Category: ठाणे

Thane news

साहेब जातात कधी याची वाटच अजित पवार पाहत आहेत,

आमदार जितेंद्र आव्हाड यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप   ठाणे : ९० वर्षांचे वडील रुग्णालयात बिछाण्यात पडले असताना लोक उधारी काढून रुग्णालयाचे देयक भरतात आणि वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न करतात.…

मलंगगड परिसरात सुलभा गायकवाड यांच्या प्रचाराचे फलक फाडले

कल्याण – कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचाराचे फलक काही अज्ञात इसमांनी फाडून टाकले आहेत. याप्रकरणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. प्रचाराच्या वीस…

नरेश मणेरांसाठी भास्कर बैरीशेट्टी यांची शिवाईनगर परीसरामध्ये प्रचार पदयात्रा

अनिल ठाणेकर ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नरेश मणेरा यांच्या निवडणुक प्रचारार्थ निष्ठावंत शिवसैनिक सरसावलेत, अशी माहिती शिवसेना उबाठा पक्षाचे ओवळा माजीवडा विधानसभा…

निष्ठा हीच प्रतिष्ठा – मनोज शिंदे

अनिल ठाणेकर ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेले काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार मनोज शिंदे यांनी ‘निष्ठा हीच प्रतिष्ठा’ हा नारा देत आपल्या…

रविवारी ४२ वी आनंद श्री शरीरसौष्ठव स्पर्धा

ठाणे : श्री आनंद भारती व्यायामशाळेच्या विद्यमाने रविवार,१७ नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्हास्तरीय ४२ व्या आनंद श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने हि स्पर्धा…

 मतांच्या जोगव्यासाठी राजन विचारेंची भाजप कार्यालयात पायधूळ,

 एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक नारायण पवार यांची घेतली भेट   ठाणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येताच उमेदवारांनी राजकीय खेळी खेळण्यास सुरूवात केली असून अशाचप्रकारे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार राजन विचारे यांनी प्रचारादरम्यान एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक आणि भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची घेतली. या भेटीची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. यानिमित्ताने मतांच्या जोगव्यासाठी विचारे यांनी भाजप कार्यालयात पायधूळ केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार संजय केळकर, शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार राजन विचारे आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यासह इतर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. असे असले तरी या तीन उमेदवारांमध्येच खरी लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. या तिरंगी लढतीमुळे येथे अटीतटीचा सामना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेणे, प्रभाग फेरीदरम्यान मतदारांच्या भेटी घेणे, स्थानक परिसरात प्रचार फेरी काढणे, प्रचार रॅली काढणे, पक्षातील नेत्यांच्या चौक आणि जाहीर सभा घेणे, यावर तिन्ही उमेदवारांकडून भर देण्यात येत आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने तिन्ही उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढविला असून त्याचबरोबर राजकीय खेळी खेळण्यास सुरूवात केल्याचे चित्र आहे.अशाचप्रकारे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार राजन विचारे यांनी प्रचारादरम्यान एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक आणि भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची घेतली असून त्याचे चित्रफित समाजमाध्यांवर प्रसारित झाली आहे. पाचपाखाडी येथील सिद्धेश्वर तलाव परिसरात ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा प्रभाव रहिला आहे. पॅनल पद्धतीमध्ये हा परिसर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या चंदनवाडी परिसराला जोडण्यात आला आहे. २०१७ च्या निवडणुकीत पवार यांच्या पॅनलने विचारेंचे पुतणे मंदार विचारे यांचा पराभव केला. तसेच नारायण पवार हे पूर्वी पाच वेळा काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले असून गेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढली आणि या निवडणुकीत ते निवडून आले. नारायण पवार हे काँग्रेस पक्षात होते, तेव्हापासून पवार आणि विचारे यांच्यात राजकीय वैर आहे. हे दोघे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राहिलेले आहेत. असे असतानाच, विचारे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतल्याने मतांच्या जोगव्यासाठी राजन विचारेंची भाजप कार्यालयात पायधूळ केल्याची चर्चा रंगली आहे. या संदर्भात राजन विचारे यांच्याशी संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. कोंट ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांची प्रचार फेरी रायगड गल्ली परिसरातून जात होती. त्यावेळी मी कार्यालयात बसलेलो होतो. अचानकपणे विचारे हे माझ्या कार्यालयात आले आणि त्यांनी माझी भेट घेतली. परंतु आम्ही आमचे उमेदवार संजय केळकर यांचा जोरदार प्रचार करीत असून ते चांगल्या मताधिक्याने विजयी होतील. – नारायण पवार, माजी नगरसेवक,

