Category: ठाणे

Thane news

मुंबई, ठाणे, कल्याण, भाईंदर महानगरपालिकांना ७ मे रोजी अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

ठाणे : मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि मिरा भाईंदर महानगरपालिका यांना आणि महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव, जिल्हा न्यायदंडाधिकारी यांना मैला सफाई कामगारांचे सर्वेक्षण करण्याचे आणि सदर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या कामाचा व योजना राबविल्या असल्याचा रिपोर्ट येत्या ७ मे २०२४ रोजी सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी दिली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील गायत्री सिंह, सुधा भारद्वाज आणि संज्योत शिरसाठ यांनी न्यायालयात बाजू मांडली. सीवर डेथ प्रकरणी श्रमिक जनता संघाने दाखल करण्यात रिट याचिका क्र.१५७०/ २०२३ गमध्ये   मुंबई उच्च न्यायालयाने  पुन्हा १६ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना मानवी मैला सफाई प्रतिबंध कायदाच्या तंतोतंत अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.सीवर डेथ घडतात – संडासाच्या मैला टाक्या साफ करतांना सफाई कर्मचाऱ्यांना मरण येते  –  म्हणजे अजूनही The Prohibition of Employment as Manual Scavengers and Their Rehabilitation Act 2013 चे उल्लंघन होत आहे. सदर कायद्याच्या तरतुदीनुसार मानवी मैला सफाईच्या कामावर प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. परंतु वारंवार सीवर डेथच्या घटना घडत आहेत. ही अमानुष प्रथा बंद होण्यासाठी न्यायालयाने महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव, जिल्हा न्यायदंडाधिकारी यांना आणि मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि मिरा भाईंदर महानगरपालिका यांना मैला सफाई कामगारांचे सर्वेक्षण करण्याचे आणि सदर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या कामाचा व योजना राबविल्या असल्याचा रिपोर्ट येत्या ७ मे २०२४ रोजी सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी दिली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील गायत्री सिंह, सुधा भारद्वाज आणि संज्योत शिरसाठ यांनी न्यायालयात बाजू मांडली. महाराष्ट्र शासनाने राज्य निगराणी समिती (Monitoring Committee), दक्षता समिती (Vigilance Committee), राज्य स्तरीय सर्वेक्षण समिती, जिल्हा सर्वेक्षण समिती, उपविभागीय समित्या गठीत केलेल्या आहेत का? तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत? मैला सफाई कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांनी पुनर्वसन करण्यासाठी केलेले अर्ज आणि त्यावर झालेली अंमलबजावणी बाबतीतही रिपोर्ट सादर करण्याचे आदेश मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका आणि मिरा भाईंदर महानगरपालिका यांना या निकालात देण्यात आलेले आहेत. मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत वारंवार मलटाकी सफाई करतांना विषारी दुर्गंधीने गुदमरून मृत्यू कांड घडत आहेत. परंतु आजपर्यंत कुणाचेही पुनर्वसन करण्यासाठी शासनाने किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेतला नसल्याचा आरोप ही प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा सर्वेक्षण समिती नेमून वर्ष उलटून गेले आहे परंतु समिती सदस्यांनी मागणी करूनही बैठका घेतल्या जात नाहीत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत जून २०२३ मध्ये बंद दुषित गटार सफाई करतांना २२ वर्षीय आदिवासी तरुण ऋतिक कुरकुटे मरण पावला. परंतु त्यांच्या आश्रितांनी मागणी करून ही अजून नुकसान भरपाई अदा केलेली नाही. ठाणे जिल्हा सर्वेक्षण समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या कडे प्रत्यक्ष घटनेची चौकशी करण्यासाठी समिती सदस्यांनी आग्रह धरूनही पथक पाठवून सर्वेक्षण करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. या अमानुषरित्या मृत्यूमुखी पडलेल्या सफाई कामगारांवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी आणि कायद्यानुसार त्यांचे  न्याय्य पुनर्वसन व्हावे या उद्देशाने श्रमिक जनता संघाच्या अध्यक्षा मेधा पाटकर, उपाध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महासचिव जगदीश खैरालिया, म्युज फाऊंडेशनचे श्रेयस, निशांत बंगेरा, राकेश घोलप आदी कार्यकर्ते यांनी या प्रकरणी परिश्रम घेतले.

आयुक्त बदलले तरी, ठाण्यात अनधिकृत बांधकामे सुरूच !

आमदार संजय केळकर यांची संतप्त प्रतिक्रिया अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनात आवाज उठवताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र तत्कालीन आयुक्तांनी कारवाईचा केलेला फार्स, नवीन आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतरही ठाण्यात आजही अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा संताप आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे. ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनात गाजवला. त्यावेळी आ. संजय केळकर यांनी, ठाणे महापालिकेचे अधिकारी आयुक्तांच्या आदेशाची कशी पायमल्ली करतात याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे निर्देश दिल्याने तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर मोहीम हाती घेतली पण या बांधकामांना जबाबदार असलेल्या एकाही अधिकाऱ्याला निलंबित केलेले नाही. केवळ एका सहायक आयुक्ताला सक्तीच्या रजेवर पाठवून कारवाईचा फार्स केला. याबद्दलची खंत आ. संजय केळकर यांनी नवे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे व्यक्त केली आहे. काही ठिकाणच्या बांधकामांचे तपशील तक्रारदारांनी सादर केले. पण कारवाई शून्य ! ७२ माणसं या शहरात एका इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडली, तरी सुद्धा प्रशासनाला अजून जाग आलेली नाही. ठाणे पश्चिमेकडील उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील पहिली राबोडी येथे शेरू कुरेशी या हॉटेल मालकाने आपल्या सागर हॉटेलच्या इमारतीवर बेधडकपणे बेकायदा मजले उभारण्यास सुरुवात केली आहे. या विरोधात राबोडीतील एका तक्रारदाराने दाखल केलेल्या रिट पीटीशनवर उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला आदेश देऊन सुरू असलेले अनधिकृत बांधकाम रोखण्याचे बजावले. न्यायालयाने स्पष्ट निर्देश देऊनही उथळसर प्रभागाचे अधिकारी ढिम्म असल्याचे जावेद शेख यांनी निदर्शनास आणले आहे. ही बाबही आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. अशीच परिस्थिती बाळकुम, ढोकाळी, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट, कोपरी आदी भागात असून येथे कारवाईचा केवळ फार्स न करता प्रत्यक्ष ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. सध्या आचारसंहिता सुरू असून आयुक्तांनी ही बांधकामे तोडण्याची मोहीम हाती घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत, मात्र तरीही या प्रभागांत अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे  आमदार संजय केळकर यांनी आयुक्त श्री. सौरभ राव यांच्या निदर्शनास आणून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मतदारांच्या जनजागृतीसाठी 5 मे रोजी मॅरेथॉनचे आयोजन

पालघर  : 5 मे रोजी सकाळी 6 वाजता विविध वयोगटातील नागरिकांसाठी “Run For Vote” मॅरेथॉनचे आयोजन SVEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation) अंतर्गत करण्यात आले आहे. भारत निवडणुक आयोगाकडुन लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-2024 हा कार्यक्रम घोषित झालेला आहे. त्यानुषगाने पालघर जिल्हातील मतदारांमध्ये जनजागृती करुन मतदानासाठी प्रवृत्त करणे आयोगाकडील या विषयी स्थायी सुचना आदेशांची अंमलबजावणी करणे व नागरिकांमध्ये निवडणुक विषयी जनजागृती करण्यासाठी SVEEP (Systematic Voters…

