Category: होम

 महाराष्ट्राचे कुमार व मुली (ज्युनिअर) खो-खो संघ जाहीर

 स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर मुंबईत धाराशिव : अलीगड, उत्तरप्रदेश येथे २५ ते २९ नोव्हेंबर  या कालावधीत होणाऱ्या ४३व्या कुमार व मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे कुमार व मुली (ज्युनिअर) संघ महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी जाहीर केले. धाराशिव येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून हे संघ प्रशांत कदम (सातारा),  गोविंद शर्मा (छत्रपती संभाजीनगर), संदीप चव्हाण (पुणे) व भावना पडवेकर (ठाणे) या निवड समिती सदस्यांनी निवडले. या संघात धाराशिवबरोबरच सांगली, सोलापूर, ठाणे, पुणे, अहिल्यानगर, सातारा, नाशिक, मुंबई उपनगर, रत्नागिरी, जालना या जिल्ह्यातील खेळाडूंचा समावेश आहे. या संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर १७ नोव्हेंबरपासून ओम साईश्वर मंडळ, लालबाग, मुंबई येथे होणार आहे. महाराष्ट्राचे संघ असे : कुमार गट : सोत्या वळवी, विलास वळवी, भरत वळवी, राज जाधव, जितेंद्र वसावे (सर्व धाराशिव), प्रज्वल बनसोडे, प्रेम दळवी, पार्थ देवकाते (सर्व सांगली), कृष्णा बनसोडे, शुभम चव्हाण (सर्व सोलापूर), आशिष गौतम (ठाणे), चेतन गुंडगळ, भावेश माशिरे (सर्व पुणे), अनय वाल्हेकर (अहिल्यानगर), प्रतिक जगताप (सातारा), प्रशिक्षक : युवराज जाधव (सांगली), मुली गट : अश्विनी शिंदे, तन्वी भोसले, सुहानी धोत्रे, प्रणाली काळे (सर्व धाराशिव), सानिका चाफे, प्रतीक्षा बिराजदार, धनश्री तामखडे (सर्व सांगली), प्राजक्ता बनसोडे, स्नेहा लामकाने (सर्व सोलापूर), दीक्षा काटेकर, धनश्री कंक (सर्व ठाणे), सुषमा चौधरी (नाशिक), दिव्या गायकवाड (मुं. उपनगर), रिद्धी चव्हाण (रत्नागिरी), जोया शेख (जालना), प्रशिक्षक : श्रीकांत गायकवाड (मुंबई), व्यवस्थापिका सुप्रिया गाढवे (धाराशिव). 000

विविध रांगोळ्या साकारत लाकड्या बहिणींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

ठाणे : दिवाळीचे सणाचे औचित्य साधून ठाणे महापालिका प्रभाग क्र. 22 करिता आरोग्य दूत म्हणून ओळखले जाणारे निखिल बुडजडे यांनी रांगोळी आणि किल्ले स्पर्धेचे आयोजन केले होते. `अबकी बार शिंदे…

 विशेष सुरक्षा तर पुरवली, पण त्यांचे ७ कोटी मात्र थकित!

