Author: bittambatami.com

सिंधुदुर्ग जिल्ह्याला जगाच्या पर्यटन नकाशावर नेणारं भारतातलं पहिलं ‘ फिश थीम पार्क ‘

अवघ्या ८ महिन्यात तीन लाख पर्यटकांनी दिली भेट…! पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सलाम…! राजन आनंद चव्हाण सिंधुदुर्ग: ‘ होय ‘ ‘ जेव्हा लोक प्रवास करतात,तेव्हा त्यांचं आयुष्य बदलतं असं म्हणतात…! ‘ १,मे,११९७ रोजी जेव्हा सिंधुदुर्ग हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला तेव्हा आम्हालाही असच वाटत होतं.देश – विदेशातले पर्यटक  इथं येतील,इथले स्वच्छ – सुंदर समुद्र किनारे बघतील,निसर्ग सौंदर्याचा मनमुरादपणे आनंद उपभोगतील,इथल्या ऐतिहासिक गड- किल्ल्यांचा,इथल्या संस्कृतीचा – कलेचा अभ्यास करतील,इथल्या कोकणी मेव्याचा,मालवणी पदार्थांचा आस्वाद घेतील जेणेकरून आमचंही जीवनमान सुधारेल.मात्र गेल्या २७ वर्षात म्हणावा तसा बदल,म्हणावी तशी परिस्थिती बदललेली दिसत नाही. रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन(१, मे १९८१)जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली तेव्हा या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न सुमारे २५ ते ३० हजाराच्या आसपास होतं. कोणत्याही भागाचा,प्रांताचा,देशाचा,  विकास हा तिथल्या पायाभूत सुविधा,दळणवळणाची साधनं,उपलब्ध साधनं- संपत्ती, यावर खरं तर अवलंबून असतो.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष कै.जॉन केनेडी यांचं एक वाक्य नेहेमीच लक्षात ठेवायला हवं.’अमेरिका श्रीमंत आहे म्हणून तिथले रस्ते चांगले आहेत असं नाही,तर अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे’. सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीचे सर्व श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री अ.र.अंतुले आणि त्यांचे खास विश्वासू सहकारी, तत्कालीन राज्यमंत्री एस.एन.देसाई यांनाच जातं. कुडाळ- वेंगुर्ल्याचे आमदार असताना त्यांनी कुडाळ शहराजवळ ‘ एमआयडीसी ‘च्या माध्यमातून अनेक लहान मोठे उद्योग आणले.तरुण – तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.मात्र काही वर्षातच या उद्योगांना घरघर लागली.त्यात राजकीय हेव्यादाव्यामुळे   निसर्गरम्य सिंधुदुर्गात मोठे – मध्यम उद्योग नको.लघु उद्योग ,कुटिरोद्योग हवेत अशा आग्रहातून आहे त्या उद्योगांकडे ,त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होऊ लागलं आणि हळू हळू एकापाठोपाठ एक उद्योग बंद पडत गेले.बघता बघता या उद्योगनगरीला अवकळा आली.या एम आय डी सी तून पूर्वी सोन्याचा धूर निघत होता हे आताच्या तरुण तरुणींना सांगीतलं तर खरंच वाटणार नाही.कारखाने बंद पडले आणि कुडाळ शहर आणि आसपासच्या परिसराची रयाच गेली.एकेकाळी गजबजलेलं असणार असं हे कुडाळ एकदम शांत झालं. इथली धावपळ थांबली. कुडाळ शहराच्या आठवणी सांगताना इथल्या जुन्या जाणत्या व्यापाऱ्यांचा, बुजुर्ग मडळींचा कंठ दाटून येतो. ‘गेले ते दिन गेले ‘ हेच उद्गार त्यांच्या तोंडून निघतात. ही ‘एमआयडीसी’ पुनरुज्जीवीत  व्हावी यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले. मधल्या काळात काही उद्योग आले आणि काही कालावधीत बंदही पडले. आजही     ‘अतिरिक्त एमआयडीसी’त उद्योग येताहेत, यापुढेही ते येतील, तरुणांना कायमचा रोजगार मिळेल याच आशेवर इथले तरुण -तरुणी आहेत. पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर या जिल्ह्याचं रुपडंच पालटून जाईल असं आम्हाला वाटलं होतं पण याही बाबतीत निराशाच झाली.याला कारणीभूत आमची मानसिकता, आमचा करंटेपणा. आम्हाला ‘Sea World’ नको, मालवणच्या खोल समुद्रातल्या ‘ ‘Marine sanctuary’ सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन प्रकल्पांना आमचा विरोध. परदेशी पर्यटक जे कपडे घालतात त्यानं आमची संस्कृती बिघडते…! मात्र  ओरड करणारी हीच मंडळी मात्र सिंगापूर, मलेशिया, थायलंड किंवा अन्य देशांमध्ये भटकंती करून येतात, तेव्हा मात्र आमची संस्कृती बिघडत नाही. हा दांभिकपणा जोपर्यंत आम्ही सोडत नाही तोपर्यंत जिल्ह्याचा पर्यटन विकास कधीच होणार नाही. आमचे समुद्र किनारे गोव्यापेक्षा स्वच्छ आणि सुंदर आहेत अशी शेखी आम्ही मिरवतो पण त्या समुद्र किनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांना आपण कोणत्या सोयी – सुविधा निर्माण केल्या हा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. काही ठिकाणी तर चहा -कॉफी सोडाच साधी पाण्याची बाटलीही मिळत नाही ही शोकांतिका आहे. आज गोव्यात दरवर्षी सुमारे ३० ते ४० लाख पर्यटक येतात.त्यापैकी सुमारे ८-१० लाख विदेशी पर्यटक असतात. युरोप,रशिया इथून पर्यटन हंगामात अनेक चार्टर्ड विमानं येतात. केरळ राज्य, दक्षिणेकडची अन्य राज्ये आज पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करू लागली आहेत. गोव्याच्या बरोबरीनं केरळनंही पर्यटन क्षेत्रात आघाडी घेतली आहे. आज गोव्यात खाण उद्योग,अन्य उद्योग,फार्मा कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत.मात्र गोव्याचं अर्थकारण हे पर्यटनावर अवलंबून आहे. एक पर्यटक जेव्हा येतो तेव्हा ११ते १२ जणांना प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोव्यातल्या लोकांनी ‘पर्यटन हीच आपली रोजी-रोटी’ समजून ते केव्हाच स्वीकारलं आहे व पर्यटन विकासाचा ध्यास घेतला आहे. दरवर्षी हॉटेल्स वाढताहेत, दळण- वळणाची साधनं वाढताहेत.आज गोव्याचं दरडोई उत्पन्न सव्वा चार लाख आहे. त्याखालोखाल सिक्कीम आणि नवी दिल्लीचा नंबर लागतो जो सिंधुदुर्गच्या कितीतरी पटीनं अधिक आहे याचा सर्वांनीच गांभीर्यानं विचार केला पाहिजे.…

