Category: होम

ठाण्यात इव्हीएमच्या स्ट्राँगरुमला तिहेरी सुरक्षा कवच

केंद्रीय सुरक्षा दलासह राज्य राखीव पोलिसांचाही खडा पहारा ठाणे: ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघाच्या लोकसभा निवडणुकीसाठी शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीतील…

नाईट लाईफमुळे तरुणाई उद्‌ध्वस्‍त!

नवी मुंबई ः रात्रभर सुरू असलेल्या पब, बार आणि रेस्‍टॉरंटमुळे नवी मुंबईतील तरुणाई धोक्यात आली आहे. सीमाशुल्क उत्पादन विभागाने मध्यरात्री दीड वाजेपर्यंत बार खुले ठेवण्याची परवानगी दिली आहे. याचा गैरफायदा…

पालघरचा मुकुट कोणाकडे?

वसई : पालघर लोकसभा मतदारसंघाचे मतदान सोमवारी (ता. २०) उत्साहात पार पडले. जिल्ह्यात उष्णतेचा पारा अधिक असला, तरी शांततेत मतदान पार पडले. ग्रामीण भागातदेखील नागरिक मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर…

कापूरबावडी उड्डाणपूलावर वाहन उलटले

कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन ठाणे : घोडबंदर येथील कापूरबावडी उड्डाणपूलावर बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ठाण्याहून मुंबईच्या दिशने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर सिमेंट मिक्सर वाहन उलटले. या…

१२ वर्षाखालील मुलांची ड्रीम ११ कप क्रिकेट स्पर्धा :

गणेश पालकर क्रिकेट क्लबला विजेतेपद मुंबई :  दिलीप वेंगसरकर फाउंडेशनच्या वतीने ओव्हल मैदान, चर्चगेट येथे आयोजित करण्यात आलेल्या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत गणेश पालकर क्रिकेट क्लब संघाने विजेतेपद पटकावले.…

अनधिकृत होर्डींगविरोधी कारवाईत 34 मोठ्या होर्डींगवर निष्कासनाची धडक कारवाई   

नवी मुंबई : 13 मे रोजी सायं. 4 नंतर सुरू झालेले वादळी वारे आणि अकाली पर्जन्यवृष्टी कालावधीत मुंबईत घाटकोपर येथे होर्डींग पडून घडलेल्या दुर्घटनेनंतर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी…

येणाऱ्या राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीने ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दंत विभागाच्या डॉक्टर्स,आरोग्य कर्मचारी आणि नागरिक यांनी तोंडाच्या कॅन्सर बद्दल जनजागृती करून तंबाखू सेवन करणार नाही…

निवृत्तीवेतनधारकधारकांनी दूरध्वनीद्वारे व्यवहार करण्यापूर्वी कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा -सुरेंद्र राऊत

ठाणे : निवृत्तीवेतन कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांनी कोणत्याही प्रकारच्या दूरध्वनीद्वारे व्यवहार करण्यापूर्वी कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी व अपर कोषागार अधिकारी (निवृत्ती वेतन) सुरेंद्र राऊत यांनी केले आहे.…

बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

अशोक गायकवाड मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांनी दिलेली मैत्री, करुणा, मुदीता आणि उपेक्षा (समता) हि शिकवण व्यक्तींना, समाजाला तसेच राष्ट्रांना नेहमीच…

नाल्यातून गाळ काढण्याला येणार वेग

मुंबई : नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करावीत. रेल्‍वे, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांसह विविध विभागांशी योग्‍य समन्‍वय साधून ५ जूनपर्यंत नाल्‍यातील गाळ काढण्‍याची कामे पूर्ण करा, आवश्यक तेथे अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा, असे स्‍पष्‍ट निर्देश पालिका आयुक्‍त भूषण गगराणी यांनी दिले. तसेच उपायुक्‍त, सहायक आयुक्‍तांनी आपल्या विभागात दररोज सकाळ, सायंकाळी विभागात नाल्यातील गाळ काढण्याची पाहणी करावी. पाणी साचण्‍याच्‍या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून पाण्‍याचा जलद गतीने निचरा होण्‍याकामी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आखाव्‍यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. यंदाच्‍या पावसाळ्याच्‍या पार्श्‍वभूमीवर नाल्‍यांतून गाळ काढण्‍याच्‍या कामांची आढावा बैठक पालिका आयुक्‍त गगराणी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली महापालिका मुख्‍यालयात झाली. अतिरिक्‍त पालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, डॉ. अमित सैनी, अभिजीत बांगर, डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्‍त चंद्रशेखर चोरे आदी अधिकारी बैठकीस उपस्थित होते. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये नाल्‍यातून गाळ उपशाची कामे जलद गतीने करण्यात येत आहेत. नाल्यांमधून उद्दिष्टाएवढे किंवा त्याहूनही अधिक गाळ काढण्याचे काम ५ जून अखेरपर्यंत पूर्ण करावे. या मुदतीत ही कामे पूर्ण होतील, त्या दृष्टीने नियोजन करून संपूर्ण यंत्रणेने कार्यवाहीला वेग द्यावा, अशा सूचना आयुक्त गगराणी यांनी दिल्या. नाल्यातील गाळ काढण्याची कामे योग्यरीत्या सुरू आहेत, हे पाहण्यासाठी पालिकेच्‍या उपायुक्‍त, सहायक आयुक्‍तांनी नाल्यांच्या ठिकाणी भेट द्यावी, असे स्‍पष्‍ट करतानाच आयुक्‍त म्‍हणाले की, नाल्‍यालगतच्‍या रहिवाशांकडून नाल्‍यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्‍याच्‍या तक्रारी असल्‍या तरीदेखील तरंगत्‍या कचऱ्याची योग्‍य प्रकारे विल्‍हेवाट लावावी. नाले तुंबता कामा नयेत, याची दक्षता घ्यावी, रुंद नाल्‍याच्‍या ठिकाणी ‘ट्रॅश बूम’चा वापर करावा. स्‍थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींशी संवाद साधून त्‍यांचा सहयोग घ्‍यावा, असेही गगराणी यांनी नमूद केले. रेल्वे हद्दीतील नाले साफ करा रेल्वे प्रशासनासमवेत समन्‍वय साधून रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळ्या नाल्यांमधून गाळ काढण्यासह कल्व्हर्ट स्वच्छता कामांची पाहणी करावी. विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावावेत, मुंबई शहरात पाणी साचू नये, त्‍याचा जलद गतीने निचरा व्‍हावा, यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आखाव्‍यात, असे निर्देश आयुक्‍त गगराणी यांनी दिले आहेत.