Category: रायगड

raigad news and updates

वाहनांच्या ताफ्यावर मर्यादा, दहापेक्षा अधिक वाहनांना बंदी

जि. प. व पं. स. निवडणूक वाहनांच्या ताफ्यावर मर्यादा, दहापेक्षा अधिक वाहनांना बंदी जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांचे आदेश अशोक गायकवाड रायगड-अलिबाग : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी वापरणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात कोणत्याही राजकीय पक्ष किंवा उमेदवाराच्या वाहनांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक मोटारगाड्या किंवा वाहने वापरण्यास बंदी घालणारे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. मा. भारत निवडणूक आयोगाने १३ जानेवारीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. रायगड जिल्ह्यात गुरुवार, ५ फेब्रुवारीला मतदान तर शनिवार, ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या वाहनांच्या ताफ्यात दहा पेक्षा अधिक वाहने नसावीत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करत जिल्हादंडाधिकाऱ्यांनी रायगड जिल्ह्यात आचारसंहिता लागू असलेल्या कालावधीत, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहापेक्षा अधिक मोटारगाड्या किंवा वाहनांचा ताफा वापरण्यास मनाई केली आहे. हे आदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत स्वतंत्रपणे पोहोचविणे शक्य नसल्याने पोलीस विभागामार्फत ध्वनीक्षेपकाद्वारे या आदेशांची जाहीर घोषणा व प्रसिध्दी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

 महाडमध्ये समतादुत यांची दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा

महाडमध्ये समतादुत यांची दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा समतादुतांनी शासनाच्या विकास प्रक्रियेचे वाहक व्हावे- डॉ. हर्षदीप कांबळे अशोक गायकवाड महाड: बार्टीचे समतादूत हे संपूर्ण राज्यात शासनाच्या तसेच सामाजिक न्याय विभाग व बार्टीच्या विविध योजनाचा प्रसार व प्रचार करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. शासनाच्या योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचण्यासाठी समतादुतांना समतादूत ॲपचा मोठा फायदा होईल. समतादूत हे शासनाचे मजबूत पाईक आहेत, त्यांनी शासनाच्या विकास प्रक्रियेचे वाहक व्हावे, असे आवाहान सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी व्यक्त केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे संस्थेच्या वतीने १९ व २० जानेवारी रोजी समतादूत व प्रकल्प अधिकारी यांची दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा क्रांतीभूमी महाड, जिल्हा रायगड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे दुरुस्तथ प्रणालीद्वारे उद्घाटन डॉ. कांबळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे, निबंधक विशाल लोंढे, विस्तार व सेवा विभागाचे विभागप्रमुख डॉ बबन जोगदंड, लेखाधिकारी नितीन चव्हाण, सहाय्यक लेखाधिकारी उल्हास शिंदे, आदी उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास महासंचालक सुनील वारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना डॉ. कांबळे म्हणाले, सामाजिक न्याय विभाग शासनाच्या १७ विभागांना योजनांसाठी निधी देत असतो. या सर्व योजनांचा प्रचार -प्रसार समदुतांनी करावा. शासनाच्या विकास योजनेच्या प्रक्रियेत समतादुतांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या प्रक्रियेत हिरीरीने सहभाग घेऊन आपल्या कामाचा ठसा उंचवावा असे,आवाहनही त्यांनी केले. कार्यशाळेला संबोधित करताना महासंचालक सुनील वारे म्हणाले की, महाड ही क्रांतिकारी भूमी असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याच क्रांतीभूमीत चवदार तळ्याचा सत्याग्रह करून समता प्रस्थापित केली. तो लढा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. समतादूत हे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या व सामाजिक न्याय विभागाच्या तसेच बार्टीच्या विविध योजनांचा प्रसार आणि प्रचार करतात. समतादूतांना अवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ. समतादुतांनी बदलत्या काळानुसार आपल्यात बदल केला पाहिजे. नवे ज्ञान, नवे कौशल्य विकसित केले पाहिजे असेही ते म्हणाले. कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना विस्तार व सेवा विभागाचे विभाग प्रमुख डॉ बबन जोगदंड यांनी सर्व राज्यातील प्रत्येक तालुक्यात आपले समतादूत चांगले काम करत असून समतादूतांच्या कामात गतिशीलता येण्यासाठी महाड येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केल्याचे सांगितले तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या समतादूत आणि प्रकल्प अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करणार असल्याचे सांगितले. समतादूत प्रकल्पाचे गतीने काम करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा समतादुतांनी वापर करवा, असे आवाहनही त्यानी केले. कार्यालयीन कामात शिस्त याविषयी निबंधक विशाल लोंढे यांनी सर्व समतादुतांना मौलिक मार्गदर्शन करून संवाद साधला. या कार्यशाळेला संपूर्ण राज्यातून ३०० समतादूत व प्रकल्प अधिकारी उपस्थित होते . कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी समतादूत विभागाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती तेजस्वी सोनवणे, राजश्री कांबळे, डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाडचे व्यवस्थापक प्रकाश जमदाडे, माहिती जनसंपर्क अधिकारी लिना कांबळे, यांनी मेहनत घेतली.सूत्रसंचालन प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात यांनी केले. आभार रामदास लोखंडे यांनी मानले.

जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान प्रचार वाहनांवरील झेंडे व फलकांवर निर्बंध

जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान प्रचार वाहनांवरील झेंडे व फलकांवर निर्बंध जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आदेश अशोक गायकवाड रायगड-अलिबाग :जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी, यासाठी निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवरील पक्ष प्रचाराचे झेंडे व कापडी फलक याबाबत जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी निर्बंधात्मक आदेश जारी केले आहेत. भारत निवडणूक आयोगाने १३ जानेवारीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. रायगड जिल्ह्यात गुरुवार, ५ फेब्रुवारीला मतदान तर शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहिता लागू असून तिची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये हा आदेश देण्यात आला आहे. आदेशानुसार, प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा वाहनाच्या डाव्या बाजूस विंडस्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो वाहनाच्या छतापासून २ फुटांपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक हे वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा. इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावयचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलकसंबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. हे आदेश आचारसंहितेच्या कालावधीत, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहेत. हा आदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे शक्य नसल्याने पोलीस विभागामार्फत ध्वनीक्षेपकावर जाहीर करून त्याची व्यापक प्रसिद्धी देण्याचेही आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर शाळेचा रेखाकला परीक्षेत सलग चौथ्या वर्षीही १०० टक्के निकाल

प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर शाळेचा रेखाकला परीक्षेत सलग चौथ्या वर्षीही १०० टक्के निकाल मुकुंद रांजणे माथेरान : महाराष्ट्र शासन कला संचालनालय, मुंबई, यांच्या अंतर्गत सप्टेंबर २०२५ मध्ये घेतल्या गेलेल्या शासकीय रेखाकला…

 जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ

जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ डॉ.निशिकांत पाटील आणि डॉ. शीतल जोशी यांचे मार्गदर्शन अशोक गायकवाड अलिबाग: वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि रजोनिवृत्तीच्या काळात उद्भवणाऱ्या विविध शारीरिक…

नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांचा अत्यावश्यक सेवासुविधांवर भर

नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांचा अत्यावश्यक सेवासुविधांवर भर मुकुंद रांजणे माथेरान :पर्यटक आणि नागरिकांना भेडसावत असणाऱ्या अडीअडचणी, समस्या त्याचबरोबर प्रलंबित प्रश्नांची उकल करण्यासाठी विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी अत्यावश्यक सेवासुविधांवर लक्ष केंद्रित केले असून गावातील विविध ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी शौचालयांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहेत त्याबाबत पाहणी करून ती अद्ययावत करण्याबाबत संबंधित अधिकारी वर्गाला सूचना केल्या आहेत. मुख्य पॉईंट असणाऱ्या एको पॉइंट वर पर्यटकांची मोठया प्रमाणावर गर्दी असते त्याठिकाणी वनखात्याच्या अंतर्गत शौचालय बांधण्यात आलेले आहेत परंतु त्या शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे.त्यामुळे ती वापर करण्यास अयोग्य आहेत. याचा नाहक त्रास पर्यटकांना विशेष करुन महिला पर्यटकांना प्रकर्षाने जाणवत आहे. अन्य पर्यटनस्थळांच्या तुलनेत सुविधांचा अभाव याठिकाणी भासू नये यासाठी खुद्द नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी नगरपरिषदेच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी वर्गासोबत प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली आहे.वनखात्याच्या संबंधित अधिकारी वर्गास सुध्दा त्यांच्या अखत्यारीत असलेल्या शौचालयांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी असे सूचित केले आहे. प्रशासकीय राजवटीत अनेक महत्वपूर्ण कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत.त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.कार्यक्षम नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या माध्यमातून नागरिक आणि पर्यटकांना भेडसावत असणाऱ्या समस्या मार्गी लागतील असा नागरिकांनी विश्वास व्यक्त केला आहे. ———————————————- जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केलेले आहे. प्रथम नागरिक या नात्याने आम्हाला समस्त नागरिकांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.आमच्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारची महत्वपूर्ण कामे यामध्ये पर्यटक आणि नागरिकांना अभिप्रेत असणारी कामे,सेवासुविधा प्रलंबित न राहता ती युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या सर्व सदस्यांसोबत प्रयत्नशील आहोत. चंद्रकांत चौधरी—नगराध्यक्ष माथेरान

