Category: ठाणे

Thane news

महाराष्ट्रातील बकासुराचा नाश आता जनतारूपी भीम करणार -अनंत गीते

उल्हासनगर : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस चुरशीचं होतांना दिसत आहे, आणि याच पार्श्वभूमीवर उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक ४ मधील मराठा सेक्शनमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारार्थ एक भव्य चौक सभा आयोजित करण्यात आली होती. उत्साहाने भरलेली ही सभा शिवसेना नेते अनंत गीते आणि उपनेत्या ज्योतीताई ठाकरे यांच्या धारदार भाषणांनी गाजली. त्यांनी महायुती सरकारवर जोरदार प्रहार करत, जनतेला जणू महाराष्ट्राच्या भविष्याची शपथ दिली. सभेच्या सुरवातीलाच शिवसेना उपनेत्या ज्योतीताई ठाकरे यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. “लाडकी बहीण योजना म्हणजे निवडणुकीच्या तीन महिन्यांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी केलेली फसवणूक आहे. या योजनेतून राज्यातील महिलांची फसवणूक होत आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जणू आरसा दाखवला. त्यांच्या या रोखठोक टीकेने श्रोत्यांत एकच खळबळ उडाली. कल्याण पूर्वचे महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय बोडारे यांनी त्यांच्या भाषणात उल्हासनगरातील मूलभूत समस्यांना हात घातला. पाणी, वीज, रस्ते आणि वाढती गुन्हेगारी हे मुद्दे मांडून त्यांनी तीन वेळा आमदार राहूनही विद्यमान आमदारांनी या क्षेत्रात कोणताही विकास न केल्याचे ठणकावून सांगितले. “येथील जनतेला त्रास सहन करावा लागतो. हा त्रास संपवण्यासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे,” असे भावनिक आवाहन करत त्यांनी येथील लोकांच्या मनाला हात घातला. शिवसेना नेते अनंत गीते यांनी आपल्या सडेतोड भाषणातून राज्यातील “नीच राजकारण” आणि फोडाफोडीच्या खेळीवर संताप व्यक्त केला. “महाराष्ट्राची संस्कृती नाती जोडण्याची आहे, ती फोडण्याची नाही. परंतु सध्याच्या सरकारने पक्ष, घर, आणि नाती तोडून महाराष्ट्राला एक विषारी झाडासारखे फोडण्याचे काम केले आहे. या झाडाला मुळासकट उपटावे लागेल, आणि हे काम महाराष्ट्रातील जनतारूपी भीम करतील,” असे ते ठामपणे म्हणाले. अनंत गीते यांनी पुढे सांगितले की, “धनंजय बोडारे म्हणजे जनतेचा भीम आहे, जो महाराष्ट्रातील बकासुराचा नाश करणार आहे.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांमध्ये जणू नवचैतन्य निर्माण केलं. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार धनंजय बोडारे यांना विधान भवनात भगवा फडकवण्यासाठी त्यांनी मतदारांना मनःपूर्वक आवाहन केले आहे. अनंत गीते म्हणाले, “आज महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराने निर्धार केला आहे की यावेळी महाविकास आघाडीचं सरकार राज्यात निवडून यावं. आमच्या हक्काचे सरकार सत्तेत आणण्यासाठी कल्याण पूर्व मतदारसंघातील जनतेने महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय बोडारे यांना मतदान करावे. त्यामुळे विधानभवनात भगवा फडकेल आणि शिवसेनेचा आवाज बुलंद होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. या सभेला शिवसेना संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, कल्याणचे शहरप्रमुख शरद पाटील, दिलीप मालवणकर, प्रकाश तरे, शेखर यादव, रोहित साळवे, अंजली साळवे, वसुधा बोडारे, सुरेंद्र सावंत, राजेंद्र शाहू, कैलास तेजी, जया तेजी, बापू सावंत, मंगला पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपास्थित होते. परिसरातील सर्व शिवसैनिकांनी सभा यशस्वी करण्यासाठी आपले योगदान दिले. शिवसैनिक, महिला आघाडी व हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सभेत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. सभेच्या अखेरीस जनतेने धनंजय बोडारे यांना विधानसभेत पाठवण्याची शपथ घेऊन निश्चय व्यक्त केला.

