Month: October 2024

अनधिकृत फलक, पोस्टर्स यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश

ठाणे : निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगीशिवाय लागलेले सर्व प्रकारचे दिवाळी शुभेच्छा किंवा त्याप्रकारचे अनधिकृत फलक, पोस्टर्स यावर सर्व सहाय्यक आयुक्तांनी तत्काळ कारवाई करावी. काही ठिकाणी त्या फलकांचे सांगाडे (तात्परुत्या फ्रेम) कायम असल्याचे निर्दशनास आले आहेत. फलकांचे सांगाडेही काढण्यात यावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे सोमवारी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत फलकांबाबत कठोर कारवाईचे आदेश दिले. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर करावाई करून सगळे फलक, पोस्टर्स काढून घेण्यात आले होते. आता दिवाळीचे दिवस असल्याने पुन्हा एकवार शुभेच्छांसाठी फलक लावले जाण्याची शक्यता आहे. ज्या फलकांना जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी असेल, त्यांनाच असे शुभेच्छा फलक लावता येतील, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, परिमंडळ उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख उपस्थित होते. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी बैठकीतील सादरीकरणाचे संचालन केले. मतदारांच्या सोयीच्या दृष्टीने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून मतदारांसाठी आवश्यक तेथे रॅम्प, शौचालय सफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांचे नियोजन करावे. मतदारांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आयुक्त राव यांनी सांगितले. दिवाळीची सुटी लक्षात घेऊन दैनंदिन साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची सफाई, पाणी पुरवठा या व्यवस्था सुरळीत राहतील याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी. त्याचबरोबर, बांधकाम प्रकल्पांच्या परिसरातील रस्ते, चिखल आणि धूळीने भरत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. शहर विकास विभागाने सर्व बांधकाम व्यावसायिकांना परिसरातील रस्ते खराब होणार नाहीत, त्यावर वेळोवेळी पाण्याची फवारणी होईल याविषयी पुन्हा सूचना द्याव्यात, असेही आयुक्त राव म्हणाले.

मुरबाडमधून सुभाष पवार यांचा शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज

रॅलीला हजारो नागरिकांची गर्दी मुरबाड : मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनात खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानिमित्ताने मुरबाड शहरातील वातावरण महाविकास आघाडीमय झाल्याचे पाहावयास मिळाले. मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सुभाष पवार यांना उमेदवारी दिल्याने महायुतीपुढे आव्हान निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुरबाड मधील कुणबी भवन येथून रॅलीला सुरुवात झाली. बेंजो, ब्रास बॅण्ड, ढोलच्या गजरात शहराच्या विविध भागातून रॅली निघाली. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर संतोषी माता मंदिराच्या मैदानात रॅली पोहोचल्यावर झालेल्या जाहीर सभेत मुरबाड मतदारसंघात परिवर्तन घडविण्याचे आवाहन करण्यात आले. या रॅलीच्या निमित्ताने मुरबाड तालुक्याने इतिहासातील सर्वात मोठी रॅली अनुभवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे, लोकनेते आमदार गोटीरामभाऊ पवार, शिवसेनेचे उपनेते अल्ताफ शेख, उमेदवार सुभाष पवार,  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे,  जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे, कॉंग्रेसचे बदलापूर शहर अध्यक्ष संजय जाधव, मुरबाड तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर घुडे, संतोष विशे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बदलापूरचे प्रभारी अध्यक्ष कालिदास देशमुख, विश्वनाथ जाधव, जयराम मेहेर, लियाकत शेख, सुधीर पष्टे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कविता वरे आदी उपस्थित होते. मुरबाड हा सुसंस्कृत मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. मात्र, गेल्या १५ वर्षात मतदारसंघाचे नुकसान झाले. बदलापूर शहरात पाणी, वीज आदी प्रश्न तीव्र आहेत. गेल्या १५ वर्षांत फुटले नव्हते, तेवढे नारळ प्रथमच फोडले गेले, अशी टीका उमेदवार सुभाष पवार यांनी केली. मुरबाड शहरातील भव्य रॅलीने मतदारांमधील उत्साह अनुभवता आला, याबद्दल लोकनेते गोटीराम पवार यांनी कौतुक केले. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही मतदारांनी ताकद दाखवावी. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आदेश अंतिम असून, आता अशक्य काहीही नाही. सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन सुभाष पवार यांना विजयी करावे, असे आवाहन खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी केले आहे.

