Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

 केआरपी XI चा समर व्हेकेशन क्रिकेट शिल्डवर झेंडा

 गौड युनियनवर ६ विकेटने मात; मनीष राव ‘मॅन ऑफ द मॅच’ मुंबई : इस्प्लनेड लिबरल्स क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित समर व्हेकेशन क्रिकेट शिल्ड टूर्नामेंटमध्ये केआरपी XI क्रिकेट क्लबने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.…

 आरसीएफ टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा

जैन इरिगेशन ब संघाची मुंबई पोलीस ‘अ’ संघावर मात मुंबई :  राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर कंपनी आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक आरसीएफ टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत जैन इरिगेशन ब संघाने ग्रेटर मुंबई पोलीस एससी अ संघाचा १५ धावांनी पराभव केला. मुंबई पोलीस एससी अ संघाने नाणेफेक जिंकून जैन इरिगेशन ब संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यांनी २० षटकांत ८ बाद १४३ धावा केल्या. त्यात विलोहित देसाईने सर्वाधिक (५४ धावा, ४७ चेंडू, ४ चौकार, १ षटकार) योगदान दिले. त्याला अनिरुद्ध नायरची (३९ धावा, ३१ चेंडू, ५ चौकार, १ षटकार) चांगली साथ लाभली. मुंबई पोलीस संघाकडून योगेश पाटीलने (४/२९) प्रभावी गोलंदाजी केली. ग्रेटर मुंबई पोलीस संघाला प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पेलवले नाही. त्यांचा डाव १८.४ षटकांत १२८ धावांमध्ये आटोपला. त्यांच्याकडून योगेश पाटील (३५ धावा, २२ चेंडू, ४ चौकार, २ षटकार) आणि हर्ष साळुंखेने (२५ धावा, ९ चेंडू, ३ चौकार, २ षटकार) छान फटकेबाजी केली तरी सोहम सबनीस (२.४-०-१३-३) आणि हर्षल वाघमारेच्या (४–०-२४-२) अचूक माऱ्यासमोर अन्य फलंदाजांचा टिकाव लागला नाही. योगेश पाटील याला सामनावीर म्हणून प्रमुख पाहुणे महेंद्र अग्रवाल (ईडी-वित्त) यांच्या हस्ते गौरविण्यात आले. संक्षिप्त धावफलक; जैन इरिगेशन ब संघ – २० षटकांत ८ बाद १४३(विलोहित देसाई ५४, अनिरुद्ध नायर ३९; योगेश पाटील ४/२९) वि. ग्रेटर मुंबई पोलीस एससी अ संघ – १८.४ षटकांत सर्वबाद १२८ (योगेश पाटील ३५,  हर्ष साळुंखे २५; सोहम सबनीस २.४-०-१३-३, हर्षल वाघमारे (४–०-२४-२). निकाल: जैन इरिगेशन ब संघ १५ धावांनी विजयी. सामनावीर : योगेश पाटील. 00000000

Heading – कानपिल्लेवारच्या नाबाद शतकामुळे मारवाडी सीसीचा मोठा विजय

७६वी सालार जंग निमंत्रित क्रिकेट स्पर्धा २०२६ मुंबई: इस्लाम जिमखाना आयोजित ७६व्या सालार जंग निमंत्रण क्रिकेट स्पर्धेच्या (२०२६) पहिल्या फेरीच्या सामन्यात सोमवारी सलामीवीर प्रग्नेश कानपिल्लेवारच्या (नाबाद १०० धावा, ३६ चेंडू…

केडीएमसी स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड

केडीएमसी स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड महिला बालकल्याण समितीसाठी सारिका जाधव, शिक्षण मंडळासाठी भाजपाचे अभिजित थरवळ यांची निवड कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या शिवसेनेकडेच राहणार असून स्थायी समिती सभापती पदी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्याच नगरसेविका सारिका जाधव  आणि शिक्षण मंडळ सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक अभिजीत थरवळ यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली. या उमेदवारांनी 2 एप्रिलला आपली नामनिर्देशन पत्रे महापालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे दाखल केली होती. केडीएमसी मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात आज या तिन्ही सभापती पदांसाठी निवडणूक अधिकारी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. या तिन्ही पदांसाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या तिघांचीही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, आमदार राजेश मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह शिवसेना भाजपाचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशांत – सोनाली विजयी

रोटरी क्लब कॅरम स्पर्धा रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आयोजित व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जुहू यांच्या सहकार्याने प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या ६ व्या राज्य मानांकन कॅरम…

महाराष्ट्र खो-खोला नवी दिशा! २०२६-२७ साठी निवड समितीची दमदार घोषणा!

