नवी मुंबई : एमएमआरडीएकडून उभारण्यात येणारा ऐरोली-कटाई नाका उन्नत मार्ग जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. २०१८ मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. या रस्त्यामुळे आता नवी मुंबई ते कल्याण- डोंबिवली प्रवास अवघ्या १५ मिनिटांत होणार
सध्या याच मार्गासाठी वाहनचालकांना ठाणे, मुंब्रा आणि दिवा परिसरातील प्रचंड ट्रॅफिकला सामोरे जावे लागते. ऐरोली-कटाई नाका मार्ग सुरू झाल्यावर मुंबईहून कल्याणकडे जाणाऱ्या आणि कल्याणहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांना थेट आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे.