रेल्वे कामगार संघटनेच्या मान्यतेसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता कामगारांचे शक्ती प्रदर्शन

अनिल ठाणेकर ठाणे : नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला पुन्हा मान्यता  मिळविण्यासाठी ४  ते ६  डिसेंबर २०२४  दरम्यान निवडणूक  होणार असून,  या निवडणुकीचे नामांकन अर्ज २५ ऑक्टोबर २०२४  रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल  येथील महाप्रबंधक कार्यालयात  कामगारांच्या उपस्थित भरण्यात आले, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. भारतात रेल्वे कामगारांची संख्या जवळजवळ अकरा लाख असून, मध्य रेल्वेच्या कामगारांची संख्या जवळपास एक लाख आहे.  या उद्योगात कामगार कायद्यानुसार  युनियन मान्यतेसाठी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक केली जाते. या उद्योगात  नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला पुन्हा मान्यता  मिळविण्यासाठी ४  ते ६  डिसेंबर २०२४  दरम्यान निवडणूक  होणार असून,  या निवडणुकीचे नामांकन अर्ज २५ ऑक्टोबर २०२४  रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल  येथील महाप्रबंधक कार्यालयात  कामगारांच्या उपस्थित भरण्यात आले. याप्रसंगी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्त्यांनी सीएसटी येथे मोर्चा नेऊन आपले शक्तिप्रदर्शन केले. मिटिंग सुरू होण्यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक ७  आणि ८ पासून DRM कार्यालय मार्गे उपनगरीय लॉबीपर्यंत कामगार मोर्चाने गेले, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना  ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनचे (AIRF)  महामंत्री  कॉ.  शिवगोपाल मिश्राजी आणि नॅशनल रेल्वे मजदूर युनियन ( NRMU ) व  कोकण रेल्वेचे महामंत्री (CRKR) कॉ. वेणू पी. नायरजी यांनी पुष्पहार अर्पण केला, त्यानंतर जनरल मॅनेजर ऑफिस कंपाऊंड क्षेत्राकडे  मोर्चा पुढे जाऊन मिटिंग सुरू झाली. नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे  महामंत्री कॉ.  वेणू नायरजी यांनी आपल्या तेजस्वी भाषणातून  चांगला संदेश देऊन  रेल्वे कामगारांचा उत्साह वाढविला.  त्यानंतर ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनचे महामंत्री कॉ.  शिवगोपाल मिश्राजी यांनी सरकारची सद्यस्थिती, युनियनची गरज आणि पेन्शन योजनेच्या  UPS  गोंधळाबद्दल बोलून इंटक प्रणित संघटना कामगारांच्या पाठीत   खंजीर खुपसते.  उदा.  १९६०,१९७४  चा संप फोडून सरकारची लॉयल्टी व आपल्या मुलांना रेल्वेत नोकरीत सामावून घेतले. AIRF/ NRMU ला 100 वर्षाचा इतिहास या युनियनला आहे. UPS मध्ये राहिलेले मुद्दे सुद्धा चर्चेद्वारे सोडविले जातील याची हमी यावेळी त्यांनी कामगारांना दिली व ज्या कर्मचाऱ्यांना आपल्या निवडीनुसार UPS किंवा NPS घेण्यासाठी ऑप्शन देण्यात आले आहे त्यांनी ऑप्शन देताना विचार पूर्वक निवड करावी हे सुद्धा सांगितले आहे.NRMU व AIRF सारख्या संघर्षशील युनियनची कर्मचार्‍यांना गरज का आहे.  हे स्पष्ट केले.नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या अध्यक्षा कॉ.  कामाक्षी बागलवाडीकर यांनी सर्वांचे आभार  मानले. रेल्वे मुख्यालय व विभागातील सर्व पदाधिकारी, युवा, महिला कॉम्रेड,  सर्व DC चे पदाधिकारी आणि विभागातील सर्व सक्रिय सदस्यांनी या मिटिंगमध्ये  सहभाग घेतल्यामुळे मिटींगला हजारोच्या संख्येने उपस्थिती होती . याप्रसंगी ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे झोनल सचिव कॉ. जे. शिंदे,  नॅशनल  रेल्वे मजदूर युनियनचे सर्व सहाय्यक सचिव कॉ. विवेक नायर, कॉ. पी. टी. एस. राजा, कॉ. श्याम नायक, कॉ. बी.एल. यादव, कॉ. विनय सावंत कॉ. संतोष कुमार, कॉ. आर. के. मलबारी, WP, सर्व मंडळाचे अध्यक्ष, मंडळ सचिव, युवा महिला, शाखा पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते यांच्या साक्षीने नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने मान्यतेच्या निवडणुकीसाठी नामांकन मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी सहर्ष बाजपेयी यांना दिले.

