Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

रिक्षा चालकांचा उपोषणाचा इशारा

रिक्षा चालकांचा उपोषणाचा इशारा विविध मागण्यांसाठी घेतली उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱयांची भेट कल्याण : रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी  पूर्ण महाराष्ट्रातील आरटीओ कार्यालयात  शशांक राव व  विलास भालेकर साहेब यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण यांना टॅक्सी संघर्ष कृती समिती कल्याण वतीने  समितीचे अध्यक्ष महेंद्र मिश्रा, कृती समितीचे कार्याध्यक्ष विल्सन काळपुंड, कृती समितीचे उपाध्यक्ष मोहन पाठारे तसेच प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांना निवेदन देण्यात आले. तसेच लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. ऑटोरिक्षा चालक मालकांवर धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळच्या नोंदणी करण्यास सक्ती करण्यात येऊ नये व जे गैरकायदेशीररित्या सक्ती करत असतील अश्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.  धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळात रिक्षाचालक मालकांच्या नोंदणी करिता प्रवेश शुल्क व वार्षिक शुल्क रद्द करण्यात यावे व सर्व रिक्षाचालक मालकांची निःशुल्क नोंदणी या मंडळात करण्यात यावी. ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र ने कल्याणकारी मंडळासाठी मागणी केलेल्या व सुचवलेल्या कल्याणकारी योजना रिक्षाचालक मालकांकरिता या मंडळामार्फत राबविण्यात याव्यात.  महाराष्ट्र राज्य सरकारने ऑटोरिक्षांच्या परवाना वितरणावर स्थगिती आणली आहे. मात्र, इलेक्ट्रीक ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षा यांच्यावर स्थगिती आणलेली नाही. या सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा आम्ही निषेध करत आहोत. इलेक्ट्रीक ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षा यांच्या नोंदणीवर सरकारने तातडीने स्थगिती आणावी. अस्थित्वात असलेल्या इलेक्ट्रीक ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षा यांच्यावर ऑटोरिक्षा सारखेच नियम लावण्यात यावेत व त्यांना ठरवून दिलेल्या मार्गावरच वाहतूक करण्यासाठी कठोर कारवाही करण्यात यावी. राज्य सरकार ने नुकतीच बाईक टॅक्सी वर बंदी घातली आहे, तरीही शहरात खाजगी कंपन्यांद्वारा अवैधरित्या बाईक टॅक्सी सेवा सर्रासपणे सुरु आहे. या अवैध बाईक टॅक्सी मुळे प्रवाश्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, या अवैध बाईक टॅक्सी व ती सेवा देणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाही करत त्यांच्यावर बंदी आणण्यात यावी. या सर्व मागण्या या अत्यंत रास्त मागण्या आहेत व ऑटोरिक्षा चालकांच्या भविष्यासाठी महत्वाच्या आहेत. तेव्हा यावर गांभीर्याने कारवाही कराल अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे.

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा केडीए, रहेजा, केईएम हॉस्पिटल उपांत्यपूर्व फेरीत मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत केडीए हॉस्पिटल-अंधेरी, रहेजा हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. अर्धशतकवीर संकेत किणी ( ४३ चेंडूत ५४ धावा) व दिशांत म्हात्रे (२८ चेंडूत ३५ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे केडीए हॉस्पिटलने उभारलेले १५१ धावांचे आव्हान किम्स हॉस्पिटलला २३ धावांच्या फरकाने पेलवले नाही. सलामीवीर डॉ.रौठू राकेशकुमार (२० चेंडूत २३ धावा) व डॉ. परमेश्वर मुंडे (११ चेंडूत नाबाद १५ धावा) यांनी किम्स हॉस्पिटलचा पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सामन्यातील उत्कृष्ट क्रिकेटपटू डॉ. राकेशकुमार व संकेत किणी यांना पुरस्कार देऊन क्रिकेटपटू धनंजय केतकर, डॉ. विवेक पालकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी गौरविले. शिवाजी पार्क येथील दुसऱ्या अतिशय चुरशीच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात सलामीवीर भूषण सावंत (२० चेंडूत २५ धावा) व विजय वैती (३३ चेंडूत ४६ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे रहेजा हॉस्पिटलने सर्वबाद १३१ धावसंख्या रचली. बलाढ्य सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघाला विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना १४ धावा कमी पडल्या. सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे कप्तान डॉ. हर्षद जाधव (३१ चेंडूत ३५ धावा) व अष्टपैलू डॉ. मनोज यादव (९ धावांत ५ बळी) यांनी छान खेळ केला. केईएम हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ७ बाद १२१ धावांचा टप्पा गाठताना प्रीतेश सावंत (३९ चेंडूत ४३ धावा) व सागर सोळंकी (२८ चेंडूत ३१ धावा) यांनी चमकदार फलंदाजी केली. सलामीवीर कल्पेश भोसलेच्या (३३ चेंडूत ४७ धावा) धडाकेबाज फलंदाजीमुळे डावाच्या मध्यास ४ बाद ८१ धावांची सुस्थिती कस्तुरबा हॉस्पिटलकडे होती. परंतु जयदीप मेहेर (२७ धावांत ३ बळी) व प्रीतेश सावंत (१५ धावांत ३ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी करून कस्तुरबा हॉस्पिटल संघाला १५.४ षटकात ९७ धावांत गुंडाळले आणि केईएम हॉस्पिटलने २४ धावांनी शानदार विजय संपादन केला.

