Month: March 2026

 सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती सभापती -उपसभापती महायुतीचेच…!

सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती सभापती -उपसभापती महायुतीचेच…! सर्व निवडी बिनविरोध…! सिंधुदुर्ग(प्रतिनिधी )– जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांमध्ये भाजपा आणि शिंदे सेनेचे सभापती आणि उप -सभापती बिनविरोध निवडून आले असून सर्व ठिकाणी महायुतीचाच  झेंडा फडकला आहे. कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदी शिंदे सेनेचे मिलिंद नाईक तर उप -सभापती पदी भाजपाचे सिताराम तेली बिनविरोध विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे नाईक हे तुळसुली गावचे तर तेली हे हुमरस गावचे सरपंच म्हणून कार्यरत होते. या निवडीनंतर सभापती दालनामध्ये भाजपा खासदार नारायण राणे आणि शिंदे सेनेचे आमदार निलेश  राणे यांचे फोटो लावण्यात येऊन महायुतीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. मालवणमध्ये शिंदे सेनेच्या पोईप मतदारसंघातील सदस्या प्रज्ञा चव्हाण तर उप-सभापतीपदी भाजपाचे वायरी   – भूतनाथ मतदारसंघाचे सदस्य घनश्याम झाड यांची बिनविरोध निवड झाली. देवगडमध्ये भाजपाचे गणेश राणे हे सभापती झाले तर शिंदे सेनेचे अमोल लोके हे उप- सभापती बिनविरोध विजयी झाले आहेत. याठिकाणी महायुतीची निर्विवाद सत्ता आहे. कणकवली पंचायत समिती सभापतीपदी अपेक्षेप्रमाणे नांदगाव पं. स.मतदारसंघातून  बिनविरोध विजयी  झालेल्या हर्षदा वाळके यांची बिनविरोध निवड झाली आहे  तर उप-सभापतीपदी वरवडे पंचायत समिती मतदारसंघातून बिनविरोध विजयी झालेले राजेश उर्फ सोनू सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. कणकवलीत  भाजपाचे १४ तर शिंदे सेनेचे दोन अशा १६ ही जागांवर महायुतीचीच सत्ता आहे. महायुतीचेच सर्व  उमेदवार विजयी होऊन  एकहाती सत्ता मिळाली आहे. वैभववाडीत सभापती आणि उप-सभापती हे दोन्ही भाजपाचेच असून दोघेही बिनविरोध निवडून आले आहेत.सभापतीपदी सिद्धेश दिलीप रावराणे तर उप- सभापतीपदी सौ. साची सचिन  कोलते या बिनविरोध निवडून आल्या आहेत. दोडामार्ग  तालुक्यात महायुतीची एकहाती सत्ता आल्याने सभापतीपदासाठी भाजपच्या पार्वती गवस यांची तर उप-सभापती पदासाठी गणेशप्रसाद गवस यांची बिनविरोध निवड झाली आहे. वेंगुर्ल्यात सभापतीपदी मातोंडचे भाजपा सदस्य शंकर घारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उप-सभापतीपदी शिंदे सेनेचे परुळे प. स.सदस्य सचिन देसाई यांची निवड झाली आहे. सावंतवाडीत शिंदे सेनेच्या सुस्मिता जाधव या सभापतीपदी बिनविरोध निवडून आल्या आहेत  तर उप-सभापतीपदी भाजपाचे गौरव मुळीक हे बिनविरोध निवडून आले आहेत.

वंचितचा पंतप्रधान मोदींविरोधात एल्गार २३ मार्ला आरएसएस मुख्यालयावर मोर्चा

वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चात काँग्रेसही होणार सहभागी ० आरएसएस मुख्यालयासमोर धरणे आंदोलनही करणार मुंबई : देशाच्या सार्वभौमत्व आणि आर्थिक स्वायत्ततेशी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी तडजोड केल्याचा आरोप करत काँग्रेस पक्ष आणि वंचित…

मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट

मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट मुंबई  : मॉरिशस प्रजासत्ताकाच्या भारतातील उच्चायुक्त श्रीमती शीलाबाई बाप्पू यांनी आज सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची देवगिरी या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. भारत-मॉरिशस संबंधांना अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने सुनेत्रा अजित पवार व शीलाबाई बाप्पू यांच्यामध्ये भारत–मॉरिशस संबंध, महाराष्ट्र–मॉरिशस ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध, व्यापार-गुंतवणूक संधी तसेच पर्यटन व सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. यावेळी मॉरिशसचे कॉन्सुल जनरल डॉ. डी. के. बकटोवार, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, दयानंद बाप्पू उपस्थित होते.

