Author: bittambatami.com

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीवर टांगती तलवार?

काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांपासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर राज्यातील तणावाची परिस्थिती पहाता विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचे कंबरडे मोडणारे माजी डीजीपी कुलदीप खुदा यांनीही…

अजित पवारांमुळे भाजपाला फायदा !

प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा अजब तर्क मुंबई : भाजापाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून अजित पवारांना महायुतीत घेतल्यामुळेच पराभव झाल्याची तर्कसंगत मांडणी करण्यात आली होती. पण भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी आज अजब तर्क देत ऑर्गनायझरलाच खोटे ठरवले.…

जरांगेचे उपोषण स्थगित

“आता यानंतर उपोषण नाही, आरक्षण न दिल्यास विधानसभा निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार”- मनोज जरांगे जालना : मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटीत उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज सरकारच्या विनंतीवरून उपोषण एक…

पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी – डॉ. भरत बास्टेवाड*

अशोक गायकवाड अलिबाग :जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून, पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छतेसह आपल्या परिसरातही स्वच्छता राहिल याची काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे,…

‘मी एक मास्तर’ पुस्तक प्रकाशन सोहळा

मुंबई : रविवार, दिनांक ९ जून रोजी लोणावळ्यातील गुरुकुल विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवर्य दीपक चैतन्य गंगोळी लिखित “मी एक मास्तर” ह्या शिक्षण क्षेत्राशी निगडित अशा पुस्तकाचे प्रकाशन पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या…

 ठाण्यात हरित कचऱ्याची डोकेदुखी

 रस्त्यावर जागोजागी छाटलेले वृक्ष पडून ठाणे : शहरात गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे अनेक वृक्षांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. तर काही ठिकाणी ठाणे महापालिकेने वृक्षांची छाटणी केली. परंतु छाटणी केलेल्या…

 रानभाज्या बाजारात दाखल

 जांभूळ, करवंदांसह, रानभाज्यामुळे आदिवासी महिलांना मिळतोय रोजगार बदलापूरः बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या परिसरातील बाजारपेठांमध्ये रानभाज्या आणि रानमेवा दाखल झाला आहे. बदलापूर शहराची बाजारपेठ, शहराच्या वेशीवरील एरंजाड, सोनिवली परिसरासह कल्याण अहमनदगर राष्ट्रीय महामार्गावर आदिवासी महिलांकडून रानभाज्यांची विक्री केली जात आहे. कोणत्याही मशागतीशिवाय उगवणाऱ्या या रानभाज्या पौष्टीक आणि आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी असतात. त्यामुळे जून महिन्यात या रानभाज्यांना पसंती मिळते. त्यामुळे आदिवासी कुटुंबाना आणि विशेषतः महिलांना हक्काचा रोजगार मिळतो आहे. ग्रामीण भागात दैनंदिन आहारात रानभाज्यांचे मोठे महत्व आहे. आदिवासी बांधव आपल्या जुन्या जाणत्या बांधवांनी दिलेल्या माहितीच्या जोरावर रानातून या भाजा निवडून आणतात. गेल्या काही वर्षात शहरी भागातही या रानभाज्यांना महत्व प्राप्त होताना दिसते आहे. मे महिन्यात पडणाऱ्या अवकाळी पावसानंतर या रानभाज्या रानात बहरू लागतात. आदिवासी बांधव त्या निवडून बाजारात विक्रीसाठी आणतात. कोणत्या लागवड आणि मशागतीशिवाय या रानभाज्या वाढतात. त्यामुळे त्यांच्यात अनेक औषधी गुण असतात. जुनच्या पहिल्या आठवड्यापासून बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या भागात या रानभाज्यांची आवक वाढल्याचे दिसून आले आहे. बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेर आदिवासी महिला या रानभाज्या घेऊन बसलेल्या दिसतात. त्यासोबतच महत्वाचे चौक, बदलापुरच्या वेशीवर एरंजाड, सोनिवली, कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग, बदलापूर बारवीमार्गे मुरबाड रस्त्यावर आणि मुरबाडमध्येही या रानभाज्यांची विक्री करताना आदिवासी महिला दिसत आहेत. शेवळी, टाकळा, कुळू, कुड्याची फुले, चायवळ, तेलपट, मोहदुडी आणि लोतं या भाजा सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. १० रूपये जुडीपासून ४० रूपयांपर्यंत या भाज्यांची विक्री केली जाते आहे. ग्राहकही या भाजांना पसंती देत आहेत. संवादामुळे नवग्राहक दूरच आदिवासी महिला रानभाज्या विक्री करताना त्याची पुरेशी माहिती देऊ शकत नसल्याने नवग्राहक या भाज्यांकडे वळताना दिसत नाही. या रानभाज्या विक्रीच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्याची माहिती जुन्या पिढीकडे अधिक आहे. त्याचीही योग्य माहिती दिल्यास नवी पिढीही या भाज्यांकडे वळेल. जांभुळासाठीही ग्राहकांची गर्दी सध्या बदलापुरच्या जांभळानेही बाजारात गर्दी केली आहे. १६० ते २०० रूपये प्रति किलो दराने आदिवासी बांधव या जांभळांची विक्री करत आहेत. बदलापुरच्या जांभळांना भौगोलिक मानांकन नुकतेच प्राप्त झाले आहे. बारवी पर्यटनासाठी येणारे पर्यटक आवडीने या जांभळांना पसंती देत आहेत. सोबत करवंदांनाही पसंती मिळते आहे.

