Author: bittambatami.com

दिव्यांग चेतन पाशिलकरला दिल्लीमधील राष्ट्रीय अबीलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक

2027 ला फिनलँडमधील 11 व्या आलिम्पिक चित्रकला स्पर्धेतही निवड   ठाणे ः ठाण्यातील आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता दिव्यांग चित्रकार चेतन पाशिलकरने दिल्लीमधील राष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. चेतन पाशिलकर यांची फिनलँड येथे  2027 साली होणार्‍या आंतरराष्ट्रीय Abylimpic स्पर्धेसाठी पुन्हा निवड झाली आहे. (चेतन पाशिलकर यांनी मार्च 2023 साली फ्रान्स, मध्ये झालेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत पेंटिंग मध्ये सुवर्णपदक मिळविले होते.) दिव्यांग चेतन पाशिलकर हे शालेय जीवनापासूनच चित्रकला या विषयात पारंगत असून 2018 सालीही त्यांनी राष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते.. वेगवेगळ्या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या विविध प्रादेशिक चित्रकला स्पर्धेतही सुवर्णपदके मिळविली होते.चेतन पाशिलकर हे आपल्या पत्नी आणि लहान मुलगा सह ठाणे शहरातील हायल्यांड रेसिडेन्सी मध्ये वास्तव्यास असून ते दिव्यांग तसेच सामान्य विद्यार्थ्यांसाठी चित्रकला प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरेही घेतात. नुकतेच त्यांनी दिल्ली येथे झालेल्या नॅशनल Abilimpic स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले आहे त्यांच्या यशामुळेच 2027 या वर्षात फिनलॅण्ंडमध्ये होणार्‍या अकराव्या आंतरराष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत त्यांची पुन्हा निवड झाली आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या स्पर्धेमध्ये दिव्यांगाच्या पुनर्वसनावर आधारित 33 वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आहेत यात क्राफ्ट, आयसीटी व सर्विसेस अशा तीन विभागात प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा क्रमाने स्पर्धा होत असतात. 2024 यावर्षी जानेवारी महिन्यात गोवा येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत निवड झाल्यानंतर चेतन पाशीलकर यांनी नुकत्याच ( डिसेंबर महिन्यात) दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय abylimpic स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले आहे. चेतन पाशीलकर हे मुख आणि कर्णबधिर असून देखील ते स्वतः लहान मुलांना पेंटिंगचे ज्ञान देत आहेत. 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी सुवर्णपदक प्राप्त करूनही शासनाकडून त्यांच्या कार्याची दखल घेतली न गेल्याची खंत ते व्यक्त करतात. क्रीडा क्षेत्रात प्रविण्या मिळणाऱ्या स्पर्धकाला अनेक बक्षिसे आणि मानधन मिळतात, मात्र चेतन पाशिलकर सारख्या दिव्यांग सुवर्ण पदक विजेत्या चित्रकाराचा सामाजिक संस्था व राजकीय मानकऱ्यांना त्याचा विसर पडतो. भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिव्यांग सुवर्ण पदक विजेता चित्रकार म्हणून सन्मानित करण्यात येत नाही हे त्या गरीब चित्रकारांचे दुर्दैवच म्हणावं लागेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा  करताना त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी त्यांचे पालक आणि आपत्येष्ठ चेतन पाशिलकर यांच्या कलेसाठी मेहनत घेत आहेत. चेतन पाशीलकरांसारखे असंख्य दिव्यांग कलाकार आर्थिक कणा मोडल्यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांना मुकतात अशावेळी त्यांना मदतीचा हात देणे आवश्यक असते. दिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उद्योजक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. सुधागड तालुक्यातील पाली जवळील तळई या डोंगर वस्तीत वसलेल्या गावातील चेतन पाशिलकर या मूकबधिर आंतरराष्ट्रीय सुवर्णं पदक विजेत्या चित्रकाराला मदतीचा हात दिल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील abylimpic दर्जाच्या चित्रकला स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा सुवर्ण कामगिरी करून देशाचे नाव इतिहासात कोरण्याची किमया त्यांच्याकडून होऊ शकते. कारण दिव्यांगांच्या या स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी चेतन पाशिलकर यांच्याच नावावर आहे. ००००