पोलिसांच्या मेहनतीची सरकारलाच किंमत नाही मुंबई : अनेक व्हीआयपी व्यक्ती, संस्था, महत्त्वाच्या कारवाया, सरकारी कार्यक्रमांचा बंदोबस्त अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी मुंबई पोलिसांकडून विशेष सुरक्षेची मागणी केली जाते. शहराची सुरक्षा व कायदा-सुव्यवस्थेची सर्वात महत्त्वाची जबाबदारी असूनही मुंबई पोलीस प्रचंड ताण सहन करून ही सुरक्षा पुरवतात देखील. मात्र, खुद्द सरकारकडूनच मुंबई पोलीस विभागाच्या मेहनतीचा परतावा मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जाद्वारे यासंदर्भातला खुलासा झाला आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांकडून वेगवेगळ्या कारवाया किंवा व्हीआयपी व्यक्तींसाठी पोलिसांकडून विशेष सुरक्षेची मागणी केली जाते. यामध्ये खुद्द राज्य सरकार किंवा त्यांच्या इतर विभागांच्या कार्यक्रम वा कारवायांना ही सुरक्षा पुरवली जाते. यासाठी पोलीस दलाकडून निश्चित अशा मूल्याची मागणी केली जाते. शासनानं निर्धारित केलेल्या निकषांनुसारच हे दर आकारले जातात. मात्र, गेल्या ७ वर्षांत मुंबई पोलिसांनी पुरवलेल्या अशाच विशेष सुरक्षेसाठीचे तब्बल ७ कोटी रुपये थकित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १४ शासकीय यंत्रणा, ७ कोटींची थकबाकी! माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार, शासनाच्या एकूण १४ विभागांकडून या विशेष सुरक्षेसाठीचे तब्बल ७ कोटी १० लाख ६७ हजार २५२ रुपये थकित आहेत यामध्ये सर्वाधिक वाटा हा प्राप्तीकर विभागाचा असून त्यांच्या विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यांसाठी ही विशेष सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्याशिवाय या यादीमध्ये मुंबई मेट्रोपोलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी अर्थात MMRDA, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्टमधील जनरल स्टम्प ऑफिस अशा विविध शासकीय संस्थांचा समावेश आहे. प्राप्तीकर विभाग, सर्वात मोठा ‘डिफॉल्टर’! करचुकवेगिरीमुळे इतरांना डिफॉल्टर घोषित करणारा प्राप्तीकर विभागत मुंबई पोलिसांचा सर्वात मोठा ‘डिफॉल्टर’ ठरला आहे. कारण थकित ७ कोटींच्या रकमेपैकी एकट्या प्राप्तीकर विभागाचेच ४ कोटी ८५ लाख रुपये थकित आहेत. गेल्या सहा वर्षांत प्राप्तीकर विभागानं टाकलेल्या वेगवेगळ्या छाप्यांसाठी पुरवलेल्या विशेष सुरक्षेचाही यात समावेश आहे. प्राप्तीकर विभागापाठोपाठ एमएमआरडीएकडे मुंबई पोलिसांचे १ कोटी ११ लाख रुपये थकित आहेत. २०१७ सालापासून या विभागाला पोलिसांनी पुरवलेल्या विशेष सुरक्षेचे हे पैसे आहेत. त्यानंतर आरबीआय तिसऱ्या क्रमांकावर असून RBI कडे मुंबई पोलिसांचे ४५ लाख ७१ हजार रुपये थकित आहेत. कशी असते सुरक्षा पुरवण्याची प्रक्रिया? एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार या सर्व यंत्रणांना आधी विशेष सुरक्षेची मागणी करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती अर्ज द्यावा लागतो. त्यानंतर ती विनंती पोलीस उपायुक्तांकडे पाठवली जाते. पोलीस आयुक्तांच्या वतीने नंतर पोलीस उपायुक्त त्या विनंती अर्जाची तपासणी करतात, चौकशी करतात आणि त्यातून आलेल्या निष्कर्षांच्या आधारे ‘लोकल आर्म्स डिपार्टमेंट’ला संबंधित यंत्रणा वा व्यक्तींना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले जातात.

