Author: bittambatami.com

राज सिंग यांच्या नेतृत्वाखाली पदकांची लुटालूट

अबू धाबी ओपन मास्टर्स गेम्स २०२६ राज सिंग यांच्या नेतृत्वाखाली पदकांची लुटालूट पुण्याच्या अनुभवी बॅडमिंटनपटूंचे जागतिक स्तरावर वर्चस्व अबू धाबी, युएई – अबू धाबी ओपन मास्टर्स गेम्स २०२६ मध्ये भारतीय ध्वज अभिमानाने फडकवला गेला. अनुभवी भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विविध वयोगटातील अनेक पदके पटकावली. पुण्याचे राज सिंग यांनी या मोहिमेचे नेतृत्व करताना आपल्या चिकाटीचा आणि कौशल्याचा परिचय देत तब्बल तीन पदकांवर आपले नाव कोरले. रौप्य पदकाची कमाई ६०+ पुरुष दुहेरी गटात अव्वल स्थानासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत राज सिंग आणि धनंजय देशपांडे या जोडीने रौप्य पदक पटकावले. संपूर्ण स्पर्धेत या जोडीने उत्कृष्ट समन्वय आणि रणनीतीचा वापर केला. अंतिम सामन्यात थोडक्यात सुवर्णपदक हुकले असले तरी, त्यांच्या खेळाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर भरभरून कौतुक झाले. ऐतिहासिक पदार्पण आणि कांस्य विजय या स्पर्धेत रेखा धुपर यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण स्वप्नवत ठरले. ६०+ मिश्र दुहेरी गटात राज सिंग यांच्यासोबत खेळताना या जोडीने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत मानाचे कांस्य पदक मिळवले. इतकेच नव्हे तर, राज सिंग यांनी आपल्या अष्टपैलू खेळाचे दर्शन घडवत ४५+ पुरुष दुहेरी गटात प्रताप मेकाला यांच्यासह खेळताना आणखी एक कांस्य पदक प्राप्त केले. या गटातील उपांत्य फेरीचा सामना अत्यंत चुरशीचा ठरला: पहिला गेम: सिंग आणि मेकाला यांनी १५-८ असा एकतर्फी विजय मिळवला. निर्णायक खेळ: दुसऱ्या सेटमध्ये १८-२० अशा अटीतटीच्या संघर्षानंतर, तिसऱ्या सेटमध्ये (९-१५) या जोडीने झुंजार खेळ करत कांस्य पदक निश्चित केले. जागतिक दर्जाचे नियोजन आणि सोयी-सुविधा मैदानातील खेळासोबतच, २०२६ च्या या स्पर्धेचे नियोजन आणि खेळाडूंना दिलेल्या सुविधांचे मोठे कौतुक झाले. आयोजकांनी खेळाडूंसाठी विशेष व्यवस्था केली होती. प्रवास सुविधा (Pick-up & Drop): खेळाडूंना निवासाच्या ठिकाणाहून मैदानापर्यंत नेण्या-आणण्यासाठी २४ तास वाहन सेवा उपलब्ध होती, ज्यामुळे खेळाडू वेळेवर आणि ताजेतवाने होऊन पोहचू शकले.…

मानवी रोबो दारात आलाय…

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आणि त्याअगोदर घरातील कामे घरचे पुरुष आणि महिला मंडळी करीत असत. केवळ काही कामासाठीच मोलाने काम करून घेतले जात असे. परंतु जगभरात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा डंका वाजू…

व्हॉट्सअप वाढदिवस!

आजचे युग हे सोशल मिडियाचे युग आहे आणि या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये अनेक मेसेजिंग ॲप्लिकेशन आहेत आपणही दररोज अनेक मेसेजिंग ॲप्लिकेशनचा वापर करतो. या मेसेजिंग ॲप्लिकेशनमध्ये सर्वाधिक…

कर्जउभारणीचा वाढता बोजा

भारत आज जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून ओळखला जातो. पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, संरक्षणक्षमता, सामाजिक कल्याण योजना आणि जागतिक स्तरावर वाढता प्रभाव या सर्व बाबींमुळे देशाच्या विकासाचा वेग अधोरेखित…

भविष्यवेधी परिषद

भविष्यवेधी परिषद भारताने नवी दिल्लीमध्ये 16 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ‌‘इंडिया ॒एआय इम्पॅक्ट समिट 2026‌’ या जागतिक स्तरावरील एका मोठ्या कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदचे आयोजन केले. त्यासाठी जगभरातून एआय…

