Category: होम

मिताली म्हात्रेचे नाबाद शतक

अर्जुन मढवी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा   ठाणे : मिताली म्हात्रेची नाबाद शतकी खेळी आणि मिताली गोवेकरच्या नियंत्रित गोलंदाजीच्या जोरावर एमआयजी क्रिकेट क्लबने गतविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लबचा ७० धावांनी पराभव करत पदापर्णालाच डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. एमआयजी क्रिकेट क्लबने २३९ धावांचे लक्ष्य दिल्यावर प्रतिस्पर्धी संघाला १६३ धावांवर रोखत विजय साकारला. एमआयजी क्रिकेट क्लबच्या धावसंख्येत मितालीच्या जोडीने गार्गी वारंग आणि वैभवी राजाने मोलाचे योगदान दिले. मितालीने १०६ चेंडूत १२ चौकार मारत १०८ धावांची बहुमूल्य खेळी केली. गार्गीने नाबाद ४७ आणि वैष्णवी राजाने ४० धावा केल्या. वैष्णवी पोतदार आणि निवेदी जैतपालने प्रत्येकी दोन बळी मिळवले. सलोनी कुष्टे आणि निव्या आंब्रेने राजावाडी क्रिकेट क्लबला चांगली सुरुवात करुन दिली. पण इतर फलंदाज ढेपाळल्यामुळे राजावाडी क्रिकेट क्लबची स्पर्धेतील वाटचाल उपांत्य फेरीत संपुष्टात आली. सलोनी कुष्टेने ३१, निव्या आंब्रेने २३ आणि अंजली केसरकरने नाबाद १७ धावा केल्या. मिताली गोवेकरने तीन, स्वाती स्वेनने दोन, आर्या सुकाळे, महेक मिस्त्री आणि मिताली म्हात्रेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. संक्षिप्त धावफलक : ४० षटकात  ४ बाद २३९ ( मिताली म्हात्रे नाबाद १०८, गार्गी वारंग नाबाद ४७, वैभवी राजा ४०, वैष्णवी पोतदार ८-२६-२, निवेदी जैतपाल ७-२२-२) विजयी विरुद्ध राजावाडी क्रिकेट क्लब : सलोनी कुष्टे ३१, निव्या आंब्रे २३, अंजली केसरकर नाबाद १७, मिताली गोवेकर ६-२५-३, स्वाती स्वेन ८-३१-२, आर्या सुकाळे ६-२८-१, महेक मिस्त्री ६-२२-१, मिताली म्हात्रे ५-१-१५-१.) सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू : मिताली म्हात्रे (एम आय जी क्रिकेट क्लब). 00000

अद्वैत कचराजचे बळींचे सप्तक

गाईल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धा ठाणे : लेग स्पिनर अद्वैत कचराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीमती सुलोचनादेवी सिंघनिया स्कुलने एस एम शेट्टी स्कुलचा १० विकेट्सनी धुव्वा उडवत मुंबई शालेय क्रिडा संघटना आयोजित १४ वर्षाखालील मुलांच्या गाईल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. प्रतिस्पर्ध्यांना अवघ्या २३ धावांत गुंडाळल्यावर श्रीमती सुलोचनादेवी सिंघनिया स्कुलने चार षटकात २४ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या एस एम शेट्टी स्कुलचा एकाही फलंदाजाला अद्वैत कचराजच्या माऱ्यासमोर वैयक्तिक पाच धावांचा पल्ला पार करता आला नाही. अद्वैतने चार निर्धाव षटकांसह १० धावांत सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. वीर धुमाळने दोन धावांत ३ बळी मिळवले. श्रीमती सुलोचनादेवी सिंघनिया स्कुलच्या मिहीर नाईक आणि निर्मित धुरीने  संघाचे कुठलेही नुकसान होऊ न देता २४ धावासह दुसऱ्या फेरीतील स्थान पक्के केले. मिहिरने नाबाद १४ आणि निर्मितने नाबाद ३ धावा केल्या. संक्षिप्त धावफलक : एस.एम.शेट्टी स्कुल : १५ षटकात सर्वबाद २३ ( अंश हडवळे ५, अद्वैत कचराज ८-४-१०-७, वीर धुमाळ १-०-२-३) पराभूत विरुद्ध श्रीमती सुलोचनादेवी सिंघनिया स्कुल : ३.४ षटकात बिनबाद २४ (मिहीर नाईक नाबाद १४, निर्मित धुरी नाबाद ४). 0000

मुंबई महानगरातील परवडणाऱ्या घरांच्या किमतीत ५५ टक्के वाढ!

मुंबई : मुंबई महानगर परिसरात परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत गेल्या काही महिन्यात झालेली घट यामागे या घरांच्या वाढलेल्या किमती एक कारण असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महानगरातील घरांच्या किमतीत गेल्या पाच…

कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या

मुंबई : नाताळच्या सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाण्याचे किंवा नववर्ष गोव्याच्या किनारी, कोकणात, दक्षिण भारतात साजरा करण्याचे अनेकांचे नियोजन असते. सलग सुट्ट्यांच्या कालावधीतील गर्दी आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मध्य आणि कोकण…

डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई

 नागरिकांनी व्यक्त केले समाधान   डोंबिवली : डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करणाऱ्या हातगाडी चालक, रिक्षा चालक यांच्याविरुध्द रामनगर, विष्णुनगर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे डोंबिवली रेल्वे स्थानक भागात रिक्षा वाहनतळ सोडून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांना चाप बसला आहे. पदपथ अडवून हातगाडीवर खाद्य पदार्थ विक्री करणारे विक्रेते या कारवाईमुळे अस्वस्थ आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानक भागात अनेक रिक्षा चालक रिक्षा वाहनतळ सोडून रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारावर येऊन नियमबाह्यपणे प्रवासी वाहतूक करतात. या रिक्षांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर भागात हा प्रकार नेहमीच प्रवाशांना पाहण्यास मिळतो. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे हवालदार किरण फड आणि त्यांचे सहकारी डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात गस्त घालत होते. ठाकुरवाडी भागात राहणाऱ्या एक रिक्षा चालकाने आपली रिक्षा डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने उभी केली होती. या रिक्षा चालकाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव बालाजी गार्डन भागात एक भंगार विक्रेता वर्दळीच्या रस्त्यावर भंगार सामानाची हातगाडी उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत होता. ही बाब रामनगर पोलीस ठाण्यातील गस्तीवरील हवालदार प्रसाद चोरमुले आणि सहकाऱ्यांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी भंगार विक्रेत्या विरुध्द गुन्हा दाखल केला. न्यू आयरेगाव साईबाबा मंदिराजवळ एक वडापाव विक्रेता वर्दळीच्या रस्त्यावर हातगाडी लावून उभा होता. हातगाडीवर सिलिंडरला जोडलेली शेगडी होती. विक्रेत्याने मानवी जीवितास धोक होईल अशा ठिकाणी सिलिंडर, शेगडी ठेवली म्हणून हवालदार सुभाष नलावडे यांनी वडापाव विक्रेत्या विरुध्द गुन्हा दाखल केला. डोंबिवली रेल्वे स्थानकामुळे सार्वजनिक ठिकाणी गॅस सिलिंडर, शेगडीचा वापर करून चहा विक्री व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्या विरुध्द रामनगर पोलीस ठाण्याचे हवालदार वेणु कळसे यांनी गुन्हा दाखल केला. राजाजी रस्त्यावरील कुडाळ देशकर सभागृहाच्या बाजुला दुरुस्तीसाठीची वाहने रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा आणला म्हणून हवालदार वेणु कळसे यांनी कार्यशाळा चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला. दत्तनगर चौकात हातगाडीवर सिलिंडरच्या माध्यमातून शेगडी पेटवून चायनिज पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी रस्ते, पदपथ अडविणाऱ्या, खाद्य पदार्थ विक्रीच्या ठिकाणी ज्वालाग्रही सामान ठेवणाऱ्या विक्रेते, चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, पालिकेच्या फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी फेरीवाल्यांना हटविण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. रस्ते, पदपथ फेरीवाला मुक्त झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. 00000

 १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा

आमदार संजय केळकर व प्रेरणा संस्थेच्या वतीने अनिल ठाणेकर ठाणे : आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने व प्रेरणा संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील १२ वी कॉमर्स व सायन्स च्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही डिसेंबर महिन्यात १५, २२, २९ असे दर रविवारी विनामूल्य सराव परीक्षेचे आयोजन केले आहे. सराव २६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता पाच मिनिटांसाठी घरातील लाईट्स बंद ठेवून ईव्हीएमचा प्रतिकात्मक निषेध करा – राजन राजे हे १२ वे वर्ष आहे. ब्राम्हण शिक्षण मंडळ इंग्रजी माध्यम, व महाराष्ट्र विद्यालय या दोन परीक्षा केंद्रावर सकाळीं ११ ते दुपारी २ या वेळेत बोर्ड पध्दतीने सराव परीक्षा पार पडणार आहेत. 8 तारखेला सायन्स चा फिजिक्स तर कॉमर्स चा इको पेपर असेल.१५ तारखेला केमेस्ट्री व बी. के. पेपर २२ तारखेला सायन्स चा मॅथ्स व ओ. सी. २९ तारखेला सायन्स चा बायोलाॅजी व कॉमर्स चा मॅथ्स असे पेपर होणार आहेत. विध्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती निघून जावी, सहजरीत्या व सोप्या पद्धतीने पेपर लिहता यावा, त्याचा सराव व्हावा या करिता ही सराव परीक्षा आयोजित केली जाते. ठाणे शहरातील विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेमध्ये सहभाग घ्यावा. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे, मुख्य बोर्ड परीक्षा आधी चांगला सराव मिळणार आहे. असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. यावेळी प्रेरणा संस्थेचे पंढरीनाथ पवार, संतोष साळुंखे उपस्थित होते. यासाठी प्रेरणा संस्थेचे पंढरीनाथ पवार व संतोष साळुंखे यांच्याशी संपर्क करावा. पत्ता :- ठाणे भारत सहकारी बँक समोर, बाजी प्रभू देशपांडे रोड विष्णूनगर नौपाडा ठाणे. मोबाईल : ८०८२३७७७११, ९०२२०५६०६० वरील पत्यावर सराव परीक्षा फॉर्म मिळतील, असे सांगण्यात आले आहे. 00000