आमदार प्रताप सरनाईक यांना विविध समाजाचा पाठिंबा

अनिल ठाणेकर ठाणे : ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार – शिवसेना , भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस , आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रताप सरनाईक यांना मतदारसंघातील विविध संस्था , समाज घटक , सामाजिक संस्था यांचा पाठींबा दरदिवशी वाढत आहे. गेल्या १५ वर्षात झालेली प्रचंड विकासकामे आणि पुढील ५ वर्षाचे संकल्प पत्र पाहता आमदार सरनाईक यांचा विजय निश्चित असून त्यांना ठाणे – मीरा भाईंदर मधील यादव समाज तसेच , अल्पसंख्याक संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. यावेळी प्रताप सरनाईक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आहे , असा निर्धार यावेळी करण्यात आला. ‘सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास’ हे सूत्र घेऊनच आमदार सरनाईक यांनी आजवर विकासाची कामे सर्वाना सोबत घेऊन केली असल्याने त्यांना व्यापक जन समर्थन मिळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. यादव समाज या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात राहतो. विशेष म्हणजे ‘फेक नॅरेटिव्ह’मुळे यातील काही लोक लोकसभा निवडणुकीत हे महाविकास आघाडीसोबत गेले होते. पण आता त्यांनी शिवसेना – भाजप महायुतीला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांची विकासकामे दिसत आहेत आणि त्यांची प्रभावी कार्यशैली , मतदारसंघातील जनतेशी त्यांचा असलेला थेट संपर्क यामुळे आम्ही त्यांना समर्थन देत आहोत व त्यांच्या सक्रिय प्रचारात उतरायचे ठरवले आहे , आमचे प्रत्येक मत हे आमदार प्रताप सरनाईक यांना मिळणार आहे , असे यादव समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.प्राचीन काळात माणसाच्या जीवनात गायीचं अद्वितीय महत्त्व होतं. वैदिक काळात गायींना धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळे गायीला कामधेनूही म्हटलं गेलं. राज्यातील विविध भागात गायीच्या विविध प्रजाती आढळतात. गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी घेण्यात आला व तसा शासन निर्णयही लगेच प्रसिद्ध करण्यात आला होता. भारतीय परंपरेत गायीला प्रचंड महत्त्व आहे. त्याचा हवाला देऊनच सरकारने हा निर्णय घेतल्याने यादव समाज हा खुश आहे. या निर्णयाने यादव समाज आणखी प्रभावित झाला. राज्य सरकार व आमदार सरनाईक यांच्या विकासकामांचा धडाका यामुळे आम्ही यादव समाज आमदार सरनाईक यांना एक गठ्ठा मतदान करणार , असेही पदाधिकारी म्हणाले.आमदार प्रताप सरनाईक यांनी मतदारसंघात लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना सर्व समाज घटकांना सोबत घेऊन काम केले आहे. कोणताही भेद त्यांनी केला नाही. सर्व समाजघटकांसाठी त्यांनी विकासाची अनेक कामे केली आहेत.  त्यामुळे सर्व समाजातून त्यांना समर्थन , पाठींबा मिळत आहे. गेल्या १५ वर्षात आमदार प्रताप सरनाईक यांनी संपूर्ण मतदारसंघात चौफेर विकास केला आहे. ठाणे – मीरा भाईंदर मेट्रो , सूर्या पाणी योजना , नाट्यगृह , कॅशलेस हॉस्पिटल , सिमेंट काँक्रीटचे रस्ते , विविध समाज भवने , चांगली उद्याने ,  चौपाटी विकास यासह असंख्य विकास कामे झाली आहेत. प्रत्येक समाज घटकासाठी झालेली विकासकामे व त्यांचा दांडगा जनसंपर्क या जोरावर त्यांचा विजय निश्चित आहे. अल्पसंख्याक बांधवांसाठीही विकासाची कामे झालेली आहेत. त्यामुळे विविध अल्पसंख्याक समाजाच्या संघटनांनी आमदार सरनाईक यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंब्रा-कळव्याच्या विकासासाठी नजीब मुल्ला यांना विजयी करा – धनंजय मुंडे

