Category: ठाणे

Thane news

पुण्यातील शाळा क्षेत्रीय स्तरावर जाणार

भारत विकास परिषदेच्या प्रांतीय समुहगान स्पर्धा संपन्न पुणे : भारत विकास परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतीय समुहगान स्पर्धेत पुण्यातील एसपीएम इंग्रजी माध्यम शाळेने पहिला क्रमांक पटकावला असून या शाळेचा विजयी संघ आता भारत विकास परिषदेतर्फे होणाऱ्या समुहगान स्पर्धेत पुढच्या क्षेत्रीय फेरीसाठी बडोद्याला जाईल. स्पर्धेचे उद्घाटन करताना विख्यात उद्योजक उमेश राठी म्हणाले की समूहगान घेण्याचा उद्देष हा विद्यार्थ्यांयंमध्ये संघ भावना (टीम स्पिरिट) निर्माण करणे हा असून संस्कारक्षम वयात देशभक्ती रुजवणे हाही एक हेतू यातून साध्य होत असल्याने या स्पर्धेचे महत्व निराळेच आहे. प्रमुख पाहुणे दत्ताजी चितळे या वेळी म्हणाले की या स्पर्धांचा इतिहास हा लक्षणीय असून पुण्यातून निवडून गेलेले संघ क्षेत्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरही चमकल्याची अनेक उदाहरणे आहेत. दोन्ही पाहुण्यांनी सर्व संघांना भरूपर शुभेच्छा दिल्या. भारत विकास परिषद दरवर्षी संस्कृत व हिंदी भाषेतील देशभक्तीपर समुहगीत गायनाच्या स्पर्धा भरवते. विविध शाखांतर्फे राज्याच्या सर्व भागात होणाऱ्या स्पर्धांच्या पहिल्या फेरीत विजयी झालेले संघ प्रांतीय स्तरावरील स्पर्धेत दाखल झाले होते. एकूण बारा संघांनी यात सहभाग नोंदवला होता. कर्वे शिक्षण संस्थेच्या सभागृहात या पश्चिम महाराष्ट्र प्रांतस्तरीय स्पर्धा पार पडल्या. भारत विकास परिषदेच्या कोथरूड शाखेने स्पर्धेचे यजमानपद सांभाळले. या स्पर्धेत नासिक येथील विस्डम हाय इंटरनॅशनल शाळेने दुसरा तर पुणे येथील भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यम शाळेने तिसरा क्रमांक पटकावला. भारत विकास परिषद संपर्क, सहयोग, सेवा, संस्कार आणि समर्पण या पंचसूत्री वर काम करते. यात संस्कार या सुत्रला अनुसरून शाळांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यात प्रामुख्याने राष्ट्रभक्ती पर सामुहगान, भारत को जानो (प्रश्नमंजुषा) आणि गुरू वंदन छात्र अभिनंदन असे कार्यक्रम घेतले जातात. संगीत क्षेत्रातील जाणकार सुश्री घुगरी, राजे व साठे यांनी परीक्षक म्हणून कम केले. सुश्री मंजुषा चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर श्री शाम उकिडवे यांनी आभारप्रदर्शन केले. 0000

 यशवंत सेनेने शिंदे गटाचा पाठींबा काढला

 मुख्यमंत्र्यांवर धनगर समाज नाराज ठाणे: ‘धनगर आरक्षण व समाजाच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्हाला देखील तुमची गरज नाही’, असे सांगत धनगर समाजासाठी काम करणाऱ्या  यशवंत सेनेचे…

मित्रांचाही मित्र अजातशत्रू  बाळू कुडाळकर – डॉ साळगावकर

ठाणे : ‘बाळूचे व्यावहारिक नाव संतोष होते याचा आज अनेक मित्रांना शोध लागला. कुडाळकर कुटुंबीय चेंदणी कोळीवाड्याशी एकरूप झाले. क्रिकेटआणि समाजसेवा म्हणजे बाळूच्या जिवनाची दोन अविभाज्य अंगे होती.मित्रासाठी तन, मन…

