Category: होम

बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास बंगालमध्ये फाशी

ममता बॅनर्जी सरकारचं नवं विधेयक मंजूर कोलकाता : पश्चिम बंगाल सरकारने महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसंच लैंगिक अत्याचार, शोषण आणि बलात्काराच्या घटनांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने नवं विधेयक आणलं आहे. या…

एसटी कर्मचाऱ्यांचा संप

मुंबई : एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने आज संप पुकारण्यात आला आहे. प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने आजपासून (३ सप्टेंबर) बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता, त्यानुसार राज्यातील विविध आगारांमध्ये कामबंद…

एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी संप आता मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या संदर्भात बुधवारी संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीगृहावर…

वेतन आयोग आणि निवृत्ती वेतनाने कर्मचारी होणार मालामाल

केंद्र सरकार एक एप्रिल 2025 पासून देशात एकात्मिक निवृत्ती योजना लागू करणार आहे. यासोबतच एक जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू केला जाऊ शकतो. नवीन वेतन आयोग आणि नवीन…

साथीचे आजार टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी गरजेची

राज्याला पावसाने चांगलेच झोडपल्याने राज्यात सध्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकणगुणिया यासारख्या साथीच्या आजाराने राज्यातील नागरिक हैराण झाले आहे. साथीच्या आजाराने रुग्णांची संख्या वाढत चालल्याने आरोग्य…

बँकांमधील पैशाचा आटता ओघ चिंताजनक

नोंद कैलास ठोळे बँकांमध्ये ठेवी असतील, तरच त्या कर्ज देऊ शकतात. ठेवी आणि कर्जाचे प्रमाण ठरलेले असते. तो पाळला न गेल्यास बँका अडचणीत येतात. आता बँकांच्या घटत्या ठेवींसाठी बँका नागरिकांना…

संकटाचे नवे ढग

संपूर्ण भारतीय उपखंडातील हवामान मॉन्सूनवर आधारित आहे. सभ्यता आणि संस्कृतीच्या प्रत्येक पैलूवर त्याचा खोल ठसा ऐतिहासिकदृष्ट्याही उमटलेला दिसून येतो. मॉन्सूनशी जमीन, आकाशय आणि समुद्राचा संबंध आहे. उन्हाळ्यात अरबी समुद्र आणि…

जादूटोणाविरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर करा – गणेश चिंकोले

सुप्रिया सुळे व संजय दिना पाटील यांना निवेदन अनिल ठाणेकर   ठाणे : जादूटोणाविरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवरती व्हावा याकरिताचे निवेदन खासदार सुप्रिया सुळे तसेच खासदार संजय दिना पाटील यांना  देण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्टचे विश्वस्त गणेश चिंचोले व राज्य कार्यकारणी सदस्य प्रा प्रवीण देशमुख यांनी दोन्ही खासदारांची नुकतीच भेट घेऊन हे निवेदन दिले. जुलै २०२४ मध्ये हातरस येथे एका भोंदू बाबाच्या दरबारात १२४ महिलांच्या दुर्दैव मृत्यूनंतर  हा कायदा संपूर्ण देश पातळीवरती होण्याची गरज  निर्माण झाली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हातरस घटनेनंतर जादूटोणाविरोधी कायद्याची राष्ट्रीय पातळीवर  अंमलबजावणी करण्याची भूमिका मांडली. उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी महत्त्वाची बाब म्हणून त्याचा स्वीकार केला. महाराष्ट्रामध्ये जादूटोनाविरोधी कायदा व्हावा यासाठी करिता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सतत प्रयत्न केले. डॉ नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर २०१३ महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरिता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने  संपूर्ण महाराष्ट्रात सातत्याने या कायद्याच्या प्रबोधनाचे कार्यक्रम राबवले. त्याचा परिणाम म्हणून आज पर्यंत एक हजारच्या वर  गुन्हे या जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत नोंद झालेले आहेत. नंतर महाराष्ट्राच्या जादूटोणाविरोधी कायद्याच्या धर्तीवर कर्नाटक सरकारने सुद्धा जादूटोणाविरोधी कायदा केला. मागील महिन्यामध्ये गुजरात सरकारने सुद्धा जादूटोणाविरोधी कायद्याचे विधेयक मंजूर  करून राज्यपालांकडे सही करिता पाठवले. आज महाराष्ट्र मध्ये कुठलाही बुवा बापू महाराज उघडपणे चमत्काराचा दावा करून फसवणूक करायला सहजासहजी धजावत नाही अशी स्थिती आहे. बागेश्वरधाम सारख्या महाराजाला महाराष्ट्रातून पळून  दुसऱ्या राज्यात जावून आपल्या दाव्याला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करावा  लागतो, हा महाराष्ट्रात असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याचा धाक आहे असे मत प्रा प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केले. असे असले तरी संपूर्ण भारतात सातत्याने घडणाऱ्या घटना या अस्वस्थ करणाऱ्या असतात. नुकत्याच हातरस येथे घडलेल्या घटनेने  हा कायदा संपूर्ण देश पातळीवरती होण्याची गरज प्रकर्षाने आणि निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जादूटोणाविरोधी कायदा हा संपूर्ण राष्ट्रीय पातळीवर देश पातळीवरची व्हावा याबाबतचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सर्व खासदारांना भेटून देत आहेत. आम्ही सातत्याने या मागणीचा पाठपुरावा करत राहू अशी भूमिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यकारिणी सदस्य प्रा प्रवीण देशमुख यांनी स्पष्ट केली.

नाविकांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यासाठी वचनबद्ध – मिलिंद कांदळगावकर

ठाणे : भविष्यात नाविक कामगारांच्या हितासाठी  अनेक कामगार कल्याणकारी योजना राबविल्या जातील. आपल्या भाषणात  ते पुढे म्हणाले की, आम्ही आमच्या नाविकांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत असे नुसिचे सरचिटणीस  मिलिंद कांदळगावकर…

 इंद्रलोक सर्वधर्मिय स्मृती उद्यान व स्मशानभूमीचे आरक्षण रद्द

१५ कोटींच्या निधीतून थीम गार्डनसह इतर विकास कामे होणार! आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीवर मनपा आयुक्त संजय काटकर यांनी केले शिक्कामोर्तब!   अनिल ठाणेकर / अरविंद जोशी भाईंदर : जनतेच्या भावनेचा आदर करत इंद्रलोक भागातील सर्वधर्मिय स्मृती उद्यान व पर्यावरण पूरक स्मशानभूमीचे काम रद्द करण्याची मागणी आमदार सरनाईक यांनी महापालिका आयुक्त संजय काटकर यांना पत्र लिहून केली होती. आमदार सरनाईक यांच्या मागणीची दखल घेत मनपा आयुक्तांनी शिक्कामोर्तब केले. याऐवजी आता त्याजागेत १५ कोटीच्या विकास निधीतून थीम गार्डनसह इतर विकास कामे विकसित करणार असल्याची घोषणा आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. इंद्रलोक परिसरातील शासकीय जमिनीवर महापालिकेने सर्वधर्मीय  स्मृती उद्यान आणि पर्यावरण पूरक (इको फ्रेंडली) आधुनिक स्मशानभूमी प्रस्तावित केली होती. त्यासाठी १५ कोटींचा निधी राज्य सरकारकडून आला होता. पण या नागरी वस्तीत स्मशानभूमी येणार, सर्वधर्मीय स्मृती उद्यान होणार यामुळे काही लोक नाराज होते. स्थानिक हौसिंग सोसायट्या आणि नागरिकांनी महापालिका आयुक्त व आमदार प्रताप सरनाईक यांना निवेदने दिल्यावर सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयात सर्वांची बैठक झाली. यावेळी मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार सरनाईक म्हणाले की, लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासन सर्वानी लोक भावनेचा आदर केला पाहिजे. मीरा भाईंदर शहरात वेगाने विकास होत आहे. भविष्याची लोकांची गरज ओळखून काही कामे प्रस्तावित केली गेली आहेत. गेल्या २ वर्षात मीरा भाईंदर शहराच्या विकास कार्यासाठी राज्य सरकारकडून ३ हजार कोटी विकास निधी आणला आहे. मीरा भाईंदरचा घोडबंदर खाडी किनारा विकास करण्यासाठी १५० कोटीचा प्रकल्प असून तेथे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट करणार आहोत अशी मोठी कामेही शहरात होत आहेत. लोकांना इंद्रलोक सर्वधर्मिय स्मृती उद्यान व पर्यावरण पूरक स्मशानभूमी नको असेल तर ते आरक्षण रद्द करुन लोकभावनेचा आदर करूया. इंद्रलोकच्या  शासकीय जमिनीत चांगले थीम गार्डन किंवा जनहितासाठी चांगली सुविधा विकसित करूया, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. याबद्दल इंद्रलोकच्या नागरिकांनी त्यांचे आभार मानले. भाईंदर पश्चिमेला १२.५ एकर शासकीय जागा असून त्याठिकाणी हे सर्वधर्मीय स्मृती उद्यान प्रस्तावित करावे, अशी सूचना आमदार सरनाईक यांच्याकडून करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, विधानसभा संघटक सचिन मांजरेकर, विक्रम प्रताप सिंग, जिल्हा संघटक निशा नार्वेकर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. 00000