बोरीवलीतलं बंड शमवण्यात भाजपाला यश

गोपाळ शेट्टींची माघार, देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी मुंबई : भाजपाचे बंडखोर नेते गोपाळ शेट्टी  हे बोरीवलीतून अपक्ष लढवण्यार ठाम होते. मात्र अखेर त्यांनी माघार घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे. किरीट सोमय्या आणि विनोद तावडे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गोपाळ शेट्टींनी उमेदवारी मागे घेतली आहे. माझी लढाई विशिष्ट कार्यपद्धतीवर होती. कार्यकर्त्यांची काळजी पक्ष घेतो. मला अनेक नेते भेटायला आले. गोपाळ शेट्टी यांना काय करायचं ते करु दे अशी भूमिका पक्षाने घेतली नाही. त्यामुळे मी माघार घेतो आहे असं गोपाळ शेट्टींनी जाहीर केलं. बोरीवलीत भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. त्यानंतर गोपाळ शेट्टींनी बंड करत काहीही झालं तरीही निवडणूक लढणारच असं म्हटलं होतं. मात्र आज ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्या दिवशी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. काय म्हणाले गोपाळ शेट्टी? “होय मी माघार घेत आहे. मी आमदार बनण्यासाठी लढत नाही आहे. मला दुसऱ्या पक्षांकडून देखील ऑफर्स आल्या होत्या . मात्र मला तसं करायचं नव्हतं . माझी लढाई विशिष्ट कार्यपद्धतीसाठी होती. गोपाळ शेट्टी करतोय तर करु दे काय फरक पडतो? असं आमच्या पक्षात नाही . सर्व पक्षश्रेष्ठी मला भेटायला आले. माझं मत श्रेष्ठींपर्यंत बरोबर पोहचवण्यात मी यशस्वी ठरलो. बाहेरचा उमेदवार आणू नये असं मी मुळीच म्हणत नाही आहे . मात्र सातत्याने झाल्याने मला हे करावं लागलं. पक्ष व्यक्तीपेक्षा मोठा असतो . पक्षाकडे आपल्या भावना मांडल्या आहेत.” असं गोपाळ शेट्टी  म्हणाले. लोकांना काय वाटेल ते मला माहीत नाही पक्षाला समजायला वेळ लागणार नाही असं नाही . लोकांना काय वाटेल मला माहिती नाही . पक्षाच्या नेत्यांवर नाराज नाही पण काही नेते आहेत ते असं करत असतात. नकळत होत असेल पण त्यांना लक्षात आणून दिलेलं आहे. प्रत्येकवेळी निर्णय घेणारा माणूस एकच नसतो . मी अशा कार्यकर्त्यांचं नेतृत्व करतो जे पक्षश्रेष्ठींचं ऐकतात . मी पक्ष नेतृत्वाचं ऐकतो तर ते देखील ऐकतील. असं गोपाळ शेट्टी म्हणाले आणि त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मी दुसऱ्या पक्षात जाणार नाही हे आधीही सांगितलं होतं-शेट्टी “मी अन्य पक्षात जाणार नाही, हे मी सांगितले होते. माझी लढाई एका विशिष्ट कार्यपद्धतीविरोधात आहे. भाजपा पक्ष कार्यकर्त्यांची खूप काळजी घेतो. मला आनंद आहे की, माझ्या पक्षातील नेत्यांनी संवाद साधला. त्यामुळे मी आता माघार घेतो. माझा मुद्दा पक्षश्रेष्ठींकडे पोहोचला आहे. सातत्याने बोरिवलीत अन्याय होतो, अशी चर्चा होती.” त्यामुळे मी हे पाऊल उचललं होतं. मी आता माघार घेत आहे असं गोपाळ शेट्टींनी जाहीर केलं.

निवडणुका होईपर्यंत प्रतिस्पर्धी पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटू नका!

