Category: होम

 महाविकास आघाडीच्या उमेदवार दरेकर यांच्या सारथी बनल्या सुलभा गायकवाड

डोंबिवली – शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात ते उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासोबत उपस्थित झाले असता गावात त्यांचे जंगी स्वागत झाले. यावेळी राऊत व दरेकर यांच्या गाडीच्या फ्रंट सीटवर बसलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. ठाकरे गटाच्या उमेदवार दरेकर यांच्या प्रचारासाठी गायकवाड यांनी कंबर कसली आहे का ? त्या त्यांच्या सारथी झाल्या आहेत का? अशी एकच चर्चा आता रंगू लागली आहे. अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात एका कार्यक्रमानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत मंगळवारी आले होते. तत्पूर्वी नेवाळी नाका येथे उमेदवार वैशाली दरेकर, शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, कल्याण शहर प्रमुख शरद पाटील, हर्षवर्धन पाटील यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी यांच्या वतीने राऊत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर कल्याण ग्रामीण मधील गोरपे गावात देखील जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आहे. यावेळी राऊत यांच्या गाडीच्या फ्रंट सीटवर बसलेल्या महायुतीतील कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या उपस्थित होत्या. त्यांनी साऱ्यांचेच लक्ष वेधले. याआधी देखील कल्याण मधील नववर्ष स्वागत यात्रेत वैशाली दरेकर यांची भेट घेत सुलभा यांनी त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता चक्क दरेकर यांच्या प्रचारातच सुलभा गायकवाड त्यांच्या सोबत दिसल्याने गायकवाड यांनी दरेकर यांच्या सारथी झाल्याचे पहायला मिळाले. यामुळे महायुती उमेदवाराच्या विरोधात असलेल्या उबाठा च्या वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी गायकवाड यांनी कंबर कसली आहे का? अशी ही चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान नेवाळी नाका येथे नेते संजय राऊत यांना प्रसार माध्यमांनी संवाद साधला… राऊत यांनी दोनच दिवसापूर्वी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. उपचाराचा खर्च आम्ही देणार असा खासदार शिंदे यांनी पलटवार केला होता. त्यांच्या या टिकेला राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

पनवेल : पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघातील आपटा ग्रामपंचायतीच्या उद्धव ठाकरे गटाच्या सरपंच नाजनिन खलील पटेल यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. सरपंच नाजनिन पटेल यांच्या विरोधात १० मते, तर बाजूने केवळ तीन मते पडली. गेली अनेक वर्षे आपटा ग्रामपंचायतीवर शेकाप व अलिकडे काही वर्षे ठाकरे गट पर्यायाने महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे, पण आता ही ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाच्या बाजूने झाली आहे. सरपंचाविरोधातील अविश्वास ठरावावर घेण्यात आलेल्या मतदानावेळी अप्पर तहसीलदार इंगळे, मंडल अधिकारी कारेगावकर, ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर तसेच रसायनी पोलीस अधिकारी, पोलीस पाटील उपस्थित होते. त्याचप्रमाणे भाजप नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, भाजप केळवणे विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, राजू पाटील, विद्याधर जोशी, प्रवीण काळबागे, दत्ता पाटील, अॅड. निलेश हातमोडे, अॅड. आकाश, ज्ञानेश्वर भोईर, दर्शन भोईर, लक्ष्मण बावधने, राजा देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. नाजनिन खलील पटेल यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी होती, याची दबक्या आवाजात पण मोठी चर्चा होती.  त्यामुळे अविश्वास ठराव मांडण्यात आला आणि त्यामध्ये नाजनिन पटेल विश्वास प्राप्त करू शकल्या नाहीत आणि अखेर त्यांच्यावर सरपंच पदावरून पाय उतार होण्याची नामुष्की आली.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात एक खिडकी योजना कार्यान्वित

निवडणूक प्रचारासंदर्भातील परवान्यांसाठी ठाणे  – लोकसभा निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवाने घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहा विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित…

कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

ठाणे  : राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. तसेच निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त…

जनसेवा रुग्णवाहिचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण

राजीव चंदने मुरबाड : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यंच्या 133 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस अण्णा साळवे यांनी गोर गरीब जनतेच्या सेवेसाठी  रुग्णवाहीका देऊन, त्या जनसेवा रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आला.यावेळी आमदार किसन कथोरे यांनी अण्णा साळवे यांचे विशेष कौतुक करत पाठीवर शाबासकीची थाप मारली. यावेळी आमदार कथोरे म्हणाले कि,मी अण्णाच्या मागे नाही तर अण्णा कायम सोबत आणि बरोबर आहे. या रुग्ण वाहिकेचा सर्व सामान्य गोर गरीब जनतेसाठी उपयोग झाला पहिजे असे बोलून अण्णा साळवे यांना आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या लोकार्पण सोहळ्यासाठी नगराध्यक्ष मुकेश विशे, सरचिटणीस नितीन मोहपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर, नगरपंचायत मुख्याधिकारी मनोज म्हसे, मोहन सासे,कांतीलाल कंटे,रवींद्र चंदने,रिपई प्रदेश उपाध्यक्ष महबूब पैठणकर, मुरबाड पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर,दीपक पवार, ऍड सचिन चौधरी, गुरुनाथ पवार, सुवर्णा देसले,दीपक खाटेघरे,कैलास देसले,शिवराम पवार, प्रकाश जाधव,नरेश देसले,नरेश मोरे, धनंजय थोरात, रवींद्र गायकवाड,यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.या शुभ प्रसंगी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना समता सामाजिक फाऊंडेशनचे शंकर करडे, संजय बोरगे, लक्ष्मण पवार, दिलीप पवार, सुभाष जाधव यांच्या वतीने पेढे व पेन चे वाटप करण्यात आले.

इंग्लंड-आशिया इनडोअर क्रिकेट स्पर्धा

भारतीय पुरुष संघाला पराभवाचा धक्का कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेत रंगत भरली जात असून काल भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला व भारत (२०.५ गुण) गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर फेकला गेला तर श्रीलंका (३५.५ गुण) व इंग्लंड (२१ गुण) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. या स्पर्धेत भारताला अजून एक सामना सिंगापूर विरुध्द खेळायचा असल्याने भारत अंतिम सामन्यात खेळताना दिसेल. इतर सर्व संघाचे साखळी सामने झाले असल्याने व त्यांना गुण वाढवण्याची कोणतीही संधी नाही. गुणतालीकेतील पहिले दोन संघ अंतिम सामना खेळातील. काल झालेल्या इंग्लंड विरुध्दच्या सामन्यात भारताचे खेळाडू प्रचंड दबावाखाली खेळताना दिसले. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात ७५ धावा केल्या तर प्रती उत्तरादाखल…

मेट्रो १ ची दिवाळखोरी अखेर टळली

एमएमआरडीए फेडणार कर्जाची रक्कम मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेचे संचालन करणाऱ्या मुंबईमे ट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) कंपनी दिवाळखोरीत निघण्यापासून बचावली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या मार्गिकेचे कर्ज फेडणार असल्याची हमी दिल्याने आता या मेट्रो मार्गिकेच्या थकित कर्जप्रकरणी बँकांनी सुरू केलेल्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेची याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने निकाली काढली आहे. त्यामुळे आता मेट्रो १ मार्गिका खरेदीचा एमएमआरडीएचा मार्ग माेकळा झाला आहे. मेट्रो १ मार्गिकेची खासगी-सार्वजनिक भागीदारी पद्धतीने बांधा-वापरा स्वामित्व घ्या आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर उभारली होती. या मेट्रो मार्गिकेवरून जून २०१४ मध्ये प्रवाशांची वाहतूक सुरू झाली. मेट्रो १ प्रकल्पाच्या उभारणीसाठी २ हजार ३५६ कोटी रुपयांचा खर्च आला असून, त्यात रिलायन्स इन्फ्राची ७४ टक्के, तर एमएमआरडीएची २६ टक्के भागीदारी आहे. ही मेट्रो मार्गिका खरेदी करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मंजुरी दिली; मात्र एमएमआरडीएने स्वतःच्या निधीतून ही मेट्रो मार्गिका खरेदी करावी, अशी अट राज्य सरकारने घातली आहे. त्यानुसार एमएमआरडीएकडून मेट्रो १ मार्गिका खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. बँकांनी या एकरकमी कर्ज फेडीच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिल्यानंतर एमएमओपीएलवरील दिवाळखोरीची प्रक्रिया टळली आहे. दरम्यान, याबाबत एमएमआरडीएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. सहा बँकांचे १,७११ कोटी कर्ज १) एमएमओपीएलकडून संचालन केल्या जाणाऱ्या मेट्रो १ मार्गिकेवर सहा बँकांचे सुमारे १,७११ कोटी रुपयांचे कर्ज आहे. याबाबत एमएमओपीएल आणि बँका यांच्यामध्ये १५ मार्चला बैठक पार पडली होती. २) बैठकीत कर्जाची एकरकमी परतफेड करण्यावर तत्त्वतः सहमती झाली होती. त्यानंतर बँकांनी या एकरकमी कर्जफेडीला तत्त्वत: संमती असल्याचे १८ मार्चला पार पडलेल्या अन्य एका बैठकीत कळविले होते. ३) बैठकीतील निर्णयानुसार एमएमआरडीएने १० टक्के कर्जाची म्हणजेच सुमारे १७५ कोटी रुपयांची परतफेड बँकांना केली होती. यात सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकांचा समावेश आहे.