एनआयए मनोज रामचंद्र बॅडमिंटन स्पर्धा २६ मार्चपासून

एनआयए मनोज रामचंद्र बॅडमिंटन स्पर्धा २६ मार्चपासून मुंबई, २४ मार्च: महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने आणि नॉर्थ इंडियन असोसिएशन आणि जितेश पदुकोण अकादमीद्वारे आयोजित ‘योनेक्स सनराईज मनोज रामचंद्र स्मृती राज्यस्तरीय खुली बॅडमिंटन स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून खेळली जाणार आहे. या स्पर्धेत ३६० हून अधिक प्रवेशिका आल्या असून ही स्पर्धा पुरुष आणि महिला एकेरी तसेच १५ आणि ११ वर्षांखालील मुले आणि मुली एकेरी गटांमध्ये खेळवली जाईल. हे सामने नॉर्थ इंडियन असोसिएशन, एमआयजी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि माटुंगा जिमखाना येथील कोर्टवर खेळले जातील. पुरुष आणि महिला एकेरीतील विजेत्यांना प्रत्येकी रोख ४१,००० रुपये तर उपविजेत्याला प्रत्येकी रोख ३१,००० रुपये बक्षीस मिळेल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २१,००० आणि ११,००० रुपये मिळतील. १५ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या एकेरी गटातील विजेत्याला ८,५०० रुपये, उपविजेत्याला ५,५०० रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला ३,५०० रुपये असे  बक्षीस ठेवण्यात आले आहे. १५ वर्षांखालील गटासाठीची पारितोषिके संदीप ठाकर यांनी त्यांचे पुत्र निहार ठाकर यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली आहेत. ११ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या एकेरी गटातील विजेत्यांना प्रत्येकी ६,००० रुपये रोख बक्षिसे मिळतील तर उपविजेत्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला प्रत्येकी ४,००० आणि २,५०० रुपये मिळतील. अधिक माहितीसाठी आयोजन सचिव जितेश पदुकोण (९८२१० ५१७९०) यांच्याशी संपर्क संपर्क साधा.

एमसीसी ब्ल्यू संघाचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय

एमसीसी प्रो-४० क्रिकेट लीग २०२६ एमसीसी ब्ल्यू संघाचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मुंबई, २४ मार्च: ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन (जेएसएफ) आयोजित एमसीसी प्रो-४० क्रिकेट लीग २०२६ स्पर्धेत (एलिट ग्रुप) एमसीसी ब्ल्यू संघाने ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन (जेएसएफ) संघावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मात केली. एमसीसी ब्ल्यू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४७ षटकांत २३९ धावांची मजल मारली. त्यात झैद मुफ्ती ८७(७३) आणि शौर्य वीर नगरचे ६१(९२) सर्वाधिक योगदान राहिले. जेएसएफकडून निशार्ग चौधरी (५/४५) आणि देव जम्मुला (३/५१) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. हर्षल वाघमारे (४/३०), हृद्या (२/१९) आणि अफसर अहमदच्या (२/३७) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर जेएसएफचा पहिला डाव ४०.३ षटकांत १५० धावांमध्ये आटोपला. त्यांच्याकडून मुहम्मद इब्राहिम ५५(८८) आणि देव जम्मुला २७(२७) सर्वाधिक धावा केल्या. पहिल्या डावातील ८९ धावांची आघाडी एमसीसी ब्ल्यू संघासाठी निर्णायक ठरली. एमसीसी ब्ल्यू संघाने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ३० षटकांत ७ बाद १९८ धावा केल्या. यांच्याकडून दियान कुबाडिया ५०(४६) आणि डॅलरॉन रॉड्रिग्जने ४३(३४) चांगली फलंदाजी केली. जेएसएफकडून निशार्ग चौधरीने (५/४९) अचूक मारा केला. पराभूत जेएसएफचा अष्टपैलू निशार्ग चौधरीला (संपूर्ण सामन्यात १० विकेट) सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. संक्षिप्त धावफलक: एमसीसी ब्ल्यू संघ (पहिला डाव) – ४७ षटकांत सर्वबाद २३९(झैद मुफ्ती ८७(७३), शौर्य वीर नगर ६१(९२); निशार्ग चौधरी ५/४५, देव जम्मुला ३/५१). दुसरा डाव – ३० षटकांत ७ बाद १९८(दियान कुबाडिया ५०(४६), डॅलरॉन रॉड्रिग्ज ४३(३४); निशार्ग चौधरी ५/४९). जेएसएफ (पहिला डाव) – ४०.३ षटकांत सर्वबाद १५०(मुहम्मद इब्राहिम ५५(८८), देव जम्मुला २७(२७); हर्षल वाघमारे ४/३०, हृद्या २/१९, अफसर अहमद २/३७). निकाल: सामना अनिर्णित, एमसीसी ब्लू संघ पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजयी. सामनावीर: निशार्ग चौधरी १२(२७) ५/४५ आणि ५/४९.

