Author: bittambatami.com

एसएसटी महाविद्यालयाच्या रेश्मा राठोड ची खो-खो विश्वचषक विजेत्या भारतीय संघात चमकदार कामगिरी

कल्याण : एसएसटी महाविद्यालयाची विद्यार्थीनी रेश्मा राठोड हिची प्रथम खो-खो विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली होती, जिथे भारतीय महिला संघाने ऐतिहासिक विजय नोंदवत नेपाळवर मात करून विश्वविजेतेपदाचा मान मिळवला. ही…

आंतर सहकारी बँक कॅरम व बुध्दिबळ स्पर्धेत १५६ खेळाडूंमध्ये आजपासून  चुरस

मुंबई : माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त २५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या आंतर सहकारी बँक कॅरम व बुध्दिबळ…

26 जानेवारीला ठाण्यात रंगणार कबड्डीचा थरार

भाजपा ठाणे शहर आणि सन्मान फाऊंडेशन यांच्यावतीने भव्य सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणविस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे राहणार उपस्थित ठाणे : भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा…

हरिया महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

कल्याण : शहाड येथील मातोश्री वेलबाई देवजी हरिया वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण, राज्यशास्त्र विभाग व मतदार साक्षरता मंच…

नमो चषकात खेळाडूंच्या कलागुणांना वाव; नमो चषकात खेळाडूंची विशेष काळजी

पनवेल : लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने उलवा नोडमध्ये सुरु असलेल्या ‘भव्य क्रीडा महोत्सव नमो चषक २०२५’ स्पर्धेला दिवसेंदिवस खेळाडू आणि…

ठामपा क्षेत्रात हवा प्रदूषण रोखण्यासाठी नियम न पाळणारऱ्या विकासकांना काम थांबवण्याचे आदेश !

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम सुरू असताना हवा प्रदूषण रोखण्यासाठीचे नियम न पाळल्यामुळे विकासकांना काम थांबवण्याचे आदेश देण्यास शहर विकास विभागाने सुरूवात केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील…

विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित

४ फुट ११ इंच व व्यावसायिक पुरुष व महिला खो-खो स्पर्धा ओम साईश्वर, रचना नोटरी, महावितरण, पश्चिम रेल्वे व महाराष्ट्र पोष्टाची विजयी घोडदौड मुंबई : खो-खो संघटनेच्या मान्यतेने विद्यार्थी क्रीडा…

मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला प्रारंभ

मुंबई : लोकमान्य बँक्वेट हॉल, माटुंगा येथे आयोजित केलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन ऑईल व ओ. एन. जी. सी पुरस्कृत ३२ व्या सिनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे उदघाटन मुंबई…

विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित खो खो स्पर्धा

४ फुट ११ इंच व व्यावसायिक पुरुष व महिला खो-खो स्पर्धा विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित आणि मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने किशोर गट (४ फुट ११ इंच) तसेच व्यावसायिक पुरुष व…

शेवा गावातील कोळी समाजाचा JNPT विरोधात ऐतिहासिक चॅनेल बंद आंदोलन!

समुद्रात उतरून संघर्षाची नवी लढाई; हा लढा हक्कांसाठी, सन्मानासाठी राज भंडारी पनवेल : उरण तालुक्यातील शेवा गावातील कोळी समाजाने ४० वर्षांपासून JNPT (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) मार्फत होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात चॅनेल बंद आंदोलन पुकारले होते. गावकऱ्यांनी पाण्यात उतरून आपला रोष व्यक्त केला, कारण समुद्रात उतरून असा लढा उभारण्यात आला होता.या आंदोलनात महिलांचे मोठे योगदान ठरले असून, त्यांनी आपल्या हक्कांसाठी पुढाकार घेतला व संघर्षात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.ज्यामुळे आंदोलन ऐतिहासिक ठरले. JNPT ने प्रकल्प विस्ताराच्या नावाखाली शेवा गाव विस्थापित केले आणि गावकऱ्यांना संक्रमण शिबिरांमध्ये हलवले. चार दशके अत्यंत असुरक्षित आणि अमानवी परिस्थितीत कोळी समाज जगत आहे. हा अन्याय थांबवण्यासाठी आणि हक्क पुनर्स्थापित करण्यासाठी गावकरी संविधानिक मार्गाने लढा देत आहेत. दिवसाच्या उत्तरार्धात भारत सरकारच्या जलवाहतूक , पोर्ट आणि शिपिंग विभागाचे कॅबिनेट मंत्री मा.श्री. सर्बानंद सोनोवाल यांनी हॉटेल वेस्टिन, पवई येथे आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व शेवा कोळीवाडा सामाजिक ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री.रमेश कोळी , आगरी समाज नेते श्री. जयेंद्रदादा खुणे , पर्यावरणप्रेमी श्री.नंदकुमार पवार, अ‍ॅड. सिद्धार्थ इंगळे, आणि फेडरेशन ऑफ फिशरीजचे मार्शल कोळी, यांनी केले. या बैठकीस रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी श्री.भरत वाघमारे, एसडीओ पनवेल श्री.पवन चांडक, तसेच जे.एन.पी.टी.चे अध्यक्ष श्री. उन्मेष वाघही उपस्थित होते. मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या ४० वर्षांच्या संघर्षकथांना ऐकून स्तब्ध झाले आणि आंदोलकांप्रती सहानुभूती व्यक्त केली. त्यानंतर, मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पुनर्वसन प्रक्रिया ३ महिन्यांत पूर्ण करण्याचे शब्द दिले. या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले. सदरील चॅनेल बंद आंदोलनात नवी मुंबई पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सहपोलीस आयुक्त श्री. संजय येनपुरे साहेब, उपायुक्त श्री. प्रशांत मोहिते साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहूल साहेब आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत साहेब यांनी आंदोलन शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित राहण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे आंदोलन सुरळीत पार पडले आणि गावकऱ्यांच्या मागण्यांना सकारात्मक वळण मिळाले. आंदोलन यशस्वी करण्याकरिता सुरेश दामोदर कोळी (अध्यक्ष,हनुमान – शेवा कोळीवाडा सामाजिक ग्रामविकास मंडळ, रमेश भास्कर कोळी ( अध्यक्ष, पारंपारिक मच्छिमार संघटना ), परमानंद कोळी ( मा. सरपंच हनुमान कोळीवाडा ), मंगेश अनंत कोळी ( उपाध्यक्ष ), हरेश महादेव कोळी, नितीन महादेव कोळी, उज्वला रमेश कोळी ( अध्यक्ष, विस्थापित महिला संघटना ), कल्याणी कोळी ( उपाध्यक्ष ), जगदीश जनार्दन शेवेकर, प्रकाश नाखवा यांनी खूप मेहनत घेतली.