष शिरसाट, गजानन कांदळगावकर, विजय प्रभू ,ॲड, अजित भणगे, ॲड. अमोल सामंत, ॲड.आनंद गवंडे तसेच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राणे पुढे म्हणाले, मी जिल्ह्यात आलो तेव्हा माझी पहिली ओळख संग्राम यांचे वडील ॲड. डी . डी.देसाई यांच्याशी झाली त्यानंतर ॲड.संग्राम यांची ओळख झाली.एक सर्वसामान्य वकील ते आता महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्ष पदा पर्यंतची त्यांची वाटचाल ही जिल्ह्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आणि भूषणावह आहे. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरक,माजी खासदार निलेश राणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून संग्राम देसाई यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड उमेश सावंत, सुत्रसंचलन सुमेधा नाईक, अविनाश वालावलकर यांनी केले.

 ‘हक्क मिळवायचे असतील तर जात-धर्माच्या चक्रात अडकू नका’

 ह.भ.प. शामसुंदर महाराज. सोन्नर यांचे शेतकऱ्यांना आवाहन राजेंद्र साळसकर तेलगाव : शेतकऱ्यांची एकजूट ही कोणताही लढा जिंकू शकते. मात्र शेतकऱ्यांची एकजूट होऊ नये म्हणून त्यांना जातीय संघर्षांत अडकवले जात आहे. त्यांच्या धार्मिक अस्मिता टोकदार केल्या जात आहे. आपले हक्क मिळवायचे असतील तर  शेतकऱ्यांनी जात धर्म विसरून एक व्हावे, असे आवाहन ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने बीड जिल्ह्य़ातील तेलगाव येथील संकटमोचन हनुमान मंदिरात धरणे आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी शामसुंदर महाराज यांनी कीर्तनातून शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, ज्याची कुणी मागणी केली नाही अशा योजनांवर सरकार कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करीत आहे. मात्र शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. जाहीर केलेले अनुदान,  पीक विम्याचे पैसे  शेतकऱ्यांना मागूनही वेळेवर मिळत नाहीत. कारण शेतकऱ्यांची एकजूट नाही. खरं तर शेतीवर उपजिविका करणारा मोठा वर्ग देशात आहे. मात्र तो एकत्र येऊ नये म्हणून त्यांत फूट पाडली जात आहे. धर्माच्या अस्मिता टोकदार करून धार्मिक विद्वेष वाढविला जात आहे. त्यामुळे आपल्या खऱ्या प्रश्नांची जाणीव होत नाही. आता तरी शेतकऱ्यांनी सावध व्हावे. जात धर्माच्या चौकटीतून बाहेर येऊन शेतकरी म्हणून एक व्हावे, तरच आपल्याला न्याय्य मिळेल, असेही शामसुंदर महाराज म्हणाले. किसान सभेचे बीड जिल्हा अध्यक्ष काॅ. अजय बुरांडे यांनी या धरणे आंदोलनामागील भुमिका स्पष्ट केली. आम्ही नवीन काही मागत नाहीत, सरकारनेच जे जाहीर केलं आहे ते वेळेत द्यावे याठी हे आंदोलन असल्याचे सांगितले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार कॉम्रेड दत्ता डाके कॉम्रेड भगवान बडे श्री. विठ्ठल दादा लगड यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी न्यायाधीश  बाबुराव तिडके, कॉ. सुभाष डाके, विष्णू देशमुख, कॉ. सुदाम शिंदे, कॉ. सय्यद रजक आदी उपस्थित होते. कागदावरच पीठलं-भाकरीचा महाप्रसाद किसान सभेच्या आंदोलकांनी कीर्तन संपल्यानंतर आपापल्या घरातून आणलेले पिठल भाकरी काढल्या. वर्तमान पत्राच्या कागदावर वाढून घ्यायला सुरुवात केली. शामसुंदर महाराज यांची जेवणाची व्यवस्था एका कार्यकर्त्याच्या घरी करण्यात आली होती. मात्र तिकडे न जाता शामसुंदर महाराज यांनी सर्व आंदोलकांसोबत कागदावरच पीठल-भाकर वाढण्यास सांगितले. कार्यकर्ते घरी जेवणाची चांगली व्यवस्था केली असल्याचे सांगत होते. मात्र गोपाल कृष्णाने अशाच सर्व गोपाळांच्या शिदो-या एकत्र करून काला केला होता. आज तुमच्या सर्वांच्या घरातून आलेल्या या भाकरी त्या गोपाल कृष्णाच्या काल्याच्या प्रसादासारख्या आहेत, असे सांगून पीठल-भाकरीच्या महाप्रसादाचा आनंद वर्तमान पत्राच्या कागदावरच महाराजांनी घेतला.

माथेरानमध्ये जंतुनाशक फवारणी

माथेरान : गावातील काही भागातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता नसल्याने काही ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव निर्माण झाला असून काही दिवसांपूर्वी डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विषयक सावधगिरी बाळगून गावातील भागात नगरपरिषदेच्या माध्यमातून उत्तम प्रशासक तथा कार्यक्षम मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या सूचनेनुसार जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. गावातील उघडी गटारे आणि त्यातूनच वाहून जाणारे सांडपाणी आणि स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता नसलेल्या नागरिकांनी उघड्या गटारात टाकलेल्या ओल्या कचऱ्यामुळे सुध्दा डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे नागरिकांना आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. डेंग्यू सारखे आजार बळावले तर एखाद्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागण्याची शक्यता आहे. यासाठी स्वच्छता राखणे हे नागरिकांचे सुध्दा कर्तव्य आहे.घनकचरा व्यवस्थापनाच्या कचरा वेचक महिला नियमितपणे कचरा गोळा करण्यासाठी घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन करीत असतात परंतु जे नागरिक अनेकदा घरातील कचरा उघड्या गटारात टाकत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास वचक बसून स्वच्छता राखण्यास मदत होऊ शकते.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बुलढाणा येथे केले स्वागत

अशोक गायकवाड बुलडाणा : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज सकाळी बुलढाणा येथील एमएसआरटीसी वर्कशॉप मागील हेलीपॅडवर शासकीय हेलीकॉप्टरने आगमन झाले. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.…

रायगड किल्ल्याची युनेस्को पथकाकडून पाहणी

रायगड किल्ल्याला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळेल – किशन जावळे* अशोक गायकवाड   रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाशी जोडलेल्या १२ निवडक किल्ल्यांपैकी स्वराज्याची राजधानी असलेला हा रायगड किल्ला जागतिक स्तरावर ओळखण्यासाठी…