अनुभवी तज्ज्ञांवर निवडीची जबाबदारी पुणे : “उत्कृष्टतेची निवड, विजयाची पायाभरणी!” या ब्रीदवाक्यासह महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनने २०२६-२७ हंगामासाठी निवड समिती व राष्ट्रीय संघ प्रशिक्षकांची भव्य घोषणा करत क्रीडा क्षेत्रात नवा उत्साह निर्माण केला आहे. राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धांसाठी अनुभवी आणि कसलेल्या तज्ज्ञांवर जबाबदारी सोपवण्यात आल्याने आगामी स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा दबदबा कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. निवड प्रक्रियेचा पाया: अनुभवी हातात सूत्रे! या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव यांनी पुणे येथे पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत केली. यावेळी कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. विविध वयोगटांतील खेळाडूंची निवड, त्यांचे मार्गदर्शन आणि राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघांची उभारणी यासाठी या समित्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्य निवड समिती: पुरुष व महिला गटासाठी दिग्गज सज्ज! पुरुष व महिला गटासाठी निवड समितीत अनुभवी सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत सोमनाथ स्वामी (सांगली), तुषार मोरे (मुंबई उपनगर), रविराज परामने (ठाणे) आणि रत्नराणी कोळी (लातूर) यांचा समावेश असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्वोत्तम खेळाडूंची निवड होणार आहे. कुमार व मुली गट: नवोदित प्रतिभेला संधी! कुमार व मुली गटासाठी निवड समितीत श्रीरंग बनसोडे (सोलापूर), विशाल पाटील (जळगाव), यतीश आक्रे (पालघर) आणि नंदिनी धुमाळ (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमार्फत उदयोन्मुख खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळणार असून, राज्यासाठी नवी प्रतिभा घडवली जाणार आहे. किशोर – किशोरी गट: भविष्यातील स्टार्सची निवड! किशोर व किशोरी गटासाठी अमोल चव्हाण (जालना), पंकज चवंडे (रत्नागिरी), रमेश लव्हाट (अहिल्यानगर) आणि तृप्ती गाडगीळ अग्रवाल (पुणे) यांची निवड समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. या गटातील खेळाडूंमध्ये असलेली ऊर्जा आणि क्षमता योग्य दिशेने विकसित करण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भविष्यासाठी भक्कम पायाभरणी: महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर! “योग्य निवड, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत” या त्रिसूत्रीवर आधारित ही निवड प्रक्रिया महाराष्ट्राच्या खो-खो संघांना अधिक सक्षम बनवणार आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचा झेंडा उंचावण्यासाठी ही समिती निर्णायक भूमिका बजावेल, अशी खात्री व्यक्त केली जात आहे. एकंदरीत, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनने घेतलेला हा निर्णय म्हणजे केवळ निवड नव्हे, तर ‘विजयाच्या नव्या पर्वाची’ दमदार सुरुवात आहे!

 डोंबिवली पश्चिमेतही नव्याने होणार दुय्यम निबंधक कार्यालय

डोंबिवली पश्चिमेतही नव्याने होणार दुय्यम निबंधक कार्यालय रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा कल्याण : शहरात पश्चिमेकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली दुय्यम प्रबंधक कार्यालयाची मागणी लवकरच मार्गी लागणार असून त्यासंदर्भात शासन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र शासन पुणे यांनी डोंबिवलीत पश्चिमेलाही ती सुविधा देण्यास हिरवा कंदील दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी त्यासंदर्भात माहिती देतांना सांगितले की, यासंदर्भात पश्चिमेला स्वतंत्र शिधावाटप केंद्राप्रमाणेच ही सुविधा देखील असावी यासाठी पाठपुरावा केला होता, त्या सुविधेमुळे आपल्या पंच क्रोशीतील नागरिकांची गैरसॊय दूर होणार आहे. पूर्वेकडील यंत्रणेवर पडणारा ताण देखील कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूर्वेला ती सुविधा आहेच, पण आता वाढत्या शहरीकरणामुळे ती सुविधा आता पश्चिमेलाही सुरू होणार आहे. त्यामुळे त्या विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. शासनाच्या महसूल व वन विभागाने १ एप्रिल रोजी त्यासंदर्भात शासन आदेश काढले असून डोंबिवली पश्चिमेला ती सुविधा असेल असेही शासन आदेशात म्हंटले आहे. त्या विभागाच्या कार्यासन अधिकारी प्राची पालव यांनी ते आदेश दिले असल्याचे आदेशावरून स्पष्ट झाले. नागरिकांची अनेक वर्षांची मागणी होती, त्याबाबत अलीकडे महसूल विभाग आणि शासनाला पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला, त्यानुसार मागणीला यश आले असून लवकरच पश्चिमेलाही दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होईल असे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