मुरली सुब्रमण्यम एकेरीत राष्ट्रीय बॅडमिंटन विजेता

मुरली सुब्रमण्यम एकेरीत राष्ट्रीय बॅडमिंटन विजेता मडगाव (गोवा) : येथे सुरू असलेल्या Yonex Sunrise ४८व्या भारतीय मास्टर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा २०२५-२६ मध्ये मुंबईच्या मुरली सुब्रमण्यम यांनी ६० वर्षांवरील एकेरी गटात दमदार कामगिरी करत…

 महाराष्ट्रात घुमणार इनडोअर क्रिकेटचा आवाज!

 महाराष्ट्रात घुमणार इनडोअर क्रिकेटचा आवाज!  गरवारे क्लब, वानखेडे स्टेडियममध्ये क्रीडा संघटकांचा ऐतिहासिक मेळावा मुंबई: पारंपारिक क्रिकेटच्या चौकटीबाहेर आता नव्या थराराची चाहूल लागली आहे! महाराष्ट्रात इनडोअर क्रिकेटचा झंझावात घुमवण्यासाठी ‘महाइनडोर क्रिकेट…

तेली समाजाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात

ठाणे : श्री संताजी सहाय्यक संघ, ठाणे यांच्या वतीने तेली समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन न्यू इंग्लिश स्कूल येथील भोळे सभागृहात उत्साही वातावरणात पार पडले. यावेळी विद्यार्थी गुणगौरव, ज्येष्ठ नागरिक सत्कार, हळदी-कुंकू…

 साईंच्या पालखीतून अवतरले ‘देवदूत’