 डॉ. साद काझी आणि रवींद्र लाखे यांचा गौरव

कल्याण-भूषण व कल्याण-रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात कल्याण : कॉम्रेड दत्ता केळकर जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, ‘कल्याण सिटीझन फोरम’ आयोजित, “कल्याण-भूषण” आणि “कल्याण-रत्न” पुरस्कार वितरण सोहळ्यात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे मानकरी म्हणून, सामाजिक व शैक्षणिकक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे डॉ. साद काझी आणि ज्येष्ठ नाट्य-दिग्दर्शक रवींद्र लाखे यांना गौरविण्यात आले. रविवारी, अग्रवाल कॉलेज ऑडिटोरीयम, कल्याण (प.) येथे, मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार-लेखक अनिल थत्ते, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विश्वास, आदि मान्यवर ‘प्रमुख पाहुणे’ या नात्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून, डॉ. विजय पंडित; तर, समारंभाचे अध्यक्षपद मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नरेशचंद्र यांनी भूषविले. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे मानकरी म्हणून, सामाजिक व शैक्षणिकक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे डॉ. साद काझी आणि ज्येष्ठ नाट्य-दिग्दर्शक श्री. रवींद्र लाखे यांना गौरविण्यात आले.

– डॉ. साद काझी आणि रवींद्र लाखे यांचा गौरव

– कल्याण-भूषण व कल्याण-रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात कल्याण : कॉम्रेड दत्ता केळकर जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, ‘कल्याण सिटीझन फोरम’ आयोजित, “कल्याण-भूषण” आणि “कल्याण-रत्न” पुरस्कार वितरण सोहळ्यात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे मानकरी…

‘ईव्हीएम हटाव-देश बचाव, बॅलेट-पेपर लाव’ बैठकीत मरकडवाडी गावचे सरपंच रणजित मरकड यांची उपस्थिती

अनिल ठाणेकर ठाणे : भविष्यात ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी, ‘ईव्हीएम हटाव-देश बचाव, बॅलेट-पेपर लाव’ या घोषणेखाली, मतपत्रिकेद्वारे निवडणुकांसाठीची लोकचळवळ सुरु करण्यात आली असून, दि. १४ डिसेंबर-२०२४ रोजी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील,  मुंबई मराठी पत्रकार संघ येथे, एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मरकडवाडी गावचे सरपंच रणजित मरकड यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मतपत्रिकेवरील मतदानाचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी, ‘प्रजासत्ताक दिना’चे औचित्य साधून, २६ जानेवारी-२०२४ रोजी, रात्रौ ठीक ९ वाजता, फक्त ५ मिनिटांसाठी आपल्या घरातील, कार्यालयातील व जिथे जिथे शक्य असेल त्या ठिकाणचे, लाईट्स बंद ठेवून, ‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध नोंदविण्याचे विनम्र आवाहन राजन राजे यांनी केले. या बैठकीला निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील, ‘धर्मराज्य पक्षाया’चे अध्यक्ष राजन राजे, डाव्या चळवळीतील नेते फिरोज मियठीबोरवाला, आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे, मेहमूद प्राचा, प्रा. अमित उपाध्याय आणि विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर, अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या मरकडवाडी गावचे सरपंच रणजित मरकड आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत सर्व समविचारी पक्ष आणि सामाजिक संस्था/संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी, ‘ईव्हीएम’विरोधी लोकचळवळ, यापुढे आक्रमकपणे सुरु ठेवत, मतपत्रिकेद्वारे निवडणुका पार पाडण्यासाठी, मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. या बैठकीचे आयोजन अमीन सोलकर, शरद कदम, संतोष आंबेकर, एम.ए. खालिद यांनी केले होते.