भाजपाचे विशाल परब यांची बंडखोरी.?

जोरदार शक्ती प्रदर्शन करत अपक्ष म्हणून दाखल केला अर्ज…! सिंधुदुर्ग :सावंतवाडी विधानसभा मतदार  संघातून भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष  विशाल परब यांनी बंडखोरी करत जोरदार शक्ती प्रदर्शन करत अपक्ष म्हणून कल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून भाजपाचे ते इच्छुक उमेदवार होते.मात्र हा मतदार संघ शिंदे गटाच्या वाट्याला आल्याने विद्यमान आमदार,राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उमेदवारी शिंदे सेनेने जाहीर केली.महायुतीचे उमेदवार म्हणून आता केसरकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.भाजपामधील आणखी एक इच्छुक असलेले माजी आमदार आणि केसरकर यांचे कट्टर विरोधक राजन तेली यांनी अचानकपणे भाजपा मधून बाहेर पडून ऊबाठा सेनेत प्रवेश केला आणि सेनेची उमेदवारीही मिळवली.या मतदार संघात आता केसरकर विरुद्ध तेली ( सेना विरुद्ध सेना) असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पवार गटाच्या अर्चना घारे – परब या सुद्धा इच्छुक होत्या.ही जागा राष्ट्रवादी पवार गटाला मिळावी यासाठी त्यांचा व त्यांचा समर्थकांनी जोरदार प्रयत्न चालवले होते मात्र तेलींची उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज झालेल्या अर्चना घारे – परब यांनी बंडाचे निशाण हाती घेत जोरदार शक्ती प्रदर्शन करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज परवा दाखल केला.तेव्हा दोघा बंडखोर अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे न घेतल्यास या मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. दरम्यान आज विशाल परब यांनी सावंतवाडीतील जगन्नाथराव भोसले उद्यानापासून मिरवणुकीने जात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी ‘आपण लढणार आणि जिंकणारही’ असा विश्वास व्यक्त केला.त्यांच्या समर्थनार्थ दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यातून त्यांचे समर्थक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने आले होते.

नागरिकांच्या भेटी घेऊन मतदान करण्याविषयी जनजागृती

नवी मुंबई : 20 नोव्हेंबर रोजी होणा- निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यादृष्टीने 150 व 151 विधानसभा निवडणूक कार्यालयांप्रमाणेच नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार स्वीपचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त…

पनवेलच्या वनवासी कल्याण आश्रमात जॉय ऑफ गिव्हिंगचा दिवाळी भेट उपक्रम संपन्न

मुंबई व परिसरात सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या जॉय ऑफ गिव्हिंग ह्या सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी पनवेल जवळील वनवासी कल्याण आश्रमाच्या वस्तीगृहातील निराधार आदिवासी…

अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर

मुंबई :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या तिसऱ्या यादीत चार उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या आधी अजित पवार यांनी दोन याद्यांची घोषणा केली होती. त्यानुसार अजित पवार…

आमदारांची चल-अचल संपत्ती अचानक दरवर्षी कशी काय दुप्पट होते हो!

सर्वसामान्यांनी बॅंकेत पैसा ठेवला तर त्याला दुप्पट व्हायला पाच वर्षे लागतात आमदारांची चल-अचल संपत्ती अचानक दरवर्षी कशी काय दुप्पट होते हो! राज्यात निवडणूका जाहीर झाल्यात व उमेदवारी फार्म सध्या भरने…

शरद पवारांच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानेदेखील  उमेदवारांच्या दोन याद्या यापूर्वीच जाहीर केल्या असून आता ९ उमेदवारांची तिसरी यादी शरद पवारांनी जाहीर केली आहे. पहिल्या दोन यादीत राष्ट्रवादीने ६७ उमेदवारांची घोषणा केली होती. आतापर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकूण ७६ उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे.  शनिवारी…