विश्व पॉवरलिफ्टिंग स्पर्धा

प्रेरणा, सेजल, रोशनची निवड मुंबई : येत्या २८ ऑगस्टपासून माल्टा येथे सुरु होणाऱ्या विश्व पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी प्रेरणा साळवी, सेजल मकवाना, रोशन गावकर या तीन महाराष्ट्राच्या खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. रोशन १०५, प्रेरणा ७६ व सेजल ६३ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करतील. पतियाळा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रोशन ने रौप्य पदक पटकावले होते. कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रेरणा ला कांस्य पदक मिळाले. याच स्पर्धेत सेजलने ११२.५ किलो वजन उचलून बेंचप्रेसमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम साजरा केला. रोशन १४ वीत तर प्रेरणा १५ वीत शिकत आहेत. सेजल बीपीएड करत आहे. रोशन, प्रेरणा हे दोघे चेंदणी कोळीवाडा, ठाणे (पूर्व) येथील “युनायटेड क्लब”चे खेळाडू आहेत. रोशन, प्रेरणाचे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अनंत चाळके प्रशिक्षक आहेत. सेजल जोगेश्वरी (पूर्व) येथील “टू पॉवर जिम” मध्ये सराव करते. संकेत चव्हाण यांचे मार्गदर्शन सेजलला मिळत आहे. संजय सरदेसाई, सतीश पाताडे, सुरेश गद्रे यांनी विश्व स्पर्धेसाठी प्रेरणा, सेजल आणि रोशन या तिघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