लोकलमधून पडून डोंबिवलीतील दोन जणांचा मृत्यू

डोंबिवली: छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलच्या डब्यात तुडुंब गर्दी असल्याने डब्यात शिरता न आल्याने लोकलच्या दरवाजात दाटीवाटीने उभे राहून प्रवास करणाऱ्या एका तरूणाचा, एका तरूणीचा दोन दिवसांत लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. डोंबिवली ते कोपर आणि दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान या दुर्देवी घटना घडल्या आहेत. लोकलची संख्या वाढवुनही लोकल अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्याने रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या वर्षात डोंबिवली ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सुमारे ४०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ८०० हून अधिक लोकल मधून पडून जखमी झाले आहेत. रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. तरीही ही अपघातांंची मालिका संपत नाही. लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रिया श्यामजी राजगोर (२६) या तरूणीचा मृत्यू झाला. डोंबिवली रेल्वे स्थानकात रियाने सोमवारी सकाळी मुंबईला जाणारी लोकल पकडली. डब्यातील गर्दीमुळे तिला डब्यात शिरता आले नाही. ती लोकलच्या दरवाजात उभी राहून प्रवास करत होती. डोंबिवली स्थानकानंतर लोकलने वेग घेतल्याने कोपर रेल्वे स्थानकाजवळ तिचा तोल गेला आणि ती रेल्वे मार्गात पडून जागीच मरण पावली. ती ठाण्यातील एका बांंधकाम कंपनीत कामाला होती. डोंबिवलीतील अवधेश दुबे या तरुणाचा दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यानच्या खाडीत पडून मृत्यू झाला आहे. तो लोकलने मुंबईच्या दिशेेने प्रवास करत होता. डब्यात गर्दी असल्याने तो दरवाजाला लटकून प्रवास करत होता. मुंब्रा खाडीजवळ लोकलच्या दरवाजाला त्याने धरलेला हात सटकला तो खाडीत पडला असे पोलिसांंचे म्हणणे आहे. अवधेशची कार्यालयीन पिशवी गायब असल्याचे कुटु्ंबीयांनी सांगितले. यामध्ये काही घातपात असण्याचा संंशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. जाणकारांंकडून मिळालेली माहिती अशी की, कोपर ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकल वेगात असताना रुळांवरून डबे दोन्ही बाजुला वेगाने कलताना दिसतात. यावेळी दरवाजात उभ्या असणाऱ्या प्रवाशावर आतील गर्दीचा भार येतो. किंवा त्या प्रवाशाला दरवाजाच्या दांडीला हात धरून उभे राहणे मुश्किल होते. यावेळी त्याचा तोल जाऊन तो रेल्वे मार्गात पडतो. त्यामुळे अशा अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

कपिल पाटील व श्रीकांत शिंदे या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचे नरेंद्र मोदी रणशिंग फुंकणार

राजीव चंदने मुरबाड : येत्या 10मे रोजी  कल्याण मध्ये नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी यांनी कल्याण पश्चिमेतील वासुदेव बळवंत फडके मैदानात या दोन्ही उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली होती. त्याचप्रमाणे आता येत्या १० मे रोजी कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांसाठी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जाहीर सभा घेणार असल्याची माहिती भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी दिली. तर नरेंद्र मोदी यांची सभा होण्याआधीचे भिवंडी आणि कल्याण लोकसभेचे चित्र अतिशय पोषक आहे. पण नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने इथल्या झंजावाताचे महायुतीच्या वादळामध्ये रूपांतर होईल अशा प्रकारचा विश्वासही भिंवडी लोकसभेच्या कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. मोदींचे विचार स्वयंस्फूर्तीने ऐकण्यासाठी जनता येत असते, अशाप्रकारे जनता हे विचार ऐकते आणि त्यांनाही मोदींच्या विचारांची प्रेरणा मिळते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित रहा असे आव्हान भिवंडी लोक सभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी केले आहे

ठाण्यात इंडिया-महाविकास आघाडीची वज्रमूठ

जोरदार शक्तिप्रदर्शन करत राजन विचारे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे लोकसभेचे इंडिया- महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी ठाण्यातील कोपनेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शक्ती स्थळावर आशीर्वाद घेऊन आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आल्याने ठाण्यात इंडिया-महाविकास आघाडीची वज्रमूठ पाहायला मिळाली. तसेच ठाण्यात मिंधेची उमेदवारी  गुजरातमधून आदेश आल्यानंतर ठरणार असल्याची खरमरीत टीका करत आदित्य ठाकरे यांनी गद्दार गॅंगवर जोरदार निशाणा साधला. इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भर उन्हात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने हे ठाणेकरांचे प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले. शिवसेना आणि ठाण्याचे जुने नाते आहे. ही लढाई पक्ष आणि बाप चोरणाऱ्या, संविधान बदलणाऱ्या आणि महाराष्ट्राला दिल्लीमध्ये झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्यावेळी शिवसेना, युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे अध्यक्ष ठाणे जिल्हा विक्रांत चव्हाण, शिवसेना उपनेते विजय कदम, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष अॅड. मनोज आखरे, नवी मुंबई कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष कौशिक आनंद, कॉंग्रेस उपाध्यक्ष राखी पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नवी मुंबई सलुजा सुतार, कॉंग्रेस महिला आघाडी पूनम पाटील, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, प्रभाकर म्हात्रे, केदार दिघे, अनिश गाढवे, मुजफ्फर हुसैन, धर्मराज्य पक्ष अध्यक्ष राजन राजे, व इंडिया-महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१ मेला वाजणार ठाणे प्रिमियर लीगचा बिगुल