ठाणे स्थानकात भारतीय रेल्वेचा १७१ वा वाढदिवस साजरा

डोंबिवली : भारतीय रेल्वेचा १७१वा वाढदिवस मंगळवारी ठाणे रेल्वे स्थानकात साजरा करण्यात आला. ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेने त्याचे आयोजन केले होते, ठाणे ते कर्जत रेल्वे स्थानक पर्यन्त शटल सेवा सोडण्यापर्यन्त शांत बसणार नाही असा निर्धार संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी।केला. त्याबाबत त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया।दिली. सातत्याने नागरिकांनी मागणी करूनही रेल्वे प्रशासनावर त्याचा परिणाम होत नसल्याचे सांगण्यात आले. ठाणे स्थानकातील ऐतिहासिक रेल्वे इंजिन बसवण्यात आले आहे त्या ठिकाणी १७१ वर्षांचा इतिहास माहितीपर लावण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच या इंजिनाची ख्याती सर्वदूर जाऊन त्या स्मृती अजरामर} राहण्यासाठी सेल्फी पॉईंट असावा अशी सुविधा रेल्वेने द्यावी अशीही मागणी देशमुख यांनी केली. १७१ वर्षे झाली परंतु दिवसाला सुमारे सरासरी १२ अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात जातो हे योग्य नाही, त्यामुळे ते अपघात शून्य प्रमाणात आणावेत यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत सुधाकर पतंगराव यांनी व्यक्त केले. त्यावेळी स्थानक प्रबंधक केशव तायडे, समाजिक कार्यकर्ते शिवराम मिश्रा, किशोर बोन्द्रे आदींसह लोहमार्ग पोलीस, अरपीएफ जवान, प्रवासी आदी उपस्थित होते. भारतीय रेल्वेचा 171 वाढदिवस साजरा करीत असताना मुंबईतील उपनगरीय लोकल प्रवाशांचा प्रवास सुसह्य आणि किमान गर्दीचा व्हावा अशा अपेक्षा मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल प्रवाशांनी व्यक्त केल्या. यासाठी गेली 6 वर्षे रेल्वे बोर्डाकडे मंजुरी च्या प्रतिक्षेत असलेल्या बदलापूर व टिट वाळा लोकल 15 डबा चालविण्या च्या प्रकल्पाला  तात्काळ मंजुरी मिळावी व  सदर प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करावा अशी महत्वाची  मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. तसेच वेळा पत्रक बदलताना निदान कल्याण  किंवा ठाणे स्थानकातून कर्जत व कसारा मार्गावर लोकल फेर्या वाढवाव्यात  अशी माफक अपेक्षा व्यक्त केली. : मनोहर शेलार, संस्थापक अध्यक्ष, उपनगरी रेल्वे प्रवासी संस्था