स्नेहांकित हेल्पलाईनची अंध शिक्षण परिषद मुंबईत

रमेश औताडे मुंबई :विशेष अंध शाळांकरिता व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी स्नेहांकित हेल्पलाईन या सामाजिक संस्थेमार्फत मार्फत नवीन शिक्षण पद्धती या विषयावर परिषद आयोजित केली आहे.अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेच्या अध्यक्षा परिमला भट यांनी दिली. सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत शिक्षकांकरिता नवीन शिक्षण पद्धती कशी लागू करता येईल याबाबत चर्चासत्र व सूचना या परिषदेच्या माध्यमातुन शासनास सादर करण्यात येणार आहेत. नेहांकित हेल्पलाईन ही संस्था मागील २३ वर्षांपासून अंध युवकांना शैक्षणिक क्षेत्रात विविध स्तरावर मार्गदर्शन करत आहे. विलेपार्ले पूर्व मुंबई येथे महाराष्ट्रातील विविध अंध शाळांकरिता व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत शिक्षकांकरिता परिषद २५ ऑगस्ट रोजी उत्कर्ष मंडळ हॉल, विलेपार्ले पूर्व, मुंबई येथे होत आहे. माधव गोरे व योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शैक्षणिक धोरण, त्याची ओळख व ते अंधांकरिता कसे राबविता येईल याबाबत एक सत्र आहे. विविध क्षेत्रातील जाणकार व अनुभवी आपले अभ्यासपूर्वक विश्लेषण करणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरण हे सर्वसमावेशी असून यात प्रत्येक टप्प्यावर विविध शाळांमध्ये कशा पद्धतीने कामकाज करावे याबाबत माहिती मिळणार आहे . नवीन धोरण अंधशाळांकरिता देखील शासनाने लागू करावे. तसेच स्नेहांकित हेल्पलाईन या संस्थेमार्फत अभ्यासपूर्वक  सर्व शाळांच्या सहमतीने प्रस्ताव या परिषदेत सादर करण्यात येणार आहे.असे डॉ माधव गोरे यांनी सांगितले.

वीज कंत्राटी कामगारांचा ‘इशारा मोर्चा’

रमेश औताडे मुंबई : भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने वेतनवाढ व हरियाना सरकार प्रमाणे वीज उद्योगात कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार मिळावा या व अन्य प्रमुख मागण्यासाठी राज्यभरातून सुमारे चार हजार वीज कंत्राटी कामगारांनी मोर्चा काढला. सरकारने जर आता गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आझाद मैदानात बेमुदत आंदोलन करू असा इशारा संघटनेचे अध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी दिला. ऊर्जामंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील मित्रा यांना निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदनात दिलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा. सरकारने संघटने सोबत सकारात्मक चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढावा व जो पर्यंत ऊर्जामंत्री भेटून ठोस तोडगा काढत नाही तो पर्यंत कामगार आंदोलनातून घरी जाणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला. कंत्राटी कामगार व कायम कामगार यांच्या कामात काही फरक नाही. मात्र वेतनात फरक का ? कंत्राटी कामगार कायम करा म्हणून न्यायालय वारंवार आदेश देत असते तरीही सरकार अंमलबजावणी करत नाही त्यामुळे यापुढचे आंदोलन बेमुदत असेल असे सचिन मेंगाळे यांनी सांगितले.

भायखळा येथील कारागृहात संत रामपाल जी महाराज यांचा सत्संग

मुंबई-  मुंबईतील भायखळा जिल्हा पुरुष कारागृह आणि महिला कारागृहात 24 ऑगस्टला संत रामपाल जी महाराज यांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले. हा सत्संग प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवण्यात आला होता, दोन्ही कारागृहातील बंदींसाठी…

स्वीडनमध्ये रंगली मंगळागौर!

स्वीडनमध्ये मोठ्या थाटात रंगला मंगळागौरीचा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम आयोजित केला गोथनबर्ग महाराष्ट्र मंडळ यांनी.  गेल्या वर्षीपासून या कार्यक्रमाची  सुरुवात झाली. याला भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे  यावर्षीही हा कार्यक्रम आयोजित  केला आणि यापुढेही नक्कीच करत राहतील, असं मंडळाच्या अध्यक्षा प्रणाली मानकर पतके म्हणाल्या.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आता जरांगें आंदोलन करणार

जालना : ”शेतकरी देखील आमचाच आहे. सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी लक्ष द्यायला तयार नाही. आता आम्ही या प्रश्नात लक्ष घालणार, सरकार कसं कर्जमाफी देणार नाही हे आम्ही बघतो,” असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त…

“आज महाराज असते, तर नराधमांचे चौरंग केला असता” राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

 बदलापूर येथे मुलीवर अत्याचार झाला. ही घटना मनसेच्या महिला सेनेने उघडकीस आणली. तेव्हा लोकांना समजले. तोपर्यंत ती गोष्ट दाबून ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराज आज हवे होते. ही महाशक्ती आता हवी होती. या नराधमांचे हातपाय कापून त्यांचे…

राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार ?

बुलढाणा : राज्यभरातील एस. टी. कर्मचारी पुन्हा एकदा संपावर  जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यातील एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीची आज बुलढाणा येथे बैठक झाली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यानुसार वेतन देण्यात यावं, या मागणीसाठी येत्या…