‘ईव्हीएम हटाव-देश बचाव, बॅलेट-पेपर लाव’ बैठकीत मरकडवाडी गावचे सरपंच रणजित मरकड यांची उपस्थिती

अनिल ठाणेकर ठाणे : भविष्यात ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी, ‘ईव्हीएम हटाव-देश बचाव, बॅलेट-पेपर लाव’ या घोषणेखाली, मतपत्रिकेद्वारे निवडणुकांसाठीची लोकचळवळ सुरु करण्यात आली असून, दि. १४ डिसेंबर-२०२४ रोजी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील,  मुंबई मराठी पत्रकार संघ येथे, एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मरकडवाडी गावचे सरपंच रणजित मरकड यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मतपत्रिकेवरील मतदानाचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी, ‘प्रजासत्ताक दिना’चे औचित्य साधून, २६ जानेवारी-२०२४ रोजी, रात्रौ ठीक ९ वाजता, फक्त ५ मिनिटांसाठी आपल्या घरातील, कार्यालयातील व जिथे जिथे शक्य असेल त्या ठिकाणचे, लाईट्स बंद ठेवून, ‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध नोंदविण्याचे विनम्र आवाहन राजन राजे यांनी केले. या बैठकीला निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील, ‘धर्मराज्य पक्षाया’चे अध्यक्ष राजन राजे, डाव्या चळवळीतील नेते फिरोज मियठीबोरवाला, आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे, मेहमूद प्राचा, प्रा. अमित उपाध्याय आणि विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर, अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या मरकडवाडी गावचे सरपंच रणजित मरकड आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत सर्व समविचारी पक्ष आणि सामाजिक संस्था/संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी, ‘ईव्हीएम’विरोधी लोकचळवळ, यापुढे आक्रमकपणे सुरु ठेवत, मतपत्रिकेद्वारे निवडणुका पार पाडण्यासाठी, मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. या बैठकीचे आयोजन अमीन सोलकर, शरद कदम, संतोष आंबेकर, एम.ए. खालिद यांनी केले होते.

 जिल्ह्यातला पारा घसरला

 बदलापुरात सर्वात कमी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद   बदलापूर: सोमवार हा मोसमातील सर्वात थंड दिवस ठरला आहे. ठाणे जिल्ह्यात बदलापूर शहरात सर्वात कमी तापमानाची नोंद खाजगी हवामान अभ्यासाकांनी केली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास बदलापुरात १०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले तर शेजारच्या अंबरनाथमध्ये ११.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ठाणे जिल्ह्याचे सरासरी तापमान १२ अंश सेल्सिअस होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने घट नोंदवली गेली आहे. गेल्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यात तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यात बदलापूर शहरात १०.४ अंश सेल्सिअस इतके निचांकी तापमान नोंदवले गेले. खाजगी हवामान अभ्यासात अभिजीत मोडक यांनी त्यांच्या केंद्रात ही नोंद नोंदवली. बदलापूर शहराच्या एका बाजूला टाहुलीची डोंगर रांग तर दुसऱ्या बाजूला उल्हास नदी आहे. शहरात मोठ्या संख्येने झाडे आहेत. त्यामुळे शहरात जिल्ह्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद दरवर्षी होत असते. यंदा सोमवारी आतापर्यंतच्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. बदलापूर शेजारच्या अंबरनाथ शहरात ११.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. उल्हासनगर शहरात १२.५ अंश सेल्सिअस, कल्याण शहरात १२.८ अंश सेल्सिअस, डोंबिवली शहरात १२ अंश सेल्सिअस तर ठाणे शहरात १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