मुंबईला एक्सडीआर टीबीचा वाढता धोका

मुंबई : मुंबईला एक्सडीआर टीबीचा वाढता धोका असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. मुंबईतील क्षय रुग्णांच्या नमुन्यांच्या केलेल्या संपूर्ण जीनोम सिक्वेसिंगमधून ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. यात ६०० पैकी ५१ टक्के नमुन्यांमध्ये एक्सडीआर टीबी असल्याचे निदान झाले असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. हॅस्टॅक अॅनॅलिटिक्सने पालिकेच्या सहकार्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार टीबीसाठी देणाऱ्या चारपेक्षा जास्त औषधांचा टीबी रुग्णांवर परिणाम होत नसून हा एक्सडीआर टीबी तरुणांमध्ये सर्वाधिक पसरत आहे. कोविड काळात पालिकेने मुंबईसह इतर परिसरातील प्रामुख्याने ६०० एमडीआर टीबी रुग्णांचे नमुने गोळा केले होते. पालिकेने टीबीवरील उपचार देऊनही या रुग्णांवर औषधांचा परिणाम झाला नाही. दोनपेक्षा जास्त औषधे या रुग्णांवर वापरली; पण त्यांना फरक न पडल्याने हे रुग्ण एमडीआर म्हणजेच (मल्टी ड्रग रेसिस्टन्स) असल्याचे समजले. त्यामुळे प्राथमिक स्तरावर या रुग्णांचे नमुने पालिकेने जीनोम सिक्वेसिंगसाठी पाठवले. या जिनोम सिक्वेसिंगच्या अहवालानुसार, ६०० पैकी ५१ टक्के रुग्णांमध्ये प्री-एक्सडीआर (एक्सटेंसिव ड्रग रेजिस्टेंट) संसर्ग झाला होता. ज्या रुग्णांवर चारपेक्षा जास्त औषधांचा फारसा परिणाम होत नाही, असे रुग्ण एक्सडीआर टीबी या श्रेणीत मोडतात. सामान्यपणे, टीबी रुग्णांवर वेगवेगळ्या १८ औषधांपासून तयार केलेल्या औषधांचा वापर केला जातो. एमडीआर रुग्णांना दोन औषधांपासून तयार केलेले औषध दिले जाते; पण अनेकदा रुग्णांवर टीबीची काही औषधे प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे डॉक्टर वेगवेगळे फॉर्म्युल्यातून रुग्णांच्या आजाराच्या तीव्रतेनुसार औषधे देतात. त्यानुसार ज्या रुग्णांना एमडीआर टीबी होता, त्या रुग्णांच्या नमुन्याचे जीनोम सिक्वेंसिग केले गेले. या जीनोम सिंक्वेसिंगमधून रुग्णावर कोणती औषधे प्रतिसाद देतात आणि कोणती नाही, हेदेखील समजते. सद्यस्थितीत पालिका सी-डीएसटी म्हणजेच कल्चर डीएसटी ही चाचणी टीबी रुग्णांसाठी वापरत आहे. या तपासणीच्या अहवालासाठी किमान नऊ आठवडे लागतात. या चाचणीतून १२ ते १३ औषधांचा प्रतिसाद कळतो. काय सांगतात तज्ज्ञ? मुंबईत तरुणांमध्ये प्री- एक्सडीआर टीबीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या रुग्णांवर चारपेक्षा जास्त औषधांपासून तयार केलेले औषधही प्रतिसाद देत नाही. यापेक्षा जास्त तीव्र संसर्ग असणाऱ्या रुग्णांवर आठ औषधांपासून तयार केलेले औषध काम करत नाही. या रुग्णांना बिडाक्युलिन, डेलामाईन ही औषधे द्यावी लागतात. जीनोम सिक्वेसिंग केलेल्या ६०० एमडीआर नमुन्यांपैकी अर्ध्याहून अधिक ५१ टक्के लोकांमध्ये एक्सडीआर टीबीचा संसर्ग आढळला. विशेष म्हणजे त्यांना आधीपासूनच एक्सडीआरचा संसर्ग असल्याचा निष्कर्ष काढला आहे. अभ्यासात तरुण वयोगटात संसर्ग आढळला आहे. – अनिर्वन चॅटर्जी, प्रमुख अभ्यासक एमडीआर आणि जे रुग्ण औषधांना प्रतिसाद करत नव्हते, त्या टीबी रुग्णांचे नमुने दोन वर्षांपूर्वी अभ्यासासाठी पाठवण्यात आले होते. सामान्य लोकांमधून नमुने घेण्यात आले नव्हते. याचा हा अहवाल आता प्रसिद्ध झाला आहे. जीनोम सिक्वेसिंग ही पद्धती पालिकेने आता टीबी रुग्णांच्या तपासणीसाठी पूर्ण क्षमतेने वापरायला हवी. जेणेकरून लवकर योग्य निदान होणे शक्य होईल. – डॉ. मंगला गोमारे, माजी कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

तुर्भे एपीएमसी मार्केटमध्ये 2.5 टन प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्तीची धडक कारवाई

नवी मुंबई : स्वच्छतेप्रमाणेच एकल वापर प्रतिबंधावरही विशेष लक्ष दिले जात असून नागरिकांच्या प्रबोधनासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवायांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रात एपीएमसी मार्केट येथे जयेश कुमार अँड कंपनी या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईत 2.5 टन इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईप्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम, क्षेत्र अधिकारी अजित देशमुख व शशिकांत पाटील यांच्या समवेत नवी मुंबई महानगरपालिकेचे तुर्भे विभाग सहाय्यक आयुक्त भरत धांडे, स्वच्छता अधिकारी जयेश पाटील, स्वच्छता निरीक्षक जयश्री आढळ, सुषमा देवधर, योगेश पाटील उपस्थित होते. या कारवाईत जयेश कुमार अँड कंपनी यांचेकडून साधारणत: 2.5 टनाहून अधिक प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले तसेच संबंधितांकडून रू. 5 हजार व सरस फुड्स मार्ट, एपीएमसी मार्केट यांच्याकडून रुपये 5 हजार अशी एकूण रू. 10 हजार दंडात्मक शुल्क वसूली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हा मोठ्या प्रमाणात जप्त केलेला प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी क्रशिंगसाठी पाठवण्यात आलेला आहे.