Category: होम

 ‘क्लस्टर’च्या माध्यमातून होणार दौलत नगर सोसायटीचा विकास

 रहिवाशांना मिळणार सर्व सुखसोयींनी युक्त प्रशस्त घरे ठाणे : ठाणे पूर्व कोपरी येथील दौलत नगर को. ऑप. हौसिंग सोसायटीचा विकास `क्लस्टर’च्या माध्यमातून करण्याचा एकमुखी ठराव सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे.`क्लस्टर’ विकासामुळे सभासदांना प्रशस्त घर, उद्यान, जॉगिंग ट्रक, अंतर्गत रस्ते, पार्किंग, स्विमिंग पूल  इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र काही विघ्नसंतोषी मुठभर सभासदांनी स्वार्थासाठी कांगावा करत विकासाविरोधात भूमिका घेतली आहे. या अपप्रचाराला उर्वरित २०० सदस्य बळी पडले नाहीत आणि पडणार नाहीत, असे स्पष्टीकरण आज एका पत्रकार परिषदेत कार्यकारी मंडळाने दिले. पत्रकार परिषदेला सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी, सचिव महेश करणा, खजिनदार रमेश जेवानी, कार्यकारी मंडळ सदस्य आणि सभासद उपस्थित होते. दौलत नगर को-ऑप. हौसिंग सोसायटी ही सुमारे 60 वर्ष जुनी आहे. सोसायटीला 2002 पासून C 1 अतिधोकादायक इमारत म्हणून अनेक नोटीसा मिळाल्या आहेत. सध्या सर्व रहिवासी हे जीव मुठीत धरुन धोकादायक इमारतीत राहत आहेत. काही विघ्नसंतोषी लोकांना त्याचे गांभीर्य नसल्यामुळे स्वत:च्या स्वार्थासाठी ते इतर सभासदांना भडकवत आहेत. तसेच मॅनेजिंग कमिटीला विचारात न घेता बिल्डरला त्रास देऊन डेव्हलेपमेंट थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी केला आहे. मे. यश अशोका डेव्हलपरची नियुक्ती बहुमताने DDR च्या उपस्थितीत केली आहे. त्यांनतर आम्ही एकमताने क्लस्टर योजनेला मान्यता दिलेली आहे.  क्लस्टरला एकमताने  मान्यता दिली म्हणून मे यश अशोका यांनी LOI आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण करुन ते कार्य करत आहेत. कमिटी आणि सभासादांचा मे. यश अशोका डेव्हलपरला दौलत नगर डेव्हलपमेंट कामासाठी पूर्णपणे पाठिंबा आहे, असे सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या अटी व शर्तीप्रमाणे आम्ही दौलत नगर कमिटी मेंबर व सभासदांनी शासनाने जी नियमावली क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी दिलेली आहे त्याचे पालन करुन कायदेशीर बाबी पूर्ण करुन काम करत आहोत. आज क्लस्टरच्या माध्यमातून दर्जेदार घर, रस्ते तसेच स्विमिंग पूल, उद्याने व इतर अनेक सुविघा मिळून संपूर्ण दौलत नगर रहिवाश्यांचे घराचे स्वप्न साकार होत आहे. यासाठी आम्ही मे. यश अशोकाचे आभारी आहोत, असे सचिव महेश करणा यांनी सांगितले. क्लस्टर योजने अंतर्गत बिल्डरने 25 टक्के वाढीव क्षेत्र देण्यास बंधनकारक आहे. परंतु मे. यश अशोका बिल्डरकडून 32 टक्के वाढीव क्षेत्र मंजूर करुन घेतले आहे. सध्याच्या परिस्थितीत दौलत नगर मधील सर्व इमारती निकसीत (रिकाम्या) केल्या नसताना मे. यश अशोका हे भाडे देण्यास बांधील नसतानाही बिल्डर जे फ्लॅटधारक फ्लॅट खाली करून गेले आहेत त्यांना भाडे देत आहे. आज काही मुठभर सभासद सदर डेव्हलेपमेंटच्या कामामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने इतर सभासदांना एका नामांकित बिर्ल्डरला अर्धवट व चुकीची माहिती देऊन ते नामांकित बिल्डर दौलत नगरचा डेव्हलपमेंटचे काम करण्यात इच्छुक आहेत, असे सांगत आहेत. पंरतु त्या बिल्डरला सत्यता कळल्यानंतर त्यांनी दौलत नगरच्या डेव्हलेपमेंटचे काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे. काही रहिवांशानी कमिटीची परवानगी न घेता त्यांच्या सदनिका भाड्याने दिल्या आहेत व अश्याप्रकारे बऱ्याच बेकायदेशीर गोष्टीची परवानगी कमिटी देत नसल्यामुळे कमिटीच्या विरोधात काही स्वार्थी रहिवाशांनी बनाव करुन निरर्थक कलह निर्माण करत आहेत. आज हे विरोध करणारे 5 ते 8 रहिवाशी क्लस्टरला 9 महिन्याआधी मिटींगला हजर होते. त्याच रहिवाशांनी इतर रहिवाश्यांसोबत क्लस्टरला मान्यता दिली होती. त्याचे पुरावे फोटोज आणि व्हिडीओ यावेळी पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले. या सर्व अडथळ्यांना न जुमानता आम्ही बिल्डरसोबत क्लस्टरला जात आहोत. आज प्रसार माध्यमातून वैभव भोसले यांचे असे म्हणणे आहे की आमच्या सोसायटी चां पुनर्विकास क्लस्टरअंतर्गत होत आहे याची कल्पना आज आम्हाला मिळाली, पण  २६ नोव्हेबर २०२३ च्या मीटिंगमध्ये आपण क्लस्टर अंतर्गत पुनर्विकास करणार आहोत असे व्यक्तव्य स्वतः भोसले यांनी सर्व सभासदासमोर सोसायटी च्या विशेष सर्वासधरण सभेत केले आहे सोसायटीच्या एसजीएममध्ये दौलत नगरची डेव्हलेपमेंट ही क्लस्टर योजनेमध्ये होणाऱ्या चर्चेत वैभव भोसले सहभागी झालेले आहेत. शोभा नारवानी यांनी विकासक मे. यश अशोका  यांचे स्वागत केले आणि सदर क्लस्टर डेव्हलेपमेंटसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच सोसायटीचे सभासद व प्राध्यापक श्री अल्हाद जोशी यांनी क्लस्टर योजनेबद्दल सर्वांच्या वतीने सदर क्लस्टर योजना मान्य असल्याचे सांगितल्याचे  व्हिडीओ चित्रीकरणात दिसत आहे. याच मिंटीगमध्ये चेअरमन अनिल गुलाटी यांनी सर्वांना क्लस्टर योजना मान्य केले असल्याचे घोषित केले व सर्व उपस्थित सभासदांचे आभार व्यक्त करून त्या मिंटीगची सांगता केली, तेव्हा कोणीही सभासदांनी विरोध केला नसल्याचे स्पष्टीकरण यावेळी कार्यकारिणीच्या वतीने देण्यात आले व तसेच व्हिडिओ चित्रीकरणात दिसून आले. त्यामुळे अशा प्रकारे कमिटीला विश्वासात न घेता इतर सभासदांची व प्रसार माध्यमांची परस्पर दिशाभूल करण्याचा व स्वतःचा हेतू साधण्याचा प्रयत्न हे विघ्नसंतोषी लोक करत आहेत. ०००००