 पावसाच्या पाण्याच्या साठवणीसाठी प्रकल्प;

२.२ लाख घन मीटरपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा होणार पुनर्भरणा रायगड जिल्ह्यातील उपक्रम पनवेल (प्रतिनिधी)  टाटा स्टीलने जागतिक पर्यावरण दिनी रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये पावसाच्या पाण्याच्या साठवणीच्या नवीन प्रकल्पाचा शुभारंभ केला आणि प्रकल्पाच्या ठिकाणी १५०० पेक्षा जास्त झाडे लावून सस्टेनेबिलिटी महिन्याची सुरुवात साजरी केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगडचे क्षेत्रीय अधिकारी जयंत हजारे आणि क्षेत्र अधिकारी मीना पवार, खोपोली व होसूरचे कार्यकारी प्लान्ट प्रमुख कपिल मोदी आणि सावरोली गावाचे सरपंच संतोष गणेश बैलमारे हे यावेळी उपस्थित होते. पावसाच्या पाण्याची साठवण करणाऱ्या या नवीन प्रकल्पामुळे प्लान्टची ताज्या पाण्याची आवश्यकता ५० हजार घन मीटरने कमी होईल. या प्रकल्पामध्ये ९ पुनर्भरण खड्ड्यांद्वारे २.२ लाख घन मीटरपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा जलचरामध्ये पुनर्भरणा केला जाण्याची अपेक्षा आहे.सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले खोपोली हे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक औद्योगिक शहर आहे. इथे दरवर्षी १८५०-३९१४ मिलीमीटर पाऊस होतो, त्यामुळे महाराष्ट्रातील सुपीक पाणलोट क्षेत्रांमध्ये खोपोलीचा समावेश होतो. टाटा स्टीलमध्ये जून हा सस्टेनेबिलिटी महिना म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धा, जागरूकता सत्रे, वृक्षारोपण मोहीम इत्यादींचा समावेश असणार आहे. 0000

 महायुतीच्या कार्यकर्त्याच्या साथीने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईन

कपिल मोरेश्वर पाटील यांचा विश्वास, भिवंडीत हजारो कार्यकर्त्यांची सभा भिवंडी : आगामी काळातील विधानसभा व महापालिका निवडणुकीसाठी भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांना पूर्वीपेक्षा दहा पट अधिक ताकद देऊन पक्ष मजबूत केला जाईल. आपण फिनिक्स पक्षाप्रमाणे असून, कार्यकर्त्यांच्या साथीने राखेतून पुन्हा भरारी घेऊ, असा विश्वास माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे व्यक्त केला. त्याचबरोबर भिवंडी शहरातील दोन्ही विधानसभा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या हॅट्रिकनिमित्ताने आनंदोत्सव आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करण्यासाठी जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती. भिवंडी तालुक्यातील दिवेअंजुर येथून यात्रेला सुरूवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भिवंडी येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर कपिल पाटील यांनी उपस्थित हजारो कार्यकर्ते व नागरिकांबरोबर संवाद साधला. या वेळी भाजपाचे भिवंडी पूर्व विधानसभा प्रमुख संतोष शेट्टी, भाजपाचे शहराध्यक्ष हर्षल पाटील, माजी नगरसेवक सुमित पाटील, जितेंद्र डाकी यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी  भिवंडीतील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून मोदी… मोदी… गजर केल्याने वातावरण दुमदुमून गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुढील पाच वर्षांत होणार्‍या कार्यातून गौरवशाली इतिहास घडविला जाईल. भाजपासह महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मोदीजींचा विकास हा घराघरांपर्यंत पोचवावा, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले. तसेच भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या अनपेक्षित पराभवाने आलेली मरगळ दूर करून विधानसभा व महापालिका निवडणुकीत विजयासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. भिवंडीत `तो’ पॅटर्न चालल्यानंतरही सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले असते, तर आपली हार झाली नसती. देशात अनेक ठिकाणी चाललेल्या पॅटर्नप्रमाणे भिवंडी मतदारसंघात `घरभेदी’ हा पॅटर्नही चालला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांचा हा पराभव झाला असून, त्यात योगदान देणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असा इशाराही श्री. पाटील यांनी दिला. पक्षाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेल्या लोकांना खड्यासारखे बाजूला करून भाजपाला मजबूत करण्याचे कार्य केले जाईल, अशी ग्वाही श्री. पाटील यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून भिवंडीच्या विकासासाठी व नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता झटत राहील. आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी दिली. चौकट तेच प्रेम…तोच विश्वास… अन् उसळलेली उत्स्फूर्त गर्दी! भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपासह महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या अनपेक्षित पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हॅट्रीकनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यात आला. त्यावेळी भिवंडीतील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे गर्दी केली होती. कपिल पाटील यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करीत होते. तर अनेकांनी कपिल पाटील यांना हस्तांदोलन करीत पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली.

