Category: ठाणे

Thane news

पातलीपाड्यातील रहिवाशांचा`जंगल बचाओ’चा नारा!

जंगलातील कृत्रिम पक्षी उद्यानाला स्थानिक नागरिकांचा विरोध ठाणे : पातलीपाडा येथील डोंगरावरील १५ एकर नैसर्गिक जंगलाला नेट लावून बंदिस्त पक्षी उद्यान (आयव्हरी पार्क) तयार करण्याच्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध…

परभणी-मुंबई लाँग मार्चला सर्वतोपरी मदत करा – डॉ. उदय नारकर

अनिल ठाणेकर ठाणे : परभणी ते मुंबई या लाँग मार्चला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पाठिंबा देत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी या लॉंग मार्चमध्ये सक्रियपणे सहभागी होऊन लॉंग मार्च यशस्वी करण्यासाठी सर्व…

नवी मुंबईत हार्मनी आणि कॅम्पस डेमोक्रसी या विषयावर राष्ट्रीय विद्यार्थी संमेलन संपन्न

शाहीर संभाजी भगत, प्रा. आर. रामकुमार, आईशी घोष यांचा सहभाग अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागाने मुंबईत हार्मनी आणि कॅम्पस डेमोक्रसी या विषयावरील राष्ट्रीय विद्यार्थी संमेलन यशस्वीपणे संपन्न…

पातलीपाड्यातील रहिवाशांचा `जंगल बचाओ’चा नारा!

जंगलातील कृत्रिम पक्षी उद्यानाला स्थानिक नागरिकांचा विरोध ठाणे : पातलीपाडा येथील डोंगरावरील १५ एकर नैसर्गिक जंगलाला नेट लावून बंदिस्त पक्षी उद्यान (आयव्हरी पार्क) तयार करण्याच्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या ७० एकरापैकी ५५ एकरावर अतिक्रमणे झाल्यानंतर, रहिवाशांनी वृक्षारोपण व संवर्धन करून जोपासलेल्या जंगलाला वाचविण्याचा निर्धार केला आहे. भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन कृत्रिम पक्षी उद्यानाऐवजी `नैसर्गिक जंगल बचाओ’चा नारा दिला. ठाणे नगर विकास आराखड्यानुसार, पातलीपाड्यातील सर्वेक्षण क्रमांक २८५/२, २७१, आणि १३९ (सुमारे ७० एकर) राखीव जंगल म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतु, या भागात २००८ पासून अतिक्रमणे सुरू झाली. या संदर्भात हिरानंदानी इस्टेटसह अन्य वसाहतीतील रहिवाशांनी महापालिका, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयाकडे वारंवार तक्रारी केल्या. परंतु, ठोस कारवाई न झाल्यामुळे, २०११ मध्ये या जमिनीचे राखीव जंगल म्हणून संरक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या भागातील अतिक्रमणे थांबविण्याबरोबरच क्षेत्राचे संवर्धन करण्यासाठी रहिवाशांनी झाडे लावण्याची सातत्यपूर्ण मोहीम हाती घेतली. या प्रयत्नांमुळे गेल्या १३ वर्षात १५ एकर मोकळ्या जमिनीत ५ हजारांहून अधिक स्थानिक झाडांचे संपन्न जंगल तयार झाले आहे. त्याचबरोबर ते पोपट, घार यांच्यासह स्थानिक व परदेशी पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान बनले आहे. या १५ एकर जंगलाच्या क्षेत्राला संपूर्ण जाळीने (नेट) संरक्षित करून पक्षी उद्यान (आयव्हरी पार्क) साकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या पक्षी उद्यानात बाहेरुन आणलेले पक्षी सोडले जाणार आहेत. नेटचे आच्छादन असल्यामुळे ते बाहेर पडू शकणार नाहीत. त्यामुळे स्थानिक पक्ष्यांचा अधिवास संपुष्टात येईल. यापूर्वी राज्य सरकार व ठाणे महापालिकेने साकारलेल्या अनेक प्रकल्पांची दुरवस्था आहे. कळवा खाडी किनाऱ्यावरील डॉ. सलीम अली उद्यानाची दुरवस्था झाली. महापालिकेने उभारलेले `नवे ठाणे, जुने ठाणे’ प्रकल्पही भ्रष्टाचाराच्या गर्तेत गेला. तुर्फेपाडा येथे उभारलेल्या अर्बन फॉरेस्टला आग लागल्याचा प्रकार घडला. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे मध्यरात्री मद्यपींच्या पार्ट्या रंगतात. या पार्श्वभूमीवर पक्षी उद्यानाची दुरवस्था झाल्यास, संवर्धन केलेल्या १५ एकरावरील जंगलाचे नुकसान होईल, अशी भीती माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्यासह रहिवाशांनी व्यक्त केली. तर संरक्षित जंगल बचाओचा नारा दिला. दरम्यान, या परिसराला महापालिकेचे सहायक संचालक (नगर रचना) संग्राम कानडे, कार्यकारी अभियंता पाडगावकर, सर्व्हेअर शेलार यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या भागातील रहिवाशांकडून सोमवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेण्यात येणार आहे.

…तर रिपाइं (आठवले) ठामपाची निवडणूक स्वबळावर लढणार – सुरेश बारशिंगे

ठाणे : विधानसभा निवडणुकीत रिपाईने महायुतीला प्रचंड मदत केली आहे. त्यामुळेच महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र रिपाईवर अन्यायच केला जात आहे. त्यामुळेच आगामी ठामपा निवडणुकीत मानाचे स्थान न दिल्यास एकूण…

साकेत विद्यामंदिर इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

कल्याण : कल्याण पूर्व, साकेत विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार  सुलभा गायकवाड या  उपस्थित होत्या.  या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना…

17 फेब्रुवारीला परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन

ठाणे : नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरिय लोकशाही दिनाच्या धर्तीवर, ठाणे महानगरपालिकेच्यावतीने दर महिन्याच्या तिस-या सोमवारी १७ फेब्रुवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे. त्यानुसार, १७ फेब्रुवारी…

मनोज सानप, डॉ. संदीप माने व डॉ.अविनाश भागवत यांची उत्कृष्ट कार्यकर्ता” म्हणून  निवड

 महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कार्याबद्दल ठाणे : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल आपल्या ठाणे जिल्हा समन्वय समितीस  तसेच आपल्या कार्यकारिणीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, सरचिटणीस तथा जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप आणि कोकण विभागीय सहसरचिटणीस तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश भागवत यांची उत्कृष्ट कार्यकर्ता” म्हणून राज्यस्तरीय निवड करण्यात आली आहे. राजपत्रित महासंघाच्या  39 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या हस्ते यांना गौरविण्यात येणार आहे. आपल्या जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. *महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे समन्वय समितीला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ अंतर्गत ठाणे जिल्हा समन्वय समितीने केले आहे.

 युवासेनेच्या विशेष बैठकीत संघटनेच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यव्यापी दौऱ्याचे नियोजन ठाणे, : युवासेनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य आणि जिल्हाप्रमुखांची विशेष बैठक शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना मार्गदर्शक व खासदार डॉ.…

कुमार केतकर यांच्या हस्ते मेडिकल घन कचरा स्वच्छ आणि विल्हेवाट मशीन सुरु

ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालात जिल्ह्यातील प्रथमच बायो मेडिकल घन कचरा स्वच्छ आणि विल्हेवाट मशीन बसवण्यात आले असून बुधवारी राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले…