Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

डॉ. विजय पंडित यांच्या “बडे भाग मानुष तन पाव” या कथासंग्रहाचे प्रकाशन

डॉ. विजय पंडित यांच्या “बडे भाग मानुष तन पाव” या कथासंग्रहाचे प्रकाशन कल्याण : कल्याण पश्चिमेतील के.एम. अग्रवाल महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद १६-१७ जानेवारीला संपन्न झाला. देशभरातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय परिसंवादात सक्रिय आणि उत्साहाने सहभाग घेतला. परिसंवादाचे उद्घाटन सत्र महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विजय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. उद्घाटन सत्राचे अध्यक्षपद महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या माजी अध्यक्षा प्राध्यापक शितला दुबे यांनी भूषवले. मुख्य भाषण प्राध्यापक मनोज सिंह यांनी केले. ज्यांनी हिंदी साहित्यातील समकालीन प्रवचन, सामाजिक चिंता आणि वैचारिक ट्रेंडबद्दल सखोल आणि विचारप्रवर्तक अंतर्दृष्टी दिली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स, मुंबई झोनल डायरेक्टर रेणू पृथियानी उपस्थित होत्या. उद्घाटन सत्राचे विशेष आकर्षण म्हणजे चार महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन. यामध्ये अमरकांत वरील लेखांचा संग्रह, मध्य आशियातील हिंदीवरील लेखांचा संग्रह, पंडित विद्यानिवास मिश्रावर लक्ष केंद्रित करणाऱ्या समीचिन मासिकाचा विशेष अंक आणि डॉ. विजय पंडित यांचा नवीनतम लघुकथा संग्रह, “बडे भाग मानुष तन पाव” यांचा समावेश होता. उपस्थितांनी डॉ. विजय पंडित यांच्या लघुकथा संग्रहावर आपले विचार व्यक्त केले, तो मानवी संवेदनशीलता, जीवन दृष्टिकोन आणि सामाजिक वास्तवाने ओतप्रोत एक शक्तिशाली काम असल्याचे म्हटले आणि त्याचे मनापासून कौतुक केले.

आझाद मैदानात आंदोलनास बसलेल्या नोवेल साळवे यांचा आत्मदहनाचा इशारा

आझाद मैदानात आंदोलनास बसलेल्या नोवेल साळवे यांचा आत्मदहनाचा इशारा कल्याण:  आझाद मैदान येथे धरणा आंदोलन करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी सरकार त्यांच्या आंदोलनाची दखल घेत नसल्याकारणाने साळवे यांनी आपले आंदोलन तिव्र करून आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत मला महाराष्ट्र शासन गृह विभागाचे उप सचिव यमुना जाधव यांनी साळवे यांना बोलवून अडचण ऐकून घेत ठाणे पोलीस आयुक्त यांना कार्यवाही करण्यासाठी पत्र पाठविण्यात आले. परंतु त्या पत्रावर अद्याप कुठलीच कार्यवाही झाली नसल्याने नोवेल साळवे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. काही महिन्यांपूर्वी नोवेल साळवे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यावर त्यांचे ओपन हार्ट सर्जरी झाली  होती. नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरू झालेल्या दिवसांपासून साळवे यांनी आझाद मैदानावर न्याय मिळण्यासाठी आंदोलन सुरू केले होते व त्यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी केली की त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करून दोषींना वाचविणारे उल्हासनगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निलंबित करण्यात यावे परंतु आजपर्यंत कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार पक्ष देखील याकडे लक्ष देत नसल्याने   त्यामुळे 28 जानेवारी रोजी साळवे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

 प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा येथे आयुक्तांची भेट

अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा येथे आयुक्तांची भेट ठाणे : अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे की नाही, याचा आढावा घेण्यासाठी १६ जानेवारी रोजी आयुक्त डॉ.…

उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा

उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा ठाणे : उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचितकडून  निवडून आलेले सुरेखा सोनावणे आणि विकास खरात या दोन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच दलीत वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील कामे करण्यात यावीत यासाठी हा पाठिंबा देत असल्याचे त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि नगरसेवक योगेश जानकर, प्रवक्ते राहुल लोंढे हेदेखील यावेळी उपस्थित होते.

ठाण्यात भाजपच्या २८ नगरसेवकांमध्ये प्रतिभा मढवी ठरल्या अव्वल!

ठाण्यात भाजपच्या २८ नगरसेवकांमध्ये प्रतिभा मढवी ठरल्या अव्वल! ठाणे: ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने ३९ पैकी २८ जागा पटकावुन एकीकडे ७५ टक्के इतका स्ट्राईक रेट राखला असताना दुसरीकडे या २८ विजेत्यांमधील नौपाडा प्रभागातील प्रतिभा राजेश मढवी यांनी ७१.५६ टक्के मते घेऊन त्या भाजपमध्ये अव्वल विजेत्या ठरल्या आहेत. मतदार राजाने प्रतिभा मढवी ह्यांना विक्रमी मतदान करून डॉ.राजेश मढवी फौंडेशनच्या माध्यमातून नौपाडा प्रभागात गेली अनेक वर्ष केलेल्या समाजकारणाची पावतीच एक प्रकारे दिल्याचे दिसुन येत आहे. ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेसोबत महायुतीमध्ये असलेल्या भाजपने २८ जागांवर निर्विवाद विजय मिळवुन घवघवीत यश संपादीत केले. २०१७ मध्ये भाजपच्या २३ जागा होत्या, त्यामध्ये ५ जागांची भर पडली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनसेवक आमदार संजय केळकर, ठाणे निवडणुक प्रभारी आमदार ॲड. निरंजन डावखरे आणि भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम संघटन शक्तीच्या जोरावर ओवळा ते शिळ अशा प्रत्येक विधानसभेत भाजपने कमळ फुलवले आहे. भाजपाच्या निवडून आलेल्या ह्या २८ नगरसेवकांपैकी नौपाडा प्रभाग क्रमांक २१ ब मधील भाजप उमेदवार प्रतिभा मढवी यांनी, विजयाची पुनरावृत्ती करताना प्रभाग २१ मधून झालेल्या २५ हजार ७७ इतक्या मतदानापैकी तब्बल १७ हजार ९४५ असे ७१.५६ टक्के विक्रमी मतदान मिळवले आहे. प्रतिभा मढवी ह्या भाजपचे उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांच्या पत्नी असुन गेली अनेक वर्षे हे दांपत्य पक्षभेद विसरून प्रभागातील नागरिकांची अविरत सेवा करीत आहे. एक प्रकारे मढवी दांपत्याच्या समाजकार्याची पोचपावती मतदारांनी दिल्याचे दिसुन आले आहे. चौकट महायुतीचे वीर दौडले ‘सात’ भाजप – शिवसेना महायुतीने ठाण्यात लढवलेल्या एकुण १३१ जागांमध्ये युतीचे तब्बल सात ‘वीर’ तुफान दौडले आहेत. संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्राचा विचार केल्यास या १३१ नगरसेवकांमध्ये सर्वाधिक पसंतीचे हक्कदार शिवसेनेचे प्रभाग क्रमांक १७ ड चे योगेश जानकर ठरले असुन त्यांना ७६.४६ टक्के मतदान झाले आहे. त्याखालोखाल प्रभाग १६ अ मधील सेनेच्याच डॉ. दर्शना जानकर यांना ७२.३३ टक्के मतदान झाले. त्याखालोखाल भाजपच्या प्रतिभा मढवी यांना ७१.५६ टक्के, संजय वाघुलेंना ७०.७३, सेनेच्या मंदार केणीना ७०.७१, संध्या मोरे ७०.६१ आणि जयश्री डेव्हीड यांना ७०.५९ टक्के इतके मतदान झाल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसत आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात सेलिब्रिटींच्या गावभेटी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात सेलिब्रिटींच्या गावभेटी अनिल ठाणेकर ठाणे : राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व गावपातळीवर व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद ठाणे…

