Category: होम

 दिवा विकास प्रतिष्ठान आयोजित नवरात्री उत्सवाचा उत्साह शिगेला

श्रीकांत शिंदे मिञ मंडळ नेतृत्वाखाली दिव्यात सहा ठिकाणी रास गरबा   ठाणे : शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्त दिवा शहरात नऊ रंगात न्हाऊन निघण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. दिव्यात देखील अनेक सार्वजनिक मंडळाचे व कार्यकर्त्यांनी मंडप सजावट, साउंड सिस्टिम, विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि डीजेच्या आवाजात गरबा नृत्य आयोजित करून तरुणाई मंत्रमुग्ध होत आहे. तसेच दिवा शिवसेनेचे गरबा किंग म्हणून ओळखले जाणारे उपशहर प्रमुख तथा मा. नगरसेवक शैलेश पाटील यांनी दिवा शहरात एकूण पाच ते सहा  ठिकाणी रास दांडियाचे भव्य आयोजन केले आहे. साबेगाव येथील डिजे कंपाऊंड, तर दिवा पश्चिमेस क्रिश कॉलनी, दिवा-आगासन रोड येथील सदगुरू नगर, दत्तनगर व एन आर नगर,  या ठिकाणी आयोजन केले आहे. तसेच यावर्षी महिला व तरुणींना उत्कृष्ट बक्षिसे व भेट वस्तू व तसेच दररोज पैठणी जिकंण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यंदा महिला वर्गामध्ये बक्षिसांची लयलूट करण्यासाठी व नृत्य करताना सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळून राहाव्यात यासाठी ड्रेस, हेअर स्टाईल, दागिने, टॅट्यू काढण्याला विशेष पसंती दिली जात आहे. नवरात्री उत्सवात मोठ्या प्रमाणात गरबा-दांडियाचे ठिकठिकाणी आयोजन केले आहे. यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे. रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली आहे. राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत व या नियमांचे तंतोतंत पालन करून दिव्यातील यंदाचा शारदीय नवरात्रौत्सव मोठया उत्साहात सुरू आहे असे मा.नगरसेवक शैलेश पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे.

दिव्यातील म्हात्रे गेट येथील रस्त्याचे कोंक्रीटीकरण पूर्ण

ठाणे : दिवा शहरातील विकास म्हात्रे गेट मधील भगवान म्हात्रे चाळ क्र तीन ते सहा  येथे पावसाळ्यात रहिवासी यांना येण्याजण्यासाठी प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते याचीच दखल घेत दिवा शिवसेनेचे…

भीषण आगीत दूध डेअरीतील साहित्य खाक

मुंब्राः दूध डेअरी मध्ये लागलेल्या आगीत डेअरी मधील विविध प्रकारचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री दिव्यात घडली. दिवा शहरातील साबे रोड जवळ  असलेल्या १० बाय १५ फूट आकाराच्या गाळ्यामध्ये कैलास चंद्रकुमार यांची दूध डेअरी आहे. या डेअरी मध्ये मंगळवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. याबाबतची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ठाण्यातील कर्मचारी, वीज वितरण करणाऱ्या कंपनीचे  कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी १ फायर ,१  रेस्क्यू वाहन आणि १ वॉटर टँकरच्या मदतीने दोन तासांच्या अथक प्रयत्नानी मध्यरात्री पावणेचार वाजण्याच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या घटनेत कुणालाही  दुखापत झाली नाही. परंतु डेअरी मधील दुध ठेवण्याचे दोन मोठे आणि एक लहान फ्रिज तसेच इतर साहित्य जळून खाक झाल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.

शिधापत्रिकाधारकांनी ईकेवायसी करण्याचे आवाहन

कल्याण  : शिधापत्रिकाधारकांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी करून घ्यावी, अन्यथा भविष्यात धान्य बंद होईल, असे आवाहन ३८ फ कल्याण प्रभारी शिधावाटप अधिकारी धरमसिंग बहुरे यांनी केले आहे. तसेच,…

हजारो कोटींची खैरात करूनही ठाणे पालिकेची झोळी फाटकी

ठाणे : राज्य शासनाकडून ठाणे महापालिकेला रस्ते, विविध प्रकल्पांसह इतर विकासकामांसाठी तब्बल ४२०० कोंटीचा निधी आतापर्यंत मंजूर झाला असून, त्यापैकी तीन हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम प्राप्त होऊनही महापालिकेची आर्थिक…

