Author: bittambatami.com

महावितरणचे शनिवारी ७२ ग्राहक मेळावे

स्मार्ट मीटरमुळे बिल वाढल्याची तक्रार? हरिभाऊ लाखे नाशिक : राज्यात महावितरणकडून बसविल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटरवरून मोठे वादळ उठले आहे. हे मीटर बसवल्यानंतर देयकांत वाढ झाली, बळजबरीने ते बसविले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्या विरोधात आंदोलने होत असून स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसविण्याचा आग्रह धरला जात आहे. स्मार्ट मीटरमुळे निर्माण झालेला संभ्रम आणि संशय दूर करण्यासाठी आता खुद्द महावितरणने पुढाकार घेतला आहे. स्मार्ट मीटरविरोधात नाराजी वाढत असल्याने नाशिक मंडळातील २८, मालेगाव मंडळातील १५ आणि अहिल्यानगर मंडळातील २९ अशा महावितरणच्या एकूण ७२ उपविभागीय कार्यालयांमध्ये शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत ग्राहक संवाद मेळावा पार पडणार आहे. मेळाव्यांना संबंधित महावितरणचे कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित राहून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करतील. तसेच स्मार्ट मीटरसंदर्भात असलेल्या शंकांची व वीज देयकांबाबतच्या तक्रारींची तपासणी करून त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. यावेळी स्मार्ट मीटरचे फायदे, वैशिष्ट्ये, कार्यपद्धती आणि अचूकतेविषयी माहिती देण्यात येणार आहे. स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत किंवा कुठल्याही कारणाने आलेल्या वाढीव वीज देयकांबाबतच्या तक्रारींचे महावितरणकडून प्राधान्याने निराकरण करण्यात येणार आहे. परिमंडळात पावणे आठ लाख स्मार्ट (टीओडी) मीटर नाशिक परिमंडळात आतापर्यंत एकूण ७ लाख ६५ हजार ७०९ सर्व वर्गवारीच्या वीज ग्राहकांकडे स्मार्ट (टीओडी) मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक मंडळात ३ लाख ३८ हजार ८५५, मालेगाव मंडळात १ लाख १५ हजार ३७३ आणि अहिल्यानगर मंडळात ३ लाख ११ हजार ४८१ मीटरचा समावेश आहे. स्मार्ट मीटरचे फायदे व माहिती जाणून घेतल्यानंतर नाशिक परिमंडळातील मोठ्या प्रमाणात वीज ग्राहकांनी स्वेच्छेने स्मार्ट मीटर बसविण्यासाठी प्रतिसाद दिल्याचा दावा महावितरणने केला आहे. औद्योगिक ग्राहकांना साकडे? स्मार्ट (टीओडी) मीटर हे पूर्णतः अचूक असून सामान्य वीज ग्राहकांसाठी फायदेशीर असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैशांची सवलत मिळविण्यासाठी स्मार्ट टीओडी मीटर उपयुक्त ठरले आहेत. औद्योगिक ग्राहकांकडे अनेक वर्षांपासून अशा प्रकारचे मीटर वापरात असल्याने वीज ग्राहकांनी मेळाव्यांना उपस्थित राहून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे. 000000000

स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी बचत गटांनी मालाचा दर्जा आणि पॅकिंगवर भर द्यावा- नारायण राणे

सिंधुदुर्गनगरी —जिल्ह्यातील बचत गट तयार करीत असलेल्या मलाचा दर्जा चांगला असेल आणि पॅकिंग चांगले असेल तरच आजच्या स्पर्धेच्या युगात बचत गटांचा टिकाव लागू शकेल.तेव्हा या दोन्ही बाबींवर भर देऊन वाटचाल…

– देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या सुखदुःखात पाठीशी उभे असणारे एकमेव नेतृत्व

 भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन डोंबिवली :“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व शेतकऱ्यांसह प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी गावागावातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव…

कच्छी समाजाशी जिव्हाळ्याचे नाते; ठाण्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध : एकनाथ शिंदे

  अनिल ठाणेकर | ठाणेकच्छी अस्मिता मंचच्या वतीने आयोजित ‘कच्छी पगडी कोणशिरे’ गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कच्छी समाजातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.…

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन पोर्टल

अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या (Construction and Demolition – C&D) कचऱ्याचे  निर्मितीपासून अधिकृत प्रक्रिया केंद्रापर्यत प्रभावी, पारदर्शक आणि शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्यासाठी  ठाणे महापालिकेने C&D Waste Management Portal विकसित केले असून या पोर्टलचे उद्घाटन आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या हवा प्रदुषणसंदर्भातील Suo Moto PIL क्र ३/२०२३ मधील निर्देशांच्या अनुषंगाने ठाणे महापालिकेने Council on Energy, Environment and Water (CEEW) यांच्या सहकार्याने (Construction and Demolition – C&D) Waste Management Portal विकसित केले आहे. यावेळी नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, सहायक संचालक नगररचना कुणाल मुळे, उपायुक्त मधुकर बोडके, प्र.मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत, पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच Council on Energy, Environment and…

रिंग मेट्रोमुळे चेंदणी कोळीवाड्यात संभ्रम –  संजय केळकर

ठाणे : वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या भूमिगत मार्गामुळे चेंदणी कोळीवाडा परिसरात संभ्रमाचे वातावरण आहे. या मार्गामुळे या कोळीवाड्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि भौगोलिक महत्वालाच तडे जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत…

बी.आर. नगरच्या नागरी समस्यांबाबत शिवसेना उबाठा पक्षाचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन

दिवा, दि 16 जुलै : बी.आर. नगर परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दिवा शहर शाखेच्या वतीने दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले.…

कल्याणच्या केएफसीमध्ये अन्न सुरक्षा नियमांची पायमल्ली

कल्याण : कल्याणच्या खडकपाडा येथील केएफसीमधील आऊटलेटमध्ये अन्नसुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचा ठपका अन्न व औषध प्रशासन विभागाने ठेवला आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण मंचचे जिल्हा संघटक प्रथमेश पुण्यार्थी यांनी एका…

मतदार पडताळणीबाबत संभ्रम कायम

घरोघरी जाऊन फॉर्म भरणे आवश्यक -नंदकुमार देशमुख अनिल ठाणेकर ठाणे, मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेबाबत प्रशासनाने केलेल्या घोषणेनंतरही प्रत्यक्षात घरोघरी जाऊन मतदारांचे फॉर्म भरले जात नसल्याचा आरोप ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार दत्तात्रेय देशमुख यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक मतदार यादी तयार करण्यासाठी नियुक्त कर्मचारी (बीएलओ) प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन आवश्यक फॉर्म भरून घेतील, असे आवाहन केले होते. मात्र आजपर्यंत कोणताही कर्मचारी घरी आलेला नसल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. शिवाईनगर येथील शाळेत सुमारे ५० नागरिक माहिती घेण्यासाठी गेले असता, तेथे बीएलओंची यादी उपलब्ध झाली. मात्र यादीतील बहुतांश अधिकाऱ्यांनी फोन न उचलल्याने किंवा आवश्यक माहिती न दिल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.अनेक मतदारांना ऑनलाइन पद्धतीने माहिती मिळविणे किंवा अर्ज भरणे शक्य नसल्याने प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष द्यावे. बीएलओंना आवश्यक सूचना देऊन त्यांनी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन मतदार यादी पडताळणी व फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी नंदकुमार दत्तात्रेय देशमुख यांनी केली आहे.