 भाजपचा पदाधिकाऱ्यांना सल्ला डोंबिवली : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची भेट घेतली आहे. तत्पूर्वी त्यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांची देखील भेट घेतली आहे. ठाकरे गट उमेदवाराच्या या भेटीगाठीने भाजप शिंदे गटाच्या गोटात खळबळ माजली आहे. याच भीतीतून भाजपचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी महायुती पदाधिकाऱ्यांना ‘निवडणुका होईपर्यंत कुणीही प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा कार्यकर्त्यांना भेटू नका. शुभेच्छा काय त्या फोनवरून द्यायला सांगा. 20 तारखेनंतर आपली मैत्री जपा असा सल्ला दिला आहे. अंबरनाथ मध्ये मनसेने ठाकरे गटाला दोस्तीचा वादा दिला असताना आता शिंदे गटातील पदाधिकारी देखील वानखेडे यांना भेटत असल्याने आमदार बालाजी किणीकर यांच्या विरोधात संदेश जात असल्याने या कानपिचक्या दिल्या जात आहेत का ? अशी चर्चा आता रंगली आहे. दिवाळीची धामधूम संपताच आता राजकीय मंडळी उमेदवाराच्या प्रचारासाठी कामाला लागली आहेत. कल्याण ग्रामीण मतदारसंघात महायुती मधील शिवसेना शिंदे गटाने मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या विरोधात उमेदवार दिल्याने मनसैनिक नाराज आहेत. त्यातच अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील मनसैनिकांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे. दिवाळी दीपोत्सवाला वानखेडे यांनी आमदार पाटलांची भेट घेतली. यावेळी आमदार पाटील यांनी देखील वानखेडे हे माझे मित्र आहेत. एक मित्र म्हणून मी त्यांना नक्कीच मदत करेल. पक्षाची भूमिका जी काही असेल ते नंतर पाहिले जाईल असे सांगितले. यामुळे महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात खळबळ माजली आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे उमेदवार वानखेडे यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अंबरनाथ येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना कानपिचक्या दिल्या आहेत. भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी आपल्या सांभाषणात म्हणाले, निवडणुकीच्या काळात आपला वाढदिवस असेल तर एखादा प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा कार्यकर्ता आपल्याला भेटायला येतो. त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून संभ्रम निर्माण करतो. त्यामुळे 20 तारखेपर्यंत आपली मैत्री, आपले संबंध बाजूला ठेवा, आणि कुणालाही भेटू नका, फोनवरून शुभेच्छा स्वीकारा. त्यांना सांगा तुमच्या निवडणुका तुम्ही लढा आमच्या निवडणुका आम्ही लढतो. बाकी सगळं 20 तारखेनंतर असं भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी म्हणाले. 20 तारखेपर्यंत फक्त राजकारण, निवडणूक, महायुती आणि धनुष्यबाण इतकंच लक्षात ठेवा, असं सूर्यवंशी म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करा – सतीश कुमार एस.

अशोक गायकवाड रायगड :निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश निवडणूक निरीक्षक सतीश कुमार एस यांनी दिले. महाड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. निवडणूक निरीक्षक सतीश कुमार एस. यांनी घेतला १९४ – महाड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा शनिवार,(दि.२ नोव्हेंबर २०२४) रोजी आढावा घेतला. स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राची पाहणी करून भारत निवडणूक आयोगाच्या सूचना प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. सतिश कुमार यांनी निवडणुकीचे नोंदणी कार्यालय, स्ट्रॉग रूम, एम.सी.सी, कंट्रोल रूम, साहित्य विभाग, सी.सी.टी.व्ही, आचारसंहिता कक्ष, कंट्रोल रूमची पाहणी केली. आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देशही त्यांनी दिले. निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे स्ट्राँग रूमच्या सुरक्षेतेबाबत पोलीस पथकास सूचना दिल्या.तसेच मतमोजणी केंद्रास भेट देऊन आवश्यकतेनुसार सर्व बाबींची पूर्तता करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करणे गरजेचे आहे. विशेषतः विविध पथकांनी अत्यंत बारकाईने अधिक दक्षतापूर्वक कामकाज करावे असेही त्यांनी सांगितले. निवडणूक अनुषंगाने त्यांनी विविध कक्षास भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, नायब तहसीलदार भाबड आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रायगडचे सुपुत्र पं. उमेश चौधरी यांच्या घरंदाज गायकीने श्रोते मंत्रमुग्ध

