Category: होम

रविवारच्या दिवशी रायगड गल्ली परिसरात केळकरांच्या झंझावाताला जोरदार प्रतिसाद

अनिल ठाणेकर ठाणे : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांची रविवारी सकाळी जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीचा श्रीगणेशा रायगड गल्ली परिसरातील गणेश मंदिरातील बाप्पाच्या दर्शनाने झाला. रविवार असल्याने सुट्टीच्या दिवशी मतदारांशी संवाद साधल्याने या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे पाहण्यास मिळाले. याचदरम्यान महिलांनी त्यांचे औक्षण सुद्धा केले. पाचपाखाडी, चंदनवाडी , नामदेववाडी परिसरातून प्रत्येक घरातून महिला प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या झंझावात रॅली रायगड गल्ली भागातुन सुरू झाली. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार, अशोक (भाऊ) राऊळ,…

ओवळा माजिवड्यात प्रताप सरनाईक यांचा झंझावात

अनिल ठाणेकर ठाणे : प्रताप सरनाईक यांच्या प्रचार रॅलीत आगरी कोळी बांधवांनी त्यांच्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी होऊन प्रचाराचा उत्साह द्विगुणीत केला. त्यांनी प्रताप सरनाईक यांना देखील पारंपारिक वेशभूषा परिधान करण्याचा आग्रह…

गुजरात उच्च न्यायालयाचा अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय कर्मचारी म्हणून नियमित करण्याचा आदेश देशभरात लागू करा !

अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : गुजरात उच्च न्यायालयाचा अंगणवाडी सेविका, मदतनिसांना वर्ग ३ व ४ चे शासकीय कर्मचारी म्हणून नियमित करण्याचा आदेश संपूर्ण देशात ताबडतोब लागू करा, अशी मागणी अखिल भारतीय…

उमेदवारांनी निवडणूक खर्चाशी सबंधित कागदपत्रे तपासणीकरिता सादर करावीत -मुकेश चव्हाण

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये १९२ अलिबाग विधानसभा मतदारसंघात एकूण १४ अधिकृत उमेदवार असून अंतिम झालेल्या उमेदवारांनी खर्च नोंदवही, निवडणूक खर्चासाठी उघडलेली स्वतंत्र बँक खाते पासबुक, निवडणूक…

अभिषेक बजाज, राहुल सचदेवची आगेकूच

मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्नूकर स्पर्धा मुंबई, 10 नोव्हेंबर: मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्नूकर स्पर्धेत सिक्स रेड तिसर्‍या फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत मुंबईच्या अभिषेक बजाज आणि राहुल सचदेवने आगेकूच कायम ठेवली. एमएचसी बिलियर्ड्स…