 पाणी बिलाची थकबाकी ठेवणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

 महापालिका क्षेत्रात ६११ नळ जोडण्या केल्या खंडित, ३० मोटर पंप जप्त सुमारे ३३ कोटी रुपयांची पाणी बिल वसुली ठाणे : ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी वसुलीकरता पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत संपूर्ण महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ६११ नळ जोडण्या खंडित केल्या असून ३० मोटर पंप जप्त केले आहेत. या पाणी बिल वसुली अभियानात आतापर्यंत सुमारे ३३ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. दरम्यान, पाणी बिलाची रक्कम वेळच्या वेळी भरून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे २२४ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, ७६ कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही १४८ कोटी रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यास सांगितले होते. त्यानुसार, पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी बिलाचा भरणा न करता, खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली. प्रभाग                        कारवाई        वसुली नौपाडा – कोपरी :          १५        –  ४,५४,२७,३२५ उथळसर :                    ५८        –  ३,४७,३२,४९७ माजिवडा मानपाडा :      ००        –  ६,२१,७५,४५९ वर्तकनगर :                  ३५        –  २,९४,२३,७१०…

‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेत तंबाखूमुक्त शिबीराचे आयोजन

नवी मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्याप्रमाणेच नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज शहर स्वच्छ ठेवणा-या स्वच्छतामित्रांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे. या अंतर्गत…

विजय सिंघल यांनी केली सिडकोच्या विविध पाणी पुरवठा प्रकल्पांची पाहणी

नवी मुंबई: सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, विजय सिंघल यांनी सिडकोच्या विविध पाणी पुरवठा योजनांच्या प्रकल्पस्थळांना भेट देऊन, सिडकोतर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेतला व संबंधित अधिकारी व…

