Author: bittambatami.com

एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधातील सोशल मीडिया पोस्ट्सवर आक्षेप

शैलेश पाटील यांची मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिवा :  गेले अनेक दिवस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांची सोशल मिडीयावार वारंवार बदनामी केल्या प्रकरणी येथील गणेश पाटील यांच्या विरोधात ठामपाचे प्रभाग क्र.२७ चे नगरसेवक शैलेश पाटील यांनी आज मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल शिंदे यांची भेट घेत तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात वारंवार बदनामी केल्याप्रकरणी संतापही व्यक्त केला आहे. शैलेश पाटील हे दिवा शहरातील तीन टर्म मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले ठाणे महानगरपालिकचे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांनी आज आपल्या  वरिष्ठ नेत्यांवर सोशल मिडीयावरील वारंवार होणारी बदनामी सहन न झाल्याने मुंब्रा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, गणेश निळकंठ पाटील हे वारंवार फेसबुकच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विविध प्रकारे आरोप करीत कार्यकर्त्यांच्या भावाना दुखावतील असे लिखाण करीत आहेत. एकनाथ शिंदे हे मुक्ता बिल्डरला हाताशी धरुन येथील कांदळवन बुजवण्यास सांगून बिल्डींगचे काम करण्यास सांगत आहेत. खाडी बुजवून मुक्ता बिल्डरला बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देत आहेत. गाववाल्यांच्या जमीनी बळकावित आहेत. कांदळवन आणि खाडी बुजविण्याचे काम करीत आहेत. तसेच हिंदु धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या शिव हनुमान मंदिरही पाडण्यास एकनाथ शिंदेच सांगत आहेत. तसेच गणेश पाटील यांचे स्वताचे घर पाडण्यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन नोटीस पाठवित आहेत, असे विविध आरोप आणि आक्षेपार्ह लिखाण गणेश निळकंठ पाटील यांनी सोशल मिडीयावर केल्याचे नगरसेवक शैलेश पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. नगरसेवक शैलेश पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव येथील हनुमान मंदिर पाडण्याच्या कामात मुद्दाहून आणि वारंवार घेत असून लोकांमध्ये धार्मिक भावना भडकविण्यासाठी गणेश पाटील हे मुद्दामहून प्रयत्न करीत आहे, लोकांमध्ये अफवा पसरवून उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांचे नाव मुद्दामहून बदनाम करण्यासाठी फेसबुक सारख्या सोशल मिडीयाचा वापर करीत आहेत. येथील मुक्ता बिल्डरच्या प्रविण पाटील यांच्याशी कोणतेही सबंध नसताना वारंवार सोशल मिडीयावर वारंवार बदनामी करुन जनतेच्या भावनाही भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आज आम्ही मुंब्रा पोलीसांत तक्रार दाखल करुन सबंधित गणेश पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे असे शैलेश पाटील म्हणाले.