  गांधारी रिंगरोडवरील भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

गांधारी रिंगरोडवरील भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी उपविभाग प्रमुख कुणाल कुलकर्णी यांचे सहाय्यक पोलीस आयुक्तांना पत्र कल्याण: कल्याण पश्चिमेतील गांधारी वडवली रिंगरोड येथे वाहनचालक अतिवेगाने वाहने चालवत असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत असून या अपघाताला कारणीभूत असलेल्या भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना विभाग उपप्रमुख कुणाल कुलकर्णी यांनी वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. गांधारी वडवली रिंगरोड हा रस्ता पूर्णत्वास आलेला नाही. या रस्त्यावर दिवसा व रात्रीच्या वेळी भरधाव दुचाकीस्वार व चारचाकी वाहन चालक आपल्या वाहनांची रेसिंग लावून इतर नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहेत. नुकताच काही दिवसांपूर्वी याठिकाणी अपघात होऊन एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वाहनांच्या वेगामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी स्पीडगन, दुभाजक, गतिरोधक लावून ठोस कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपविभाग प्रमुख कुणाल कुलकर्णी यांनी केली आहे. दरम्यान कुलकर्णी यांच्या पत्रानंतर वाहतूक पोलीस सतर्क झाले असून रिंगरोडवर बंदोबस्त लावून वाहनचालकांची तपासणी करत कारवाई केली आहे.

 कल्याण पश्चिमेतील गोविंद वाडी परिसराची महापौर हर्षाली चौधरी यांनी केली पहाणी

कल्याण पश्चिमेतील गोविंद वाडी परिसराची महापौर हर्षाली चौधरी यांनी केली पहाणी नागरिकांशी साधला थेट संवाद कल्याण : कल्याण पश्चिमेतील गोविंद वाडी परिसराची केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांनी स्वतः पायी फिरून पहाणी केली आणि तेथील रहिवाशी असलेल्या मुस्लिम बांधवांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी यावेळी सदर परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली.  गोविंद वाडी परिसरात ड्रेनेजचे पाणी तुंबत असल्याबाबत पालिका सदस्या समीना शेख यांनी केलेल्या तक्रारीवरून तेथील मलनिस्सारण व्यवस्थेची देखील त्यांनी  पाहणी केली आणि सदर तक्रारीचे  निराकरण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त रामदास कोकरे, मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद सखदेव, काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी त्यांच्या समवेत उपस्थित होत्या. यावेळी नवनिर्वाचित महापौरांचा सत्कार करण्यासाठी नागरिक पुढे सरसावले असता आधी तुमची कामे होऊ द्यात, नंतर सत्कार करा असे सांगत महापौरांनी आपल्या सहृदयतेने नागरिकांची मने जिंकली.

मालमत्ता कर वसुलीच्या कामातील हलगर्जीपणासाठी दोन लिपिकांवर निलंबनाची कारवाई

मालमत्ता कर वसुलीच्या कामातील हलगर्जीपणासाठी दोन लिपिकांवर निलंबनाची कारवाई कल्याण: मालमत्ता कर वसुलीच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ९ आय प्रभागातील दोन लिपिकांवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी निलंबनाची कडक कारवाई केली. मालमत्ता कर वसुलीच्या उददीष्टपुर्तीसाठी कर संकलन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामार्फत अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. आज आयुक्त अभिनव गोयल यांनी कर वसुलीसंदर्भात समक्ष महानगरपालिकेच्या ९ आय व १० इ प्रभागात भेट दिली आणि दोन्ही प्रभागांचे सहायक आयुक्त, कर अधिक्षक व कर विभागातील भाग लिपिक यांच्या समवेत कर वसुलीबाबत सविस्तर बैठक घेवून, वसुलीच्या सद्यस्थितीबाबत  एकंदर आढावा घेतला. या बैठकीत भाग लिपिकांशी चर्चेअंती अत्यंत कमी प्रमाणात कर वसुलीस जबाबदार असणा-या ९ आय प्रभागातील भाग लिपिक अरविंद काळण व राजेंद्र पाटील यांच्यावर कामातील हलगर्जीपणाबाबत तातडीने निलंबनाची कारवाई करत, कर वसुलीचे उद्दिष्टपूर्तीसाठी  अधिक गांभीर्याने काम करण्याबाबत अधिकारी व कर्मचारी वर्गास सक्त निर्देश दिले. यावेळी, कर वसुलीसाठी  प्रभागात पहाणी करीत असताना कर लावण्यास अटकाव करणा-या  सुमारे ४ अनधिकृत अनिवासी मालमत्तावर निष्कासनाची  धडक कारवाई देखिल करण्यात आली. मार्च महिना हा कर संकलनाचा या आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असून, कर चुकवेगिरी करणा-यांवर तसेच कर वसुलीच्या कामात जाणीवपुर्वक निष्काळजीपणा दाखविणा-या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देखिल कडक कारवाई केली जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी दिली आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, कर विभागाचे उपआयुक्त बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.

‘यादव जी की लव्ह स्टोरी’ चित्रपटाविरोधात मोर्चाचा इशारा

‘यादव जी की लव्ह स्टोरी’ चित्रपटाविरोधात मोर्चाचा इशारा  रमेश औताडे मुंबई :मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र करणी सेनाचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी ‘यादव जी की लव्ह स्टोरी’ या हिंदी चित्रपटाविरोधात २७ फेब्रुवारी रोजी…

महानगरपालिका मुख्यालयात भिक्षा मागून करवाढ विरोधात शिवसेनेचा निषेध

महानगरपालिका मुख्यालयात भिक्षा मागून करवाढ विरोधात शिवसेनेचा निषेध मिरा -भाईंदर महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी पक्षाने सुचवलेल्या ६०% करवाढीविरोधात शिवसैनिकांनी तीव्र निषेध केला. शेकडो शिवसैनिकांनी महानगरपालिका मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले आणि सत्ताधारी पक्षाविरुद्ध भीक मागून आणि घोषणाबाजी करून आपला निषेध नोंदवला. निदर्शनादरम्यान, शिवसैनिकांनी एका पेटीत भिक्षा मागत सत्ताधारी पक्षासाठी “देणगी” असे म्हटलं आणि त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. संतप्त कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेचे मुख्य गेट जबरदस्तीने उघडले आणि आवारात प्रवेश केला. पोलिसांच्या वारंवार प्रयत्नांनंतरही, ते महापौरांना भेटून निवेदन सादर करण्याच्या त्यांच्या मागणीवर कायम राहिले. महापौर त्यांच्या दालनात उपस्थित नसताना, शिवसैनिकांनी महापौरांच्या दालनासमोर घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली, निवेदन सादर केले आणि वाढीव करदर तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. या प्रसंगी, शिवसेना नेते सचिन मांजरेकर यांनी सत्ताधारी पक्षावर तीव्र हल्ला चढवला आणि म्हटले की, करवाढ ही कोणत्याही जनहित धोरण नाही तर “पैशाची भूक” आहे. त्यांनी उपहासात्मक टिप्पणी केली की, “जर सत्तेत असलेल्यांना पैशांची इतकी कमतरता असेल, तर आम्ही शिवसैनिक भीक मागू आणि पैसे वसूल करू, परंतु आम्ही जनतेवर अतिरिक्त कर लादू देणार नाही.” दरम्यान, शिवसेना नेते विक्रम प्रताप सिंह यांनी सांगितले की, आर्थिक बळाच्या जोरावर निवडणुका जिंकल्यानंतर, सत्ताधारी पक्ष आता जनतेकडून पैसे उकळू इच्छित आहे. त्यांनी आरोप केला की नवीन आणि जुन्या घरांवरील कराबाबत गोंधळ पसरवला जात आहे, तर प्रत्यक्षात या निर्णयाचा थेट परिणाम शहरातील कायमस्वरूपी रहिवाशांवर होईल. याला “तुघलकी फर्मान” म्हणत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, शिवसेना या कराचा तीव्र विरोध करत राहील. जर करवाढ मागे घेतली नाही तर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. सेव्हन इलेव्हन कंपनीचे ७८ कामगार महासभा चालवत आहेत-निशा नार्वेकर निदर्शनादरम्यान, शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा निशा नार्वेकर यांनी सत्ताधारी पक्षावर तीव्र हल्ला चढवला आणि म्हणाल्या की महासभा जनहिताकडे दुर्लक्ष करत आहे आणि केवळ सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी ठराव मंजूर करत आहे. त्यांनी आरोप केला की कर मनमानी पद्धतीने वाढवला जात आहे आणि महासभेत काम करणारे लोक भाजप बहुमताने निवडून आलेल्या नगरसेवकांसारखे नाही तर सेव्हन इलेव्हन कंपनीच्या ७८ कामगारांसारखे वागत आहेत आणि सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर निर्णय घेत आहेत.