ई रिक्षा वाढत्या पर्यटनाचा केंद्रबिंदू

माथेरान : माथेरानच्या पर्यटन वाढी सोबतच राजकारणाचा एक अविभाज्य भाग बनलेल्या ई रिक्षामुळे इथल्या गल्लीबोळातले राजकारण सुध्दा रंगताना दिसत आहे.काही राजकीय पक्षांनी या ई रिक्षाचा मुद्दा घेऊन पतसंस्था निवडणुकीत विजय मिळवला होता तर काही गावाचे हित पाहणाऱ्या राजकीय लोकांनी राजकारण बाजूला ठेवून सकारात्मक विचार करून गावात सुविधा उपलब्ध व्हायलाच हव्यात याकामी ई रिक्षा साठी आपली प्रतिष्ठा पणाला लावून परिणामाची चिंता न करता पतसंस्था निवडणुकीत पराभवाला सामोरे गेले आहेत.मुळात ज्यांनी ज्यांनी ई रिक्षाला प्रखर विरोध दर्शवून राजकारण करून सर्वसामान्य लोकांची मते घेऊन पतसंस्थेत सत्ता स्थापन केली तीच राजकीय पक्षांची मंडळी या ई रिक्षाचा आपल्या घरापर्यंत वापर करताना दिसत आहेत. ह्याच ई रिक्षा यापुढेही प्रत्येक राजकीय वातावरणात महत्वाचा विषय ठरणार आहेत. एकीकडे ई रिक्षाला विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूने याचा वापर सुध्दा तितक्याच जोमाने करायचा अशी दुहेरी भूमिका विरोधक मंडळी बजावत आहेत. सध्या ह्या रिक्षांची संख्या वीस असून अद्यापही उर्वरित ७४ रिक्षा येणार आहेत. आणि याच येणाऱ्या रिक्षांची संख्या कमी व्हावी यासाठी राजकीय पक्षांना हाताशी धरून कुणी या पक्षातून दुसऱ्या पक्षात बेडूक उड्या मारत आहेत.आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकी मध्ये ई रिक्षा समर्थक आणि विरोधक असाच सामना पहावयास मिळणार आहे. ई रिक्षामुळे खऱ्या अर्थाने पर्यटन क्रांती घडत आहे हेही विरोधात असणाऱ्या लोकांना माहीत आहे परंतु केवळ राजकारण करून लोकांची दिशाभूल करून सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय मंडळी अग्रेसर दिसत आहेत. लवकरच ई रिक्षाचा पायलट प्रोजेक्ट डिसेंबर महिन्यात पूर्ण होऊन उर्वरित ७४ रिक्षा डेरेदाखल होणार आहेत यात शंकाच नाही. या सर्व मिळून ९४ ई रिक्षा सुध्दा पर्यटकांना कमी पडणार आहेत. गावाच्या इतिहासात प्रथमच एक नाविन्यपूर्ण बदल ई रिक्षाच्या माध्यमातून समस्त नागरिक अनुभवत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे आबालवृद्ध मंडळी बरोबरच रुग्णांना सुध्दा या सेवेचा लाभ मोठया प्रमाणावर होत आहे. स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने पर्यटकांना ही एक पर्वणीच ठरली आहे. आजवर हजारो पर्यटकांसह स्थानिक लोक सुध्दा याचा उपभोग घेत आहेत.अधिकारी वर्गाला सुध्दा आपल्या कार्यालयापर्यंत सध्या तरी मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.मुळात ई रिक्षा सुरू व्हावी यासाठी राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधीनी सहकार्याची भूमिका बजावली नव्हती त्यांनी आपले हात झटकले होते.कारण हा एक संवेदनशील विषय असल्यामुळे सुप्रीम कोर्टाशिवाय परवानगी मिळणे कठीण होते. त्यासाठी रिक्षा संघटनेने जवळपास बारा वर्षे पाठपुरावा केल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सनियंत्रण समितीच्या परवानगीने पायलट प्रोजेक्ट म्हणून या रिक्षा कार्यरत आहेत.पर्यटकांची वाढती संख्या पाहता वीस रिक्षा अपुऱ्या पडत आहेत त्यासाठी सनियंत्रण समितीने लवकरच उर्वरीत ७४ रिक्षांना परवानगी देऊन इथे पर्यटन क्रांती घडवून आणावी अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे. या ई रिक्षांची संख्या कमी आहे इथे आल्यावर खूप वेळ प्रतीक्षा करावी लागते. एक सोयीस्कर आणि स्वस्त प्रवास उपलब्ध झाला आहे हे खूपच छान आहे.रिक्षात मोठया बॅगा घेत नाहीत त्यासाठी हमाल करावा लागतो हा खर्च परवडत नाही त्यासाठी सामान सुध्दा घ्यायला हवे. लोचन पानसरे—-पर्यटक मुंबई

