Month: October 2024

  युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करतांना माजी आमदार परशुराम उपरकर

मिहीर कोटेचा मुलुंड विधानसभेसाठी आज उमेदवारी दाखल करणार

मुंबई : मुलुंडचे आमदार आणि भाजप आणि महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा हे उद्या, गुरुवारी, २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योगच्या दिवशी मुलुंड विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी जंगी…

कॉंग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांच्या हाती ‘घड्याळ’…

मुंबई : अमरावती शहरातील कॉँग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.…

 ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा आयुक्त सौरभ राव यांना इशारा

अनधिकृत बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास न्यायालयात जाणार!   अनिल ठाणेकर ठाणे : अनधिकृत बांधकामांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कुठलीही ठोस कारवाई न करता प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचवून चौकशीचा फार्स केल्याने या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात यावी अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल, असा इशारा महापालिका आयुक्त सौरभ राव यांना ठाणे शहर (जि.) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे. ठाणे महापालिका हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना महापालिकेचे संबंधित अधिकारी अभय देत नागरी सुविधा पुरवत असल्याने शहरातील नागरी सुविधांवर ताण वाढत असल्याने अनेक सामाजिक संघटनांसह नगरसेवकांनी आवाज उठवला होता. मुंब्रा परिसरातील लकी कंपाऊंड,वागळे येथील साईराज इमारत कोसळून अनेक जणांचे प्राण गेल्याच्या भीषण घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अशा अनधिकृत बांधकामांना कायमचा पायबंद घालण्यासाठी व  त्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्याकरता मा.ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण व माजी नगरसेवक नारायण पवार यांनी महासभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती.या लक्षवेधी सुचनेवर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर सभागृहाने सर्वानुमते ६ सप्टेंबर २०२१ रोजी अनधिकृत बांधकामांच्या चौकशीचा ठराव पारित केला होता.त्या ठरावाच्या व २००९ च्या नगरविकास शासन निर्णयास अनुसरून तत्कालीन आयुक्त विपिन शर्मा यांनी १६ ऑगस्ट २०२१ रोजी सर्व सहाय्यक आयुक्तांच्या चौकशीच्या दिलेल्या आदेशानुसार ठा.म.पा सेवेतील  सहाय्यक आयुक्तांच्या चौकशी ह्या चौकशी अधिकारी नेमुण करण्यात आल्या व प्रतिनियुक्ती वर आलेल्या सहाय्यक आयुक्तांची शासनाने चौकशी केली होती. बारा पैकी अकरा सहाय्यक आयुक्तांना चौकशी अधिकाऱ्याने दोषारोपातून मुक्त केले आहे आणि एका सहाय्यक आयुक्ताची चौकशी प्रलंबित आहे. या प्रकरणी ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाणे काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे,हिंदुराव गळवे यांच्यासह पत्रकार परिषद घेत अनधिकृत बांधकाम करणारे ठा.म.पा सेवेतील व प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी जर निर्दोष असतील तर अनधिकृत बांधकामे करणारे व त्यास जबाबदार असणारे कोण..? तसेच या प्रकरणी कुठलीही ठोस कार्यवाही न झाल्याने सहाय्यक आयुक्तांची चौकशी सुरु असतानाच दुसरीकडे या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना कोणाच्या दबावाखाली क्लीन चिट देण्यात आली.तसेच आयुक्तांनी हा बोगस चौकशी अहवाल स्वीकारू नये व या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्यात यावी अशी मागणी  ठाणे शहर (जि.) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे केली आहे.

एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर

अनिल ठाणेकर मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून आज रात्री उशीरा ४५ उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे. पक्षातील विद्यमान जवळपास सर्वच आमदारांना पुन्हा विधानसभेची तिकीट जाहीर करण्यात आली आहे. जेथे विद्यमान आमदार खासदारकीची…

ऑलेक्ट्राचा सहामाही आर्थिक अहवाल सकारात्मक

मुंबई : प्रवाशांना प्रदुषण विरहीत गारेगार प्रवासाची संधी एसटी आणि बेस्टच्या इलेक्ट्रिक बस देत आहेत. दिवाळीच्या दरम्यान या पुरवठ्यात वाढही झाल्याचे नुकतेच महामंडळाने सांगीतले. एसटी आणि बेस्टला इलेक्ट्रिक बस पुरवण्यता आघाडीवर असणारी  इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OGL) ने  दुसऱ्या तिमाही आणि पहिल्या सहामाहीचा  एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केला. संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत या उल्लेखनीय बाबींना अधिकृतपणे मान्यता दिली.  या  तिमाहीत, ऑलेक्ट्रा ने 315 इलेक्ट्रिक वाहने वितरित केली, 23-24 या आर्थिक वर्षातील 154 च्या तुलनेत यात  105 टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीकडे एकूण 10,503  बस ऑर्डर्स आता पर्यत नोंदवण्यात आल्या आहेत. 0000  

सेनादलाच्या विर मराठा रेजिमेंटच्या कबड्डी संघ चांगली कामगिरी करणार – लक्ष्मण गांवड

