Category: होम

बोर्डी ग्रामपंचायतीची वाळू तस्करी

तहसीलदारांनी बजावली स्वामित्व शुल्क भरण्याची नोटीस  ग्रामसेवकाचा नो रिस्पॉन्स! योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायत खुट खाडी येथील पुलाच्या संरक्षक भिंतीचे काम करीत असून, या कामासाठी समुद्राची वाळू उचलण्यात आली. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तसेच स्वामित्व परवानगी व शुल्क न भरता ही वाळू उचलण्यात आल्याने तहसीलदारांनी या ग्रामपंचायतीला तसेच सरपंचांना बाजारभावाच्या पाचपट दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. ग्रामपंचायत अथवा स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या कामासाठी वाळू, मुरूम, दगड आदी वापरायचे असेल, तर त्याचे स्वामित्व शुल्क भरणे आवश्यक असते तसेच लिलावात भाग घेऊन वाळू उचलता येते. बोर्डी ही ग्रामपंचायत समुद्रकिनारी आहे. येथे अतिशय शांत, स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा आहे. बोर्डी हे चित्रपट शूटिंगसाठी तसेच पर्यटकांसाठी ही महत्त्वाचे  ठिकाण आहे. पर्यटकांच्या गर्दीच्या ठिकाणाहूनच वाळू तस्करी बोर्डीचा स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येत असतात. अशा पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी पर्यटक…

द्वेष गाडायचा असेल तर जितेंद्र आव्हाड हाच एकमेव पर्याय – संजय सिंह

अनिल ठाणेकर ठाणे : भाजप हा पक्ष फक्त द्वेषाचे राजकारण करीत आहे. धर्माच्या नावावर या देशात द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या द्वेषाचे राजकारण आता मुंब्र्यात आणले जात आहे अन् त्या राजकारणाला गाडायचे असेल तर जितेंद्र आव्हाड हाच एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन आप चे राष्ट्रीय प्रवक्ते , खासदार संजय सिंह यांनी केले.  महाविकास आघाडीचे उमेदवार,  आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारासाठी संजय सिंह यांनी मुंब्रा येथील अलमास कॉलनी आणि  तन्वीर नगर येथे सभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर शमीम खान,  शानू पठाण, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संजय सिंह पुढे म्हणाले की, इथे डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ जमा झालेले लोक बघून आपले ठाम मत झाले आहे की  त्यांचा विजय एक लाख मतांनीच होणार आहे. आपण जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी येण्याची दोन कारणे आहेत: पहिले म्हणजे, डॉ.जितेंद्र आव्हाड हे दुसर्‍याचे दुःख पाहून त्याच्या दुःखी होणारे व्यक्तिमत्त्व आहे. मी जेव्हा मोदींच्या हुकूमशाहीविरोधात बोललो तेव्हा मला जेलमध्ये टाकण्यात आले. त्याप्रसंगी दिल्लीत माझ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जितेंद्र आव्हाड हेच धावून आले होते आणि दुसरे कारण म्हणजे जो कोणी द्वेष पसरविणाऱ्या भाजपविरोधात लढतो, त्याच्या सोबत उभे राहण्यासाठी मी नेहमीच सज्ज असतो. जितेंद्र आव्हाड हे द्वेषाच्या राजकारणाविरोधात लढत आहेत. म्हणूनच मी इथे आलो आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेण्याची भाषा देशाचे विधी मंत्री करीत आहेत. पण, जेपीसीसमोर हा विषय चर्चेला आता आला आहे. 800 पानांच्या अहवालापैकी फक्त 100 पाने वाचून झाली आहेत. त्याआधीच जर कायदा करण्याची भाषा केली जात असेल तर ते संविधानविरोधी कृत्य आहे. हे सरकार संविधानाशी आणि लोकशाहीशी गद्दारी करीत आहेत. आजची स्थिती अशी आहे की, “वतन की हालत सुनायेंगे तो पत्थर भी रोऐंगे” हे शिंदे सरकार नको त्या गोष्टी सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे. माझे म्हणणे आहे की त्यांनी कधी तरी शिक्षण, रोजगार, महागाई, महिला अत्याचार यावर बोलावे, असे आवाहन सिंह यांनी केले. योगी महाराष्ट्रात येतात आणि बटेंगे.. काटेंगेचा  नारा देत आहेत. मी तुम्हाला सांगतोय की हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे. कारण, भाजप आणि पंतप्रधान मोदी यांनी खोटं बोलण्यात मास्टरकी मिळविली आहे. मोदी म्हणतात की से लोक बेटी पळवतील; लोक सुरक्षित नाहीत. माझे म्हणणे आहे की गेल्या दहा वर्षात जर लोक सुरक्षित नसतील तर मोदींचे अपयश असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा. लक्षात घ्या कोणताच धर्म द्वेष पसरवित नाही. द्वेष हटवण्यासाठी बंद पडलेले घड्याळ फेकून तुतारी वाजविली पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांचा विजय हा तमाम सामन्यजणांचा विजय असणार आहे. त्यामुळेच तुतारी समोरील एक नंबरचे बटन दाबा,असे आवाहन केले. दरम्यान,  डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी, महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात महागाई वाढलेली आहे. महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत आहेत. असहिष्णुतेची परंपरा आपल्या महाराष्ट्रात वाढीस लागली आहे. ती गाडण्यासाठी आपणाला लढावे लागणार आहे. काल परवा केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून गेले. धर्मद्वेषाचे राजकारण हे सरकार  उघड्या डोळ्याने पहात आहे. द्वेषाचे राजकारण करून आपण विजयी होऊ असे त्यांना वाटत असले तरी आपण ते होऊ द्यायचे नाही. द्वेषमूलक राजकारण करणाऱ्या सरकारचा महाराष्ट्रात नक्कीच पराभव होणार आहे, असा विश्वासही डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.  विशेष म्हणजे, यावेळेस उपस्थित जनसमुदायाने एक नंबर.. एक नंबर अशा घोषणा देत डॉ.जितेंद्र आव्हाड यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

