नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेतील विजय हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील जनतेचे, विशेषतः तरुण वर्गाचे आणि महिलांचे, या ऐतिहासिक विजयासाठी आभार मानले आहेत. एवढेच नाही, तर मी ग्वाही देतो की, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची युती सातत्याने काम करत राहील. जय महाराष्ट्र!
एनडीएच्या लोकाभिमुख योजनाची चर्चा संपूर्ण देशभरात सुरू आहे. लोकांची स्वप्ने आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यात आम्ही कुठलीही कसर सोडणार नाही.
उत्तर प्रदेशातील नऊ विधानसभा जागांपैकी सात जागांवर आघाडी घेत भाजपने विरोधकांना कडवी टक्कर दिली आहे. तसेच, इतर राज्यांतील पोटनिवडणुकांमध्येही एनडीएची कामगिरी प्रभावी ठरली आहे.