२६ जानेवारीला रात्री ९ वाजता पाच मिनिटांसाठी घरातील लाईट्स बंद ठेवून ईव्हीएमचा प्रतिकात्मक निषेध करा – राजन राजे

अनिल ठाणेकर ठाणे : २६ जानेवारी-२०२५ रोजी, भारताच्या अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी, रात्री ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील अथवा इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेवून, ईव्हीएमचा प्रतिकात्मक तीव्र निषेध व्यक्त करण्याचे आवाहन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी केले आहे.यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित, पक्षप्रवक्ते समीर चव्हाण, पक्षाचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष तसेच, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. भाजप व त्यांची ‘महायुती’ (एनडीए) सत्तेवर आल्यानंतर, भारतीय जनतेचा ईव्हीएम वरील विश्वास उडत गेला व आजमितीस तो पूर्णतया उडाल्यानेच, पुन्हा ‘कागदी-मतपत्रिकेवरील’ मतदानाची मागणी भारतभरातून व्हायला लागलीय…त्याच अनुरोधाने धर्मराज्य पक्ष, या ईव्हीएम हटाव… लोकतंत्र बचाव मोहिमेत हिरिरीने उतरला असून, “आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात” यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, १० डिसेंबरपासून ‘विश्वमानव-दिवस’ किंवा ‘जागतिक मानवी-हक्क दिना’चं औचित्य साधत निवडणूक-प्रक्रियेसंबंधाने ईव्हीएम हवे की, बॅलेट पेपर अशी ठाणेकरांची ‘जनमत-चाचणी’ मोहीम सुरु करण्यात आलेली असून, ठाणे शहराच्या काही भागात प्रायोगिकस्तरावर, ही ‘जनमत-चाचणी मोहीम’ यापुढेही राबविण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी, वर्तकनगर नाका, येथे गुरुवारी, ठाणे जनता सहकारी बँक, खोपट नाका, ठाणे (प) येथे जनमत-चाचणी घेण्यात आली. दरम्यान, “नो बॅलेट पेपर… नो इलेक्शन” ही ‘धर्मराज्य पक्षा’ची घोषणा असून, मतपत्रिकेवरील मतदानाचा पारदर्शक लोकशाही-प्रजासत्ताकाचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी. येत्या २६ जानेवारी – २०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी सर्वांनी आपल्या घरातले अथवा कार्यालयातले लाईट्स बंद ठेवून ‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध व्यक्त करण्याचे आवाहन राजन राजे यांनी केले आहे. ०००००

माथेरानच्या शैक्षणिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार पद्मश्री डॉक्टर अझीम काझी यांचे आश्वासन

माथेरान : माथेरान मध्ये काल अंजुमन इस्लाम या संस्थेचे चेअरमन तसेच पद्मश्री डॉक्टर जहीर काझी भेट दिली होती यावेळी माथेरान मध्ये असलेल्या संस्थेच्या इमारतीमध्ये लवकरच येतील स्थानिकांसाठी अद्यावत शाळा व…

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमेत 1 लाखाहून अधिक दंड वसूली

नवी मुंबई: नवी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या दृष्टीने विविध उपाय योजना राबवितांना प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिकला प्रतिबंध करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. या करिता महापालिका आयुक्त डॉ.…

जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणीत महिलांनी न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात – रुपाली चाकणकर

अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी बुधवार १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे होणार आहे. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पाटोळे तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. जिल्ह्यात होणाऱ्या या जनसुनावणी महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर १८ डिसेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती चाकणकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व विधी यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणा-या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे. 0000