Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक म्हणून अरविंद मालखेडे यांनी पदभार स्विकारला

मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक म्हणून अरविंद मालखेडे यांनी पदभार स्विकारला ( राजेंद्र साळसकर ) मुंबई -अरविंद मालखेडे यांनी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी रेल्वे बोर्डात…

 वैनगंगा-नळगंगा महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी

वैनगंगा-नळगंगा महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी जल अभ्यासक डॉ.प्रवीण महाजन यांच्या प्रयत्नाला मोठे यश  राजेंद्र साळसकर मुंबई : पश्चिम विदर्भाला सुजलाम-सुफलाम करणाऱ्या आणि १४ वर्षांपासून मजुरीच्या प्रतीक्षेत असलेला महत्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देऊन विदर्भवासियांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विदर्भाचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस यांनी मोठी भेट दिली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच नागपूर भेटीत जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांनी ३ नोव्हेंबर २०१४ रोजी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाबाबत मागणी केली. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प नकाशा नसल्याने सातत्याने होणाऱ्या शेतकरी आत्महत्या व नापिकीमुळे शेतकऱ्यांचे, कामकऱ्यांचे जगणे कठीण झाले होते. यावर उपाय म्हणून वैनगंगा नदीतून आपल्या हिश्यातील वाहून जाणारे पाणी नदीजोडद्वारे वळविल्यास पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेतीकरिताया पाण्याचा उपयोग करून त्यांचे जीवनमान उंचावल्या जाऊ शकते. याकरता डॉ. महाजन यांनी ही मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीसांनी जलसंपदा विभागाला सदर विषयाबाबतचा स्थितिदर्शक अहवाल शासनास त्वरित सादर करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार जलसंपदा विभागाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांनी यावर अभ्यास करून अहवाल सादर करण्यात यावा,या आदेशाद्वारे त्यांनी अहवाल तयार केला. यानंतर राज्य तांत्रिक सल्लागार समिती,जल विदन्यान व धरण सुरक्षितता विभाग,राष्ट्रीय  जल विकास प्राधिकरण,  महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरण ( MWRRA ), या सर्वांनी नदीजोड प्रकल्पाच्या अहवालाची छाननी करून मागील आठवड्यात प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर सादर केला होता.त्यानंतर मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत मंजूरी प्रदान करत या नदीजोड प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखवून  विदर्भपुत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ वासियांचे स्वप्न पूर्ण केले आहे. प्रसिद्ध जल अभ्यासक डॉ.प्रवीण महाजन यांनी वैनगंगा – नळगंगा या नदीजोड प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सन २०१४ साली लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती.तसेच  गेली १२ वर्षे म्हणजे एक  तप या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता.या मान्यतेमुळे डॉ.प्रवीण महाजन यांच्या एक तपाच्या या  तपश्चर्येला मोठे यश मिळाले असून त्यांची तपश्चर्या फळाला आल्याचं बोललं जात आहे.

  महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन-२०२६ कार्यशाळा संपन्न

महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन-२०२६ कार्यशाळा संपन्न जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे विशेष मार्गदर्शन  अशोक गायकवाड   अलिबाग :विकास आयुक्त (उद्योग) यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची…

 बीपीएमसी कायद्यानुसार कर व दर निश्चित करण्यासाठी तातडीने महासभा बोलवा

बीपीएमसी कायद्यानुसार कर व दर निश्चित करण्यासाठी तातडीने महासभा बोलवा भाजपा नगरसेवक दिपेश म्हात्रे यांची केडीएमसी महापौरांकडे मागणी कल्याण : बीपीएमसी कायद्यानुसार कर व दर निश्चित करण्यासाठी तातडीने महासभा बोलवण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी केली असून याबाबत त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे १२२ नगरसेवक दिनांक १६ जानेवारी रोजी निवडून आले असून, ३ फेब्रुवारी रोजी महापौरपदी नियुक्ती हर्षाली चौधरी यांची नियुक्ती झाली आहे. तथापि, बीपीएमसी कायद्या  मधील तरतुदीनुसार  महानगरपालिकेचे कर व दर हे दिनांक २० फेब्रुवारीपूर्वी निश्चित करणे अत्यावश्यक आहे. मात्र, आजपर्यंत यासंदर्भात कोणतीही महासभा घेण्यात आलेली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. गेल्या पाच वर्षांपासून महानगरपालिकेचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून चालू होता. नागरिकांनी व लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडून दिलेल्या १२२ नगरसेवकांच्या अस्तित्वातही जर अशा महत्त्वाच्या विषयांवर महासभा होत नसेल, तर पुन्हा प्रशासनाचा कारभार प्रशासकांच्या हातीच राहणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नगरसेवकांच्या मनात निर्माण होत आहे. महासभा ही लोकशाही व्यवस्थेतील सर्वोच्च निर्णयप्रक्रिया असून, तिच्यामार्फतच कर व दर निधित होणे अपेक्षित आहे. यामध्ये विलंब होणे हे नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनेही योग्य नाही. त्यामुळे तातडीने महासभा बोलवून कर व दर निश्चित करण्याचा विषय मांडण्यात यावा. महानगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्पासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात. निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना त्यांच्या अधिकारानुसार निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात यावे अशी मागणी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी महापौरांकडे केली आहे.