स्वच्छता पंधरवडा मोहिमेत नागरिकांनी हिरीरीने सहभाग घ्यावा : नरेश म्हस्के

ठाणे :   प्रत्येकाने माझे घर, माझा परिसर, माझे गाव त्याचबरोबर माझे शहर देखील स्वच्छ राहिल असा  गुण  अंगीकारला पाहिजे तरच आपले शहर, राज्य व पर्यायाने देश स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. ठाणे महानगरपालिका…

घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सर्व यंत्रणा दक्ष

 महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पुन्हा घेतला कार्यवाहीचा आढावा   ठाणे : घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी समस्या सोडविण्यासंदर्भात तातडीची उपाययोजना करण्याबाबत सर्व प्राधिकरणाची बैठक पंधरा दिवसापूर्वी पार पडली होती, या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाली. या बैठकीस पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट,  तिरुपती काकडे, उपनगर अभियंता विकास ढोले, घोडबंदर रोडचे नोडल ऑफिसर आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच मेट्रोचे अधिकारी तसेच घोडबंदररोड परिसरातील नागरिक उपस्थित होते. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका व इतर प्राधिकरणांची यंत्रणा सातत्याने कार्यरत असून काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे व ही यंत्रणा यापुढेही अधिक गतिमानतेची काम करेल, या कामाची जबाबदारी ठाणे महापालिकेसह मेट्रो प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग हे सर्व समन्वयाने काम करत असून याबाबत महापालिका प्रशासन सातत्याने माहिती घेत आहे. तसेच नागरिकांकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा विचार करुन त्या तातडीने सोडविण्याची कार्यवाही सुरू आहे, यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने संबंधित प्रभागसमितीचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उपअभियंता हे देखील प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवून असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी या बैठकीत नमूद केले. घोडबंदर रोड अस्त‍ित्वात असलेल्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस रात्रीच्या वेळेस पुरेशा प्रमाणात प्रकाश उपलब्ध होईल या दृष्टीकोनातून लाईटस् बसविण्यात यावेत,  तसेच रस्त्यावर तुटलेल्या अवस्थेत असलेली चेंबर्सची दुरूस्ती करणे, खड्डे तातडीने बुजविणे आदी मागण्या यावेळी उपस्थित नागरिकांकडून करण्यात आल्या. याबाबत संबंधित यंत्रणांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या. 00000

नवरात्र उत्सव मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

कल्याण : सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध असलेली अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी…

बदलापूरच्या शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचे पोलिसांनी एन्काऊंटर केले होते. या झटापटीत जे दोन पोलीस जखमी झाले त्यांची राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला राज ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांच्या…

पावसामुळे मोदींचा पुणे दौर रद्द

पुणे :  पुण्यातील मुसळधार पावासमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.  मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार आहे. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही…

घराच्या छतावर वीज निर्मिती करून ६०० ग्राहक झाले स्वावलंबी

 पीएम सूर्यघर योजनेचा लाभ; ३४०० अर्जांवर प्रक्रिया सुरू ठाणे : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या भांडुप परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत ३ हजार ४०० जणांनी अर्ज केले आहेत. यातील ६०० ग्राहकांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित अर्जदारांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात येत आहेत. अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत पर्यावरणपूरक वीज निर्मितीसोबतच आपल्या मासिक वीजबिलात बचत करण्याचे आवाहन भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी केले आहे. या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. ही योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. सौर प्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य होते. शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३० हजार रुपये अनुदान २ किलोवॅटपर्यंत मिळते. ३ किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते. ३ किलोवॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे. गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरीता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसह सामाईक उपयोगासाठी १८ हजार रुपये प्रति किलोवॅट अनुदान मिळते. गृहसंकुलासाठी अनुदानाची एकूण कमाल मर्यादा ५०० किलोवॅट आहे. महावितरणतर्फे रुफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर देण्यात येत आहे. ग्राहक आणि सोलर रूफटॉप बसवणाऱ्या एजन्सींसाठी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे. त्याचप्रमाणे १० किलोवॅटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे.

आदिवासी विकास विभागातील राजपत्रित अधिकारी संघटना करणार कामबंद आंदोलन

ठाणे : आदिवासी विकास विभागातील विविध मागण्यांच्या अनुषंगाने कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आदिवासी विकास विभागातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी दिला आहे. आदिवासी विकास विभागातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत गेल्या दोन वर्षापासून…