समान नागरी कायद्यासाठी सर्वोच्च न्यायालय अनुकुल

नवी दिल्ली:सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत देशात समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त केले. मुस्लिम महिलांना वारसा हक्कात समान अधिकार मिळावेत, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान…

 मूळ भाजपा कार्यकर्ते व राणे समर्थक यांच्यात पुन्हा एकदा वाद रंगणार…!

मूळ भाजपा कार्यकर्ते व राणे समर्थक यांच्यात पुन्हा एकदा वाद रंगणार…! जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना पक्षविरोधी कारवाईबद्दल निलंबित करण्याची मागणी…! वेंगुर्ला (प्रतिनिधी)– सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या मतदारसंघातील रहिवासी व स्वतःला भाजपचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून ओळख करून देणारे समीर रुक्मांगद कुडाळकर यांनी प्रदेश भाजपा अध्यक्षांकडे निवेदन सादर करून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि राणे समर्थक भाजपा नेते मनीष दळवी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. कट्टर राणे समर्थक असलेले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जाणारे दळवी यांच्या विरोधात मुळच्या भाजपा कार्यकर्त्यांनी सुरुंग पेरायला सुरुवात केली असून यामागे ‘त्या ‘अदृश्य शक्तीचा हात असल्याची चर्चा भाजपा कार्यकर्ते आणि राणे समर्थक कार्यकर्त्यांमागे रंगली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवारी निश्चित करण्याचे अधिकार पक्षाकडून मनीष दळवी यांना देण्यात आले होते. मात्र या अधिकारांचा वापर करताना स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता काही निर्णय घेतले गेल्याचा आरोप कुडाळकर यांनी या निवेदनात केला आहे. या निर्णयांमुळे तालुक्यात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ हा मागील अनेक वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रभाव आहे. या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवार असतानाही मनीष दळवी यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करून निवडणूक अर्ज दाखल केल्याचे कुडाळकर यांनी निवेदनात म्हटले आहे. सुरुवातीला जिल्हा परिषदेसाठी आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाच्या आदेशानंतर आपण आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर मनीष दळवी यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आडेली मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली याकडे कुडाळकर यांनी लक्ष वेधले असून त्यामुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. यासोबतच वेंगुर्ला तालुक्यातील उमेदवारी वाटप, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवादाचा अभाव, तसेच काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांना दिलेल्या छुप्या  पाठिंब्याबाबतही कुडाळकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या सर्व बाबींची पक्षाने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे. निवडणूक काळात काही निर्णयांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीच्या वेळीही स्थानिक पदाधिकाऱ्यांना पुरेसे महत्व दिले नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. दरम्यान, कुडाळकर यांनी आपल्या निलंबनाबाबतही आक्षेप घेतला असून, त्यांनी पंचायत समितीची निवडणूक अपक्ष उमेदवाराविरुद्ध लढवली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पक्षातून केलेले त्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या संदर्भात मनीष दळवी किंवा भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. मात्र स्थानिक पातळीवर या निवेदनाची चर्चा रंगली असून प्रदेशाध्यक्ष   याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जि. प. आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर या अदृश्य शक्तीने राणे समर्थकांचे वर्चस्व असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आपले लक्ष वळवले असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ना अर्थ… ना संकल्प…  जयंत पाटीलांचा हल्लाबोल 

  मुंबई –     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात ना ‘अर्थ’ आहे… ना कोणता ‘संकल्प’ आहे….या अर्थसंकल्पातून फक्त काँट्रॅक्टर लोकांचे भले होणार आहे आणि तेही फक्त मोठे काँट्रॅक्टर…

सिंधुदुर्ग भाजपात पेटलो आतलो बाहेरचो वाद !

