Author: bittambatami.com

संविधानामुळे मी मंत्री झालो याची सदैव जाणीव – पालकमंत्री उदय सामंत

अशोक गायकवाड   रत्नागिरी : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच मी मंत्री झालो, याची सदैव मला जाणीव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्यभिषेक सोहळ्यास रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून…

Photo-2 स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे साहेब  यांच्या माध्यमातून आनंद नगर शिर्डी नगर महिलांचे सभासद नोंदणी फॉम भरण्यात आले. स्वराज अभियान संघटनेशी जोडण्यात आले. स्वराज अभियान ही एक सामाजिक आणि राजकीय चळवळ आहे, ज्याचा उद्देश स्थानिक स्वराज्य, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे आहे. स्वराज अभियानाचे सक्रिय सदस्य होण्याचे आवाहन करण्यात आले. हे शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी स्वराज अभियानाच्या महिला सदस्य संजना खोत, सुषमा ब्रीद, मृणाल सूवरे, प्रिया सोडगे, अंकिता शिर्के यांचा सहभाग आहे.

पायताणाची काळजी घेणारा चर्मकार समाज आक्रमक

रमेश औताडे मुंबई : फूटपाथवर बसून जनतेच्या पायताणाची काळजी घेणारा चर्मकार समाज आज अनेक वर्षापासून आपल्या न्याय हक्कासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मात्र सरकार फसव्या घोषणा  व आश्वासन देण्यात गुंग झाले आहे. त्यामुळे आता हा समाज आझाद मैदानात सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. चर्मोद्योग हा परकीय चलन मिळवून देणारा व्यवसाय आहे. मात्र या व्यवसायाकडे सरकारचे लक्ष नाही. चर्मकार समाजाचे महामंडळ आहे. त्याला अध्यक्ष नाही. पुरेसे कर्मचारी महामंडळात नाहीत. असे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड यांनी सांगितले. फंड नसल्याने अनेक चर्मकार बांधव अनुदान व कर्ज यापासून वंचित आहेत. तरुण बेरोजगार झाले आहेत, असे  मुंबई अध्यक्ष राजू नेटके यांनी यावेळी सांगितले. लाडकी बहिण व लाडका भाऊ या योजना मतांच्या जोगव्यासाठी आहेत हे सरकारलाही माहीत आहे. तरीही सरकार मनमानी कारभार करत आपलेच खरे करत आहे. त्यामुळे आता मागण्या मान्य होईपर्यंत मैदान सोडायचे नाही असा इशारा समाजाचे युवा नेते जगदीश लाड यांनी दिला आहे. 000

मुरबाड-कल्याण रेल्वे लवकरच सुरु होणार

 २०० कोटींचा निधी मंजूर मुरबाड : मुरबाड- ल्याण रेल्वेच्या भूमी अधिग्रहणासाठी रेल्वेने २०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती माजी खासदार कपिल पाटील यांनी मुरबाड येथे दिली. मुरबाड-कल्याण रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांची…

ठाणे स्थानक परिसर मोकळा

ठाणे : काही महिन्यांपासून थंड पडलेल्या फेरीवाला विरोधातील कारवाईचे हत्यार ठाणे पालिकेने पुन्हा एकदा बाहेर काढले आहे. त्याअंतर्गत ठाणे स्थानकात कारवाई करून पालिकेने परिसर फेरीवालामुक्त केला आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या…

 पात्र अर्जदारांची प्रारूप यादीची प्रतीक्षा संपणार

 म्हाडा मुंबई मंडळ सोडत ऑक्टोबर २०२४ मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली असून मुंबई मंडळाने अर्ज विक्री – स्वीकृतीसाठी दिलेल्या विहित मुदतीत अनामत रकमेसह एक लाख १३ हजार इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. प्राप्त अर्जांची मुंबई मंडळाकडून छाननी पूर्ण करण्यात आली असून गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पात्र अर्जदारांची प्रारूप यादी मुंबई मंडळ म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करणार आहे. मुंबईतील गोरेगाव, बोरिवली, जुहू, पवई, विक्रोळी, ताडदेव, दादर, वरळी, वडाळा आदी ठिकाणच्या २०३० घरांसाठी ९ ऑगस्टपासून सोडत पूर्व प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ९ ऑगस्ट ते १९ सप्टेंबरदरम्यान ही प्रक्रिया सुरू होती. या कालावधीत मुंबई मंडळाकडे अनामत रकमेसह एक लाख १३ हजार अर्ज सादर झाले आहेत. या अर्जांची छाननी करण्यात आली असून छाननीत पात्र – अपात्र ठरणाऱ्या अर्जदारांची यादी गुरुवारी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अपात्र ठरलेल्या अर्जदारांना सूचना – हरकती नोंदविण्यासाठी काही कालावधी देण्यात येणार आहे. या कालावधीत आपल्या अर्जातील त्रुटी दूर करणाऱ्या आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांची नव्याने पात्रता तपासत एकूण पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडतीच्या वेळापत्रकानुसार अंतिमतः पात्र ठरलेल्या अर्जदारांची यादी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीत जे अर्जदार समाविष्ट असतील तेच सोडतीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे या यादीत एकूण किती अर्जदार पात्र ठरतात आणि किती अर्जदार सोडतील सहभागी होतात हे ३ ऑक्टोबर रोजी स्पष्ट होईल. पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढली जाणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे उपस्थित राहणार आहेत. सोडतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी अर्जदारांची यादी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर यशस्वी अर्जदारांना देकार पत्र वितरित करून त्यांच्याकडून घराची विक्री किंमत भरून घेतली जाईल. निश्चित कालावधीत जे यशस्वी अर्जदार घराची संपूर्ण रक्कम मुद्रांक, शुल्क नोंदणी शुल्क आणि देखभाल शुल्क अदा करतील त्यांना घरांचा ताबा दिला जाईल. दरम्यान, यंदा सोडतील निर्माणाधीन प्रकल्पातील घरांची संख्या बरीच आहे. त्यामुळे अशा घरांसाठी यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना घराचे काम पूर्ण होऊन निवासी दाखला मिळाल्यानंतर घरांचा ताबा दिला जाणार आहे.

बदलापूर एन्काऊंटरचे श्रेय घेणाऱ्या फडणवीसांनी नालासोपाऱ्यातील महिला बलात्काराचीही जबाबदारी घ्यावी – वर्षा गायकवाड

मुंबई : बदलापूर प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर केल्याचे श्रेय घेण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यात स्पर्धा सुरु झाली आहे. शिंदेंचे कौतुक करणारी मोठी जाहिरात वर्तमानपत्रात झळकली तर फडणवीसांच्या नावाने मुंबईत ‘बदलापुरा’…

ठाणे  महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती’ ‘अंत्योदय दिवस’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी…

आपला दवाखाना बंद होण्याच्या मार्गावर ?

माथेरान : राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत याचा असंख्य गरजवंताला लाभ मिळत आहे. वैद्यकीय सुविधा सुध्दा ” आपला दवाखाना”या माध्यमातून सर्वाना मोफत तपासणी आणि उपचार केले…

पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई –  उदय सामंत

अशोक गायकवाड   रत्नागिरी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महिलांच्या उन्नतीसाठी आणि त्यांना सक्षम करणारी आहे. ७२ तासात प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत. पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला…