Category: होम

तरुणाईचा उत्साह, थरांचा थरथराट आणि ठाण्याची सामाजिक बांधिलकी हे गोकुळहंडीचे विशेष !

कृष्णा पाटील आयोजित ५५ लाखांची गोकुळहंडी वेधणार ठाणेकरांचे लक्ष ठाणे : शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या गोकुळहंडीची धूम पाहायला मिळणार आहे. भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्याकडून या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. गोकुळ दहीहंडी ही ठाण्यातील एक प्रतिष्ठित दहीहंडी बनली असून यामध्ये एकूण ५५ लाखांची बक्षिसे  आयोजकांकडून जाहीर करण्यात आली आहेत. तरुणाईचा उत्साह, थरांचा थरथराट आणि ठाण्याची सामाजिक बांधिलकी हे गोकुळहंडीचे विशेष असल्याची माहिती भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी दिली. प्रथम नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 5 लाख 55 हजार 555 रोख रक्कम व चषक बक्षीस दिले जाणार असून पुढील प्रत्येक नऊ थरास रुपये ३ लाख ३३ हजार ३३३ रुपये रोख रक्कम व चषक बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. ठाण्याची हंडी २ लाख २२ हजार २२२ रुपये व चषक त्याचबरोबर मानाची गोकुळ हंडी महिला गोविंदा पथकास एक लाख ११ हजार १११ व चषक अशी रक्कम बक्षीस दिली जाणार आहे. याशिवाय आठ थराची सलामी ५१ हजार व चषक,सात थराची सलामी १२ हजार व चषक, सहा थराची सलामी ९ हजार व चषक,पाच थराची सलामी ५ हजार व चषक, चार थराची सलामी ३ हजार व चषक, अशी बक्षिसे पुरुष गटासाठी असून सात थराची सलामी २५ हजार व चषक, सहा थराची सलामी १५ हजार व चषक, पाच थराची सलामी १० हजार व चषक, चार थराची सलामी ३ हजार व चषक अशी बक्षिसे महिलांसाठी ठेवण्यात आली आहेत. मागील वर्षी या दहीहंडीच्या निमित्ताने अर्जुन पुरस्कार विजेते त्याचप्रमाणे शिवछत्रपती पुरस्कार विजेते, व अन्य क्षेत्रातील क्रीडापटूंचा सत्कार करण्याचा अनोखा सामाजिक उपक्रम आयोजकांनी राबवला होता. यावर्षीही ठाण्याच्या हिताचे सामाजिक उपक्रम या दहीहंडीच्या निमित्ताने राबवले जातील असे आयोजक कृष्णा पाटील यांनी सांगितले आहे. ठाण्याच्या मूलभूत नागरिक समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या दहीहंडीच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे कृष्णा पाटील यांनी सांगितले. गोकुळ दहीहंडी ही हिंदू सणांचे प्रतीक बनतानाच तरुणाईचा उत्साह आणि शहराच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव याची सांगड घालणारी अनोखी दहीहंडी ठरेल असेही कृष्णा पाटील म्हणाले.या दहीहंडी निमित्त गोविंदांच्या मनोरंजनासाठी आर्केस्ट्रा, सिने कलाकार त्याचबरोबर मान्यवर लोकांच्या भेटीगाठी व मार्गदर्शन लाभणार असल्याचे कृष्णा पाटील यांनी यावेळी सांगितले.

कामोठेत शेतकरी कामगार पक्षातर्फे दहीहंडीचे आयोजन

पनवेल : कामोठे मध्ये शेतकरी कामगार पक्षातर्फे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सव 2024 चे आयोजन 27 ऑगस्टदुपाला दुपारी तीन वाजता सिडको समाज हॉल समोर, सेंट्रल बँक चौक, सेक्टर 20, कामोठे येथे करण्यात आले आहे. माजी सभापती व नगरसेवक प्रमोद भगत यांनी या कार्यक्रमासाठी सर्व दहीहंडी, बाळ गोपाल यांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. शेतकरी कामगार पक्षातर्फे कामोठे सालाबाद प्रमाणे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मोठ्या संख्येने दहीहंडी पथक या ठिकाणी येऊन हजेरी लावून सलामी देत असतात. तसेच दहीहंडी फोडल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडी तर्फे पारितोषिक मानधन व बक्षीस देण्यात येते. या दहीहंडी पाहण्यासाठी सर्व नागरिक त्या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहतात. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 2024 या वर्षीची दहीहंडी मोठ्या जल्लोषात उत्सवात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या दहीहंडी उत्सवात  एकूण पारितोषिक 2 लाख 22 हजार 222 रुपयांची असणार आहेत. तसेच ट्रॉफी देखील देण्यात येणार आहेत . आठ थराच्या हंडी फोडणाऱ्या पथकाला प्रथम पारितोषिक (खुले) १ लाख ११ हजार १११ रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. तर सात थराच्या  सलामीसाठी 5001, सहा थराच्या सलामीसाठी 3001 आणि पाच थराच्या सलामीसाठी 2001 रुपये देण्यात येणार आहेत. यावेळी कोळीगीत, लोकगीत, मराठी गाण्यांचा आम्ही सारे कलाकार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आशियाई जलतरण स्पर्धेत पनवेलच्या सारा वर्तकची उल्लेखनीय कामगिरी

सारा वर्तकने ३ रौप्य पदकांसह २ कांस्य पदके पटकावली बँकॉक येथे पार पडलेल्या स्पर्धेत १४ राष्ट्रांच्या ६०० जलतरणपटूंचा सहभाग राज भंडारी पनवेल : बँकॉक येथे सुरू असलेल्या आशियाई शालेय निमंत्रित २५ मीटर जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र जलतरण संघटनेच्या जलतरणपटूंनी प्रत्येकी सात सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी एकूण २१ पदकांची कमाई केली. यामध्ये पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स ॲकॅडमीची खेळाडू सारा वर्तक हिने ३ रौप्य आणि २ कांस्य पदकाची मिळून एकूण ५ पदके मिळवली. तिच्यातील आत्मविश्वास तिला स्पर्धेत टिकविण्यासाठी सरस ठरला असल्याची प्रतिक्रिया सारा हिने बोलताना स्पष्ट केले. आशियायी जलतरण स्पर्धेत एकूण १४ राष्ट्रांच्या ६०० जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत १९ वर्षांवरील मुलांमध्ये इचलकरंजीच्या सर्वेश गुरवने २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात कांस्यपदक पटकाविले. या पदकाद्वारे महाराष्ट्राचे खाते उघडले. त्यानंतर त्याने २५ मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्ण, तर २०० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्यपदक मिळवले. ठाण्याच्या राघवी रामानुजनने तीन सुवर्ण, एक कांस्य, तर मुंबईच्या अथर्व म्हात्रेने प्रत्येकी एक सुवर्ण, कांस्य, पुण्याच्या श्रीलेखा पारिखने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य, नंदिनी पेटकरने प्रत्येकी एक रौप्य, कांस्यपदकाची कमाई केली. शिवांशू कोर्तेने एक रौप्य, अर्जुन नाईकने एक कांस्य, ठाण्याच्या अर्जुन श्रीवास्तवने प्रत्येकी एक सुवर्ण, रौप्य, तर रायगड जिल्ह्यातील पनवेलच्या सारा वर्तकने तीन रौप्य आणि दोन कांस्यपदकाची कमाई केली. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमधील सर्वात लहान जलतरणपटू म्हणून कु. सारा अभिजीत वर्तक आहे. अवघ्या ६ वर्षांच्या साराने बँकॉक येथे झालेल्या आशियायाई शालेय जलतरण स्पर्धेत वयोगट 6 मध्ये भारतामधून महाराष्ट्र जलतरण संघाचे प्रतनिधीत्व करणाऱ्या स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले. तिला मिळालेल्या पहिल्याच संधीमध्ये तिने 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली.

उलवे नोडमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

पनवेल : भारतीय जनता पार्टी व महिला मोर्चा उलवे नोड यांच्यावतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. उलवे नोड सेक्टर ९ मधील खारकोपर तलावाच्या बाजूला असलेल्या मैदानात या उत्सवाचे सायंकाळी ४ ते १० वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात ६ लाख ६६ हजार ६६६ रुपयांची एकूण बक्षिसे असणार असून महिलांसाठीही खास आकर्षक दहीहंडीही असणार आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. अधिक माहितीसाठी ९८२०२२८०८१, ९६६४६४९९५०, ९०८२९८४६९३ किंवा ८१०८५९५९८५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उलवे नोड अध्यक्ष विजय घरत, महिला मोर्चा अध्यक्ष योगिता भगत यांनी केले आहे.

पेसा आदिवासी नोकरभरतीसाठी ठाणे-पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग बंद !

अनिल ठाणेकर ठाणे : पेसा कायद्यानुसार आदिवासी १७ संवर्गाच्या नोकरभरती झाल्या पाहिजेत म्हणून नाशिक येथे १ ऑगस्ट २०२४ रोजी पासून आमरण उपोषण सुरू आहे. त्यास पाठिंबा म्हणून २३ ऑगस्ट २०२४ रोजी डहाणू तालुक्यातील चारोटी नाका येथे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या ठिकाणी डीवायएफआय युवा संघटना तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, कष्टकरी संघटना, इतर आदिवासी संघटना, यांच्या वतीने हजारों लोकांचा रस्ता रोको करण्यात आला. या वेळी डहाणू मतदारसंघाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले, विक्रमगड मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा, कष्टकरी संघटनेचे नेते ब्रायन लोबो, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव किरण गहला, डीवायएफआय चे राज्य अध्यक्ष नंदू हाडळ व जिल्हा सचिव राजेश दळवी, राज्य कमिटी सदस्य सुरेश भोये व दत्तू भोंडवा, किसान सभेचे नेते रडका कलांगडा, चंद्रकांत घोरखाना, रामू पागी, रामदास सुतार, सीटूचे नेते लक्ष्मण डोंबरे, तसेच माकप व इतर पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या पेसा भरती आंदोलनाला पाठिंबा म्हणून २४ ऑगस्ट २०२४ रोजी शहीद राजगुरू यांच्या जयंतीदिनी तलासरी तालुक्यातील तलासरी व उधवा बाजारपेठ १००% बंद ठेवून व्यापारी वर्गानेही चांगला प्रतिसाद दिला.

बालकांसाठी ‘चाईल्ड हेल्पलाईन सेवा’ १०९८ कार्यान्वित – डॉ.प्रशांत नारनवरे

रायगड :आपल्या आजूबाजूला आपल्याला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरित आवश्यक मदत कोठून व कशी…

प्रवेश प्रक्रियेबाबतचा अर्ज भरण्यासाठी QR Code-महेश देवकाते

रायगड : २५ फेब्रुवारीला जर्मनी देशातील बाडेन वुटेनवर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. ज्यामध्ये वाहनचालकांचा समावेश असून सदर कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्याची कार्यपध्दती…

महेंद्र थोरवे यांच्या भेटीत डॉ. आंबेडकर भवन निर्माण संदर्भात चर्चा – हिरामण गायकवाड

अशोक गायकवाड कर्जत : कर्जत-खालापूर विधानसभा क्षेत्र कार्यसम्राट आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांची रविवारी भेट घेऊन बाबासाहेब डॉ. आंबेडकर भवन निर्माण संदर्भात चर्चा केली, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)…

सिंधुदुर्ग जिल्ह्याला जगाच्या पर्यटन नकाशावर नेणारं भारतातलं पहिलं ‘ फिश थीम पार्क ‘

अवघ्या ८ महिन्यात तीन लाख पर्यटकांनी दिली भेट…! पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सलाम…! राजन आनंद चव्हाण सिंधुदुर्ग: ‘ होय ‘ ‘ जेव्हा लोक प्रवास करतात,तेव्हा त्यांचं आयुष्य बदलतं असं म्हणतात…! ‘ १,मे,११९७ रोजी जेव्हा सिंधुदुर्ग हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला तेव्हा आम्हालाही असच वाटत होतं.देश – विदेशातले पर्यटक  इथं येतील,इथले स्वच्छ – सुंदर समुद्र किनारे बघतील,निसर्ग सौंदर्याचा मनमुरादपणे आनंद उपभोगतील,इथल्या ऐतिहासिक गड- किल्ल्यांचा,इथल्या संस्कृतीचा – कलेचा अभ्यास करतील,इथल्या कोकणी मेव्याचा,मालवणी पदार्थांचा आस्वाद घेतील जेणेकरून आमचंही जीवनमान सुधारेल.मात्र गेल्या २७ वर्षात म्हणावा तसा बदल,म्हणावी तशी परिस्थिती बदललेली दिसत नाही. रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन(१, मे १९८१)जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली तेव्हा या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न सुमारे २५ ते ३० हजाराच्या आसपास होतं. कोणत्याही भागाचा,प्रांताचा,देशाचा,  विकास हा तिथल्या पायाभूत सुविधा,दळणवळणाची साधनं,उपलब्ध साधनं- संपत्ती, यावर खरं तर अवलंबून असतो.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष कै.जॉन केनेडी यांचं एक वाक्य नेहेमीच लक्षात ठेवायला हवं.’अमेरिका श्रीमंत आहे म्हणून तिथले रस्ते चांगले आहेत असं नाही,तर अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे’. सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीचे सर्व श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री अ.र.अंतुले आणि त्यांचे खास विश्वासू सहकारी, तत्कालीन राज्यमंत्री एस.एन.देसाई यांनाच जातं. कुडाळ- वेंगुर्ल्याचे आमदार असताना त्यांनी कुडाळ शहराजवळ ‘ एमआयडीसी ‘च्या माध्यमातून अनेक लहान मोठे उद्योग आणले.तरुण – तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.मात्र काही वर्षातच या उद्योगांना घरघर लागली.त्यात राजकीय हेव्यादाव्यामुळे   निसर्गरम्य सिंधुदुर्गात मोठे – मध्यम उद्योग नको.लघु उद्योग ,कुटिरोद्योग हवेत अशा आग्रहातून आहे त्या उद्योगांकडे ,त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होऊ लागलं आणि हळू हळू एकापाठोपाठ एक उद्योग बंद पडत गेले.बघता बघता या उद्योगनगरीला अवकळा आली.या एम आय डी सी तून पूर्वी सोन्याचा धूर निघत होता हे आताच्या तरुण तरुणींना सांगीतलं तर खरंच वाटणार नाही.कारखाने बंद पडले आणि कुडाळ शहर आणि आसपासच्या परिसराची रयाच गेली.एकेकाळी गजबजलेलं असणार असं हे कुडाळ एकदम शांत झालं. इथली धावपळ थांबली. कुडाळ शहराच्या आठवणी सांगताना इथल्या जुन्या जाणत्या व्यापाऱ्यांचा, बुजुर्ग मडळींचा कंठ दाटून येतो. ‘गेले ते दिन गेले ‘ हेच उद्गार त्यांच्या तोंडून निघतात. ही ‘एमआयडीसी’ पुनरुज्जीवीत  व्हावी यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले. मधल्या काळात काही उद्योग आले आणि काही कालावधीत बंदही पडले. आजही     ‘अतिरिक्त एमआयडीसी’त उद्योग येताहेत, यापुढेही ते येतील, तरुणांना कायमचा रोजगार मिळेल याच आशेवर इथले तरुण -तरुणी आहेत. पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर या जिल्ह्याचं रुपडंच पालटून जाईल असं आम्हाला वाटलं होतं पण याही बाबतीत निराशाच झाली.याला कारणीभूत आमची मानसिकता, आमचा करंटेपणा. आम्हाला ‘Sea World’ नको, मालवणच्या खोल समुद्रातल्या ‘ ‘Marine sanctuary’ सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन प्रकल्पांना आमचा विरोध. परदेशी पर्यटक जे कपडे घालतात त्यानं आमची संस्कृती बिघडते…! मात्र  ओरड करणारी हीच मंडळी मात्र सिंगापूर, मलेशिया, थायलंड किंवा अन्य देशांमध्ये भटकंती करून येतात, तेव्हा मात्र आमची संस्कृती बिघडत नाही. हा दांभिकपणा जोपर्यंत आम्ही सोडत नाही तोपर्यंत जिल्ह्याचा पर्यटन विकास कधीच होणार नाही. आमचे समुद्र किनारे गोव्यापेक्षा स्वच्छ आणि सुंदर आहेत अशी शेखी आम्ही मिरवतो पण त्या समुद्र किनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांना आपण कोणत्या सोयी – सुविधा निर्माण केल्या हा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. काही ठिकाणी तर चहा -कॉफी सोडाच साधी पाण्याची बाटलीही मिळत नाही ही शोकांतिका आहे. आज गोव्यात दरवर्षी सुमारे ३० ते ४० लाख पर्यटक येतात.त्यापैकी सुमारे ८-१० लाख विदेशी पर्यटक असतात. युरोप,रशिया इथून पर्यटन हंगामात अनेक चार्टर्ड विमानं येतात. केरळ राज्य, दक्षिणेकडची अन्य राज्ये आज पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करू लागली आहेत. गोव्याच्या बरोबरीनं केरळनंही पर्यटन क्षेत्रात आघाडी घेतली आहे. आज गोव्यात खाण उद्योग,अन्य उद्योग,फार्मा कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत.मात्र गोव्याचं अर्थकारण हे पर्यटनावर अवलंबून आहे. एक पर्यटक जेव्हा येतो तेव्हा ११ते १२ जणांना प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोव्यातल्या लोकांनी ‘पर्यटन हीच आपली रोजी-रोटी’ समजून ते केव्हाच स्वीकारलं आहे व पर्यटन विकासाचा ध्यास घेतला आहे. दरवर्षी हॉटेल्स वाढताहेत, दळण- वळणाची साधनं वाढताहेत.आज गोव्याचं दरडोई उत्पन्न सव्वा चार लाख आहे. त्याखालोखाल सिक्कीम आणि नवी दिल्लीचा नंबर लागतो जो सिंधुदुर्गच्या कितीतरी पटीनं अधिक आहे याचा सर्वांनीच गांभीर्यानं विचार केला पाहिजे.…

विश्व पॉवरलिफ्टिंग स्पर्धा

प्रेरणा, सेजल, रोशनची निवड मुंबई : येत्या २८ ऑगस्टपासून माल्टा येथे सुरु होणाऱ्या विश्व पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी प्रेरणा साळवी, सेजल मकवाना, रोशन गावकर या तीन महाराष्ट्राच्या खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. रोशन १०५, प्रेरणा ७६ व सेजल ६३ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करतील. पतियाळा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रोशन ने रौप्य पदक पटकावले होते. कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रेरणा ला कांस्य पदक मिळाले. याच स्पर्धेत सेजलने ११२.५ किलो वजन उचलून बेंचप्रेसमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम साजरा केला. रोशन १४ वीत तर प्रेरणा १५ वीत शिकत आहेत. सेजल बीपीएड करत आहे. रोशन, प्रेरणा हे दोघे चेंदणी कोळीवाडा, ठाणे (पूर्व) येथील “युनायटेड क्लब”चे खेळाडू आहेत. रोशन, प्रेरणाचे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अनंत चाळके प्रशिक्षक आहेत. सेजल जोगेश्वरी (पूर्व) येथील “टू पॉवर जिम” मध्ये सराव करते. संकेत चव्हाण यांचे मार्गदर्शन सेजलला मिळत आहे. संजय सरदेसाई, सतीश पाताडे, सुरेश गद्रे यांनी विश्व स्पर्धेसाठी प्रेरणा, सेजल आणि रोशन या तिघांना शुभेच्छा दिल्या आहेत.