साईंच्या पालखीतून अवतरले ‘देवदूत’ धामणगाव अपघातातील जखमींना दिले जीवदान! मुंबई : ईश्वराच्या भेटीसाठी निघालेली पावले जेव्हा संकटात सापडलेल्या माणसांच्या मदतीसाठी धावतात, तेव्हा खऱ्या अर्थाने देव पावल्याची प्रचिती येते. असाच अंगावर काटा आणणारा आणि प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलवून टाकणारा प्रसंग रविवारी रात्री धामणगाव – कवडदरा येथे घडला. भीषण रस्ते अपघातात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तीन मरणोन्मुख तरुणांसाठी ‘भटवाडी साईदर्शन सेवा संस्थे’चे पदयात्री अक्षरशः देवदूत बनून धावून आले आणि त्यांनी प्राण वाचवले. नेमके काय घडले होते ? रविवारी धामणगाव – कवडदरा मार्गावर दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. धडक इतकी जोराची होती की तीन जण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते. अंधाराची वेळ आणि मदतीची वानवा अशा अगतिक परिस्थितीत अपघातग्रस्तांचे प्राण कंठाशी आले होते.जेव्हा टाळ-मृदुंगाचा गजर थांबला आणि माणुसकी धावली… नेमक्या त्याच वेळी भटवाडी साईदर्शन सेवा संस्थेची पदयात्रींची दिंडी तिथून मार्गक्रमण करत होती. साईंच्या दर्शनाची ओढ लागलेल्या या भक्तांनी रस्त्यावरील हे विदारक दृश्य पाहताच क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी भक्तीसोबतच कर्तव्याचे भान राखत तातडीने मदत कार्य सुरू केले. डॉ. जयेश सरमळकर यांनी जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी त्वरित हालचाली केल्या. मंडळासोबत असलेल्या रुग्णवाहिकेतून या जखमींना अत्यंत सुरक्षितपणे मोहन वामन व जितेंद्र हरमळकर यांनी नजीकच्या रुग्णालयात पोहोचविले.विभागप्रमुख दिपकबाबा हांडे, गुरुनाथ सामंत, सिद्धू मांजरेकर, प्रतिक जाधव, सागर गायकवाड, करन पायमोडे यांनी रुग्णालय गाठून त्यांना उपचारासाठी दाखल केले आणि गोल्डन आवर्स मध्ये अपघातग्रस्थांना सहकार्य केल्यामुळे एसएमबीटी  रुग्णालयाकडून देखील साईभक्तांचे विशेष कौतुक केले. रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “भटवाडी साई दर्शन सेवा संस्थेची रुग्णवाहिका अगदी वेळेत पोहोचली, ज्यामुळे जखमींना गोल्डन अवरमध्ये योग्य उपचार मिळू शकले. या भक्तांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठे प्राणहानी टळली आहे.” खऱ्या भक्तीचे दर्शन… पायाला फोड आले तरी साई दर्शनाच्या ओढीने शेकडो किलोमीटर चालणाऱ्या या भक्तांनी केवळ मंदिरात देव न शोधता, संकटात सापडलेल्या माणसांत देव पाहिला. अंगात थकवा असतानाही दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी दाखवलेली ही धडपड पाहून आज प्रत्येकाच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू आहेत. या घटनेने भटवाडी साईदर्शन सेवा संस्थेच्या पदयात्रींनी साईंची ‘माणुसकीची’ शिकवण खऱ्या अर्थाने जगून दाखवली आहे. आज मुंबई वरून शिर्डीला येणाऱ्या सर्व पालख्यांना या थोर कार्याचा सार्थ अभिमान वाटत आहे असे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव यांनी म्हटले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी निधी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी निधी आमदार अमित गोरखेंच्या प्रयत्नाला यश मुंबई / रमेश औताडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सावा निमित्त ठाणे, मुंबई महानगरपालिके प्रमाणे नवी मुंबई महानगरपालिके तर्फे प्रतिवर्षी सात लाख रुपया मंजूर करणे बाबत जे समाज आंदोलन व मागण्या झाल्या त्याला आमदार अमित गोरखे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. अशी माहिती समाजसेवक राजीव मानकर यांनी दिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील महान साहित्यिक, समाजसुधारक व लोकशाहीर होते. त्यांनी आपल्या साहित्य व शाहिरीच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित घटकांचे प्रश्न समाजासमोर मांडले व सामाजिक प्रबोधनाचे मोठे कार्य केले. त्यामुळे त्यांची जयंती महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. ठाणे महानगरपालिका व मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त दरवर्षी आर्थिक तरतूद करण्यात येते. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी रु. सात लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात यावी अशी मागणी असणारे निवेदन दिल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजप्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्यात येणार असल्याचे राजीव मानकर यांनी सांगितले.

कळसुबाई शिखरावर शालेय विद्यार्थ्यांचा झेंडा

कल्याण : शालांत परीक्षा संपल्यानंतर मुलांना सुट्ट्यांचे वेध लागतात. दहावीची परीक्षा संपल्यानंतर पिकनिक, वॉटर रिसॉर्ट, मोबाईल, कम्प्युटर गेम यापासून दूर जात  काही मुलांनी एकत्र येत महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर पार करण्याची मोहीम आखली. यासाठी गिर्यारोहक आणि प्रशिक्षक प्रदीप नायक यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत लोक कल्याण पब्लिक स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच ही मोहीम फत्ते केली. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्या मध्ये असणारे सर्वोच्च शिखर (१६४६ मी/५४०० फूट उंच ) ज्याला महाराष्ट्र चा एव्हरेस्ट मानले जाते. मुलांनी सायंकाळी शिखराकडे कूच केल्यानंतर मध्ये अनेक अडचणी आल्या. विद्यार्थ्यांचा हा पहिलाच प्रयत्न होता. या सर्वांवर मात करत सकाळी ६ वाजता शालेय विद्यार्थ्यांनी कळसुबाई शिखर सर केले. या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि पहिल्यांदाच केलेला कामगिरीचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता.  या टीम मध्ये स्केटिंगची राष्ट्रीय खेळाडू आस्था नाइकर, तीर्था पणिकेर, दिशिता खाचणे, हर्षिल सोळंकी, धनराज सावंत, सार्थक घोडेस्वार, श्रेया प्रसाद, श्लोक बोंबाटकर, शोभित लोखंडे, सई देशमुख, अमेय सोरकाडे, यश भोर, रणबीर प्रसाद, श्रावणी बांदेकर, कृष्णा पाणीग्रही, तृषा खराडे, पार्थ दाभाडे, मनस्वी ढेंगरे, विरेन वानखेडे, अथर्व कदम, वेदिका देवळेकर, मनस्वी फुटाणे, आर्या गुरव आणि प्रशिक्षक प्रदीप नायक यांचा समावेश होता.