अनिल ठाणेकर ठाणे : कळवा मुंब्र्यातील विधानसभा निवडणुकीतील ही लढाई गुरु शिष्याची लढाई नाही तर योग्य-अयोग्यची लढाई आहे, सत्य-असत्याची लढाई आहे, धर्म-अधर्माची लढाई आहे, नजीब मुल्ला यांची ही लढाई लढण्यासाठी मी अर्जुन बनून आलो आहे. मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी नजीबभाईला निवडून आणण्याची ही योग्य वेळ आहे. येत्या २० तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून नजीबभाईला विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांनी मतदारांना केले. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ शमशाद नगर, मुंब्रा येथे मंत्री धनंजय मुंडे यांची जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीरसभेला मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यातही महिलांची संख्या लक्षणीय दिसत होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माजी नगरसेवक राजन किणे, अनिता किणे, मोरेश्वर किणे, रुपाली गोटे, आशरीन राऊत, इब्राहिम राऊत, अजिज शेख, राजू अन्सारी, जफर नोमानी, मनिषा भगत, नेहा नाईक, संगिता पालेकर, ठाणे महिला जिल्हाध्यक्ष वनिता गोतपागर, युवक जिल्हाध्यक्ष विरु वाघमारे, रिदा रशीद, शर्मिला किणे,राजा सूर्यवंशी, नसीम खान, काळूराम पाटील, दत्तुमामा आदी मान्यवर उपस्थित होते. जे स्वतःला लोकांपेक्षा मोठे समजतात, भगवान, ईश्वर, अल्लापेक्षाही मोठे समजतात त्यांना त्यांची जागा दाखवायची हीच योग्य वेळ आहे.कळवा मुंब्र्याची ही लढाई गुरु शिष्याची लढाई नाही तर योग्य-अयोग्यची लढाई आहे, सत्य-असत्याची लढाई आहे, धर्म-अधर्माची लढाई आहे, नजीब मुल्ला यांची ही लढाई लढण्यासाठी मी अर्जुन बनून आलो आहे. जितेंद्र आव्हाड हा माणूस दुतोंडी आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भाजप बरोबर जाण्यासाठी पत्रकावर सही केली होती. सही करताना विधान परिषदेची मागणीही आव्हाड यांनी केली होती. पण नंतर दादाच्या भितीने सही केली अशी पलटी मारली. टोरन्ट कंपनीकडून इलेक्ट्रिकचा पैसा खाणाऱ्याला पराभूत करा मग मीही टोरन्ट कंपनीला ठेवणार नाही असे वचन देतो. लाडक्या बहिणींना महायुती सरकारने मासिक १५०० मानधन सुरु केल्यावर त्याविरोधात बोलणारे महाविकास आघाडीने आता महिलांना तीन हजार रुपये देम्याचे जाहीर केले आहे.पण ज्या कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश येथून ही कल्पना आणली तेथील निवडणूका संपल्यावर तीन हजार रुपये देण्याची योजना बंद झाली आहे.महाराष्ट्रतही माताभगिनींची महाविकास आघाडीकडून अशीच फसवणूक होवू शकते. मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी नजीबभाईला निवडून आणण्याची हीच योग्य वेळ आहे. येत्या २० तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून नजीब मुल्ला यांना विजयी करा, असे आवाहन मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. चौकट जितेंद्र आव्हाड म्हणतात मला निवडून द्या, मी महिन्याभरात टोरन्ट पाॅवर घालवतो. मंत्री, आमदार असताना टोरन्ट का घालवले नाहीत उलट टोरन्टला चार्ज देतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. मुंब्रा कळव्यातील मतदारांच्या मतांवर आमदार होऊनही थोड्याश्या पैशासाठी मतदारांचे पाकिट मारुन जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःचे घर भरले आहे. यामुळेच टोरन्ट पाॅवर हटविण्यासाठी विद्यमान आमदाराचा पराभव करून मला निवडून द्या असे आवाहन नजीब मुल्ला यांनी केले. 0000