नजीब मुल्ला यांच्या समोरील घड्याळाचे बटन दाबून त्यांना विजयी करा – खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

अनिल ठाणेकर ठाणे : आपण महायुतीमधून लढतो आहोत, महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना निवडून द्यायचे आहे. वेळ बदल घडविण्याची आहे. मतदारसंघातील वेळ बदलायची आहे, चांगली वेळ आणायची असेल तर नजीब मुल्ला यांच्या समोरील घड्याळाचे बटन दाबून त्यांना विजयी करा, असे आवाहन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मतदारांना केले.तर क्लस्टर डेव्हलपमेंट-रीडेव्हलपमेंट होणार, सुसज्ज रस्ते करणार, कळवा, खारीगाव, पारसिक नगर परिसराचा विकास करणार असे आश्वासन मतदारांना १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी दिले. नजीब मुल्ला यांची प्रचार सभा खारेगाव येथील जय भारत स्पोर्ट्स क्लब च्या पटांगणात आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, विभागप्रमुख शाम पाटील,  शहरप्रमुख नरेंद्र शिंदे, माजी नगरसेवक उमेश पाटील, मनोज लासे,विजया लासे,अनिता गौरी, गणेश कांबळे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वनिता गोतपागर, शिवसेना पदाधिकारी राकेश पाटील, रचना पाटील, सुनील पाटील, सुनील गौरी आदी पदाधिकारी तसेच मोठ्यासंख्येने मतदार उपस्थित होते. नजीब मुल्ला यांच्या रुपाने एक आश्वासक चेहरा मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून महायुतीने दिलेला आहे. ठाणे महापालिकेतील कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.मतदारांनी लोकप्रतिनिधी निवडून देताना खासदार, आमदार,…

प्रताप सरनाईक यांना विविध संस्था – समाज संघटनांचा पाठिंबा जाहीर

अनिल ठाणेकर ठाणे : ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार   शिवसेना , भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस , आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रताप सरनाईक यांना मतदारसंघातील विविध संस्था , समाज…

फेसबुक व इन्स्टाग्राम अकाऊंटधारकावर गुन्हा दाखल

आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या ठाणे : समाजात जातीय तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचा मजकूर समाजमाध्यमांवर पोस्ट करणाऱ्या “आमची मुंबई” या फेसबुक व इन्स्टाग्राम अकाऊंटधारकांविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी 145 मिरा भाईंदर…

ठाण्यातील खोपट बसस्थानकावरील प्रवाशांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

ठाणे : लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्ज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वांनी न चुकता दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहन खोपट परिसरातील बसस्थानकावर करण्यात आले. 148 ठाणे विधानसभा मतदारसंघात निवडणूकविषयक मतदार जनजागृती व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खोपट परिसरातील बसस्थानकावर मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या जनजागृती मोहिमेत बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाचे मतदान जनजागृतीबाबत लावण्यात आलेले मोठे फलक हे प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी स्वीपच्या पथकाने बसस्थानकावरील प्रवाशांना मतदानाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमात ठाणे परिवहन बसस्थानक येथील सर्व अधिकारी, कर्मचारी व प्रवासी सहभागी झाले होते. यावेळी ‘मतदान जनजागृती’विषयक “माझं मत माझा अधिकार”, “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” आणि “जागरूक मतदार लोकशाहीचा आधार” या घोषणा सर्व प्रवाशांनी मोठ्या आवाजात सामूहिकपणे दिल्या.

मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

ठाणे : विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदारयादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य…

मतदानपूर्व आणि मतदान दिवशीच्या जाहिरातींना ‘एमसीएमसी’चे प्रमाणिकरण बंधनकारक

ठाणे : कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दि.20 नोव्हेंबर 2024 मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच…

निवडणूक विशेष पोलीस निरीक्षकांनी घेतला कोकण विभागाचा आढावा

ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठीची मतदान प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकण विभागातंर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांच्या तयारीचा आढावा आज निवडणूक विशेष पोलीस निरीक्षक दीपक मिश्रा यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीदरम्यान घेतला. निवडणूकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून या कर्तव्यात कोणतीही कसूर राहणार नाही. या दृष्टीने विधानसभा सार्वत्रिक निवडणूका शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस प्रशासन यांनी सतर्क राहण्याचे आदेश देत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या. आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विशेष पोलीस निरीक्षक यांनी कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांतील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी पालघर, रायगड, रत्नागिरी, ‍सिंधुदूर्ग येथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी हे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. सुरूवातीला ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी ठाणे जिल्हयातील 18 विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रे, मतदानाची तयारी याबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली. तसेच कोकण ‍विभागातंर्गत इतर जिल्ह्याबाबतही त्यांनी जाणून घेतले. ‍प्रत्येक जिल्हयात तयार करण्यात आलेल्या कंट्रोल रुमच्या माध्यमातून मतदानाच्या एक दिवस आधी 19 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रियेची अभिरुप चाचणी घेण्यात यावी, जेणेकरुन मतदानाच्या दिवशी येणाऱ्या संभाव्य अडचणी टाळता येतील.‍ मतदान केंद्रावर मतदानासाठी येणारे उमेदवार हे मतदान झाल्यानंतर मतदान केंद्राच्या बाहेर 100 मीटर परिसरात रेंगाळणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असे श्री.मिश्रा यांनी नमूद केले.  मतदान केंद्रावर येणाऱ्या वयोवृद्ध मतदारांसाठी जास्तीत जास्त व्हीलचेअर उपलब्ध करण्यात याव्यात, जेणेकरुन मतदारांना मतदान केंद्रावर ताटकळत उभे रहावे लागणार नाही, यासाठी आपल्या विभागातील रुग्णालय, सेवाभावी संस्थांशी संपर्क साधून व्हीलचेअरची पुरेशी उपलब्धतता प्रत्येक मतदान केंद्रावर करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. एखाद्या मतदान केंद्रावर मशीनमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण होवून मतदान प्रक्रिया थांबली किंवा अन्य काही अडचण उद्भवली तर त्याचे वृत्त हे दिवसभर विविध वाहिन्यांवर दाखवले जाते. त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाल्यावरसुध्दा ती बातमी तशीच सतत सुरू असते याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी ‍याबाबतची माहिती घेवून संबंधित वाहिन्यांशी संपर्क साधून वस्तूस्थिती तात्काळ कळविण्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, जेणेकरुन निवडणूक विभागाची बदनामी होणार नाही, या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही श्री.दीपक मिश्रा यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व ठिकाणी भरारी पथकाच्या माध्यमातून सुरू असलेली वाहनांची तपासणी देखील काटेकोरपणे करण्याचे निर्देश निवडणूक विशेष पोलीस‍ निरीक्षक दीपक मिश्रा यांनी पोलीस प्रशासनाला दिले. ‍कोकण विभागातील सर्व जिल्हयांची मतदानाची तयारी ही अंतिम टप्प्यात असून एखादी समस्या उद्भवल्यास तात्काळ निवडणूक आयोगाशी समन्वय साधावा असे नमूद करीत त्यांनी निवडणूका ‍नि:पक्षपातीपणे व निर्भयपणे पार पाडण्यासाठी सर्व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

मतदानाकरिता मतदान यंत्रे तयार करण्याची प्रक्रिया

 जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील चार मतदारसंघात पार पडली ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतदानाकरिता लागणारी मतदान यंत्रे मतदानाकरिता तयार करण्याची प्रक्रिया…

ठाणे जिल्ह्याच्या प्रचारातून वाहतूक कोंडीचा मुद्दाच हरवला

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात हजारो कोट्यवधी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सार्वजनिक वाहतुकीचे राष्ट्रीय प्रकल्प उभारले जात असले तरी जिल्ह्यातील प्रामुख्याने कल्याण ग्रामीण आणि पश्चिम, डोंबिवली, ठाणे शहर, भिवंडी ग्रामीण आणि पश्चिम याचबरोबर शहापूर या विधानसभा मतदारसंघांमधील अंतर्गत आणि बाह्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या जटील आहे. परंतु विधानसभा निवडणूक रिंगणात उतरलेले आणि स्वतःला भावी आमदार म्हणून भूषण मिरवणाऱ्या सर्व उमेदवारांनी वाहतूक कोंडीच्या मुद्द्याला प्रचारात पूर्णपणे बगल दिली आहे. यामुळे ठाणे जिल्ह्याच्या प्रचारातून वाहतूक कोंडीचा मुद्दाच हरवला असल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वच उमेदवारांकडून निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. यंदा जवळपास सर्वच पक्षातील उमेदवारांकडून मोठी विकासकामे, आर्थिक मदतीची घोषणा, महापुरुषांची स्मारके तर विविध समाजासाठी भव्य वास्तू यांसारख्या अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रश्न असलेल्या आणि दिवसेंदिवस अधिक त्रासदायक होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या विषयाला सर्वच उमेदवारांनी आपल्या प्रचार मुद्द्यातून बगल दिली असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे जिल्ह्यात मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई – बडोदा राष्ट्रीय महामार्ग, मालवाहतुक विशेष रेल्वे मार्ग, ऐरोली – काटई उन्नत मार्ग, कल्याण रिंग रोड यांसारखे काही हजार कोटी…