अशोक गायकवाड अलिबाग : सेनादलाच्या विर मराठा रेजिमेंटच्या कबड्डी सराव शिबिर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पिपंळपाडा येथे घेण्यात आले. न्युयंग संघ पिपळपाडा यांच्या क्रिडांगणावर या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी बिकानेर येथे होणाऱ्या सेनादलाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये हा संघ चांगली कामगिरी करुन अंतिम विजेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आसल्याचे वीरमराठा रेजिमेंटचे प्रशिक्षक लक्ष्मण गांवड यांनी सांगितले.* या शिबीराच्या सांगता समारंभाप्रसंगी न्यूयंग संघ पिपळपाडा संघाने सेना दलाच्या संघाचा सत्कार केला या वेळी जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी पेण तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हरिचंद्र शिंदे, कराटे, किकबॉक्सिंगचे आंतराष्ट्रीय खेळांडु किकबॉक्सिंग पंच प्रविण पाटील, सेनादल संघाचे प्रशिक्षक राष्ट्रीय प्रशिक्षक तथा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य लक्ष्मण गावंड, न्यू यंग संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता पाटील, न्यू यंग संघाचे अध्यक्ष विकास पाटील,खजिनदार सुनिल पाटील, उपाध्यक्ष गजानन पाटील सरचिटणीस हरिश्चंद्र पाटील, कासु ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुनंदा गांवड,राष्ट्रीय कबड्डी पंच हिरामण भोईर, योगेश पाटील, योगेश टेमकर , धावपटू गजानन भोईर, महेंद्र पाटील, आकाश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. रायगड ही कबड्डीची पंढरी मानली जाते रायगड जिल्ह्याने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळांडू दिले तर राष्ट्रीय प्रशिक्षक दिले रायगडच्या कबड्डीचे आकर्षण सगळ्यानाच असते अनेक राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रायगड जिल्ह्यात केले जाते. सेनादलाच्या विर मराठा रेजिमेंट, बीकानेर-राजस्थान या संघाचा सराव शिबिरासाठी सेना दलाने देखील रायगगड जिल्ह्याची निवड केली. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पिपंळपाडा येथे सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर न्यूयंगसंघ पिपंळपाडा संघाचा कबड्डी खेळांडू सध्या सेनादलात कार्यरत असलेला प्रदिप भगत यांनी वीरमराठा रेजिमेंट संघाचे सराव शिबिर घेण्याचे ठरविले येथील क्रिडांमंडळाच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी या खेळांडूना क्रिडांगण उपलब्ध करुन दिले. तर खेळांडुच्या राहाण्याची व सर्व व्यवस्था केली. या संघाला प्रशिक्षण देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय प्रशिक्षक लक्ष्मण गांवड यांची निवड करण्यात आली. लक्ष्मण गांवड हे अनुभवी प्रशिक्षक असल्याने त्यांनी या संघाला उत्तम प्रकारे प्रशिक्षण देण्याचे काम केले बिकानेर येथे होणाऱ्या सेनादलाच्या कबड्डी स्पर्धेमधे हा संघ सहभागी होणार असून या संघासोबत लक्ष्मण गांवड प्रशिक्षक तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून न्यू यंग संघाचे तथा पोलीस दलातील नंदकुमार पाटील हे असणार आहेत. या गोदर लक्ष्मण गांवड यांनी 2010 ला फिरोजपुर पंजाब येथे या संघाला प्रशिक्षण दिले आहे त्यावेळी लक्ष्मण गांवड यांना सेनादलाने आर्मी कॅप देवून सन्मानित केले होते.सेनादलाच्या वीरमराठा रेजिमेंटच्या संघाला दोन वेळा प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. या संघामधे चांगले खेळाडू आहेत खेळांडूनी चांगली मेहनत घेतलीच आहे तर न्युयंग संघ पिपळपाडा संघाने या सराव शिबिरासाठी चांगले सहकार्य केले आहे. यावर्षी बिकानेर येथे होणाऱ्या सेनादलाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये हा संघ चांगली कामगिरी करुन अंतिम विजेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आसल्याचे वीरमराठा रेजिमेंटचे प्रशिक्षक लक्ष्मण गांवड यांनी सांगितले.आम्ही जे सुखाने जगतो ते तुमच्या मुले सेनादलाने येथे कबड्डीचा सराव शिबिराचे आयोजन आमच्या पिपंळपाडा गावात केले हे आमचे भाग्य आसल्याचे न्युयंगसंघ पिपंळपाडा संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता पाटील. यांनी या वेळी सांगितले.या सराव शिबीरास न्यू यंग संघाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी ऊत्तम सहकार्य केले. तसेच संघाचे खेळाडू नंदकुमार पाटील, दुर्वास पाटील, गजानन पाटील, विजय भगत सतिष पाटील तसेच अन्य वरिष्ठ खेळाडुंनी शिबीरात ऊत्तम मार्गदर्शन केले.या प्रशिक्षण शिबीरास सर्वश्री विकास पाटील, चंद्रकांत पाटील, विश्वनाथ पाटील, सुनिल पाटील, संदेश पाटील, देवेंद्र भोईर , दत्तात्रेय पाटील, हिरामण भोईर, लिलाधर म्हात्रे, प्रविण पाटील, जयेश पाटील या सर्वांनी आर्थिक व अन्य स्वरुपात मदत केली.

