Category: होम

 ठाणे जिल्ह्यातील ३ संस्थांचे नामकरण

 मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना मिळाली नवी ओळख ठाणे : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे यशस्वी नामकरण करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. त्यानंतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ३ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. याबाबत मंत्री लोढा म्हणाले की, “औद्योगिक संस्थांचे नामकरण हा केवळ एक निर्णय नसून, महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या संस्थांना आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या नावाने ओळख मिळाल्याने या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची शिकवण व प्रेरणा मिळेल. युवकांचा कौशल्य विकास हे राज्याच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे आणि या नावांमुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला आपल्या कार्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल. हा उपक्रम नव्या पिढीला त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी प्रेरणा देईल आणि त्यांच्या मेहनतीला एक दिशा देईल.” नामकरण केलेल्या संस्थांची माहिती पुढीलप्रमाणे, १. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे, जि. ठाणे- धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे, जि. ठाणे २. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, जि. ठाणे- दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, जि. ठाणे ३. शासकीयऔद्योगिक प्रशिक्षण संस्था, (महिला) ठाणे, जि. ठाणे- राजमाता जिजाऊ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) ठाणे, जि. ठाणे

अतिक्रमण विभागाने तुर्भे विभागात केली तोडक कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ.राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली…

रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विचुंबे पुलाचे लोकार्पण

पनवेल : पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाजवळ गाढी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व लोकप्रिय आमदार प्रशांत…

हरियाणा व महाराष्ट्राची परीस्थिती वेगळी, महाराष्ट्रात मविआचे सरकार येईल – रमेश चेन्नीथला

मुंबई : हरियाणा विधानसभेच्या निकालाने काँग्रेस पक्ष निराश झालेला नाही. हरियाणा व महाराष्ट्रातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. महाराष्ट्रातील भाजपा शिंदे सरकार हे सर्वात भ्रष्ट सरकार असून या भ्रष्ट सरकारला सत्तेतून…

सत्कार हा व्यक्तीचा नसतो तर त्याच्या कर्तुत्वाचा असतो-नारायण राणे

कुडाळ :’सत्कार हा व्यक्तीचा नसतो तर त्याच्या गुणांचा आणि केलेल्या कर्तृत्वाचा असतो आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करणे आणि लोकांना न्याय मिळवून देणे महत्त्वाचे असते ‘ अशा शब्दात भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड संग्राम देसाई यांचा गौरव केला. देसाई यांची बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी नुकतीच मुंबईत निवड झाली.यानिमित्ताने कुडाळ शहर वासियांतर्फे त्यांचा नागर सत्कार करण्यात आला.या सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना राणे म्हणाले, संग्राम देसाई यांनी माणसे जोडण्याचे काम केले आहे.लोकांना  न्याय मिळवून देण्यासाठी ते कशाप्रकारे लढतात हे मी पाहिले आहे. राणे यांच्या हस्ते यावेळी देसाई यांचा  मानपत्र तसेच स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कौन्सिलचे सदस्य ॲड जयंत जायभावे, ॲड गजानन चव्हाण, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड परिमल नाईक, कुडाळ नगराध्यक्ष अक्षता खटावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, गोव्याचे ॲड विवेक घाडगे, सत्कार समिती अध्यक्ष अमित सामंत, भाजपचे सरचिटणीस रणजीत देसाई तसेच जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड विवेक मांडकुलकर, काका कुडाळकर, अभय शिरसाट, धीरज परब, संतोष शिरसाट, गजानन कांदळगावकर, विजय प्रभू ,ॲड, अजित भणगे, ॲड. अमोल सामंत, ॲड.आनंद गवंडे तसेच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राणे पुढे म्हणाले, मी जिल्ह्यात आलो तेव्हा माझी पहिली ओळख संग्राम यांचे वडील ॲड. डी . डी.देसाई यांच्याशी झाली त्यानंतर ॲड.संग्राम यांची ओळख झाली.एक सर्वसामान्य वकील ते आता महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्ष पदा पर्यंतची त्यांची वाटचाल ही जिल्ह्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आणि भूषणावह आहे. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरक,माजी खासदार निलेश राणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून संग्राम देसाई यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड उमेश सावंत, सुत्रसंचलन सुमेधा नाईक, अविनाश वालावलकर यांनी केले.

मुंबईतील कौशल्य केंद्र एक लाख तरुणांना देणार प्रशिक्षण  – पियूष गोयल

मुंबई – केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पियुष गोयल यांनी आज कांदिवली येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची घोषणा केली. शहरातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने…

 ‘हक्क मिळवायचे असतील तर जात-धर्माच्या चक्रात अडकू नका’

 ह.भ.प. शामसुंदर महाराज. सोन्नर यांचे शेतकऱ्यांना आवाहन राजेंद्र साळसकर तेलगाव : शेतकऱ्यांची एकजूट ही कोणताही लढा जिंकू शकते. मात्र शेतकऱ्यांची एकजूट होऊ नये म्हणून त्यांना जातीय संघर्षांत अडकवले जात आहे. त्यांच्या धार्मिक अस्मिता टोकदार केल्या जात आहे. आपले हक्क मिळवायचे असतील तर  शेतकऱ्यांनी जात धर्म विसरून एक व्हावे, असे आवाहन ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने बीड जिल्ह्य़ातील तेलगाव येथील संकटमोचन हनुमान मंदिरात धरणे आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी शामसुंदर महाराज यांनी कीर्तनातून शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, ज्याची कुणी मागणी केली नाही अशा योजनांवर सरकार कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करीत आहे. मात्र शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. जाहीर केलेले अनुदान,  पीक विम्याचे पैसे  शेतकऱ्यांना मागूनही वेळेवर मिळत नाहीत. कारण शेतकऱ्यांची एकजूट नाही. खरं तर शेतीवर उपजिविका करणारा मोठा वर्ग देशात आहे. मात्र तो एकत्र येऊ नये म्हणून त्यांत फूट पाडली जात आहे. धर्माच्या अस्मिता टोकदार करून धार्मिक विद्वेष वाढविला जात आहे. त्यामुळे आपल्या खऱ्या प्रश्नांची जाणीव होत नाही. आता तरी शेतकऱ्यांनी सावध व्हावे. जात धर्माच्या चौकटीतून बाहेर येऊन शेतकरी म्हणून एक व्हावे, तरच आपल्याला न्याय्य मिळेल, असेही शामसुंदर महाराज म्हणाले. किसान सभेचे बीड जिल्हा अध्यक्ष काॅ. अजय बुरांडे यांनी या धरणे आंदोलनामागील भुमिका स्पष्ट केली. आम्ही नवीन काही मागत नाहीत, सरकारनेच जे जाहीर केलं आहे ते वेळेत द्यावे याठी हे आंदोलन असल्याचे सांगितले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार कॉम्रेड दत्ता डाके कॉम्रेड भगवान बडे श्री. विठ्ठल दादा लगड यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी न्यायाधीश  बाबुराव तिडके, कॉ. सुभाष डाके, विष्णू देशमुख, कॉ. सुदाम शिंदे, कॉ. सय्यद रजक आदी उपस्थित होते. कागदावरच पीठलं-भाकरीचा महाप्रसाद किसान सभेच्या आंदोलकांनी कीर्तन संपल्यानंतर आपापल्या घरातून आणलेले पिठल भाकरी काढल्या. वर्तमान पत्राच्या कागदावर वाढून घ्यायला सुरुवात केली. शामसुंदर महाराज यांची जेवणाची व्यवस्था एका कार्यकर्त्याच्या घरी करण्यात आली होती. मात्र तिकडे न जाता शामसुंदर महाराज यांनी सर्व आंदोलकांसोबत कागदावरच पीठल-भाकर वाढण्यास सांगितले. कार्यकर्ते घरी जेवणाची चांगली व्यवस्था केली असल्याचे सांगत होते. मात्र गोपाल कृष्णाने अशाच सर्व गोपाळांच्या शिदो-या एकत्र करून काला केला होता. आज तुमच्या सर्वांच्या घरातून आलेल्या या भाकरी त्या गोपाल कृष्णाच्या काल्याच्या प्रसादासारख्या आहेत, असे सांगून पीठल-भाकरीच्या महाप्रसादाचा आनंद वर्तमान पत्राच्या कागदावरच महाराजांनी घेतला.

कल्याणच्या पेशवेकालीन श्री महालक्ष्मी मंदिरात महाआरती

कल्याण : प्राचीन मंदिरांपैकी एक आणि पेशवेकालीन मंदिर अशी ओळख असलेल्या टिळक चौकातील श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीचा पाचवा दिवस काहीसा खास ठरला. आजच्या ललित पंचमीचे औचित्य साधून कल्याणातील सकल हिंदू…

भिवंडीत नवरात्रोत्सव आणि गरबा उत्सवाला गर्दी

भिवंडी : शहरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शहरातील सर्व हिंदूबहुल भागात दुर्गामातेच्या भव्य मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. तेथे मोठ्या संख्येने महिला गरबा खेळत दुर्गामाता व अंबेमातेसाठी…

न्यू हॉरीझॉन महाविद्यालयात मतदार नोंदणी व जनजागृती अभियान

ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी व जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नव मतदार होणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक…