Category: ठाणे

Thane news

पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले आहेत

श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांना टोला ठाणे : संजय राऊत यांच्या आरोपावर हसायचे  की रडायचे हेच समजत नाही. पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले आहे. असा टोला शिवसेनेचे कल्याणचे खासदार श्रीकांत…

ठाण्याच्या बाजारात पिवळा कलिंगड दाखल

ठाणे : उन्हाळा सुरू झाल्यावर रसाळ कलिंगडांना मागणी वाढते; परंतु बाजारात लालऐवजी पिवळी कलिंगडे दाखल झाली आहेत. ही पिवळी कलिंगडे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ही कलिंगडे चवीला गोड व…

संयुक्त कृती समितीच्या २५ लाख सभासदांचा महाविकास आघाडीला पाठिंबा – डॉ. डी.एल.कराड

उद्धव ठाकरे यांच्या भेटीत दिले १५ मागण्यांचे निवेदन अनिल ठाणेकर ठाणे : कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने १५ मागण्याचे निवेदन महाविकास आघाडीचे नेते व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…

कपिल मोरेश्वर पाटील यांच्याकडून राज ठाकरेंची सदिच्छा भेट

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान…

वांगणीत पाण्यासाठी आदिवासींचा आक्रोश

बदलापूर : प्रधानमंत्री आवास योजना, हर घर जल, हर घर नल अशा अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकार गावागावात पोहचवत आहेत; मात्र कासगाव-गोरेगाव या दोन्ही गावात सरकारच्या ‘हर घर जल, हर घर नल’ या योजनेच्या कामावर ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांनीच माती टाकली आहे. त्यामुळे आता पाण्यासाठी वांगणीतील आदिवासी बांधव आणि ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून आक्रोश करण्याची वेळ आली आहे. जलजीवन मिशनच्या ‘हर घर जल, हर घर नल’ या योजनेअंतर्गत कासगाव व गोरेगाव येथील साधारण दोन हजार ग्रामस्थांच्या पाणी समस्येवर उपाय म्हणून २०२२ मध्ये या कासगाव येथे नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे पाण्याच्या टाकीपासून गावापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी एक कोटी ९८ लाख ५८ हजार म्हणजे जवळपास दोन कोटींच्या कामाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. अंबरनाथ ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या माध्यमातून कामाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. त्यानंतर संबंधित कामाचा ठेका हा मे. लीना पांडुरंग पाटील या ठेकेदाराला देण्यात आला. तसेच साहाय्य संस्था म्हणून एम.जे.एस. प्रायव्हेट लिमिटेड इंडिया या कंपनीने सहकार्य केले आहे. हे काम २९ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र अद्यापही पूर्ण झालेले नाही. उल्हास नदीच्या किनाऱ्यावरच जुन्या पाण्याच्या टाकीच्या शेजारी नवी पाण्याची टाकी उभारण्यात आली. या टाकीतून गावागावात नळ योजना देण्यासाठी मोठमोठे पाईप टाकीला जोडून जमिनीच्या आतून गावागावात पोहोचवण्यात आले; मात्र बांधलेली नवीन टाकी आजही अपूर्णावस्थेत असून त्या टाकीचे अजिबात खोलीकरण केलेले नाही. त्यात टाकीवर छप्परच बसवलेले नाही. त्यामुळे मोकळ्या पाण्यात जीवजंतू पडण्याचा धोका आहे; मात्र तरीदेखील पाणी नळातून सोडण्यास सुरुवात झाली; पण असे होऊनही ग्रामस्थांच्या नळाला पाणी काही येत नाही. या सगळ्या कामात संबंधित ठेकेदार आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी अक्षरशः ग्रामस्थांच्या मूलभूत प्रश्नांची हेळसांड केल्याचा आरोप करण्यात येत आहे. कामाची पाहणी करण्यासाठी अंबरनाथ पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी शेख आले होते; मात्र त्यांनी यावेळी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. अर्ध्या फुटावरच जलवाहिनी काही महिन्यांपूर्वी गावकऱ्यांनीच टाकीतून पाणीपुरवठा करणारे पाईप जमिनीतून कशाप्रकारे सोडले आहेत हे पाहण्यासाठी जमीन खोदली. यावेळी गावकऱ्यांच्या असे निदर्शनास आले की हे पाईप जवळपास अर्धा ते एक फूट इतक्याच खोलीवर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे टाकीतले पाणी पाईपमधून पुढे जात नाही. साधारण ही जलवाहिनी जमिनीपासून चार ते पाच फूट खोल टाकण्यात येणे आवश्यक होते; मात्र अर्धा ते एक फूट खोल असणाऱ्या या वाहिनीतून पाणी येणार कसे, असा प्रश्न ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारला आहे. ठेकेदार व ग्रामस्थांमध्ये वाद संबंधित ठेकेदार व प्रशासनाने कानाडोळा केल्याने ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी ठेकेदार व संबंधित कर्मचाऱ्यांसमोर पाण्यासाठी आक्रोश करत जाब विचारला. यावेळी ठेकेदार व ग्रामस्थांची बाचाबाचीदेखील झाली. हर घर जल योजनेचे काम अपूर्णावस्थेत असल्याने आम्ही पाण्यासाठी असेच तडफडत आयुष्य जगायचं का, असा प्रश्न या ग्रामस्थांनी विचारला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार, राजकीय नेते मतदारसंघातील सामान्य व दुर्लक्षित अशा घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न का करत नाहीत, आमच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी सरकार व प्रशासन उदासीन का आहे, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. मी कासगाव या गावातील ग्रामस्थ असून मागील अनेक वर्षांपासून शासनाच्या हर घर जल, हर घर नल या योजनेचा पाठपुरावा करत आहे. या योजनेअंतर्गत कासगाव या ठिकाणी मोठा घोटाळा झाला आहे. मंजूर झालेल्या दोन कोटींच्या कामांची पाहणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी, तसेच ही योजना अपूर्णावस्थेत असून जे काम झाले आहे ते दर्जाहीन आहे. अनेकदा माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करूनही या कामाच्या संदर्भात, शासकीय कर्मचारी कोणतेही उत्तर देत नाहीत. त्यामुळे आम्ही जाब विचारायचा कोणाला, हा प्रश्न आम्हाला पडला आहे. -राकेश टेंबे, ग्रामस्थ, वांगणी