मुंब्र्यातून नजीब मुल्ला आव्हांडविरोधात लढणार

मुंबई :  ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार जिंतेंद्र आव्हाडांविरुद्धचा महायुतीचा उमेदवार निश्चित झाला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघासाठी नजीब मुल्ला यांना तिकीट दिलं आहे. उमेदवार नजीब मुल्ला यांनी अजित…

दीपक फर्टिलायझर्स प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वततेसाठी कटिबद्ध – मुकुल अग्रवाल

अशोक गायकवाड   पनवेल:अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रणात दीपक फर्टिलायझर्स आघाडीवर असून दीपक फर्टिलायझर्समध्ये आम्ही प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वततेसाठी कटिबद्ध आहोत, अशी माहिती दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग विभागाचे अध्यक्ष मुकुल अग्रवाल यांनी दिली. दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून प्रगत पर्यावरणीय तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषण कमी करण्यासाठी सक्रिय पावले उचलले जातात. त्यानुसार प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी उपकरणे निवडण्यासाठी त्या प्रक्रियेचे काळजी पूर्वक विश्लेषण केले जाते, त्या अनुषंगाने सध्याच्या आणि भविष्यातील नियमांची पूर्तता करण्यासाठी कंपनीने आपल्या सुविधांमध्ये आधुनिक वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली कार्यान्वित केली आहे.तळोजा प्रकल्पात दीपक फर्टिलायझर्सने स्पेनच्या इन्क्रोएसए कंपनीच्या सहयोगाने एनपीके खते तयार करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला. या नवीन प्रणालीमुळे उत्पादनात वापरले जाणारे जवळजवळ सर्व अमोनिया पकडण्यास मदत होते, ज्यामुळे ते हवेत सोडण्यापासून रोखले जाते. याचा परिणाम असा होतो की अमोनियाचे उत्सर्जन खूप कमी ठेवले जाते आणि ते भारतीय मानकांपेक्षा तीनपट कमी आहे. या प्रणालीमुळे दरवर्षी ५०० टन अमोनियाची बचत होत असून कोणताही हानिकारक द्रव कचरा तयार होत नाही, त्यामुळे प्रक्रिया अधिक स्वच्छ होते. जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून इन्क्रोने मान्यता दिलेले हे तंत्रज्ञान पर्यावरणाचे रक्षण आणि वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. या संदर्भात मॅन्युफॅक्चरिंगचे विभागाचे अध्यक्ष मुकुल अग्रवाल म्हणाले कि,“दीपक फर्टिलायझर्समध्ये आम्ही प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वततेसाठी कटिबद्ध आहोत. तळोजा प्रकल्पातील आमची उत्सर्जन कमी करणारी प्रणाली पर्यावरणीय प्रभाव लक्षणीयरित्या कमी करते, अमोनिया उत्सर्जन नियामक मर्यादेपेक्षा खूप कमी आहे आणि जवळजवळ संपूर्ण अमोनियाची पुनर्प्राप्ती होते. इनक्रोएसएच्या सहकार्याने, आम्ही हवेची गुणवत्ता आणि संसाधन संवर्धनासाठी नवीन उद्योग बेंचमार्क स्थापित केले आहेत. एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून, आम्ही हरित, अधिक शाश्वत भविष्यासाठी आमच्या ऑपरेशन्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानात गुंतवणूक करत आहोत”. दीपक फर्टिलायझर्सने अलीकडेच तळोजा येथील अमोनिया प्रकल्पात या योजनेची सुरुवात केली आहे, ज्याचे व्यवस्थापन परफॉर्मन्स केमिसर्व्ह लिमिटेड या उपकंपनीद्वारे केले जाते. या प्रकल्पातून दररोज १५०० टन अमोनियाचे उत्पादन होऊ शकते. पर्यावरण रक्षणासाठी दीपक फर्टिलायझर्सने प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. त्यांनी हानिकारक नायट्रोजन ऑक्साईड उत्सर्जन 80% पेक्षा जास्त कमी करणारे विशेष बर्नर आणि प्रगत तंत्रज्ञान स्थापित केले आहे. यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते आणि प्रकल्प पर्यावरणपूरक बनतो.तसेच विसर्गापूर्वी वायू प्रदूषकांच्या सांद्रतेचा मागोवा घेण्यासाठी प्रगत ऑनलाइन निरंतर उत्सर्जन देखरेख प्रणाली स्थापित केले आहे. पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि जलद कारवाई सक्षम करण्यासाठी डेटावर २४/७ लक्ष ठेवले जाते आणि केंद्र आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाईटवर अपलोड केले जाते.