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलणार

 चर्मकार समाजाचे नेते शिवदास कांबळे राज भंडारी पनवेल : सर्व गटई कामगार महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलेल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि चर्मकार समाजाचे नेते शिवदास कांबळे यांनी दिली. शिवदास कांबळे यांच्या पुढाकाराने चर्मकार समाजातील गटई कामगारांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यावेळी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस  भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, कामगारनेते व प्रदेश उपाध्यक्ष महेश जाधव, जगदीश ठाकूर, युवक अध्यक्ष नेरूळकर, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगराध्यक्ष सुनिल मोहोड, माजी नगरसेवक सुनिल नाईक, कारंडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि गटई कामगार उपस्थित होते. शिवदास कांबळे यांनी पुढे बोलताना सांगितले कि, चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी सरकार काम करीत आहे. त्या अनुषंगाने विविध योजना प्रत्येक कामगाराला मिळाली पाहिजे यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहिलो आहोत. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर हे सातत्याने लोकांच्या हिताचे काम करीत असतात. त्यामुळे त्यांना सर्व कामगारांचा पाठिंबा, असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. रोहिदास चर्मकार समाज देशभर पसरलेला असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजाचे कौतुक केले आहे. देशाशी एकरूप असलेला या समाजाचा देशाच्या योगदानात वाटा आहे. ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मविश्वासाने काम होत आहे. सरकार संविधानाच्या विरोधात आहे असा खोटा प्रचार आणि दिशाभूल करण्याचे काम विरोधक करत असतात. मात्र सर्वप्रथम २६ नोव्हेंबर २०१५ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे संविधान दिन झाला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा करून लोकशाहीच्या मंदिरात नतमस्तक झाले होते. सोयीनुसार संविधान बदलण्याचे काम काँग्रेस पक्षाने स्वार्थासाठी केले असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले. पीएम आवास, उज्वला गॅस, शौचालय, मातृवंदन योजना, जलजीवन मिशन, लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, पीएम किसान, शेतकरी सन्मान, पीक विमा, आरोग्य योजना, अशा अनेक लोकहिताच्या योजना राबवल्या आहेत, त्यामुळे लोकांचे काम करणारे हे सरकार पुन्हा येण्यासाठी मला विजयी करा, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

पूर्वपिठिका २०२४ निवडणूक काळात अत्यंत मार्गदर्शक – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : प्रसिध्दी माध्यम कक्ष निर्मित रायगड अलिबाग पूर्वपिठिका-२०२४ निवडणूक काळात निवडणूक अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकारांसाठी अत्यंत मार्गदर्शक असल्याचे मत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केले. निवडणूक काळात ही…

मुरबाड विधानसभा क्षेत्रात नक्कीच परिवर्तन घडेल-सुरेश म्हात्रे

राजीव चंदने मुरबाड : मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांना अनुकूल वातावरण आहे. महायुतीच्या कारभाराला कंटाळलेले नागरिक मुरबाड मध्ये नक्कीच परिवर्तन घडवतील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी आज व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या सरळगाव येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यानंतर त्यांनी सरळगाव, टोकावडे येथील कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. तसेच शिरोशी येथील कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन केले. तर तळेगाव, न्याहाडी, मोरोशी भागात रॅली काढून मतदारांना महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी उमेदवार सुभाष पवार, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख आप्पा घुडे, महिला उपजिल्हाप्रमुख राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक वाघचौरे, आरपीआय सेक्युलर पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण खोळंबे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. रुपाली कराळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कविता वारे आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत परिवर्तनाची नांदी घडविली. तीच परंपरा विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, असा विश्वास खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी व्यक्त करून महायुती सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी महाविकास आघाडीला विजयी करावे, असे आवाहन श्री. म्हात्रे यांनी केले. मुरबाड तालुक्याबरोबरच बदलापूर शहर, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातूनही मतदारांचा पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबरच शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व कॉंग्रेसचे कार्यकर्तेही झोकून कार्य करीत आहेत. महायुतीचे काही भागातील कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नक्कीच परिवर्तन घडेल, असा विश्वास उमेदवार सुभाष पवार यांनी व्यक्त केला. मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये २०२१ मध्ये सर्व शाळांमध्ये १०० टक्के शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यातील काही शिक्षक निवृत्त झाले असून, तेथील रिक्त जागी शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, शिक्षकांच्या रिक्त जागांच्या मुद्द्यांवरुन तालुक्यातील मतदारांची दिशाभूल केली जात आहे, याकडे सुभाष पवार यांनी लक्ष वेधले.