गुडघ्याचे ऑपरेशन आता डॉक्टर ऐवजी रोबोट करणार

रमेश औताडे   मुंबई : म्हातारपणात गुडघ्याची दुखणी वाढतात. त्यासाठी अनेक जण डॉक्टरची खात्री व न परवडणारा खर्च पाहता ऑपरेशन करायला घाबरतात. मात्र आता गुडघ्याचे ऑपरेशन डॉक्टर ऐवजी रोबोट करणार आहे. बैठी जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, लठ्ठपणा, वाढते वय, गुडघ्याचा संधिवात आणि दुखापत यामुळे देशभरातील कित्येक लोकांना सांध्यांच्या समस्या सतावत आहेत. या पार्श्वभूमीवर अपोलो स्पेक्ट्रा या नामांकित हॉस्पिटल ने मंगळवारी मुंबईत ” गुडघा ऑपरेशन रोबोट ” चे अनावरण प्रसिद्ध अभिनेता अरबाज खान यांच्या हस्ते केले. यावेळी डॉ अलोक पांडे उपस्थित होते. तंत्रज्ञानाने आपली जगण्याची पद्धत बदलली आहे आणि आरोग्य सेवेने खूप मोठा पल्ला गाठला आहे. अपोलो स्पेक्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण आरोग्य क्षेत्रासाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे ठरले आहे. असे अरबाज खान म्हणाले. देशातील दुसरी सर्वात मोठी समस्या संधिवाताची आहे. भारतातील सुमारे २३.४६ दशलक्ष लोकांना ही समस्या असून दैनंदिन हालचाली सहजतेने करता येत नसल्याने ऑपरेशन करावे लागते. असे डॉ सफिउद्दिन नदवी व रुपिंदर कौर यांनी सांगितले. यावेळी हॉस्पिटलचे श्रीराम अय्यर व इतर डॉक्टर उपस्थित होते. 0000

निमंत्रितांचे हास्य कविसंमेलन उत्साहात

मुंबई : ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ आणि ‘सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल’ यांच्या संयुक्त विद्यमाने २१सप्टेंबरला गिरगाव येथे हास्य कविसंमेलन संपन्न झाले. यावेळी कवी नितीन वरणकार यांच्या ‘माया कोरा रायला…

 महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू,

आजपासून जेल भरो आंदोलना इशारा ! अनिल ठाणेकर मुंबई : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आझाद मैदानावर, जोरदार पावसाला न जुमानता सोमवारपासून अंगणवाडी कर्मचारी व संघटक हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. २४ तासांच्या साखळी उपोषणात सुमारे ५० कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सुमारे एक हजार अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांनी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याशी झालेल्या भेटीनंतर शिष्टमंडळ मैदानावर परतल्यावर त्यांनी या भेटीबद्दल असमाधान व्यक्त करुन बेमुदत उपोषण, मानधन वाढ, ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश निघेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच २५ सप्टेंबरच्या जेल भरो आंदोलनात राज्यभरातून हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अंगणवाड्या बंद ठेवून सहभागी होण्याचे आवाहन केले. शासनाने अनेक घटकांना मानधनात वाढ देण्याची घोषणा केली आहे. मग शासनाच्या सर्व योजना यशस्वी होण्यासाठी दिवस रात्र कष्ट करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पडला आहे. शासनाने जीआर काढेपर्यंत हे आंदोलन व उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे, असे मत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. 000

प्रधानमंत्री उन्नत ग्राम अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील ११३ गावांचा होणार कायापालट

अशोक गायकवाड   अलिबाग : आदिवासी बांधवांच्या विकासाच्या वाटचालीत मुख्य प्रवाहासोबत आणण्याच्या व त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा या उद्देशाने प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ११३ गावांचा समावेश आहे. या अभियानाचा शुभारंभ ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. प्रधानमंत्री उन्नत ग्राम अभियानात १७ मंत्रालयांद्वारे राबविण्यात येणा-या विविध २५ उपक्रमांचा समावेश असणार आहे. प्रत्येक मंत्रालय / विभाग पुढील ५ वर्षात उद्दीष्टे निश्चीत करून त्यांची कालबध्द पध्दतीने अंमलबजावणी करेल. या अभियाना अंतर्गत आदिवासी बांधवांसाठी सक्षम पायाभूत सुविधा विकसित करण्याचे ध्येय सामाविष्ट आहे. त्यासाठी आदिवासी बांधवांना पक्के घर देणे, बारमाही रस्ते बांधणे, जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरामध्ये नळाची सुविधा उपलब्ध करून देणे, प्रत्येक आदिवासी वाड्या-पाड्या पर्यंत वीज सुविधा उपलब्ध करून देणे, जेथे जेथे शक्य आहे तेथे सौर विद्युत ऊर्जेद्वारे वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, प्रत्येक वाडीतील प्रत्येक घरात LPG गॅस जोडणी उपलब्ध करून देणे तसेच अंगणवाडी केंद्र उभारून याद्वारे पोषण अभियान राबविणे या व यासारख्या अनेक सुविधांचा सामावेश करण्यात आला आहे. आदिवासी भागातील पर्यटन क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आणि आदिवासी समुदायाला पर्यायी उपजिवीकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी, पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून ट्रायबल होम स्टे (आदिवासी कुटुंबाबरोवर राहणे) यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. तसेच, वनक्षेत्रात राहणाऱ्या FRA पट्टाधारकांकडे मिशन अंतर्गत विशेष लक्ष पुरविले जाईल. या अभियानांतर्गत जिल्हयातील शासकीय आणि वसतीगृहांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच सिकलसेल आजाराच्या निदानासाठी अत्याधुनिक सुविधा असलेले क्षमता केंद्र स्थापन करण्यात येईल. या अभियानांतर्गत आदिवासी उत्पादनांच्या प्रभावी विपणनासाठी आणि विपणन पायाभूत सुविधा, जागरूकता, ब्रेडींग, पॅकेजिंग आणि वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी आदिवासींकडून थेट खरेदी करता यावी यासाठी टीएमएमसी केंद्रांची स्थापना केली जाईल. हे अभियान जिल्ह्यातील असुरक्षित समुदायाच्या कल्याणासाठी त्यांच्या पर्यंत पोहोचणारी सहकारी संघराज्य व्यवस्था आणि संपूर्ण सरकार या दृष्टीकोनाचे आगळे वेगळे उदाहरण ठरेल. 00000