इराणमध्ये अराजकता! आंदोलनात २००० हून अधिकांचा मृत्यू

इराण: इराणमध्ये महागाई, भ्रष्टाचार आणि हुकुमशाही प्रवृत्तीविरोधात सुरु असलेल्या आंदोलनामुळे देशात अराजक माजले आहे. देशात सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये आतापर्यंत सुरक्षा कर्मचाऱ्यांसह जवळपास २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.  देशभरातील निदर्शनांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मृतांची संख्या इराणी अधिकाऱ्यांनी मान्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी इस्रायली आणि अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर वाढत्या दबावादरम्यान, खराब आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण झालेली अशांतता, इराणी अधिकाऱ्यांसमोर तीन वर्षांतील सर्वात मोठे अंतर्गत आव्हान आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपासून सत्तेत असलेल्या इराणच्या धार्मिक अधिकाऱ्यांनी निदर्शनांवर दुहेरी दृष्टिकोन स्वीकारला आहे. त्यांनी आर्थिक समस्यांवरून निदर्शनांना समर्थन दिले आहे आणि त्याच वेळी कारवाई देखील केली आहे. त्यांनी अमेरिका आणि इस्रायलवर अशांतता भडकवल्याचा आरोप केला आहे. ‘ज्यांना ते दहशतवादी म्हणतात, त्यांनी निदर्शने हायजॅक केली आहेत, असंही ते म्हणाले. एका मानवाधिकार गटाने यापूर्वी शेकडो मृत्यू आणि हजारो अटक झाल्याची नोंद केली होती. काही दिवसापूर्वी इंटरनेट बंद करण्यासह संप्रेषण निर्बंधांमुळे माहितीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. photo caption इराणमधिल रस्त्यांवर आंदोलकांचे मृतदेह न्यायाच्या प्रतिक्षेत

ठाण्यात महायुतीच्या विजयासाठी ‘निरहुआ’ चा संगीतमय प्रचार

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजप – शिवसेना – रिपाई महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोमवारी प्रसिद्ध भोजपुरी स्टार अभिनेता व खासदार दिनेशलाल यादव उर्फ निरहुआ आणि प्रसिद्ध अभिनेत्री आम्रपाली दुबे ठाण्यात आले होते. या दोन्ही कलाकारांनी ठाण्यातील विविध भागांना भेटी देऊन महायुतीच्या उमेदवारांचा संगीतमय प्रचार केला. निरहुआ याने तर देशभक्ती जागावत भोजपुरी गीतातून ‘कमळ’ आणि ‘धनुष्य बाण’ या चिन्हाला मत देण्याचे आवाहन करीत धमाल उडवून दिली. यावेळी मोठया संख्येने उपस्थित जनसमुदायानेही “भारत माता की जय” च्या घोषणा देत निरहुआला साथ दिली. ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून प्रचाराचे नवनवे फंडे राजकीय पक्ष तसेच उमेदवार अजमावत आहेत. सोमवारी तर ठाण्यात भोजपुरी स्टार निरहुआ आणि अभिनेत्री आम्रपाली दुबे यांनी संगीतमय प्रचाराची धुम उडवुन दिल्याने सर्वत्र “ठाणे” शहर चर्चेत आहे. भोजपुरी अभिनेता व मा खासदार दिनेशलाल यादव (निरहुआ) व अभिनेत्री आम्रपाली दुबे यांनी वागळे इस्टेट प्रभाग क्र. १५ मधील इंदिरा नगर नाका, कळवा प्रभाग क्रं. २५ आतकोनेश्वर नगर,  मफतलाल मैदान आणि प्रभाग क्रमांक ४ मधील गांधीनगर, नळपाडा, खेवरा सर्कल परिसरात भाजप महायुतीचा साग्रसंगीत प्रचार केला. निरहुआ याने अनेक भोजपुरी गीतांचा नजराणा पेश करून  मतदारांशी संवाद साधला. उपस्थितांनी, भारतमाता की जय च्या जयघोषात फेर धरला होता. यावेळी प्रभाग क्रं १५ मधील भाजप महायुतीचे उमेदवार सुरेश चंदू कांबळे, अनिता दयाशंकर यादव, अमित सरैया, प्रभाग क्रमांक ४ मधील भाजपच्या स्नेहा आंब्रे, मुकेश मोकाशी, सेनेच्या आशादेवी सिंह, सिद्धार्थ संजय पांडे तर प्रभाग क्रमांक २५ ड चे उमेदवार ॲड. दीनानाथ पांडे आदी महायुतीच्या उमेदवारांच्या पारडयात भरभरून मतांचे दान टाकण्याचे आवाहन निरहुआ यांनी केले.

‘प्रेमांकुर’ काव्यसंग्रहाचे नेरूळमध्ये प्रकाशन

नेरूळ : येथील फ्रुटवाला कल्चरल सेंटर (मराठा हॉल) येथे २८ डिसेंबर २०२५ रोजी कवयित्री डॉ. पुष्पांजली आप्पाजी कुंभार (एम.ए., एम.एड., पीएच.डी.) यांच्या पहिल्या वहिल्या ‘प्रेमांकुर’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध वक्ते  अरुण म्हात्रे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. पुणे येथील वेदांतश्री प्रकाशन (प्रकाशक –…

अंबरनाथमध्ये श्रीकांत शिंदेंचा मास्टरस्ट्रोक !

अंबरनाथ नगरपालिकेवर शिंदेसेनेचा भगवा फडकला अंबरनाथ : अवघ्या महाराष्ट्रात महानगर पालिकांची रणधुमाळी सुरु असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ नगरपालिकेत मास्टरस्ट्रोक लगावत भाजपावर कुरघोडी केली आणि नगरपालिकेवर भगवा…