संजय केळकरांना तेली व नामदेव शिंपी समाजाचा पाठिंबा

अनिल ठाणेकर ठाणे : संजय केळकर यांनी समाजातील सर्व घटकांसाठी आजवर भरीव कार्य केले असून ते एकनिष्ठ व एकवचनी आमदार म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांच्या या कार्यामुळे विधानसभा निवडणुकीत तेली समाजसह नामदेव शिंपी समाजाने त्यांना पाठिंबा दिला आहे. ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात तिसऱ्यांदा विजयाची हट्रिक करण्यासाठी भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून संजय केळकर रिंगणात उतरले आहे. मॉर्निंगवॉक, चौक सभा, प्रचार दौरे यामध्ये केळकर यांनी खऱ्या अर्थाने प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना समर्थन देणाऱ्या संस्था आणि नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. त्यानुसार ठाणे शहर विधानसभेचे आमदार म्हणून काम करत असताना केळकर यांनी सर्व सामान्यांमधील अगदी कुठल्याही समाजाच्या किंवा अतिसामान्य व्यक्तिला तसेच कुणासही तितक्याच तन्मयतेने महत्व देता व त्याला कुठल्याही प्रकारे मदत करण्यास तत्परतेने अगदी घरातीलच व्यक्ती असावी असे रात्री अपरात्री सुध्दा धावून जात असतात. केळकर यांच्या याच कार्यशैलीमुळे व पक्षासोबत एकनिष्ठ, एकवचनी दोनवेळा विधानसभा आमदार म्हणून निवडून आला आहात. तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून विधासनसभेत पाठविण्यासाठी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे ठाणे शहरातील सर्व समाज व ज्ञातीमधील सर्व बंधू-भगिनी आपणास पाठिंबा व्यक्त करून या लेखी निवेदनाद्वारे आपणांस सुयश चिंतून आपण पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून यावेत म्हणून शुभेच्छा प्रकट करीत असल्याचे पाठिंबा पत्रात म्हंटले आहे. तर दुसरीकडे तेली समाजाने देखील केळकर यांचे समाजातील कार्याची दखल घेत, त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

ठाणे जिल्ह्यात ‘पिपाणी’मुळे ‘तुतारी वाजविणाऱ्यां’ची डोकेदुखी ?

ठाणे : लोकसभा निवडणूकांमध्ये तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर राष्ट्रवादीने (शरद पवार गट) निवडणूक लढविली होती. परंतु या निवडणूकीमध्ये ‘तुतारीवाजविणारा माणूस’ या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या चिन्हासोबत ‘ट्रम्पेट’ या चिन्हाला देखील भरमसाठ मतदान झाले. ‘ट्रम्पेट’ला प्रचलित भाषेत ‘पिपाणी’ म्हटले जाते. या पिपाणी चिन्हामुळे शरद पवार गटाला अनेक जागांवर फटका बसला होता. ठाणे जिल्ह्यात आता विधानसभा निवडणूकीसाठी शरद पवार गटाने पाच उमेदवार उभे केले आहेत. या पाचही उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आता पिपाणीमुळे तुतारी वाजविणाऱ्यांची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण १८ विधानसभेच्या जागा आहेत. महाविकास आघाडीने येथील मुंब्रा कळवा, शहापूर, उल्हासनगर, बेलापूर आणि मुरबाड या मतदारसंघात महायुतीसमोर उमेदवार उभे केले आहेत. यातील मुंब्रा कळवा मतदारसंघात…