 ऐरोली विभागात तोडक कारवाई

 नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली विभागात पाडकामाची कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत सागरनाथ रामा मढवी, घर नं – 30 ,मच्छी मार्केटच्या मागे, दिवा गाव ,सेक्टर – 9 , ऐरोली येथील आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. मा.उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र.1591/2023 च्या आदेशानुसार आज रोजी पाचव्या मजल्याचे बांधकाम अंशत: निष्कासीत करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सदर ठिकाणी पोकलेन, जेसीबी सारखी मशनरी जावु शकत नसल्याने या मोहिमेसाठी 06 हॅमर, 04 ब्रेकर व 15 मजूर यांचा वापर करण्यात आलेला असून मोहिमेकरीता जी विभाग ऐरोली येथील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. ०००००

 मणक्याच्या दुर्धर, महागड्या शस्त्रक्रीया होणार मोफत,

उपमुख्यमंत्री विशेष वैद्यकीय मदत कक्षाचा पुढाकार मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्ताने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर “मोदी सेवा महिना” राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत राज्यभर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरे राबविण्यास सुरुवात झाली आहे. या शिबिरांच्या तपासणी दरम्यान मणक्यांशी संबंधित आरांवर शस्त्रक्रीया करण्यासाठी स्पाईन फाऊंडेशनकडून पुढाकार घेण्यात आले आहे. विविध जिल्ह्यात मणक्याशी संबंधित निदान झालेल्या रुग्णांवर त्या-त्या जिल्ह्यात जावून रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार असल्याचे स्पाईन फाऊंडेशनचे विश्वस्त व मणक्यांच्या आजारावरील विशेषज्ञ डॉ शेखर भोजराज यांनी सांगितले आहे. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक हे सामुदायिक आरोग्य शिबिराचे मुख्य समन्वयक आहेत. या शस्त्रक्रीयेंना प्रायोगिक तत्वावर सुरुवात झाली असून जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक आरोग्य शिबिरामध्ये निदान झालेल्या 6 रुग्णांवर स्पाईन शस्त्रक्रीया डॉ.शेखर भोजराज यांचे मार्गदर्शनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. मणक्याच्या आजारावरील शस्त्रक्रीया या महागड्या असून त्याचा खर्च 3 लक्ष ते 5 लक्ष रूपये ऐवढा असतो. हा खर्च सर्वसामान्य गोर-गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे त्यांना या शस्त्रक्रीया करता येत नाहीत. सामुदायिक आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या शस्त्रक्रीया मोफत होणार असल्याने गोर-गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे. स्पाईन फाऊंडेशनाच्या माध्यमातून शिबिराशी संबंधित आरोग्य कर्मचारी यांना फाऊंडेशनमार्फत प्रशिक्षणही देण्यात येणार असून मणक्यांच्या आजाराबाबत संशोधनही करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ शेखर भोजराज यांनी दिली. डॉ.भोजराज हे मुंबईतील मणक्याच्या आजारावरील विशेषज्ञ असून त्यांनी स्पाईनच्या दुर्मिळ अशा हजारो सर्जरी केल्या आहेत. त्यांनी जळगाव येथे आयोजित सामुदायिक आरोग्य शिबिरांना भेटी दिल्या व तेथील उपस्थित रुग्ण व डॉक्टर्स, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. 00000