 कल्याणमध्ये पत्रीपूलजवळ जलवाहिनी फुटली

शेकडो लीटर पाण्याची नासाडी   कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेची एक जलवाहिनी सोमवारी सकाळी पत्रीपुलाजवळील ९० फुटी रस्त्यावर फुटली. जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी वाहून गेले. कल्याण पूर्व भागाला या जलवाहिनीतून पाणी पुरवठा केला जातो. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळतात या जलवाहिनीवरील पाणी पुरवठा पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी बंद केला. जलवाहिनीतून बाहेर पडणारे पाणी ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावर साचले होते. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर जलवाहिनीतून पाण्याचे कारंजे उडत असल्याने वाहन चालकांना या भागातून वाहने चालविताना काळजी घ्यावी लागत होती. अनेक वाहन चालकांनी जलवाहिनीजवळ आपली वाहने उभी करून उडणाऱ्या पाण्याद्वारे आपली वाहने धुऊन घेतली. उल्हास नदी पात्रातून उचललेले पाणी बारावे जलशुध्दीकरणात आणले जाते. तेथून हे पाणी जलवााहिनीव्दारे पत्रीपूल भागात रेल्वे मार्गाखालून कल्याण पूर्व भागात पुरवठा केले जाते. ही जलवाहिनी सोमवारी सकाळी ९० फुटी रस्त्यावरील मोहन सृष्टी येथे फुटली. जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी फुकट गेले. परिसरातील जागरूक नागरिकांनी ही माहिती तात्काळ पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर या जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. ही जलवाहिनी फुटल्यामुळे कल्याण पूर्वेतील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे. नागरिकांनी घरातील उपलब्ध पाणी एक दिवस जपून वापरण्याचे आवाहन पालिका अधिकाऱ्यांनी केले आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम अधिकाऱ्यांनी तातडीने सुरू केले होते. दुपारपर्यंत हे काम पूर्ण करून या जलवाहिनीतील पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. या जलवाहिनीच्या परिसरात राहणारे काही रहिवासी जलवाहिनीतून पाण्याचा ओघ कमी झाल्यानंतर भांडी घेऊन पाणी भरण्यासाठी आले होते. जलवाहिनीतील पाण्याच्या अति उच्चदाबामुळे जलवाहिनी फुटली असण्याचा प्राथमिक अंदाज अधिकारी वर्तवत आहेत. दुरुस्ती करत असताना जलवाहिनी फुटण्याचे खरे कारण समजून येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. कोट ९० फुटी रस्त्यावर पत्रीपुल भागात जलवाहिनी फुटली आहे. या जलवाहिनीवरील पाणी पुरवठा तातडीने बंद करण्यात आला आहे. ही जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेऊन कल्याण पूर्व भागाचा पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल. अशोक घोडे (कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग) ०००००

 ठाणे जिल्ह्यातून बनावट औषधांची रुग्णांना विक्री

आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता   ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी शहरातून बनावट औषधांची रुग्णांना विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. औषध प्रशासनाने एक कोटी ८५ लाख रुपयांचा साठा जप्त केला असून ही औषधे अँटिबायोटिक (प्रतिजैविक) असल्याचे प्रशासनाने सांगितले. या प्रकरणी औषध प्रशासन विभागाकडून नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. आंतरराज्यीय टोळी यामध्ये सहभागी असून त्यादिशेने औषध प्रशासनाचा तपास सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून बनावट औषधांप्रकरणी आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले आहेत. या बनावट औषधांचा साठा सरकारी रुग्णालयांमध्येही विक्री झाल्याचे उघड झाले होते. भिवंडीमधील एका गोदामामध्येही बनावट औषधांचा साठा असल्याची माहिती औषध प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यानुसार औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या औषधांचा साठा विक्रीस प्रतिबंधित केला होता. या औषधांचे नमुने तपासल्यानंतर ते बनावट आढळून आले. त्यानंतर पथकाने एक कोटी ८५ लाख रुपयांच्या बनावट औषधांचा साठा जप्त केला. याप्रकरणात औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट औषधांची विक्री रुग्णांनाही झाली आहे. या प्रकरणात आंतरराज्यीय टोळी कार्यरत असून त्यादिशेने औषध प्रशासनाचा तपास सुरू आहे. 00000

माथेरानमध्ये आजी-माजी विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न

माथेरान : नेहमीच्या शाळेच्या अभ्यास क्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर स्कुल, नगरपालिका प्राथमिक शाळा सेंट झेव्हीयर स्कुल आणि अंगणवाडी शाळेतील मुलांना घेऊन वार्षिक स्नेहसंमेलन…

जगातील पहिले सुवर्ण स्वरमंडल पनवेलमध्ये

पनवेल : शास्त्रीय गायनात स्वरमंडल या झंकार वाद्याला एक परंपरा आणि अनन्य साधारण महत्व आहे. शास्त्रीय संगीतातील गायक या वाद्याचा उपयोग करत असतात. असाच एक स्वरमंडल पनवेलमध्ये दाखल झाला आहे,…