ठाकुर्लीतील सरकते जिने बंद

डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील सरकते जिने बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत आहेत; मात्र स्थानकातील सरकते जिने बंद असल्याने उन्हातून थकलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकातील जिने चढून जावे लागत आहे. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या भागात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली असून रहिवाशांची संख्या वाढली आहे. डोंबिवली स्थानकात होणारी गर्दी पाहता डोंबिवली, कल्याण पूर्व व ठाकुर्लीतील नागरिक ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून प्रवास करतात. या ठिकाणी पूर्वेला प्रवाशांच्या सोयीसाठी सरकत्या जिन्याची सोय केली आहे; मात्र हे सरकते जिने अनेकदा बंद असल्याचे दिसून येते. उन्हातून चालून आल्यानंतर अनेकदा जिने चढताना काहींना दम लागतो, श्वास फुलतो तसेच जिने चढून जाण्याची ताकद राहत नसल्याने प्रवासी सरकत्या जिन्याचा वापर करतात; मात्र रेल्वे स्थानकात पाऊल टाकताच हे बंद सरकते जिने त्यांची निराशा करतात. यामुळे नागरिक त्रस्त असून दुरुस्तीच्या नावाखाली अनेक दिवस हे जिने बंद ठेवले जातात असा आरोप प्रवाशी करतात. तसेच स्थानकातील सरकते जिने तत्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.

सुधागडात मोफत आरोग्य शिबिराचा दोनशेहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ

ठाणे-  रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी, डिस्ट्रीक्ट 3142 व सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुधागडात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन रविवार सुधागड तालुक्यातील कासारवाडी, नवघर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आले होते. यावेळी कासारवाडी, जाधववाडी, नवघर, आसरे, फळसुंडे, धोंडिवली, नवघर बौध्दवाडी, आसरे बौद्धवाडी, उंबरवाडी आदिवासी वाडी गावातील सुमारे 208 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेेतला. 208 रुग्णांपैकी 7 रुग्ण विविध आजारांनी ग्रस्त आढळले असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी ठाण्यात डॉ. बोडस यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार आहेत. सन 2000 सालापासून सुधागड तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीकडून सेक्रेटरी अमित देशपांडे, युवा व्यवस्थापक मोहन तेलंग, माजी अध्यक्ष संग्राम जोशी, अर्चना जोशी, ठाणे शहरातील नावाजलेले शल्य विशारद व सुधागड भूषण डॉक्टर श्रीपाद बोडस, डॉ. नीता पाटील  व रोटरॅक्ट आणि इंट्रॅक्टर्स यांची टीम, व मेडिकल सर्जिकल नर्सेस सोसायटीमधून प्रिया शिंदे, बाबा कराळे, प्रिया तळगावकर आदींच्या टीमने लहान मुले मुली, तरुण मुले, मुली, महिला व पुरुष, ज्येष्ठ महिला, ज्येष्ठ पुरुष यांची आरोग्य तपासणी करून विनामूल्य औषध उपचार करण्यात आले. संग्राम जोशी यांनी रुग्णांना विनामुल्य औषधे  उपलब्ध केली. तसेच या शिबिरासाठी प्रकल्प समन्वयक सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघ, ठाणे समन्वयक बळीराम निंबाळकर, उपाध्यक्ष वसंत लहाने, प्रचार व प्रसार कमिटी राजेश बामणे, अजय जाधव, भगवान तेलंगे, दत्ता सागळे, जाधववाडी गावचे दिनेश जाधव, कासारवाडी गावचे राजेश मांगले तसेच विशेष सहयोग कासारवाडी, जाधववाडी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, सह्याद्री मित्र मंडळ, कासारवाडी, प्राथमिक रा.जि.प. शाळा कासारवाडी आदींचे सहकार्य लाभले.

रिटेल केमिस्ट आणि होलसेल असोसिएशन झाले सक्रिय

मतदान जनजागृतीसाठी ठाणे : १५० ऐरोली विधानसभा मतदासंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाणे यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल सारंग, नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीप (Sveep) जनजागृती कार्यक्रमांतर्गत ११ एप्रिलला त्यांच्या दालनात आयोजित बैठकीस नवी मुंबई रिटेल केमिस्ट आणि होलसेल असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.  नवी मुंबई रिटेल केमिस्ट आणि होलसेल असोसिएशनच्या प्रतिनिधींना 150 ऐरोली विधानसभा कार्यक्षेत्रात आपल्यामार्फत मतदानासंदर्भात जनजागृती करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच असोसिएशन मार्फत जनजागृती करुन नागरिकांनाही मतदान करण्याबाबत प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

भाईंदर मध्ये स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी

भाईंदर : भाईंदरमध्ये दुरुस्ती कामादरम्यान घरातील स्लॅब कोसळून कंत्राटदार आणि कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हरिराम चौहान (५५) आणि मखनलाल यादव (२६) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भाईंदर पूर्व येथील ‘श्री नाथ ज्योती’ या इमारतीच्या तळ मजल्यावर राहणाऱ्या विनय कुमार त्रिपाठी यांच्या घरी अंतर्गत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचे कंत्राट त्यांनी हरिराम चौहान यांना दिले होते. दरम्यान रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास हे काम सुरु असताना किचन मधील पाण्याच्या टाकीला लागून असलेल्या भिंतीचा स्लॅब अचानक खाली कोसळला. या ढिगार्‍याखाली कंत्राटदार हरिराम चौहान आणि कामगार मखनलाल यादव व आकाश यादव अडकले होते. याबाबतची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळताच जवानांनी तिघांना ढिगार्‍यातून काढून रुग्णालयात हलवले. मात्र यात हरीनाम चौहान आणि मखनलाल यादव यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी सांगितले. तर आकाश यादव हा यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संरचनात्मक अहवाल सादर करण्याचे आदेश. भाईंदर मधील इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेतील इमारत ही पाच मजली असून ती फारच जुनी झाली आहे. त्यामुळे इमारतीचा संरचनात्मक अहवाल काढण्याचे आदेश मिराभाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर यांनी दिले आहेत.

डॉ.‌ बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हा परिषदेच्या सभागृहात अभिवादन

ठाणे : डॉ.‌ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी  जिल्हा परिषद ठाणे येथील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण विभाग प्रमुख संजय बागुल तसेच  समाज कल्याण विभाग, महिला व बालविकास विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.