Category: होम

 अतिवृष्टीच्या पावसात दोन घरे कोसळली

दोन्ही घरातील कुटुंबातील सदस्य जखमी   सोयगाव : बनोटी मंडळात झालेल्या शनिवारी रात्रीच्या अतिवृष्टी मुळे  दोन घरे कोसळून त्यामध्ये दोन कुटुंबातील पाच जण दबल्याची घटना  सोयगाव तालुक्यातील कींन्ही येथे शनिवारी रात्रीला एक वाजता घडली ह्या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नसुन दोन्ही कुटुंबातील सदस्य  कीरकोळ जखमी झाले आहेत…महसूल विभागाने घटनास्थळी पंचनामा केला आहे जखमीना उपचार करून रविवारी सायंकाळी सहा वाजता घरी सोडण्यात आले आहे कीन्हीसह परीसरात गेल्या पाच  दीवसापासुन परतीच्या पावसाने थैमान घातले असुन ढगफुटी दुश्य मुसळधार पाऊस होत असल्याने नदीनाल्यांना मोठा पूर येत आहे शुक्रवार व शनिवार रात्री आठ वाजेनंतर वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला यामध्ये कींन्ही येथील गौतम शंकर शेळके हे पत्नी ,आई,दोन मुलांसह घरात झोपलेले होते तसेच कैलास ओंकार लोखंडे हे देखील पत्नी व दोन मुलांसह झोपलेले असताना पावसामुळे मध्यरात्रीला जवळजवळ असलेले दोघे घराच्या भिंती पडल्याने घरे कोसळली त्यामध्ये दोघे कुटुंबातील पाच सदस्य दबले मोठा आवाज आल्याने आजुबाजुचे रहीवाशी सरपंच छबाबाई फलके,कीशोर फलके,पप्पु देशमुख, वाल्मीक शेळके,वामन शेळके,शेनपडु थोरात आदींनी त्या कुटुंबातील सदस्याना बाहेर काढले व तातडीने उपचार साठी चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते यामध्ये प्रशिक गौतम शेळके(वय १३) ,पलक शेळके (वय १७) आणि छबाबाई शंकर शेळके(वय ६८) यांच्या अंगावर घराची भिंत कोसळून हे तिघेही झोपलेल्या अवस्थेत दबले यामध्ये ते जखमी झाले आहे त्यांचेवर खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना रविवारी सायंकाळी सहा वाजता घरी आणले आहे दरम्यान एकाच गावात दोन घरे पडल्याने संसार उपयोगी साहीत्याचे पुर्ण नुकसान झाले आहे हे गोरगरीब कुटुंब उघड्यावर आले आहे परंतु सुदैवाने ह्या घटनेत कुढल्याही जीवीतहानी झाली नाही तरी प्रशासनने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 मुसळधार पावसाचा ३८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