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना पक्षविरोधी कारवाईबद्दल निलंबित करण्याची मागणी…! वेंगुर्ला (प्रतिनिधी)– सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय…

माथेरान नगरपरिषदेच्या कामकाजाबाबतीत स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर

माथेरान नगरपरिषदेच्या कामकाजाबाबतीत स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर मुकुंद रांजणे माथेरान: माथेरान नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रशासकीय राजवटीत अधिकारी, कर्मचारी वेळ मिळेल त्याप्रमाणे हजर राहून कार्यालयीन कामकाज कसेतरी पहात होते. चार ते पाच वर्षे प्रशासकीय राजवट असल्याने त्यावेळी या कार्यालयावर येथील राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी अंकुश ठेवणे गरजेचे होते परंतु केवळ सभागृहात सदस्य पद नसल्याने प्रत्येकाचा अहंभाव आड येत होता. त्यामुळे गावातील कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या कार्यालयाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आजच्या घडीला नगरपरिषदेत सत्ताधारी गट स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी सुद्धा तीच परिस्थिती पहावयास मिळत आहे. दुपारी बारा वाजले तरी कुणी अधिकारी अथवा कार्यालयीन कामकाज पाहणारा द्वितीय श्रेणीतील अधिकारी वर्ग हजर नसतात. ज्या काही मुली मानधनावर कार्यरत आहेत त्याच काहिनाकाही कामे करत आहेत. नागरिकांना घरभाडे भरावयाचे असल्यास अथवा अन्य काही कामे करून घ्यावयाची झाल्यास अधिकारी नसल्याने नागरिकांना भर उन्हातान्हात  फेऱ्या माराव्या लागत आहेत. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी निदान यापुढे तरी अधिकारी वर्गावर अंकुश ठेवतील की नाही अन्यथा निश्चितच माथेरानचे भवितव्य अंधकारमय आहे असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेकदा अमुक अधिकारी अलिबागला मिटिंगला गेलेत तर कुणी मंत्रालयात गेलेत अशीही उत्तरे ऐकावयास मिळतात. या सर्व कामानिमित्त जाणाऱ्या अधिकारी वर्गाची नोंद हलचल रजिस्टर मध्ये केली जात आहे की नाही, ही मंडळी खरोखरच मिटिंगच्या बहाण्याने कर्तव्य पार पाडतात की घरीच असतात असाही प्रश्न स्थानिकांमधुन विचारला जात आहे.

राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी सोहळा आज लोकभवन येथे पार पडला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या…

मुंबई विद्यापीठाला कांस्यपदक

पश्चिम विभाग आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा मुंबई विद्यापीठाला कांस्यपदक कल्याण: एच.एस.एन.सी. विद्यापीठ, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी पश्चिम विभाग आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ (पुरुष) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रतिष्ठित स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले असून संघाची अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात एसएसटी कला व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत पोटावाड याने प्रतिनिधित्व केले. अनिकेतने संघासाठी उत्कृष्ट खेळ करत उल्लेखनीय कामगिरी बजावली. मुंबई विद्यापीठाच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट रणनीती, संयम आणि कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे संघाला पश्चिम विभागातील बलाढ्य विद्यापीठांमध्ये आपले स्थान सिद्ध करता आले. या कामगिरीमुळे आता मुंबई विद्यापीठाचा संघ अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होणार असून देशभरातील विविध विद्यापीठांशी सामना करणार आहे. या संघासाठी मार्गदर्शक म्हणून अमित भोजने आणि मार्गदर्शक म्हणून उमेश सोनवणे यांची निवड झालेली आहे. अनिकेत पोटावाडच्या या उल्लेखनीय यशाबद्दल एसएसटी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि क्रीडा विभागाने त्याचे अभिनंदन केले असून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.