Category: ठाणे

Thane news

उल्हासनगर महापालिकेने केली प्लास्टिक कारखान्यावर कारवाई,

९ मॅट्रिक टन प्लास्टिक जप्त उल्हासनगर : उल्हासनगर शहरात बंदी असलेल्या प्लास्टिक चे उत्पादन सुरु असुन बिनधास्तपणे प्लास्टिक च्या पिशव्या दुकानदार ठेवत आहेत. ही माहीती अतिरिक्त जमीर लेंगरेकर यांना मिळताच…

‘पाणी नाही तर मतदान नाही’

रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा…! कल्याण : कल्याण लोकसभेतील अंबरनाथ मध्ये पाण्याची टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यात ही समस्या जास्तच तीव्र झाली आहे. पाणी टंचाईच्या त्रासाला कंटाळून कानसई विभागातील…

पक्षाने संधी दिली तर लढणार-संजय केळकर

ठाणे : ठाणे लोकसभेच्या उमेदवारी वरून महायुतीत खलबत्ते सुरु आहेत. त्यात हि जागा कोणाकडे जाणार हे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप कडून या जागेवर…

प्रशासनाकडून होणाऱ्या जनजागृतीमुळे मतदानाच्या टक्केवारीत निश्चित वाढ होईल-उर्मिला पाटील

ठाणे : सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती. आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने,स्वीप पथक प्रमुख तथा सहायक आयुक्त श्री.सोपान भाईक यांच्या नेतृत्वामध्ये…

टीम ओमी कलानी वाटणार गरीब-अनाथांना दिड लाख वह्या

उल्हासनगर : युथ आयकॉन ओमी कालानी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महागड्या वस्तूंऐवजी नोटबुक्स गिफ्ट देण्याचे आवाहन उल्हासनगरातील हितचिंतकांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला असून ओमी यांना तब्बल दिड लाख नोटबुक्स…

हेमंत गोडसे यांनी कल्याणमध्ये घेतली श्रीकांत शिंदे यांची भेट

डोंबिवली : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात खासदार हेमंत गोडसे यांच्या नावासोबतच अजय बोरस्ते यांचे नाव चर्चेत आहे. अजय बोरस्ते यांनी…

ठाण्यावर भाजपाच्या केळकरांचा दावा !

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लोकसभा मतदार संघावर आता स्थानिक आमदार संजय केळकर यांनी दावा केला आहे. युतीत ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे होती. मात्र शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर…

वर्षभरात पावणेसतरा कोटीचा मालमत्ता कर जमा – पंकज पाटील

अशोक गायकवाड खोपोली : खोपोली नगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात तब्बल पावणेसतरा कोटींची वसुली केली असून, हा आजवरील सर्वाधिक वसुलीचा विक्रम आहे. मालमत्ता कर विभागाने गेले वर्षभर नियोजनबद्धरित्या वसुलीची रूपरेषा आखली होती. याचप्रमाणे खोपोलीकरांनी आपला मालमत्ता कराचा भरणा वेळेवर करून शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत हातभार लावावा, असे आवाहन खोपोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी केले आहे. अनेक वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी न भरलेल्या २४ थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी नळ कनेक्शन तोडण्यात आले. थकबाकीदारांच्या नावांची बॅनरद्वारे जाहीर प्रसिद्धी यासारखी कारवाई करण्यात आल्याने वसुलीत विक्रमी वाढ झाली. पालिकेच्या तिजोरीत ३१ मार्चअखेर १६ कोटी ७५ लाख रुपये जमा झाले आहेत. मालमत्ता कर विभागाचे गौतम भगळे, गजानन जाधव यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली एकूण २० कर्मचारी वसुली मोहिमेकरिता नेमण्यात आले होते. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व्यावसायिक मालमत्ता करधारकांडून पालिकेने वसुलीची थेट कारवाई सुरू केली. अनेक वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या २४ थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. मार्चनंतर देखील वसुलीची मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे.