कामांचा डोंगर, स्वप्नांचा पाऊस राजेंद्र गावित यांचा महासंकल्प

 रोजगार, शिक्षण, आरोग्य, पाणी आदींवर संकल्प पत्रात भर योगेश चांदेकर पालघरः पालघर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार माजी खासदार राजेंद्र गावित यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेताना भविष्यात काय करणार, याचे स्वप्न आपल्या संकल्प पत्राच्या माध्यमातून पालघर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना दाखवले आहे. लायन्स क्लब हॉल पालघर येथे महायुतीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणी, दळणवळण व्यवस्था अशा सर्वच बाबींना स्पर्श करत पुढच्या काळात आपण काय करणार आहोत याचे चित्र त्यांनी मतदारांसमोर उभे केले आहे. या पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे शिवसेना प्रवक्ते केदार काळे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. गावित यापूर्वी आमदार, खासदार, मंत्री होते. प्रशासनाचा त्यांना मोठा अनुभव आहे. आपल्या काळात त्यांनी काय काय कामे पालघर जिल्ह्यात केली, याचा विस्तृत आढावा आपल्या संकल्प पत्रात घेतला असून भावी काळात पालघर विधानसभा मतदारसंघासाठी आपण काय करणार आहोत आणि नागरिकांचे जीवन कसे सुसह्य करणार आहोत, त्याचा आढावा त्यांनी घेतला आहे. वचननाम्यात स्थानिकांना रोजगार गावित यांच्या वचननाम्यात प्रामुख्याने स्थानिकांना रोजगारांत प्राधान्य, स्वयंरोजगार, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण तसेच आरोग्य सेवा उपलब्ध करणार, शेतकरी व मच्छीमार बांधवांच्या मागण्या पूर्ण करणार, डायमेकर तसेच अन्य व्यावसायिकांना लघुउद्योगांचा दर्जा देणार, पालघर स्वावलंबी व नावीन्यपूर्ण बनवणार अशी पाच वचने मतदारांना दिली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी काय काय करणार याचा आढावाही त्यांनी घेतला आहे. आपली विकास नीती कशी असेल यावर त्यांनी भर दिला आहे. आधी केले, मग सांगितले मुंबई, अहमदाबाद महामार्गालगतच्या ७६ गावांना पाणी योजना, मीरा-भाईंदर ते वसई विरार पर्यंत टप्पा क्रमांक १३ अंतर्गत मेट्रो सेवा, पालघर जिल्ह्यातील सहा मोठ्या योजनांसाठी १२४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर, वसई येथे पासपोर्ट कार्यालय, वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी १००१ कोटी रुपयांचा निधी मंजूर, रेल्वे चौपदरीकरणासाठी बाधितांना दुप्पट सानुग्रह अनुदान, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री तसेच वैयक्तिक सहाय्यता निधीतून हजारो रुग्णांची प्रकरणे मंजूर, बिरसा मुंडा ग्रामसडक योजनेतून जिल्ह्यातील २५० न जोडलेल्या गावांची रस्त्यांची कामे, सातपाटी मासेमारी बंदर विकास केंद्रासाठी २८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर अशा कामांचा आढावा घेताना यापुढे काय करणार आहोत, हे त्यांनी मतदारांना सांगितले. विरार-डहाणूसाठी ३६०० कोटींचा निधी विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणासाठी ३६०० कोटी रुपये खर्च करून लवकरच विरार डहाणू रेल्वे सेवांची संख्या व वारंवारिता वाढवणार असल्याचे सांगून गावित म्हणाले, की मुला-मुलींच्या वसतिगृहाराहतील विद्यार्थ्यांची क्षमता वाढवणे, तसेच घरकुल, वनपट्ट्यांचे दावे मंजूर करणे या