 पालघर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

पालघर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान खा. डॉ. हेमंत सवरा यांची माहिती अभियानाचा नागरिकांना फायदा होणार योगेश चांदेकर पालघरः महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न असतात. या प्रश्नांचे निराकरण करणे आणि जनतेच्या तक्रारी तातडीने निकाली काढणे या सोबतच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मंडलस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती खा. डॉ. हेमंत सवरा यांनी दिली. या अभियानात नागरिकांना विविध योजनांचा मोफत फायदा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने १८ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व  समाधान शिबीर अभियान राबविण्याबाबत शासन निर्णय जाहीर केला. त्यानुसार महसूल विभागाशी संबंधित सेवा तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अनेक प्रभावी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची यापुढे परवानगी लागणार नाही. सनद प्रणाली संपुष्टात आणणे, एक वेळचे अधिमूल्य भरण्याची नवी तरतूद, तुकडे बंदी कायद्यातील सुधारणा व अभिलेख अद्ययावतीकरण आदी सुधारणांचे लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, जनता शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित केले आहे. दोन महिन्यांत सहा शिबिरे या अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचे महसूल विभागाशी निगडीत दैनंदिन प्रश्न निकाली काढणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या नवीन तरतुदी बाबत जनजागृती करणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर कसा घेता येईल, याबाबत मार्गदर्शन करणे नागरिकांचे प्रश्न एकाच दिवसात निकाली काढण्यासाठी मार्च ते मे या दोन महिन्यांत सहा शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. नगरपालिका क्षेत्रातही अभियान छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान शिबिराच्या माध्यमातून मंडलस्तरावर पूर्वतयारी करण्यासाठी १८ ते पाच मार्चपर्यंत वेळ देण्यात आला आहे. ७ मार्च आणि १४ मार्च रोजी मंडलस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर नगरपालिका, नगरपंचायतस्तरावर आठ मे व १५ मे रोजी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरासाठी राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती खा. डॉ. सवरा यांनी दिली. सातबारा जिवंत करणे, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करणे, तुकडेबंदी खरेदी, सामाजिक अर्जांची स्वीकृती, नोंदणीकृत दस्तावेजाचे नूतनीकरण, विद्यार्थ्यांचे दाखले, घरे, फेरफार, उतारा अभिलेख दुरुस्ती, अकृषिक जमिनीची पत्रके, सुधारणा, ई- केवायसी आदींबाबत या अभियानात नागरिकांना योग्य ती माहिती दिली जाणार आहे. सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार या सामाजिक उपक्रमात पात्र लाभार्थींचे अर्ज भरून घेण्यात येणार असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती या शिबिरात अर्जांना मंजुरी देईल. महसूल, ग्रामविकास, आदिवासी विभाग तसेच अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तुकडेबंदी कायदाविरुद्ध १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्रमाणभूत सीमेपेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार व हस्तांतरणाबाबत गावनिहाय यादी तयार करावी, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनमुळे सातबारा मधील इतर अधिकारातील खरेदीचे नाव, इतर अधिकारात नोंदवलेले शेरे तसेच नव्याने प्राप्त अर्जाविषयी फेरफार घेणे,  अनधिकृत व्यवहाराविषयी गावनिहाय माहिती गोळा करून नोंदणीसाठी नोंदणी विभागाकडे पाठवणे, सातबारा अद्ययावत करून शिबिराच्या दिवशी अद्ययावत सातबाराचे वाटप करावे व मंडल स्तरावरील सर्व शाळांचा आढावा घेऊन दाखले वाटप न झालेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या तयार करून विद्यार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज भरून घेऊन शिबिराच्या दिवशी दाखल्यांचे वाटप करावे, मंडळातील सर्व घरे अंतर्गत पट्टे वाटपासाठी बाकी राहिलेल्या लाभार्थींची यादी तयार करणे तसेच संबंधित शासन निर्णयातील तरतुदीनुसार पूर्वतयारीच्या कालावधीत प्रक्रिया पूर्ण करावी व शिबिरात पट्टे वाटप तयार करावे असे आदेश देण्यात आले असून समाधान शिबीर अंतर्गत प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढण्यात येणार आहेत. कोट…

दिवा शहरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय भव्य कराटे स्पर्धांचे आयोजन

दिवा: दिवा शहरात प्रथमच राज्यस्तरीय भव्य कराटे स्पर्धांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. दिवा शहरातील लोकप्रिय प्रभास कराटे स्पोर्ट अकॅडमी यांच्या माध्यमातून प्रोफेसर प्रशांत कसबे यांच्या उत्कृष्ट आयोजन व नियोजनातून ही…

 नवीन शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे विद्यार्थी पन्नास वर्षांनंतर एकत्र

संस्थेसाठी मदतीच्या घेतल्या आणाभाका मुंबई : समाज माध्यमांची किमया घडली आणि १९७५-७६ च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे विद्यार्थी चक्क पन्नास वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. या आता सत्तरी गाठलेल्या माजी विद्यार्थ्यांनी मग संस्थेला संपूर्ण मदत करण्याच्या परस्पर कौटुंबिक संबंध प्रस्थापित करण्याच्या आणाभाका घेतल्या. आजकाल वॉट्स अप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर सर्वच जण व्यस्त असतात. हे समाज माध्यम म्हणजे दुधारी शस्त्र आहे. याचा वापर विधायक कार्यासाठी केला तर फार मोठा प्रभाव पडतो. दहिसर येथील पूर्णप्रज्ञा माध्यमिक शाळेतील १९७५-१९७६ साली नवीन शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे विद्यार्थी सुमारे पन्नास वर्षांनंतर एकत्र आले आणि त्यांनी मैत्री सभेचे आयोजन केले. बोरिवली येथे  माजी विद्यार्थ्यांसाठी ‘मैत्री सभा : शाळेतील आठवणींचा मेळा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या समारंभात शाळेतील  माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने  उपस्थित होते. या समारंभात विविध क्षेत्रात  उच्च पदस्थ झालेल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा आणि  सध्या विविध सेवा संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना एकत्र बांधून परस्पर कौटुंबिक संबंध जोपासणे, व्यवसाय नेटवर्क लिंक्सद्वारे एकमेकांना जोडणे, लहान-मोठी कामे करणाऱ्या आपल्या बंधू-भगिनींना वेगवेगळ्या उंचीवर नेणे, समाजसेवेचे काम एकत्र करणे आणि शाळेतील माजी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे या उदात्त उद्देशाने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून मित्र डॉ. भरत वसानी, डॉ. प्रवीण पुरेचा भाटिया आणि उपेंद्र गोगरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाच्या यशाबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले. ००००