महिला सक्षमीकरण कार्यक्रमातून समाजात चांगला संदेश : जगदीश तेजवानी

राजेंद्र साळसकर उल्हासनगर : समाजाच्या कल्याणासाठी अनेक सामाजिक संस्था सक्रिय भूमिका निभावतात, ज्यामध्ये मां काली चॅरिटेबल ट्रस्टचे प्रयत्न नेहमीच स्मरणात राहतील कारण ही संस्था गावोगावी काम करते आणि शाळा चालवण्याबरोबरच विधवा महिलांना पेन्शन, ज्योतिबा फुले योजना, पॅन कार्ड,आधार कार्ड देखील देते. पण हीच लिंक पुढे नेत ती समाजसेवा करत आहे, महिलांना रोजगार, शिक्षण आणि मुख्य म्हणजे महिला सन्मान आणि विधवा पेन्शन आणि साडी वाटप, ट्रॉफी देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व विद्यार्थ्यांना मेडल देऊन उद्घाटन केले. प्रत्येक शुभ सणाला ट्रस्टचे अध्यक्ष व शाळेने कार्यक्रमाच्या माध्यमातून गरजूंच्या पाठीशी उभे राहावे, असा संस्थेतर्फे सातत्याने प्रयत्न केला जात आहे. शिवप्रताप सिंह सांगतात की त्यांनी २०१८ पासून संघटना स्थापन केली आहे, तेव्हापासून जगदीश तेजवानी आणि राजन चंद्रवंशी त्यांना वेळोवेळी साथ देत आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उल्हासनगर भाजपा व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष जगदीश तेजवानी, महेश पुरस्वानी होते. माँ काली चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शिवप्रताप सिंह प्राचार्य  लतिका बिचकुंडवार, अशोक भंडारी, नितीन कडू, विवेक भदानी, दर्शन अहिरे, प्रमिला शर्मा, रितू यादव यांच्यासह शिक्षक, महिला, शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ठाण्यात आचारसंहितेचे उल्लंघन सुरूच

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहिता लागू असताना या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. ठाण्यातील अनेक ठिकाणी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या पक्ष कार्यालयांवरील पक्षाचे नाव, चिन्ह अद्यापही नियमानुसार झाकले नाही. भाजपने वर्तकनगर येथे कार्यालय स्थापन केले आहे. या कार्यालयावरील भाजपचे नाव ठळक अक्षरात दिसत आहे. टेंभीनाका भागातही असेच चित्र आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून त्यानुसार आता आदर्श आचारसंहिता देखील लागू झाली आहे. या आचारंसहितेचे पालन करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज संस्थामधील अधिकारी कार्यरत आहेत. या कालावधीत पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आचारसंहितेचे पालन करावे लागते. त्यासाठी मार्गदर्शकतत्त्वे लागू करण्यात आली आहेत. पक्ष कार्यालयावर नेते, पक्षाचे नाव, चिन्ह असल्यास ते झाकण्याच्या सूचना केल्या जातात. नियमानुसार काही नेते, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाची नावे झाकली आहेत. तर काही पदाधिकारी अद्यापही आचारसंहितेच्या नियमांचे पालन करताना दिसत नसल्याचे चित्र आहे. वर्तकनगर येथील रेमंड परिसरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी गुढीपाडव्या निमित्ताने भाजपच्या प्रशस्त कार्यालयाचे उद्घाटन केले. या कार्यालयावर भारतीय जनता पक्ष असे ठळक अक्षरांममध्ये लिहीण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठ्या आकारातील छायाचित्र प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आले आहे. उद्घटनाचा दुसरा दिवस उजाडल्यानंतरही दुपारपर्यंत या कार्यालयावरील नाव झाकण्यात आले नव्हते. अशाचप्रकारे चरई भागात शिंदे यांच्या शिवसेनेच्या टेंभीनाका-चरईच्या शाखाप्रमुखाचे कार्यालय आहे. या कार्यालयावरील फलक झाकण्यात आलेले नाही. या फलकावर शिवसेनेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र आहे. उथळसर येथे शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका माजी नगरसेविकेचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या दर्शनीभागाचे फलक झाकण्यात आले असले तरी एक दिशेकडून शिवसेना हे नाव स्पष्ट दिसत आहे. ठाण्यातील टेंभी नाका येथे आनंद आश्रमावर देखील पक्षाचे नाव आहे. आनंद आश्रमात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका, पत्रकार परिषद होत आहेत. असे असतानाही निवडणूक अधिकाऱ्यांकडून या बाबत कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या कार्यालयाबाबत येथील निवडणूक अधिकाऱ्यांना विचारले असता, संबंधित बाब निदर्शनास आल्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह झाकण्याचे कारवाई सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांना संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.