हवामानबदलामुळे महिलांवरील हिंसाचारात वाढ

पर्यावरण मिलद बेंडाळे हवामानबदलाचे खोलवर सामाजिक परिणाम सध्या पहायला मिळत आहेत. चक्रीवादळ, पूर आणि इतर आपत्तींमुळे महिलांवरील हिंसाचार आणि लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आर्थिक असुरक्षितता आणि कौटुंबिक दबावामुळे…

‌‘अमेरिका फर्स्ट‌’मुळे भारताची निर्यात महाग होणार

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे बॉस बनले. भारत आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध खूप चांगले आहेत. दोघेही एकमेकांना चांगले मित्र म्हणतात. ट्रम्प अध्यक्ष बनल्याने भारत आणि अमेरिकेच्या व्यवसायावरही परिणाम होणार आहे.…

नेपाळची नवी कुरापत

नेपाळ हा भारताचा सख्खा शेजारी देश. जगातील एकमेव हिंदू धर्मीय देश. भारत हा देखील हिंदू संस्कृतीचा पाईक त्यामुळे दोन्ही देशातील चालीरीती, संस्कृती, सण, उत्सव, परंपरा सारखीच त्यामुळे नेपाळ हा भारताचा…

जिभेवरी ताबा । सर्वासुखदाता!!

रामायण घडले | महाभारत घडले | त्यांना कारणीभूत | होते कुजके शब्द || म्हणून शब्द जपावा | शब्द पुजावा | शब्द पुसावा | बोलण्या आधी || घासावा शब्द | तासावा…

भुजबळांनी ईडीच्या गैरवापरचा भांडाफोड केला- जितेंद्र आव्हाड

ठाणे : ईडी, सीबीआय, आयकर विभाग या यंत्रणांचा वापर करून विरोधकांना सतावून आपल्या पक्षात घेण्याचे काम भाजपा करत असल्याचे आम्ही सातत्याने सांगत होतो. मंत्री छगन भुजबळ‌ यांनी केलेल्या विधानामुळे तपास यंत्रणाचा गैरवापर होत असल्याचे उघड झाले असून…

अजित पवारांची चाय पे चर्चा… खराडी येथील चंदनवाडी येथे प्रचारादरम्यान अजित पवारांनी चायचा आस्वाद घेत कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली…

शिवरायांचा भगवा दरोडेखोरांच्या हाती शोभून दिसत नाही – उद्धव ठाकरे

बुलढाणा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी निष्ठावान मावळे तयार केले. शिवरायांनी त्यांच्या हाती निष्ठेचा भगवा झेंडा दिला, भगवा हा निष्ठेचा प्रतिक आहे,तो मावळ्यांच्या हातात शोभून दिसतो, दरोडेखोरांच्या हातात नाही. चाळीस जणांची टोळी आली अन् आपल्या पक्षावर…