 प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या बसगाड्या परत घ्या

अशोक लेलँड च्या कार्यालयात चालक, मालकांचा ठिय्या ठाणे :  मोठ्या प्रमाणात प्रवाशी वाहतूक करणाऱ्या अशोक लेलँडच्या बसगाड्या धोकादायक असून या गाड्या अचानक बंद पडत आहेत. शिवाय, भरधाव वेगात असताना अनेक भाग नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून याबाबत  करूनही संबधीतांकडून कार्यवाही केली जात नसल्याने मुंबई बस मालक संघटनेने आज कंपनीच्या माजिवडा येथील कार्यालयावर धडक दिली. वारंवार नादुरुस्त होणाऱ्या सुमारे ६१ नवीन बस गाड्या कंपनीने पुन्हा ताब्यात घ्याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. बस चालत असताना फ्रंट व्हील हब क्रॅक होणे, व्हील डिस्क तुटणे,  क्लच / प्रेशर प्लेट / रिलीझ बेरिंग,  क्लच सिलेंडर / डिझेल पाईप तुटणे,  सायलेन्सर पाईप फुटणे ,  पुरवठा करणे करणारे पाईप फुटणे,  गियर बॉक्स –  ब्रेक लायनर समस्या  अशा अनेक  अडचणी नव्या कोऱ्या बसगाड्यांमध्ये आहेत. अशोक लेलँडने विकलेल्या बस या सदोष असल्याने प्रवाशी आणि वाहन चालक, सहाय्य्क यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या बसगाड्या  बिघाड होऊन बंद  पडत आहेत.  या बसगाड्यांमधील  अनेक भाग अचानक नादुरुस्त होत असल्याने बसला अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. खासगी वाहतूक करणाऱ्या या बस गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यामध्ये लहान मुले, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असतो. मात्र, अचानक गाड्या बंद पडत असल्याने प्रवाशांना  रस्त्यावर तासनतास अडकून पडावे लागत आहे.  वारंवार बिघाडामुळे बस मालकांचेही आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय, प्रवाशांकडून चालकांना  घडत आहेत. याबाबत अनेकवेळा बस मालकांनी संबंधितांना कळवूनदेखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. अशोक लेलँड ही कंपनी मोठ्या अपघाताची वाट पहात आहे का, असा सवाल करीत मुंबई बस मालक संघटनेने माजिवडा येथे हे आंदोलन केले.यावेळी,  धावत्या बसमधील हब तुटल्यामुळे बसचे होणारे नुकसान कोण सहन करणार?  व्यवसायातील तोटा कोण सहन करणार ?  प्रवासादरम्यान आणि भविष्यातील प्रवासात वाहन निकामी झाल्यास प्रवाशांना परतावा, कर, विमा, बँक दायित्व, ब्रेकडाउनमुळे भविष्यातील बुकिंगवर परिणाम यावर उपाययोजना कोण करणार ? ब्रेकडाऊन दरम्यान पोलिस आणि टोइंग चार्जेसचे नुकसान कोण  करणार  ?  वॉरंटीमध्ये ब्रेकडाउन दरम्यान आम्ही किमीचा विचार करणार आहोत का?  कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यांच्या निवासाचा खर्च कोण करणार?प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्यास कोण जबाबदार आहे?  असे प्रश्न मुंबई बस मालक संघटनेने उपस्थित केले असून या ६१ नवीन बस गाड्या कंपनीने पुन्हा ताब्यात घ्याव्यात,  अशी मागणी यावेळी करण्यात आली.