पर्यावरणप्रेमींकडून अफवा पसरविण्याचे काम सुरू- आयुक्त मनिषा खत्री

पर्यावरणप्रेमींकडून अफवा पसरविण्याचे काम सुरू- आयुक्त मनिषा खत्री हरिभाऊ लाखे नाशिक : पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात वृक्षतोडीस स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, न्यायालयाने वृक्षतोडीस स्थगिती देण्यास नकार दिला. मौखिक सुनावणीतही महापालिका त्यांचे नियमित काम करीत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच पर्यावरणप्रेमी महापालिका पाच हजार झाडांची तोड करणार असल्याची अफवा पसरवित आहेत, असा आरोप महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी केला आहे. कुंभमेळ्यासाठी तपोवनातील १५०० हून अधिक झाडे तोडण्यात येणार असल्याचा मुद्दा तापलेला असतांना महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी रस्ते विस्तारीकरणात आड येणारी झाडे तोडण्यात येत आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या झाडांवर कुऱ्हाड चालविली जात असल्याने पर्यावरणप्रेमींकडून यास विरोध होत आहे. काही ठिकाणी झाडांना श्रध्दांजली वाहत, चौका-चौकात सभा घेत वृक्षतोडीला विरोध दर्शविण्यात येत आहे. सोमवारी गंगापूर रोड परिसरातील काही जुन्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू करण्यात आल्यावर याठिकाणी पर्यावरणप्रेमी दाखल झाले. त्याचवेळी वृक्षतोडीचे समर्थकही आले. वृक्षतोडीसंदर्भात महापालिका आयुक्त खत्री यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तपोवन असो किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी पाच हजार झाडे तोडण्यासंदर्भात कुठलेही आदेश महापालिकेने दिलेले नाहीत. महापालिकेच्या वतीने रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामाच्या आड येणारी काही ठिकाणी १५, काही ठिकाणी १८ किंवा त्यापेक्षा जास्त झाडे तोडली गेल्याचे खत्री यांनी सांगितले. कामाच्या व्याप्तीनुसार रस्तानिहाय ही झाडे तोडण्याची कामे सुरू आहेत. पाच हजार झाडे तोडण्याचा कोणताही आदेश, निविदा महापालिकेने काढलेली नाही. वास्तविक वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमी नाशिककर न्यायालयात गेले होते. त्यांनी स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने स्थगिती आणता येणार नाही, असे सांगितले. महापालिका प्रशासन त्यांची नियमित कामे करीत आहे. न्यायालयाने वृक्षतोडीला स्थगिती मिळणार नाही, असे मौखिक सांगितल्याचेही खत्री यांनी नमूद केले. हरित लवाद प्राधिकरणच्या वतीने स्थगिती मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमींकडून महापालिका पाच हजार झाडे तोडणार, अशी अफवा पसरवली जात आहे. असे असेल तर त्यांनी तसे लेखी आदेश दाखवावेत, असे आवाहन आयुक्त खत्री यांनी केले. दरम्यान, महापालिकेच्या वतीने वृक्षतोडीसंदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने वृक्षतोड होत असली तरी एक लाख नवीन झाडे लावण्यात येत आहेत. यंदा पाऊस झाला की पुढच्या वर्षासाठी झाडे लावण्याचे नियोजन सुरू आहे. कुंभमेळ्यात विकासही झाला पाहिजे आणि हरित कुंभही व्हावा, असा समतोल राखण्याच्या अनुषंगाने महापालिका काम करीत असल्याचा दावा आयुक्त खत्री यांनी केला. वृक्षतोड केवळ कुंभमेळ्याच्या कामासाठी होत नाही. काही वृक्ष रस्त्यात असल्याने अडचणी येत आहेत. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या असल्याचे खत्री यांनी नमूद केले.

पावसाळ्यापूर्वीच्या कामांना शिवसेनेकडून प्रारंभ

पावसाळ्यापूर्वीच्या कामांना शिवसेनेकडून प्रारंभ मागाठाणे मतदारसंघातून सुरुवात मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रभागि क्र.१२ च्या स्थानिक नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांच्या पुढाकाराने  पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या कामांचा शुभारंभ शिवसेना विधानसभाप्रमुख अशोक म्हामूणकर व उपविभागप्रमुख चेतन कदम यांच्या शुभहस्ते मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून करण्यात आला. याप्रसंगी मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य, विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, विधानसभा संघटक रोहिणी चौगुले, उपविभागसंघटक सिमिंतिनी नारकर, विधानसभा समन्वयक तुकाराम पालव, उपविधानसभा समन्वयक वैभवी तावडे, शुभदा सावंत, शाखाप्रमुख सचिन मोरे, शाखा समन्वयक योगेश देसाई, महिला शाखासंघटक माधुरी खानविलकर, शाखा समन्वयक इतिश्री महाडिक, कार्यालयप्रमुख भास्कर सावंत, उपशाखाप्रमुख अनंत आंग्रे, अजित वाळंज, प्रतीक चव्हाण, दत्ताराम मोरे, सदा परब, अनुराधा मोरे, विनिता मडीये, धनश्री चव्हाण, सीमा सानप युवासेना शाखा समन्वयक सचिन शिरसाट, साईधाम सेवा समितीचे रत्नाकर गवस उपस्थित होते.

बोरीवली येथील जनरल करिअप्पा  उड्डाणपुलाच्या  दुरुस्तीकरण कामाचे भूमिपूजन

बोरीवली येथील जनरल करिअप्पा  उड्डाणपुलाच्या  दुरुस्तीकरण कामाचे भूमिपूजन सहा महिन्यांत नवीन पूल होणार उपलब्ध मुंबई : बोरिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा जनरल करिअप्पा उड्डाणपूल हा बोरिवलीकरांसाठी सर्वात महत्त्वाचा दुवा समजण्यात येतो. सुमारे तीस वर्षांपूर्वी बांधलेल्या या पुलावरील पदपथ (फुटपाथ), कठडे (रेलिंग), तसेच या उड्डाणपुलावर असलेल्या प्रचंड वाहतुकीमुळे रस्त्यावर पडलेले खड्डे, वाहनचालकांना डोकेदुखी ठरत होते. आमदार संजय उपाध्याय यांच्या पुढाकाराने व निर्देशाने मुंबई महानगरपालिकेतर्फे या उड्डाणपुलाचे नूतनीकरण/दुरुस्तीकरण करण्याचा भूमिपूजन कार्यक्रम आमदार संजय उपाध्याय व मुंबई आर मध्य विभाग सहाय्यक आयुक्त डॉ. प्रफुल्ल दिनेश तांबे यांच्या उपस्थितीत आज पार पडला. मुंबई महानगरपालिकेतर्फे आता या पुलाचे रोड सर्फेसिंग (पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण), रेलिंग व उखडलेले फुटपाथ तसेच पूर्व व पश्चिम दिशेला पुलावरून खाली उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत, त्यांची देखील दुरुस्ती करण्याचे काम लवकरच सुरू होईल. किमान सहा महिन्यांत हा पूल नव्याने उपलब्ध होणार आहे. हे काम होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमाला स्थानिक नगरसेविका ॲड्. सीमा शिंदे, नगरसेविका राणी द्विवेदी निघूट व माजी नगरसेवक विद्यार्थी सिंग, विधानसभा संयोजक  दिनेश झाला, भारतीय जनता पक्षाचे बोरिवली मंडळ अध्यक्ष देवसिंग, सुधीर परांजपे, विजयानंद पेडणेकर, प्रभाग अध्यक्ष धर्मवीर ठाकूर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी सहाय्यक अभियंता (पूल विभाग) स. वा. सोने, गडबाई व अन्य अधिकारी उपस्थित होते.