 चांदवड, देवळा, पेठमध्ये सर्वाधिक नुकसान   नाशिक : शनिवारी रात्री मुसळधार वादळी पावसाने चांदवड, देवळा, पेठ या तालुक्यांसह सिन्नर, नाशिक आणि निफाड भागास चांगलेच झोडपले. चांदवडमध्ये दोन बंधारे फुटून उमराणे, परसूल भागात तारांबळ उडाली. जिल्ह्यात ३८ हजार ५५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात कांदा, द्राक्ष, मका, सोयाबीन, भात, डाळिंबाचा समावेश आहे. ८०६ गावांतील तब्बल ७६ हजार ५५८ शेतकऱ्यांना फटका बसला. शेकडो घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. अनेक घरांची पडझड झाली. परतीच्या पावसाने चांदवड आणि देवळा तालुक्यात हाहाकार उडवला. चांदवड तालुक्यात मातीचा बंधारा फुटल्याने गावातील लोकांना हलवावे लागले. नाशिक शहरासह कळवण, पेठ, सिन्नर, येवला आदी तालुक्यात अवघ्या काही तासात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी ढगफुटीसदृश स्थिती होती. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन पंचनामे करण्याचे निर्देश दिले. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अतिवृष्टीमुळे चांदवड तालुक्यात सर्वाधिक (१०९९२ हेक्टर), देवळा (८२३६), सटाणा (८८५३), पेठ (६२३०), इगतपुरी (१८३१), निफाड (८०७), येवला (१०७६), मालेगाव (९३५), नाशिक (७५०), कळवण (३४१), त्र्यंबकेश्वर ( ४३३), सुरगाणा (६६६), दिंडोरी (१०५) असे एकूण ३८ हजार ५५४ हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कांदा (१२९६१ हेक्टर) व मक्याचे (११५८४) सर्वाधिक नुकसान झाले. सोयाबीन (३२६), भात (९०४८, भाजीपाला (२९५८), कांदा रोपवाटीका (६४२), द्राक्षे (६२४), डाळिंब (४०८) हेक्टर नुकसान झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. ८०६ गावातील ७६ हजार ५५८ शेतकरी बाधित झाले. यात सटाणा (१७१३५), देवळा (१६१७८), चांदवड (१५९००) पेठ (१३१४७), इगतपुरी (३३२१), सुरगाणा (२६८३), नाशिक (२०२८), येवला (१४८७), त्र्यंबकेश्वर (११०४), कळवण (७६७), मालेगाव (५४९) शेतकऱ्यांचा समावेश आहे. चांदवड तालुक्यात पावसाचे पाणी शिरून १०० घरे, ४६ दुकानांचे नुकसान झाले. तालुक्यात ३५ घरांची पडझड झाली. २३ जनावरे दगावली. देवळा तालुक्यात वेगळी स्थिती नव्हती. शहरातून जाणाऱ्या कोलथी, भावडी नद्यांसह तालुक्यातील सर्वच नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ झाली. ढगफुटीसदृश पावसाचा कापशी, भिलवाड, वाखारी आदी गावांना फटका बसला. सात घरांची पडझड तर, ४५ घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती देवळ्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.

गौरी लंकेशचा मर्डरर पांगारकरच्या शिंदेच्या सेनेतील प्रवेशाला स्थगीती

मुंबई: पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झाल्यावर २४ तासाच्या आतच या प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत जालन्यात हा पक्षप्रवेशाचा…

ठाण्यातून केळकर, मुरबाडमधून कथोरेंना संधी

कल्याण पूर्वमधून गणपत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी     ठाणे: भाजपकडून जाहिर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत ठाण्याच्या ८ मतदारसंघांचा समावेश आहे. हरयानाच्या धर्तीवर भाजप यंदाच्या निवडणुकीत अँटी इन्कन्म्बन्सीचा फटका टाळण्यासाठी भाकरी फिरवेल आणि नव्या चेहऱ्यांना…

कोकणातील ‘परशुराम’ही ठाकरेंच्या शिवसेनेत

राजन चव्हाण रत्नागिरी : कोकणात शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु असून त्यात आज सावंतवाडी शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपकरांची भर पडली. कोकणातील फायरब्रँड नेता अशी ओळख असणारे परशुराम उपरकर यांनी आज मनसेला सोडचिठ्ठी देत…

भाजप ‘नाबाद ९९’

पहिल्या यादीत फडणवीस, बावनकुळेंसह अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट ० ८८ आमदारांना पुन्हा संधी ० ११ नवे चेहरे० मुंबईच्या भारती लव्हेकर, पराग शहा, सुनील राणेंचे टेन्शन वाढले० स्वाती घोसाळकर मुंबई – महाराष्ट्र…

संजय केळकर ‘हॅटट्रीक’साठी सज्ज

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे विधानसभेवर हॅटट्रीक करण्यासाठी आमदार संजय केळकर सज्ज झाले आहेत. रविवारी भाजपच्या पहिल्या यादीत आ. संजय केळकर यांची वर्णी लागताच गेल्या अनेक दिवसांपासुन सुरू असलेल्या वावड्यांना अखेर पुर्णविराम…

जेव्हा राज ठाकरे मित्राला भेटतात…

INTRO ‘मनसेप्रमुख राज ठाकरे आणि टेलिव्हीजन अँकर कुणाल विजयकर हे कॉलेज दोस्त. मुलाखतीच्या निमित्ताने हे दोन दोस्त एकत्र भेटता आणि मग सुरु होते दोस्तीची मैफल. या मैफीलीबाबत सांगतायत स्वता कुणाल विजयकर’…

उथळसर प्रभाग समिती कार्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम

ठाणे : मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. या लोकसभा निवडणुकीत मतदान करून आपली लोकशाही बळकट करायला हवी.कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे आपण मतदानाचा अधिकार बजवायला हवा असे आवाहान…