जिल्हास्तरीय आंतरशालेय खो-खो स्पर्धा

श्री मावळी मंडळ यांस तिहेरी मुकुट   ठाणे  : दिनांक ५ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान झालेल्या श्री मावळी मंडळ ठाणे आयोजित  शतक वर्ष निमित्त जिल्हास्तरीय आंतर शालेय स्पर्धेमध्ये श्री मावळी मंडळ हायस्कूल च्या खो खो संघाने तिहेरी मुकुट संपादन केले आहे. शतक वर्षामध्ये संघाने घवघवीत यश मिळवले म्हणजे त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच. १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम समन्यामध्ये सहकार विद्या मंदिर कळवा विरुद्ध हा सामना १ डाव ३ गुण राखून विजेतेपद मिळवले. ह्या समन्यामध्ये कु आयुष सोनवणे ह्याने 3 मिनिटे संरक्षण केले.  स्वरां जाधव ह्याने १ मिनिटे संरक्षण केले, सोहम ठाकूर ह्याने नाबाद 1 मिनिटे संरक्षण कारून संघास विजयी करण्यात योगदान दिले. तसेच १७ वर्षाखालील मुलिंच्या संघाने अंतिम समन्यामध्ये न्यु कळवा  हायस्कुल विरुद्ध हा सामना १ डाव २ गुण राखून विजेतेपद मिळवले. ह्या समन्यामध्ये संस्कृती जाधव, अद्विका चव्हाण आणि अंतरा कदम ह्यांनी अष्टपैलू खेळी करून संघास विजयी केले. तसेच १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम समन्यामध्ये सहकार विद्या मंदिर विरुद्ध हा सामना १ डाव ५ गुण राखून एकतर्फी विजेतेपद मिळवले. स्पर्धे मध्ये ह्या संघाने सर्व सामने एकतर्फी विजयी होऊन स्पर्धेत दबदबा कायम ठेवला. अंतिम समन्यामध्ये  अभिराज वाळंज ह्याने नाबाद 2 मिनिटे संरक्षण करून समन्यामध्ये 3 गडी  बाद करून अष्टपैलू खेळी केली, पार्थ मायनांक ह्याने 2 मिनिटे संरक्षण केले तर भार्गव शिंदे ह्याने १ मिनिटे संरक्षण करून १ गडी बाद करत आपल्या संघास विजय संपादन करून दिला. राज्यस्तरीय प्रशिक्षक  प्रणय कमले हे त्यांचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाखाली श्री मावळी मंडळ संघाने बरेच विजय संपादन केले आहे. 0000

ठाणे जिल्हा नॅचरल श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन

ठाणे  : उत्तेजक द्रव्ये आणि नको असलेल्या प्रोटीनच्या सेवनामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांची वाढत्या वयात जाणीव करून देण्यासाठी ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स संघटनेतर्फे पाचव्या ठाणे जिल्हास्तरीय नॅचरल श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन…

मुंबई पोलीस विशेष गटाच्या बाद फेरीत, तर शिवमुद्रा प्रतिष्ठान कुमार गटाच्या उपांत्य फेरीत

मुंबई : मुंबई पोलीस, रिझर्व्ह बँक, मुंबई कस्टम, हिंदुजा रुग्णालय यांनी शिवनेरी सेवा मंडळाने आयोजित केलेल्या विशेष व्यावसायिक गटाची बाद फेरी गाठली. नवोदित संघ, शिवमुद्रा प्रतिष्ठान यांनी कुमार गटाच्या उपांत्य…

माझी माऊली चषक कॅरम स्पर्धेत वेदांत राणे विजेता    

मुंबई : सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माझी माऊली चषक आंतर शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे विजेतेपद युनिव्हर्सल स्कूल-दहिसरच्या वेदांत राणेने पटकाविले. अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात अचूक…

 पर्यावरणपूरक मूर्तींसाठी आतापासूनच तयारीला लागा

 महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश   ठाणे : पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेचा ठाणेकरांनी सकारात्मकपणे स्वीकार केला आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक मूर्तींसाठीही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने आतापासूनच तयारीला लागावे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. कृत्रिम तलाव, टाकी विसर्जन व्यवस्थेप्रमाणेचे सहा फिरत्या विसर्जन व्यवस्था यंदा ठाणे महापालिकेने भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यांना ठाणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. फिरत्या विसर्जन व्यवस्थेचे आणखी काटेकोर नियोजन करून त्यांची संख्या वाढवावी. त्याबद्दल जनजागृती करावी. आपल्या सोसायटीच्या दारातच मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्याची सोय उपलब्ध झाली तर नागरिक त्याचा निश्चितपणे स्वीकार करतील, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. सोमवारी, माजिवड्याच्या नागरी संशोधन केंद्र येथे झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत आयुक्त राव यांनी यंदाच्या विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख या बैठकीस उपस्थित होते. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी या बैठकीत सादरीकरण केले. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्याची संवेदनशीलता मूर्तीकार, भाविक यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वयंसेवी संघटना, मूर्तीकारांची संघटना यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे महापालिकेने आयोजन करावे, अशी सूचनाही आयुक्त राव यांनी केली. यंदाच्या संपूर्ण विसर्जन व्यवस्थेची माहिती देणारा अहवाल सादर करण्यात यावा. त्यात, शाडू माती, पिओपी यांच्या मूर्तींचा संख्या किती होती, याचे विवरण असावे. त्या संख्येचा अभ्यास करून पर्यावरणपूरक मूर्तींच्या जागृतीसाठी धोरणाची आखणी करता येईल. त्याचबरोबर, टाकी विसर्जन व्यवस्थेसह पुढील वर्षी फिरत्या विसर्जन व्यवस्थांमध्ये वाढ करावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. येत्या काळात दसऱ्याला देवींच्या मूर्तीचे विसर्जन होईल. तसेच, छट पूजेसाठीही दोन-तीन दिवस रायलादेवी, कोलशेत, मासुंदा येथे भाविक येतील त्यांचीही चांगली व्यवस्था केली जावी, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.