ठाणे : महाराष्ट्र माझा सेवा संस्थेतर्फे १ ते ८ मे दरम्यान ठाणे प्रिमियर लीग २०२४ आयोजन करण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट संघटनेची मान्यतेने दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रंगणाऱ्या या लीगचे यंदा…

नवी मुंबईत ‘मतदार अन् लोकशाही’ची लग्नपत्रिका

वाशी : सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू असून काही राज्यांमध्ये मतदानाचा टक्का घसरला आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदानात जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, यादृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून निवडणूक आयोगाकडून लग्नपत्रिकेच्या स्वरूपात मतदानाची पत्रिका छापली असून पालिकेच्या विभाग कार्यालयाबाहेर तसेच सरकारी कार्यालयांच्या बाहेर चिकटवण्यात आली आहे. समाजमाध्यमांवरदेखील या पत्रिकेची चर्चा सुरू आहे. भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव चि. मतदार व भारतीय संविधानाची ज्येष्ठ सुकन्या चि.सौ.कां. लोकशाही यांचे सोमवारी, २० मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच या शुभमुहूर्तावर लग्न होणार आहे. लोकसभा २०२४च्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्ज्वल भारताची स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी आपल्या एक एक मतदानरूपी आशीर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा, यासाठी आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे. ‘आपले मतदान हाच आमचा आहेर’ ‘आपले मतदान हाच आमचा आहेर आणि विकसित भारत हेच तुमचे रिटर्न गिफ्ट’ असा पत्रिकेतील टीपमध्ये संदेश देण्यात आला आहे. या पत्रिकेतून मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेने पालिकेच्या मालमत्ता करांवर ‘मी जागरूक मतदार, मतदान करणारच’ असा उल्लेख करत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. एनएनएमटीमध्येदेखील जनजागृती करण्यात येत आहे; तर शहरात पालिकेने फ्लेक्स लावले आहेत. निळ्या शाईचे आवाहन पत्रिकेच्या समारोपामध्ये ‘वरील विनंतीला मान देऊन मतदानाला यायचं हं…’ ‘आमच्याशिवाय तर मज्जाच नाही’ असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच कु. निळी शाई आणि चि. ईव्हीएम यांनी मतदानाला येण्याचे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. पथनाट्य, पालिकेच्या मालमत्ताकराच्या पावतीवरदेखील संदेश देण्यात आला आहे. तसेच शहरांमध्ये फलक लावण्यात आलेले आहे. पालिकेच्या मुख्यालयात स्क्रीन लावण्यात आलेली आहे. – शरद पवार, उपआयुक्त, निवडणूक विभाग

‘मी मतदान करणारंच .. आपणही मतदान करा’

ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती ठाणे : ‘मी मतदान करणारंच.. आपणही मतदान करा आणि लोकशाही बळकट करा’ अशा घोषणा देत 25 ठाणे-लोकसभा मतदारसंघांतर्गत १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघात ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी भास्कर कॉलनी येथील हजेरी शेड या ठिकाणी मतदान जनजागृती केली. स्वीप कार्यक्रमातंर्गत शहरात विविध ठिकाणी मतदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. १४८ ठाणे मतदार संघ सहा.निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज (२९ एप्रिल) सफाई कामगारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. या ठिकाणी मतदान जनजागृतीपर सामूहिक घोषणा देऊन सफाई कामगारांना मतदान करण्यासाठी आवाहन करुन मतदानाची सामूहिक  शपथ घेण्यात आली. या मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या प्रत्येक सफाई कामगारांना मी मतदान करणारंच….. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा या संदेशासह मतदानाची तारीख  दर्शवणारे माहितीपत्रकाचेही वाटप करण्यात आले. सर्व स्वच्छता सफाई कर्मचाऱ्यांना मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि मतदान आपला अधिकार आणि आपली जबाबदारी आहे याची जाणीव त्यांना करून देण्यात आली. सर्वानी आपल्या कुटूंबातील सदस्यांनी व तुम्ही राहता तेथील आजूबाजूच्या नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मेला अवश्य मतदान करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या आवाजात सामूहिक पणे “आम्ही राबऊ स्वच्छ्ता अभियान,पण तुम्ही करा हक्काने मतदान या घोषणे द्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

कुंभारखाणपाडा येथे ‘महारेरा’ गुन्ह्यातील बेकायदा इमारत भुईसपाट

डोंबिवली: डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा येथील हरितपट्ट्यात कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांंधकाम परवानग्या न घेता, महारेराचा नोंदणी क्रमांंक मिळवून उभारलेली बेकायदा इमारत पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या तोडकाम पथकाने पोकलेन यंंत्राच्या साहाय्याने भुईसपाट केली. पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता अशा इमारतींना महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाचा (महारेरा) नोंंदणी क्रमांंक मिळवून या बेकायदा इमारतींमधील सदनिका ग्राहकांना बेमालुमपणे विकून त्यांची फसवणूक करण्याचा उद्देश भूमाफियांचा होता. याप्रकरणी प्रसिध्द वास्तुविशारद संदीप पाटील यांंनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरून तत्कालीन पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी अशी बेकायदाशीर कृती करणाऱ्या डोंबिवलीतील ६५ भूमाफियांवर नगररचना अधिकाऱ्यांच्या साह्याय्याने मानपाडा, रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. या गन्ह्यात कुंभारखाणपाडा येथील अजिंक्य नारकर आणि सुनील नारकर या बंधूंंनी वास्तुरचना वास्तुविशारद फर्मचे पांडुरंग म्हात्रे यांच्या साहाय्याने उभारलेल्या सात माळ्याच्या बेकायदा इमारतीचा समावेश होता. यापूर्वी या इमारतीवर दोन ते तीन वेळा जुजुबी कारवाई यापूर्वीच्या साहाय्यक आयुक्तांकडून करण्यात आली होती. हरितपट्ट्यातील अडगळीच्या जागेत असलेल्या या इमारतीचे पाडकाम साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांंच्या मार्गदर्शनाखाली तोडकाम पथकाने मागील पधरा दिवसांंपासून पोकलेन यंंत्राच्या साहाय्याने सुरू केले होते. या इमारतीवर कारवाई होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांंवर खूप राजकीय दवाव होता. परंतु, साहाय्यक आयुक्त सावंत यांंनी हे दबाव न जुमानता आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून ही बेकायदा इमारत बुधवारी भुईसाट केली. या कारवाईने भूमाफियांना मोठा तडाखा बसला आहे. या कारवाईने भूमाफियांचे सुमारे दोन ते तीन कोटीचे नुकसान झाल्याचे समजते. या इमारतीत एका माजी नगरसेवकाने ‘खुशी’ (बोनस) म्हणून दोन ते तीन सदनिकांची मागणी भूमाफियांकडे केली होती. या कारवाईनंतर ह प्रभागाकडून ठाकुरवाडीतील अग्निदेवी मंदिराजवळ उभारलेली प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांंची फशी हाईट्स, गटारावर उभारेली बेकायदा इमारत, राहलुनगर मधील रमाकांत आर्केड, सुदामा हाईट्स आणि खंडोबा मंदिर भागातील बेकायदा इमारती, गरीबाचापाडा येथील वसंत हेरिटेज, जुनी डोंबिवलीतील शाळेच्या आरक्षणावरील शिव लिला आणि कोपर रेल्वे स्थानकाजवळील कोंबड्याच्या खुराड्यावर कधी कारवाई केली जाते याकडे नागरिक, तक्रारदारांचे लक्ष लागले आहे.