Month: October 2024

रॅपीडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धा संजय मणियार, राहुल बर्वे विजेते

मुंबई : असोसिएशनच्या ७० व्या वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने राज्यातील पंच व पदाधिकारी यांच्यासाठी विशेष आयोजित केलेली रॅपीडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धा रविवारी सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर येथे पार…

भारत सरकारने कांडला बंदराचे अध्यक्ष सुशील कुमार सिंग यांची  मुंबई बंदराचे प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉईज युनियनच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत…

 वाचन प्रेरणा दिन आणि विज्ञान प्रदर्शन

न्यू इंग्लिश स्कूल आचरा प्रशालेत धी आचरा पीपल्स असोसिएशन संचालित न्यू इंग्लिश स्कूल आचरा प्रशालेत वाचन प्रेरणा दिन आणि विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘ मी वाचले, तुम्हीही वाचा’ या उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शनही पार पडले. साटेलकरसर यांनी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे कार्य विशद केले. मुख्याध्यापक जी बी परब सर यांनी वाचनाचे महत्त्व विशद केले. शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. इयत्ता सहावी टे दहावीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती सादर केल्या. सुयश सद्गुरू साटेलकर (रडार सिस्टीम – प्रथम क्रमांक), कौशल माधवराव भोसले आणि विक्रम वसंत भूतकडे (रिचार्जेबल टेबल फॅन- द्वितीय क्रमांक), कुंदन धनंजय नाटेकर ( स्मार्ट होम )आणि तेजस निलेश शेट्ये (ग्रास कटर) यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.  शालेय समिती अध्यक्ष निलिमा सावंत, सदस्य राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर, रघुनाथ पाटील यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला. कदम मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 0000 माहुल येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीची  निवड चाचणी २३ ऑक्टोबरला मुंबई :  माहुल, चेंबूर  येथील  वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या वतीने १३ ते १९ या वयोगटातील मुलांसाठी  बुधवार, २३ ऑक्टोबरला  दुपारी ३ ते ६ या वेळेत निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले असून १ सप्टेंबर २००५ ते ३१ ऑगस्ट २०१२ या दरम्यानच्या काळात जन्मलेली  मुले या चाचणीसाठी पात्र ठरतील. इच्छुक मुलांनी वरील दिवशी क्रिकेट किट, क्रिकेटचा पांढरा गणवेश आणि जन्माच्या दाखल्यासह माहुल, चेंबूर येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर निवड चाचणीसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी अमित जाधव यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ८६५५३३७८८५ किंवा ७०२११४७४७५  येथे  संपर्क साधावा.

उत्तर भारतीयांच्या हाती ओवळा- माजिवडा विधानसभेच्या विजयाचा पासवर्ड

 स्थानिक भूमिपुत्र दुसऱ्या क्रमांकावर   ठाणे : विधानसभेची निवडणूक जाहीर होताच सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. या निवडणुकीतील लढत थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार असली तरी ओवळा- माजिवडा विधानसभेत मात्र निवडणुकीचे चित्र वेगळे दिसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघांत पहिल्या क्रमांकाचा मतदार उत्तर भारतीय असल्याने त्याची मते ज्यांच्या पारड्यात पडतील त्या उमेदवाराला विजयाची खात्री असणार आहे. ओवळा- माजिवडा हा मतदारसंघ ठाण्यापासून थेट भाईंदरपर्यंत पोहोचला आहे. सध्या या मतदारसंघात शिवसेनेचे प्रताप सरनाईक आमदार आहेत. येथे निवडून येण्याची त्यांची तिसरी टर्म आहे. ते दोन्ही वेळा निवडून आले तेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ होती; मात्र आताचे चित्र वेगळे आहे. शिवसेनेत फूट पडल्याने दोन शिवसेना अर्थात दोन शिवसेनेचे उमेदवार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच या मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात नव्या इमारती उभ्या राहिल्याने त्यामध्ये बहुतांश मतदार ठाण्याबाहेरून येथे राहायला आला आहे. परिणामी, स्थानिक भूमिपुत्र मतदारांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. परराज्यातून येथे वास्तव्याला आलेल्यांची संख्या वाढली असून ती ७० टक्क्यांवर पोहोचली आहे. ही संख्या सुमारे तीन लाख एवढी झाली आहे. त्यात उत्तर भारतीयांसह मारवाडी, गुजराती, दक्षिण भारतीय अशा परप्रांतीयांचा समावेश आहे. एकूण मतदारांची संख्या पाच लाख ४० हजार २९३ आहे. तर, नव्या मतदारांची संख्या ११,७५४ हजारांवर पोहोचली आहे. यावरून या मतदारसंघावर परराज्यातील मतदारांचा कब्जा आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यानंतर दुसरा क्रमांक आगरी मतदारांचा लागतो. तिसऱ्या क्रमांकावर अनुसूचित जाती-जमातीमधील मतदारांचे येथे वास्तव्य आहे. अशा परिस्थितीमुळे या मतदारसंघातील बरेचसे चित्र उमेदवार कोणत्या राज्यातील आहे, त्यावर अवलंबून असण्याची शक्यता आहे. महायुतीचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून उत्तर भारतीय अथवा इतर राज्यातील उमेदवार उभा केला तर ही निवडणूक महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देणारी ठरणार आहे. येथे राहणाऱ्या उत्तर भारतातल्या भाजपप्रेमी मतदाराने प्रांतानुसार मतदान करण्याचा निर्णय घेतला तर तो महायुतीला मारक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच काशिमीरा येथे नव्याने वसलेल्या काशिगाव झोपडपट्टीत मतदारसुद्धा या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावताना दिसणार आहे. मुंबई आणि इतर ठिकाणांहून बाधित झालेले नागरिक येथे वसले आहेत. त्यामध्ये बहुतांश मतदार दक्षिण भारतातील आहेत. त्यांनी या मतदारसंघात मतदानाच्या नावांची नोंदणी करून घेतलेली आहे. हा मतदारसुद्धा चेहरा पाहून मतदान करण्याची चिन्हे आहेत. सरनाईकांचे पारडे जड शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक येथून २००९ ते २०१९ असे सलग तिसऱ्यांदा येथून निवडून आले आहेत. २००९ मध्ये ते ९०४१ मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यांनी या निवडणुकीत ३६.०३ टक्के मते मिळवली होती. यावेळी एकूण १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते; तर २०१४ मध्ये हा फरक १०,९०६ एवढा होता. यावेळी त्यांना ३६.७५ टक्के मते मिळाली होती. यावेळी एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. तर, २०१९ मध्ये मात्र सरनाईक मोठ्या फरकाने निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल ८४,००८ मतांनी पराभव केला होता. काँग्रेसच्या उमेदवाराला ३३,५८५ मते मिळाली होती, तर सरनाईक यांना १,१७,५९३ मते मिळाली होती. या वेळीसुद्धा १४ उमेदवार रिंगणात होते.

 परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणारे गृहनिर्माण धोरण हवे!

 मुंबई ग्राहक पंचायतीच्या परिषदेत सूर   मुंबई : एकीकडे गरीबांना मोफत घरे मिळतात. मध्यमवर्गीय गरजुंना परवडणारी घरे खरोखरच उपलब्ध करुन द्यायची शासनाची इच्छा असेल तर तसे प्रतिबिंब गृहनिर्माण धोरणात दिसले पाहिजे. गृहप्रकल्पांसाठी शासनाला द्यावा लागणाऱ्या शुल्काचा पुनर्विचार केला गेला तर घरांच्या किमती कमी होऊन परवडणारी घरे निर्माण होऊ शकतात, असा सूर राज्याच्या प्रस्तावीत गृहनिर्माण धोरणाबाबत मुंबई ग्राहक पंचायतीकडून शनिवारी आयोजित केलेल्या परिषदेत व्यक्त करण्यात आला. शासनाने पुढाकार घेऊन भाडे तत्त्वावरील घरनिर्मितीला प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी मागणीही या परिषदेत करण्यात आली. महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाचे (महारेरा) माजी अध्यक्ष गौतम चॅटर्जी, नॅशनल रिएल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे उपाध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, मुंबई गृहनिर्माण मंडळाचे माजी मुख्य अधिकारी अरविंद ढोले, विकासक डॉमनिक रोमेल, वास्तुरचनाकार निखील दिक्षीत, योमेश राव तसेच मुंबई विकास समितीचे ए. व्ही शेणॉय, अ‍ॅड. श्रीप्रसाद परब, अ‍ॅड. पार्थसारथी आदी या परिषदेत सहभागी झाले होते. राज्याचे गृहनिर्माण धोरण ही भविष्यातील दिशा ठरवत असते. अशा वेळी सर्व संबंधितांशी चर्चा करून अशी धोरणे निश्चित केली पाहिजेत. या धोरणात महारेराकडे गृहप्रकल्पांची नोंदणी तसेच दंडात्मक कारवाईतून मिळणारी रक्कम शासनाकडे जमा झाली पाहिजे असे नमूद आहे. परंतु रेरा कायद्यातच ही रक्कम प्राधिकरणाकडे जमा करण्याची तरतूद आहे, याकडे चॅटर्जी यांनी लक्ष वेधले. बांधकामविषयक परवानग्यांबाबत काय धोरण असावे, यासाठी २०१७-१८ मध्ये माझ्यासह माजी पालिका आयुक्त शरद काळे, माजी नगरविकास प्रधान सचिव रामनाथ झा यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने बांधकामविषयक परवानग्या देताना होणारा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी बाह्ययंत्रणेद्वारे परवानग्या देण्याची सूचना केली होती. या अहवालाची अमलबजावणी केली तरी बांधकाम विषयक परवानग्यांमध्ये सुसूत्रता येईल, असेही त्यांनी सांगितले. घरनिर्मितीसाठी शासनाला शुल्काच्या रुपाने बांधकामासाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के रक्कम द्यावी लागते. त्यामुळे सद्यस्थितीत विकासकाने कितीही ठरविले तरी तो परवडणारे घर देऊ शकत नाही. घरांच्या किमती कमी करू, असे वाटले तरीही त्यात प्राप्तीकर कायद्याचा अडथळा आहे, याकडे विकासक डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी लक्ष वेधले. शासनाला परवडणारी घरे निर्माण करायची असतील तर भाडेतत्त्वावरील घरांची अधिकाधिक निर्मिती करायला हवी, अशी सूचना त्यांनी केली. ब्रिटिशांच्या काळात चाळी बांधण्यात आल्या. या चाळींमध्ये भाड्याची घरे उपलब्ध होती. काही विश्वस्त संस्थांनीही घरे उभारली तीही भाड्याने उपलब्ध होती. मुंबईत रोजीरोटीसाठी आलेल्या व्यक्तीला भाड्याचे घरच परवडू शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शासनाने उपलब्ध भूखंडापैकी २५ टक्के भूखंड शून्य किमतीने उपलब्ध करून द्यावा. बांधकामासाठी येणारा खर्च देऊन भाडेतत्त्वावरील घरे कोणाकडूनही बांधून घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. या सर्व शिफारशींचे संकलन करून ते शासनाला सादर केले जाणार आहे. याशिवाय शासनातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चासत्राचे आयोजन करण्याचा प्रयत्न असल्याचे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी सांगितले.

इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन (आय.एम. ओ.)  चे जनरल सेक्रेटरी  अर्सेनिओ दोमिंगुझ  यांना सागरीका या मासिकाचा अंक देताना नुसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर.

बबनदादा पाटील यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

 रुग्णालयाबाहेर गर्दी   पनवेल : राज भंडारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकनिष्ठ नेते, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख तथा पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील हे गेले कित्येक दिवस नवीमुंबईतील कोपरखैरणे येथील कोकीलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल होते. नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील कारण्यात आली होती. सोमवारी बबनदादा पाटील यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. दरम्यान रुग्णालयाबाहेर असंख्य कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ऐन विधानसभा निवडणुका तोंडावर असताना बबनदादा हे कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहिलेले दिसत नव्हते. यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये पनवेल उरण महाविकास आघाडीमध्ये काही बिघाडी झाली आहे का? अशा चर्चाना उत आले होते. मात्र यामागचे कारण म्हणजे पनवेल उरण महाविकास आघाडीच्या संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील हे रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली. बबनदादा पाटील यांच्यावर नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील कोकीलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान रुग्णालयाबाहेर दादांच्या असंख्य चाहत्यांनी गर्दी केली होती. सोमवारी बबनदादा यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून प्रचार धुमाळीच्या अंतिम टप्यात बबनदादा हे तंदुरुस्त होऊन प्रचारात येतील असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे. 00000

 कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला

 महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत   कल्याण : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी रविवारी जाहीर झाली. यात कल्याण पूर्व मतदारसंघात आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र याला कल्याण पूर्व शिंदेसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाडांसह १९ शिवसेना नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आजचा दिवस कल्याण पूर्वसाठी काळा दिवस आहे. ज्याने कल्याण पूर्व बकाल करून ठेवलं आहे. वरिष्ठांना वारंवार या गोष्टी सांगत आलोय. समस्या जैसे थे आहेत. त्यात त्याच्या कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी देऊन कल्याण पूर्वेची दुरावस्था थांबवण्याचा आमचा प्रयत्न आहे असं सांगत महेश गायकवाड यांनी निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे. महेश गायकवाड म्हणाले की, कल्याण पूर्व गड हा शिवसेनेला मिळाला आहे. कल्याण पूर्वेच्या शेतकऱ्याच्या जमिनी गणपत गायकवाड यांनी बळकावला होता. हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालय त्यांना शिक्षा देईल. परंतु कल्याण पूर्व इथं अनेक समस्या आहेत. कल्याण पूर्वेत शिवसेनेचे संख्याबळ असूनही हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यात आमचे नेते अयशस्वी ठरले त्यामुळे आम्ही नाराज आहोत. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांना भेटून येथील परिस्थिती सांगितली, परंतु तुम्ही युतीचा धर्म पाळा असं त्यांच्याकडून सांगण्यात येते. आम्हाला विद्यमान आमदारांनी शिवसैनिकांवर दबाव आणण्याचं काम केले आहे. भ्रष्ट व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबात उमेदवारी दिली त्याला आमचा निषेध आहे असं त्यांनी सांगितले. तसेच आम्ही नगरसेवक, पदाधिकारी यांची आढावा बैठक बोलावली. आमच्यातील जे इच्छुक आहेत ते ठरवू. या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असावा अशी आमची मागणी आहे. आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली तरी मोठ्या मताधिक्याने ही जागा निवडून आणू. कल्याण पूर्वमधील जनता आमदारांवर नाराज आहे. ते याठिकाणी बदल करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला मागून घ्यावा अशी विनंती आम्ही वरिष्ठांना आजही करतोय असं महेश गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, आमची भूमिका ठरलेली आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही अशा व्यक्तीचं काम करणार नाही ज्याने कल्याण पूर्वचा विकास केलेला नाही. कल्याण पूर्व भकास केलेले आहे. त्यामुळे आमचा या उमेदवारीला विरोध आहे. आम्हाला हा मतदारसंघ मिळावा ही आमची मागणी आहे. मी स्वत: महेश गायकवाड, निलेश शिंदे, विशाल पावशे इथं इच्छुक आहेत. आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही येथे उमेदवार निवडून आणू असंही महेश गायकवाड यांनी म्हटलं. 00000

 ठाण्यातील कचराकोंडी दूर होणार, झाडांची सुकलेली पानेही स्वीकारणार

माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या शिष्टमंडळाला आयुक्तांचे आश्वासन   ठाणे : ठाणे शहरातील कचराकोंडी दूर होणार असून, सध्या घोडबंदर रोडसह शहरात विविध ठिकाणी साचलेला कचरा महापालिकेने उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर रहिवाशी सोसायट्यांमधील झाडांची सुकलेल्या पानांचा कचराही स्वीकारण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त सौरभ राव यांच्याबरोबर झालेल्या भेटीनंतर आयुक्तांनी घोडबंदर रोड वासियांसह ठाणेकरांना दिलासा देणारा हा निर्णय घेतला. घोडबंदर रोड परिसरात सध्या कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तर सोसायट्यांमधील झाडांची सुकलेली पाने स्वीकारण्यास घंटागाड्यांकडून नकार दिला जात होता. तर पुरेसा पाऊस झाल्यानंतरही भेडसावणाऱ्या पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्यासह शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांची आज महापालिका मुख्यालयात भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांनी झाडांच्या सुकलेल्या पानांचा कचरा उचलण्याबरोबरच सध्या ठिकठिकाणी साचलेला कचरा ताबडतोब उचलणार असल्याचे स्पष्ट केले. डायघर येथील प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तो १५ दिवसांपासून बंद होता. त्याची दुरुस्ती पूर्ण झाली असून, साचलेला कचरा उचलण्यासाठी जादा डंपरची व्यवस्था करण्यात येईल. येत्या दिवाळीपूर्वी शहरातील संपूर्ण कचरा उचलला जाईल, अशी ग्वाही आयुक्त राव यांनी दिली. त्याचबरोबर सोसायट्यांच्या बागेतील झाडांची सुकलेली पाने व फांद्या महापालिकेच्या घंटागाड्या स्वीकारतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. चौकट घोडबंदरला आचारसंहितेनंतर ७५ दशलक्ष लिटर पाणी ठाणे महापालिकेला मुंबई महापालिकेने १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मंजूर केला आहे. याबाबतची निर्णयप्रक्रिया आचारसंहितेनंतर पूर्ण होईल. त्यापैकी ७५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा घोडबंदर रोडच्या नागरी वसाहतींकडे वळविला जाईल. त्यामुळे पाणीटंचाई दूर होईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले.

माथेरानमध्ये मैला उचलण्याची प्रथा आजही कायम

माथेरान : जग एकविसाव्या शतकात जात असताना माथेरान मध्ये ब्रिटिश काळापासून पूर्वापार चालत आलेली मैला उचलण्याची प्रथा आजही कायम असल्याने पर्यटकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पूर्वी पाच दशकांपूर्वी माथेरान…