केडीएमसीतर्फे महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

केडीएमसीतर्फे महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कल्याण : ८ मार्च २०२६ रोजीच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमा करिता कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्य क्षेत्रातील सर्व महिलांनी आपण केलेल्या कामगिरी बाबतची संपूर्ण माहिती कागदपत्रे अर्जा सहित महिला व बालकल्याण विभाग, कल्याण डोंबिवली महानगपालिका येथे दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जमा करण्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी केले आहे.

भटक्या कुत्र्यांसंदर्भात उपायोजना करण्याची राहुल काटकर यांची मागणी

भटक्या कुत्र्यांसंदर्भात उपायोजना करण्याची राहुल काटकर यांची मागणी कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव अत्यंत चिंताजनक बनला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांसंदर्भात उपायोजना करण्याची मागणी कल्याण पूर्वेतील सामाजिक कार्यकर्ते राहुल काटकर यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण (पूर्व) येथे राहणारे आयेश अमीन या युवकाला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर रेबिजची भीती मनात निर्माण झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिका रुग्णालयांमध्ये रेबीज लसीचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून संबंधित विभागाच्या नियोजनातील त्रुटी व निष्काळजीपणा स्पष्ट दिसून येतो. कुत्रा चावल्यानंतर तात्काळ व पूर्ण लसीकरण होणे आवश्यक असताना लसीची अनुपलब्धता नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारी आहे. तरी परिसरात तातडीने कुत्रे पकड मोहीम राबवावी. सर्व भटक्या कुत्र्यांचे लसीकरण व नसबंदी मोहिम युद्धपातळीवर राबवावी. महानगरपालिका रुग्णालयांत रेबीज लस कायमस्वरूपी उपलब्ध ठेवावी. संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी. नागरिकांसाठी जनजागृती मोहीम व आरोग्य शिबिरे आयोजित करावीत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी राहुल काटकर यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.

 शहापूर,मुरबाड,भिवंडी या तालुक्यातील आदिवासींच्या शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर

शहापूर,मुरबाड,भिवंडी या तालुक्यातील आदिवासींच्या शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर शेकडो मुले  शिक्षणापासून वंचित अविनाश उबाळे ठाणे -ठाणे जिल्हयातील शहापूर,मुरबाड, भिवंडी,या तालुक्यातील आदिवासी वाड्या वस्त्यांवरील आदिवासी कुटुंबांनी मोठ्या प्रमाणावर शहराकडे वीटभट्ट्यांवर रोजगारासाठी स्थलांतर…

  फलाटांची उंची कधी वाढणार?

फलाटांची उंची कधी वाढणार? मुंबई ते कसारा मार्गावर वाढत्या अपघातानंतरही रेल्वे प्रशासन ढीम्म अविनाश उबाळे मुंबई : लोहमार्गावरील मध्य रेल्वेच्या मुंबई ते कसारा मार्गावरील अनेक रेल्वे स्थानकावरील फलाटाची उंची कमी असल्याने…