पनवेल : देशभरात शास्त्रीय गायनाची छाप पाडणारे रायगडचे सुपुत्र पं. उमेश चौधरी यांनी दीपसंध्या संगीत महोत्सावात आपल्या सुमधूर  घरंदाज गायकीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या सौजन्याने व संगीत कलामंच, डोंबिवली आयोजित दोन दिवसीय कार्यक्रम “दीपसंध्या संगीत महोत्सव” डोंबिवली मधील टिळकनगर शाळेच्या पेंढरकर सभागृहात पार पडला. हा महोत्सव शास्त्रीय संगीतावर आधारित होता. या कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी प्रथम अम्रीता मोरे यांचे सुश्राव्य सतारवादन झाले. त्यांनी जयजयवंती हा राग सादर केला. त्यानंतर योगेश हुन्सवाडकर यांनी राग पूर्वी सादर केला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रूपक पवार यांचे तबलावादन झाले. त्यांनी ताल तीनताल पेशकारी केली. त्यानंतर पं.  उमेश चौधरी यांनी केदार रागातील ख्याल गायकी सादर केली. त्यांच्या “अबीर गुलाल ” या अभंगाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. “त्यांनी “स्वामी कृपा कधी करणार’ या सुंदर भैरवीने पहिल्या दिवसाची सांगता केली. दुसऱ्या दिवशी महेश कुलकर्णी यांच्या पुरीया कल्याण या रागातील पेशकारीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर हिंदुस्थानी संगीत अकादमीचे संचालक विनायक नाईक यांचे तबलावादन झाले. त्यांनी ताल तीनताल ची पेशकारी केली. त्यांची विद्यार्थिनी कु. भक्ती जाधव हिने सहवादन केले. विदुषी पंडीता शुभदा पराडकर यांच्या जयजयवंती रागाने कार्यक्रमाची सांगता झाली. ठुमरी, कजरा, टप्पा गायनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शुभदाताईंनी उपस्थित श्रोत्यांच्या आग्रहास्तव शेवटी भैरवी रागातील टप्पा सादर केला. या महोत्सवात तबल्यावर निशाद पवार, नितीन डेगवेकर, गिरीश आठल्ये, प्रवीण करकरे, आणि विनायक नाईक यांनी हार्मोनियमवर वासुदेव रिसबुड, मंदार दिक्षित, या कलाकारांनी साथसंगत दिली तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तनुश्री जोग यांनी केले.

मला लक्ष करून अराजक माजवण्याचा जागतिक कट-महंत श्री रामगिरी महाराज

रमेश औताडे मुंबई : माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून अराजक मजविण्याचा जागतिक कट होता. मला कोणत्याही धर्माला, जातीला, पंथाला दुखवायचे नव्हते. आमच्या अखंड हरिनाम सप्ताहात मुस्लिम समाजाचा अध्यक्ष होता. मुस्लिम समाजाच्या पंगती उठत होत्या. त्यामुळे मी सर्व समाजाला घेऊन जात आहे. जे ग्रंथात लिहिले आहे तेच मी वक्तव्य केले. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. अशी माहिती महंत श्री रामगिरी महाराज यांनी सोमवारी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी पोलीस आयुक्त व खासदार सत्यपाल सिंह उपस्थित होते. राष्ट्रीय पातळीवरील यंत्रणेकडून सखोल तपास करून कारस्थान रचणाऱ्या धर्माध देशद्रोही आणि सत्तालोलुप राजकारण्यांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी सत्यपाल सिंह यांनी यावेळी केली. रामगिरी महाराज यांना जिहादच्या नावाखाली लक्ष करून अराजक माजवण्याचा जागतिक पातळीवर कट रचला गेला होता आणि त्यात परकीय शक्तींबरोबरच देशातील धर्माध शक्ती आणि सत्तेच्या हव्यासाने पछाडलेले राजकीय पक्ष सहभागी होते. असा खुलासा भोपाळ येथील सोशल मीडिया रिसर्च सेंटर या संशोधन संस्थेने समाज माध्यमांच्या संदर्भात केलेल्या एका अभ्यासात स्पष्ट झाला असल्याचा दाखला देत रामगिरी महाराज यांची भूमिका योग्यच होती व आहे असे मत सत्यपाल सिंह यांनी यावेळी व्यक्त केले. ऑगस्ट महिन्यात महंत श्री रामगिरी महाराज यांच्या सुमारे दीड तास कालावधीच्या प्रवचनातील काही भागाचे संदर्भ वगळून तयार केलेल्या चित्रफिती प्रसारित करण्यात आल्या हे योग्य नाही असे सांगत सिंह म्हणाले,  ‘गुस्ताख- ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा… यासारख्या घोषणा देत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, पुणे यासह अनेक जिल्ह्यांमध्ये धर्माध लोकांनी रस्त्यावर उतरत ठिकठिकाणी दगडफेक करत राज्यात दंगकसदृश्य परिस्थिति निर्माण केली  तसेच काही धर्माध व्यक्तींच्या तक्रारींची दखल घेऊन महंत श्री रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हे  दाखल करण्यात आले. हे योग आहे का ? असा सवाल सत्यपाल सिंह यांनी यावेळी केला.