स्वराज्य स्पोर्ट्स, स्वस्तिक क्रीडा मंडळ अजिंक्य

मुलुंड क्रीडा केंद्र कब्बडी स्पर्धा मुंबई : मुलुंड (पूर्व) येथील छत्रपती संभाजी राजे मैदानात मुलुंड क्रीडा केंद्रातर्फे आयोजित कबड्डी महोत्सव २०२६ मध्ये महिला गटात कांजूरमार्ग येथील स्वराज्य स्पोर्ट्सने आणि पुरुष…

वहाँ दिया जला दू,  जहाँ अंधेरा है या भूमिकेतून स्थापन झालेल्या जविकिरण काव्य मैफल मिरा रोड येथे संपन्न

वहाँ दिया जला दू,  जहाँ अंधेरा है या भूमिकेतून स्थापन झालेल्या जविकिरण काव्य मैफल मिरा रोड येथे संपन्न मिरा – भाईंदर : जविकिरण काव्य मैफल आणि स्वरसंगम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मीरा रोड येथील विरंगुळा केंद्र सभागृहात एका काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार कवी सुनील ओवाळ होते.  ज्येष्ठ हिंदी साहित्यिक कवी हृदयेश मयंक, ज्येष्ठ गझलकार भागवत बनसोडे, सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर, कवी प्रा. डॉ. अनिल साबळे, कवयित्री प्रांजली काळबेंडे, गझलकार मुस्तहसन अज्म,  कवी डॉ. मुक्तार खान, कवयित्री प्रा. संध्या वैद्य यांच्यासह ज्यांच्या नावातील जवि या आद्याक्षरांवरून ही संकल्पना सुचली ते मराठीतील ज्येष्ठ आंबेडकरवादी कवी ज.वि.पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मैफल संपन्न झाली. सुप्रसिद्ध निवेदक आणि जविकिरण काव्य मैफलीचे चिटणीस प्रा.उत्तम भगत यांनी सूत्रसंचालन केले. या संमेलनात एकूण ३२ कवींनी आपल्या रचना सादर केल्या. यावेळी प्रा. संध्या वैद्य यांच्या आव्हान व प्रा. भीमराव पेटकर यांच्या आयुष्याच्या वळणावर या कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सिने-नाट्य सृष्टीतील हरहुन्नरी कलाकार  अशोक चाफे यांनी केलेल्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वरमाउली फाउंडेशन व जविकिरण काव्य मैफल पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाला मिरा भाईंदर परिसरातील श्रोत्यांची उपस्थिती लाभली.

जंगल गप्प… आवाज माणसांचा!

येऊर : ठाणे परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या जैवविविधतेने समृद्ध उद्यान परिसरात वाढती वाहन रहदारी, पर्यटकांची गर्दी आणि विविध कार्यक्रमांमधून होणाऱ्या कर्कश ध्वनीप्रदूषणामुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त…

 ठाणे जिल्हा माध्यवर्ती बॅकेंची निवडणूक कधी?