शिबिर हे अनुभवाने जगता येते – डॉ.गोरखनाथ किर्दत

शिबिर हे अनुभवाने जगता येते – डॉ.गोरखनाथ किर्दत अनिल ठाणेकर सांगली, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व  नेतृत्वगुणांचा पाया राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून घातला जातो. शिबिर हे अनुभवाने जगता येते, असे प्रतिपादन जिल्हा समन्वयक डॉ. गोरखनाथ किर्दत यांनी केले. मसुचीवाडी येथे मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपा प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, “समायोजन,आपले वर्तन ,सहकार्य, समर्पणाची भावना हीच, स्वयंसेवकाची खरी ओळख आहे. समाजाची गरज काय आहे हे जाणून घेऊन समाजाच्या मदतीसाठी जाऊन आपल्याला  योगदान देता येईल व सामाजिक बांधिलकी जपता येईल.” अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर  होते. ते म्हणाले की, ग्रामीण संस्कृतीची जाण आणि समाजशीलता  शिबिरातून निर्माण होते. कृतीद्वारे घेतलेले शिक्षण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर उपयोगी पडते. आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्याकडे वेगवेगळी कौशल्य असणे गरजेचे आहे. सरपंच राधिका पाटोळे, उपसरपंच अमित कदम, ग्रामपंचायत सदस्य उज्वला फाटक, जयेश कदम, अजित गुरव ,तुकाराम सावळा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार माळगे ,सर्व प्राध्यापक, कर्मचारी ,ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरात गावची स्वच्छता, नदी परिसर स्वच्छता, प्लॅस्टिक संकलन ,जलसाक्षरता, कृषीविषयक सर्व्हे ,आरोग्य तपासणी सर्वे ,शाळेच्या परिसरात परसबाग, प्रबोधनपर व्याख्याने, व्यसनाधीनतेवर पोस्टर प्रेसेंटेशन इत्यादी उपक्रम राबविले .शिबिरातील उत्कृष्ट स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंदांना प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला रोखलं

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंदांना प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला रोखलं स्नानाच्या ठिकाणी पोलिसांनी पालखी रोखल्याने वाद चिघळला शंकराचार्यांच्या शिष्यांना शेंडीला पकडून मारहाण शंकराचार्यांचे उपोषण प्रयागराज : प्रयागराज माघ मेळ्यात मौनी अमावस्येला स्नान करण्यासाठी आलेल्या शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची पालखी स्नानाच्या ठिकाणाहून आधी पोलिसांनी रोखल्याने वाद चिघळला आहे. पोलिसांनी शंकराचार्यांना संगमाकडे पायी जाण्यास सांगितले. शंकराचार्यांच्या शिष्यांनी त्यास नकार देत पालखी घेऊन पुढे जाऊ लागले. यामुळे शिष्य आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी अनेक शिष्यांना ताब्यात घेतले. त्यातील एका भिक्षूला  पोलिस स्टेशनमध्ये शेंडीला पकडून मारहाण झाल्याचा व्हिडीयो व्हायरल झाल्यामुळे…

सिंधुदुर्गात भाजपांतर्गत वाद उफाळला !

सिंधुदुर्गात भाजपांतर्गत वाद उफाळला ! नारायण राणेंच्या विरोधात रविंद्र चव्हाण समर्थकांचे राजीनामा सत्र जिल्हापरिषद निवडणूकीतील नारायण राणेंच्या निवडणूक फॉर्म्युलावर नाराजी ० राजन चव्हाण सिंधुदुर्ग – सिंधुदुर्गात एकीकडे खासदार नारायण राणे यांनी महायुती मधील…

स्वित्झर्लंडमध्ये फडणविसांचे मराठमोळे स्वागत…

स्वित्झर्लंडमध्ये फडणविसांचे मराठमोळे स्वागत… स्वित्झर्लंडमधिल वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी दावोसमध्ये दाखल झालेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चक्क स्वित्झर्लंड महाराष्ट्र मंडळाने विमानतळावर मराठ मोळ्या पद्धतीन लेझिमने स्वागत केले.   फडणवीसांनी दावोसही ‘जिंकले’!…