कामांना प्राधान्य देणार आहोत. जव्हार येथे २०० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले असून त्यासाठी ९५ कोटी रुपये दिले आहेत. पालघर जिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतिपथावर असून लवकरच एक मॉडेल हॉस्पिटल म्हणून ते उदयास येणार आहे. या ठिकाणी मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. ‘अमृत भारत स्थानक’ योजनेंतर्गत पालघर रेल्वे स्थानकाचे अद्ययावत रेल्वे स्थानकामध्ये रूपांतर होणार असून पालघर-विरार आता अर्ध्या तासावर आले आहे. वैतरणा ते सफाळे खाडीवर पुलासाठी ८६० कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली असून हे कामही लवकरच सुरू होईल असे त्यांनी सांगितले. पाणीयोजनांना प्राधान्य रखडलेल्या पाणी योजना पूर्ण करून त्यासाठी विविध शासकीय संस्थांचा निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. वाडा-पोखरण पाणी योजना, पालघर व २६ गावे पाणी योजना तसेच पालघर नगरपालिकेसाठी पाण्याची स्वतंत्र योजना आणि उर्वरित गावांसाठी पाण्याची वेगळी योजना माहीम-केळवेपर्यंत नेण्याचे त्यांनी जाहीर केले. वेती वरोती व साखरा धरणाचे पाणी स्थानिक भूमिपुत्रांना उपलब्ध करून देण्यासाठी वेगळी योजना आखणार असल्याचे गावित यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यात डायमेकर व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यासाठी क्लस्टर स्थापन करण्यात येईल तसेच या व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा देण्यासाठी आपण प्रयत्न करू. त्यामुळे या उद्योगाला बँका सहजपणे कर्ज देऊ शकतील. पर्यटन विकासावर लक्ष केंद्रीत करणार पालघर विधानसभा मतदारसंघात अनेक पर्यटन क्षेत्र आहेत. अनेक धार्मिक पर्यटन क्षेत्रेही या मतदारसंघात आहेत. त्यांच्या विकासासाठी निधी आणून पालघर हे पर्यटनाच्या दृष्टीने आदर्श ठरवणार असल्याचा संकल्प त्यांनी केला. त्यातून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल. पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. येथे अद्ययावत मत्स्य मार्केट, शीतगृहाची व्यवस्था केली जाईल. एमआयडीसीमध्ये तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन कंपन्यांना परवानगी देताना रोजगारात स्थानिकांना प्राधान्य द्यावे, यासाठी कायदा आणण्याचा मनोदय गावित यांनी व्यक्त केला; याशिवाय जुन्या कंपन्यात नवीन भरती करताना स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी आपण आग्रह धरू, असे ते म्हणाले. पालघरला कामगार रुग्णालय राष्ट्रीय हित लक्षात घेऊन या ठिकाणी मोठे प्रकल्प सुरू व्हावेत व हे प्रकल्प सुरू झाल्यामुळे गावांमध्ये जाणारे रस्ते खराब होऊ नयेत, म्हणून हे रस्ते नवीन करण्यासाठी राष्ट्रीय प्रकल्पांच्या अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूद करण्यासाठी आपण आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. डिझेलवरील परतावा मच्छीमार सोसायट्यांना एका महिन्यात मिळण्यासाठी योजना तयार करून त्याची अंमलबजावणी करू तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपकेंद्र वसई-विरार भागात सुरू करणार आहे. त्याचा फायदा तलासरी भागातील शेतकऱ्यांना होईल. पालघर येथे कामगार विमा रुग्णालय सुरू करणार असल्याचे गावित यांनी सांगितले.