ठाणे जिल्हा माध्यवर्ती बॅकेंची निवडणूक कधी? निवडणूक कार्यक्रमाला उशीर का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल कल्याण: ठाणे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत येत्या ३१ मार्च ला संपत आहे. अवघे तीस दिवस उरले असताना या बँकेचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर न झाल्याने शेतकरी वर्गात संताप वेक्त केला जात आहे. ठाणे जिल्हा माध्यवर्ती बँक ठाणे पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य बँक म्हणून गणली जात आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून हीं बँक राज्यात  नावारूपास आलेली बँक आहे. या बँकेत शेतकऱ्यामधून तसेच गृह निर्माण संस्था, पत संस्था, मच्छिमार सहकारी संस्था, शेतकरी सेवा सोसायटी, मंजूर सहकारी संस्था यांच्या माध्यमातून प्रतिनिधी निवडून दिले जातात. २१ संचालक या बँकेच्या संचालक मांडळावर निवडले जातात. या संचालकांचा कार्यकाळ ३० मार्च २०२६ रोजी संपत आहे. कार्यकाळ संपण्यासाठी अवघे ३५ दिवस शिल्लक असताना निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण झालेला आहे. सहकार विभागाने निवडणुकी बाबत नवीन नियमावली केलेली आहे. या  नियमाचा फटका बसणार असल्याने विद्यमान संचालक मंडळातील  १५ संचालकांना निवडणूक लढविण्यास प्रतिबंध होणार असल्याने अनेक वर्ष या बँकेत संचालक पदावर असणाऱ्या विद्यमान संचालकांना धक्का मानला जात आहे.

मोबाईलचा अतिरेक वापर टाळा असा संदेश देत होळी साजरी

मोबाईलचा अतिरेक वापर टाळा असा संदेश देत होळी साजरी कल्याण:  सम्राट अशोकची लेकरं गाऱ्हाने घालताव रे महाराजा. जो काय आमच्या लेकरानो मोबाईलचो  नाद लागलो हा तो नाद काढून घे  महाराजा. अशा मालवणी भाषेत विद्यार्थ्यांनी पारंपारिक गाऱ्हाने घालत कल्याणच्या सम्राट अशोक शाळेत होळी साजरी करण्यात आली. मोबाईलचा अतिरेक वापरामुळे विद्यार्थी अभ्यासात दुरावत चालली त्याचा परिणाम गुणवत्तेवर होतोय म्हणून मोबाईलचा अतिरेक वापर टाळा असा संदेश दिला. तसेच होळी खेळतांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका. नैसर्गिक रंगांचा वापर करा. पर्यावरण रक्षण करा. अशी जनजागृती ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील विजया तांबे तसेच शिक्षक शिक्षकेतरांसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सोलापूरात

४२ जिल्ह्यांतील ४००हून अधिक खेळाडूंचा सहभाग पुणे: सोलापूर येथे २८ व २९ मार्च रोजी चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे संयोजन निर्झरा केअर फाऊंडेशन, सोलापूर यांच्याकडे सोपविण्यात आले असून ४२ जिल्ह्यांतील ४००हून अधिक महिला खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तीन वेळा किताब पटकावलेल्या भाग्यश्री फंड हिच्याकडे चौथ्या विजेतेपदासाठी सर्वांचे लक्ष लागले आहे. निर्झरा केअर फाउंडेशनच्या संचालिका आणि संस्थापक स्वाती अळ्ळीमोरे-साखरे, संस्थेच्या संस्थापक स्वाती अळ्ळीमोरे-साखरे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघचे अध्यक्ष रामदास तडस व सरचिटणीस योगेश दोडके यांनी माहिती दिली. स्पर्धा सोलापूरमधील हरीभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. स्पर्धेसाठी ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२ किलो तसेच महाराष्ट्र केसरी गट (६५ ते ७६ किलो) असे वजनी गट ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके देण्यात येणार असून महाराष्ट्र केसरी विजेत्या खेळाडूला मानाची गदा प्रदान करण्यात येणार आहे. भाग्यश्रीसमोर अमृता पुजारी, प्रगती गायकवाड, अंकिता फटाले व वेदांतिका पवार यांचे आव्हान असणार आहे. भाग्यश्रीने स्पेनमध्ये झालेल्या २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले असून थायलंड येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. गतवर्षीच्या अंतिम लढतीत तिने अमृतावर मात करत किताब पटकावला होता. स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी वडील सिद्धाराम साखरे यांच्या स्मरणार्थ २०२३ मध्ये निर्झरा केअर फाऊंडेशनची स्थापना केली. सोलापूर जिल्ह्यातील महिला कुस्तीपटूंना दर्जेदार सुविधा व व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ही राज्य अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आश्वासन देत आयोजकांना पाठिंबा दर्शविला.