 धर्मवीर क्रीडा संस्था बॅडमिंटन स्पर्धा २०२६ दिमाखात संपन्न

धर्मवीर क्रीडा संस्था बॅडमिंटन स्पर्धा २०२६ दिमाखात संपन्न अल्फी मेक्कदतचा दुहेरी मुकुट, जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंची चमकदार कामगिरी १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन हॉल येथे पार पडलेली धर्मवीर क्रीडा संस्था बॅडमिंटन स्पर्धा  अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात यशस्वीरीत्या संपन्न झाली. ठाणे महानगरपालिकेच्या आश्रयाखाली ठाणे सिटी अँड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेला संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंचा मोठा प्रतिसाद लाभला. विविध वयोगटांतील १० गटांमध्ये सामने खेळविण्यात आले आणि तीन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवाने जिल्ह्यातील बॅडमिंटन वातावरण अधिक बळकट केले. स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरला अल्फी मेक्कदत याचा दुहेरी किताब. अल्फीने अंडर १३ मुलांच्या एकेरी गटात तसेच अंडर १५ मुलांच्या एकेरी गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटावर आपले नाव कोरले. दोन्ही अंतिम सामन्यांमध्ये त्याने अत्यंत प्रतिभावान पियूष सुतारवर मात करत दोन उदयोन्मुख चॅम्पियनमधील थरारक आणि उच्च दर्जाच्या लढती प्रेक्षकांना अनुभवायला मिळाल्या. अंडर ९ मुलांच्या एकेरी गटात शिवांश चव्हाण विजेता ठरला तर विहान अनिखिंडी उपविजेता झाला. अंडर ९ मुलींच्या एकेरीत यश्वी कोरगावकर हिने विजेतेपद पटकावले आणि यम्मी मानोन हिला उपविजेतेपद मिळाले. अंडर ११ मुलांच्या एकेरीत योहान नायर विजेता ठरला तर वेद चव्हाण उपविजेता ठरला. अंडर ११ मुलींच्या एकेरीत नैरा पहारिया हिने बाजी मारली आणि सान्वी वागळे उपविजेती ठरली. अंडर १३ मुलींच्या एकेरीत शनाया तावटे हिने विजेतेपद पटकावले तर अद्विका मोरे उपविजेती ठरली. अंडर १५ मुलींच्या एकेरी गटात आर्या शिंदे विजेती ठरली आणि शुभ्रा कुलकर्णी उपविजेती ठरली. खुल्या गटातील मुलांच्या एकेरीत मंथन पाडेल विजेता झाला तर अर्णव सावंत उपविजेता ठरला. खुल्या गटातील मुलींच्या एकेरीत आर्या घाडगे हिने विजेतेपद मिळवले आणि गुंजन कोठारी उपविजेती ठरली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा वरिष्ठ बॅडमिंटनपटू व क्रीडाप्रेमी  उदय गायकवाड,  रामदास शिंदे आणि  सुनील सोपारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.  उदय गायकवाड आणि  रामदास शिंदे यांनी विजेत्या खेळाडूंना नैतिक मार्गदर्शन देत त्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणा दिली. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून  नरेश गुंडले यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सामने पार पाडले. या भव्य आयोजनामागे संदीप कांबळे आणि प्राजक्ता रानडे-कांबळे यांचे विशेष परिश्रम मोलाचे ठरले. तसेच धर्मवीर क्रीडा संस्थेचे अध्यक्ष अशोक वैती आणि ठाणे महानगर पालिकेच्या क्रीडा उप-आयुक्त मीनल पालांडे यांचा देखील  या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात सिंहाचा वाटा होता. खेळाडूंना स्पर्धेदरम्यान सातत्याने मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक  श्रीकांत वाड तसेच प्रशिक्षक मितेश हाजीरनीस, फुलचंद पासी, एकेंद्र दर्जी, प्रसेनजीत शिरोडकर उपस्थित होते.  श्रीकांत वाड यांनी खेळाडूंसोबतच पालकांनाही योग्य मार्गदर्शन करत स्पर्धेच्या दर्जात भर घातली. धर्मवीर क्रीडा संस्थेच्या पुढाकारामुळे आणि ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली असून, ठाणे जिल्ह्यातील बॅडमिंटनला नवी दिशा देणारा हा क्रीडा महोत्सव ठरला आहे. भविष्यातही अशाच दर्जेदार स्पर्धांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना व्यापक व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मुंबई : चौथ्या आरंभ स्पोर्ट्स तर्फे  आयोजित करण्यात आलेल्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत पार्थ धारोड, सनया पवार या समता क्रीडा भवनच्या दोन्ही खेळाडूंची अनुक्रमे पुरुष, महिला गटात सर्वोत्तम मल्लखांबपटू म्हणून निवड करण्यात आली. पुरुष गटाचे सर्वसाधारण विजेतेपद विद्यामंदिर, दहिसर व दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन या दोन्ही संघांना विभागून देण्यात आले, तर महिला विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद समता क्रीडा भवन यांनी पटकावले. ही स्पर्धा मल्लखांब या पारंपरिक भारतीय क्रीडा प्रकाराच्या उत्कृष्टतेचा व शिस्तीचा गौरव करणारी ठरली.