 पंतप्रधान मोदी यांची शुक्रवारी नाशिकमध्ये सभा

 ग्रामीण भागासाठीही पदाधिकारी प्रयत्नशील हरिभाऊ लाखे नाशिक: विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर प्रचाराला जोर येत असून, राज्यातील निवडणूक प्रतिष्ठेची लोकसभेप्रमाणेच विधानसभेसाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. सभा पंचवटीतील तपोवनात असलेल्या मोदी ग्राऊंडवर होणार आहे. सदरची सभा ठक्कर डोम येथे घेण्यासंदर्भातही प्रस्ताव होता. मात्र ती जागा सुयोग्य नसल्याने हा प्रस्ताव मागे पडला. त्यामुळे पंचवटीतील तपोवन येथील नेहमीची जागा निवडण्यात आली आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जागेची पाहणी केली. आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ६ नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये येणार आहे. सत्ताकारणात दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचे संबंध असल्याने राज्यातील जागावाटपासह इतर सर्व घटनांमध्ये गृहमंत्री अमित शाह यांचा हस्तक्षेप राहिला आहे. त्यामुळे राज्यातील जागा निवडून आणण्यासाठी तिन्ही पक्षांचे स्टार प्रचारक म्हणून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी महायुतीतर्फे या दोन्ही नेत्यांच्या सभा संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात येणार असून, जिल्ह्यातही त्यांच्या दोन सभा व्हाव्यात, यासाठी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. त्यापैकी नाशिकमध्ये मोदी मैदानावर ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांची सभा आयोजित करण्याचा प्रयत्न सुरू असून, तपोवनातील मोदी मैदानातच ही सभा होणार आहे. याशिवाय ग्रामीण भागातही एखादी मोठी सभा घेण्याचा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संजय केळकर यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने दिला जाहीर पाठिंबा

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार संजय केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरूच असून त्यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी आपल्या पदाधिकारी यांच्या सह नुकतीच केळकर यांनी भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे. भाजपने पुन्हा एकदा संजय केळकर यांच्या विश्वास दाखवत ठाणे शहर विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यानुसार त्यांनी आता आपला प्रचार सुरू केला आहे. त्यांना विविध संघटना आणि पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. त्यात आता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी केळकर यांनी भेट घेतली आणि पाठिंबा दर्शविणारे पत्र दिले आहे. केळकर यांना ठाणे शहरातील जनतेची सेवा करण्याची संधी भाजपने दिली त्यासाठी मी भाजपचे आभार मानतो असे सांगत उघडे यांनी केळकर यांच्या कार्याचा गौरव केला. केळकर हे असे आमदार आहेत की जे गोर गरीब जनेतसाठी सदैव सेवेत उपलब्ध असतात. जनेतला न्याय देणार खरा आमदार हे केळकर आहेत असेही ते म्हणाले. केळकर हे आपल्याच पक्षाचे उमेदवार असल्याचे समजून त्यानुसार त्यांच्यासाठी आपल्या सर्वांना एकदिलाने काम करायचे आहे असे अवाहन त्यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना केले. केळकर यांना भरघोस मतांनी निवडून आणायचे असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.