Category: होम

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत एकही महिला लाभापासून वंचित राहणार नाही – किशन जावळे

अशोक गायकवाड   रायगड : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना हा राज्य शासनाचा क्रांतिकारी निर्णय आहे. महिलांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण”योजनेचा”जिल्हास्तरीय शुभारंभ होरायझन सभागृह अलिबाग येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी सत्यजित बडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील, जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे, जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी जि.प.निर्मला कुचिक आदि उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की,”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंमलबजासाठी शासनाकडून निर्देश प्राप्त होताचा तात्काळ जिल्ह्यातील विविध विभागांच्या बैठकीचे आयोजन करुन या याजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रामध्ये उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी पिवळे किंवा केसरी रेशनकार्ड हा पुरावा ग्राह्य धरावा अशी शासनाला विनंती केली होती. त्यानुसार या योजनेच्या लाभासाठी पिवळे किंवा केसरी रेशनकार्ड हा पुरावा ग्राह्य धरावा असा शासनाचा निर्णय झाला. झाली. तसेच आदिवास प्रमाणपत्राबाबतही शासनाने पंधरा वर्षांचा पुरावा ग्राह्य धरण्यात यावा हा चांगला मार्ग काढला. त्यामुळे ही योजना एकदम सोपी झाली. अंगणवाडी सेविकेच्या हातात योजनेचे काम दिले त्यांनी प्रामिाणकपणे काम केले. जिल्ह्यात ही योजना विहित वेळेत, अचूक पध्दतीने राबविली गेली ही अभिमानाची बाब आहे. पहिल्या दोन महिन्यांचे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पोहचले. योजनेच्या अंमलबजावणीत रायगड जिल्हा हा सर्वात पुढे होता. आशा वर्कर व अंगणवाडी सेविका शासनाचे कर्मचारी यांचे यात मोठे योगदान आहे. एक कोटीपेक्षा जास्त लोकांना लाभ देणारी ही योजना यशस्वीपणे राबविली गेली. या योजनेचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे. जिल्ह्यात या योजनेसाठी ३ लाख ५२ हजार लाभार्थी महिला पात्र ठरल्या आहेत. अजून ९० हजार अर्ज पात्र करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात जवळ जवळ साडेचार लाखाचा आकडा आपण नक्कीच पार करु. पात्र असलेली कुठलीच भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. माजी आमदार अनिकेत तटकरे म्हणाले की, जिल्ह्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र महिलांसाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना शासनाची क्रांतीकारी योजना आहे. ही योजना सर्व धर्मियांसाठी असून सर्व समावेशक योजना आहे. ज्या माती-भगिनी अजूनही या योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांनाही या योजनेचा लाभा द्यावा. आमदार महेंद्र दळवी म्हणाले की, जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना लागू केल्याबद्दल राज्यशासनास मन:पूर्वक धन्यवाद देतो. महिलांच्या सर्वांगीण विकासाचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली आहे. हे राज्य शासन महिलांना आर्थिक व सामाजिक दृष्टया सक्षम करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्य शासनामार्फत महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व भाता-भगिनींना देण्यात यावा. या योजनेचे अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. यावेळी जिल्हाधिकारी तसेच आमदार महोदयांच्या हस्ते महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. 00000

महिलांना मोफत हेल्मेट वाटप

मुरबाड : मुरबाड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष मुकेश विशे यांच्यातर्फे स्वातंत्र्यदिनी १३० महिलांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाडचे आमदार किसन कथोरे उपस्थित होते. मुरबाड शहरातील…

माथेरानची महाराणी मिनी ट्रेनच्या जन्माची कहाणी

माथेरान : झुकझुक झुक आगीनगडी धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, ह्या पंक्तीची आठवण करून देणारी माथेरान ची महाराणीची निवड जागतिक सांस्कृतिक ठेवा म्हणजेच युनेस्को मध्ये झाल्याने माथेरानला एक…

मुकबधिर विद्यार्थिनीकडून वृक्षांना रक्षाबंधन

खर्डी : वासिंद परिसरातील दहागाव येथे रक्षाबंधनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर झाडांना राखी बांधण्यात आली. डोंबिवली येथील रोटरी क्लब, रोटरी क्लब फॉर डेफ स्कूल व पर्यावरणवादी सामाजिक संस्था शहापूरच्या संयुक्त…

ठाणे मनोरुग्णालयात रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा

ठाणे : भावा-बहिणीचे पवित्र नाते जपणाऱ्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या जागृती पालक संस्थेच्या विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या मनोरुग्णांच्या हातावर बांधल्या. या वेळी…

 शिवाजी चौकातील कार्यक्रमांमुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा

 शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचे आवाहन कल्याण : सोमवारी नारळी पौर्णिमा आणि मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा डामडौलातील दिखाव्याचा कार्यक्रम करण्यासाठी शिवसेनेचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी वर्दळीच्या शिवाजी चौकात मंडप उभारण्याचा निर्णय घेतला. या चौकातील मंडपाला पोलीस, वाहतूक, गोपनीय पोलिसांचा विरोध असताना सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून शिवसेनेकडून रेटून शिवाजी चौकात मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपामुळे वाहन कोंडी होण्याची शक्यता विचारात घेऊन आमदार विश्वनाथ भोईर यांनी वाहन चालकांना पर्यायी रस्ते मार्गाने जाण्याचे आवाहन समाज माध्यमातून केले आहे. वाहतूक विभागाने या मार्ग बदलाची कोणतीही अधिसूचना काढली नसताना, आमदार भोईर यांनी स्वतःहून वाहन चालकांनी शिवाजी चौक मार्गाऐवजी पर्यायी रस्ते मार्गाने वाहने नेण्याचे आवाहन केले आहे. शिवाजी चौकात कोणताही कार्यक्रम नसताना दररोज सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत अगोदरच वाहन कोंडी असते. या चौकात आंदोलन, मोर्चा काहीही कार्यक्रम असेल तर शिवाजी चौक एक ते दोन तास कोंडीत अडकतो. या चौकापासून वाहनांचा रांगा दुर्गाडी चौक, लालचौकी, आधारवाडी चौक, काळा तलाव चौक भागात लागतात. या रांगांमुळे कल्याण शहरातील रस्ते वाहन कोंडीत अडकतात. पत्रीपुलाकडून येणारी वाहने या कोंडीत अडकतात. या वाहनांचा शिवाजी चौक ते पत्रीपूल आणि पुढे रांगा लागतात. हे माहिती असुनही आमदार भोईर यांनी लाडकी बहिण योजनेचा आणि नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम लोकांसमोर साजरा झाला पाहिजे म्हणून भर वर्दळीच्या शिवाजी चौकात मंडप टाकण्याचे नियोजन केले आहे. गोपनीय विभागाने शिवाजी चौकात मंडप उभारणी केली तर अभूतपूर्व वाहन कोंडी या चौकात होऊन संपूर्ण शहर ऐन सणासुदीत कोंडीत अडकेल, हा विचार करून शिवसेनेला शिवाजी चौकात मंडप उभारणीस तीव्र आक्षेप घेऊन तसे लेखी पत्र वरिष्ठांना दिले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या कोंडीची माहिती देण्यात आली. पण राज्य सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याने आणि या कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे येणार असल्याने या कार्यक्रमाला विरोध करू नका, अशी चर्चा पोलीस वर्तुळात झाल्याने या मंडपाला यंत्रणांनी विरोध केला नसल्याचे समजते. शिवाजी चौकात सोमवारी कोंडी झाली तर आणि काही गैरप्रकार झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आयोजक आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावर टाकण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. आमदार भोईर यांनी मात्र शिवाजी चौकात मंडप असला तरी तेथे वाहन कोंडी होणार नाही अशी काळजी घेण्यात आली आहे, असे सांगितले. शहर कोंडी मुक्त ठेवण्याची जबाबदारी पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचीही आहे. पण पालिका अधिकारी सुट्टी असल्याने आपल्या मुळ शहरात जात असल्याने पालिका अधिकाऱ्यांचेही या महत्वपू्र्ण विषयाकडे लक्ष नसल्याचे समजते.

मुरबाड तहसील कार्यालयावर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचा बिऱ्हाड मोर्चा

राजीव चंदने     मुरबाड : तालुक्यातील बळेगाव ग्रामपंचायत हद्दीतील नेहरू वाडीतील आदिवासी वस्तीला अनेक वर्षांपासून रस्ता नसल्यामुळे तेथील शालेय विद्यार्थी,ग्रामस्थ गरोदर महिलांची मोठी कुचंबना होत आहे, देश स्वातंत्र होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले  परंतु या कातकरी आदिवासी, वाडीला रस्ता नसल्यामुळे तेथील ग्रामस्थांना अनेक समस्यानां तोंड दयावे लागत आहे, मुरबाड तहसीलदार यांच्या कडे अनेकदा रस्ता आणि स्मशाना संदर्भात निवेदन दिले परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे अखेर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दिनेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी वाडीतील ग्रामस्थांनी मुरबाड तहसील कार्यलयावर बिऱ्हाड मोर्चा काढत सोबत जनावरे, अन्न धान्य, कपडे  घेऊन तहसील कार्यलयाच्या पटांगणात आपले संसार मांडून प्रशासनाच्या कामचुकारपणा बाबत खंत व्यक्त केली, या बिऱ्हाड मोर्चेला ठाणे जिल्हा परिषदचे मा. उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी भेट दिली असता, आपण केलेली मागणी रास्त असून मी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून रस्ता व स्मशानासाठी लवकरच निधी उपलब्ध करून रस्त्याची व स्मशानाची समस्या येत्या सात दिवसात सोडवण्यासाठी प्रयत्न करेन,आणि आपण मोर्चेला पूर्णविराम दयावा. अशी ग्रामस्थांना विनंती केली, बिऱ्हाड मोर्चेला अनेक राजकीयपक्षांनी दिलेला पाठिंबा पाहता मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांनी लेखीपत्र देत सात दिवसाची मुदत मागण्यात आली व मोर्चा थांबविण्यासाठी विनंती केली याबिऱ्हाड मोर्चेत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सतिश बनसोडे, शहापूर तालुका सचिव मन्सूर शेख, ता. अध्यक्ष मारुती वाघ, चिंतामण भांगरथ आमआदमी पार्टीचे शरद पवार, जिजाबाई दंवड, लक्ष्मण खंडवी, प्रसाद वाघमारे, भीमा वाघ, व ई. कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता.

 उत्तर मुंबईतील रखडलेले प्रकल्प ,रस्ते कामे मार्गी लागणार

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची ग्वाही कांदिवली येथे क्रीडा प्रशिक्षण संकुल उभारणार राजेंद्र साळसकर     मुंबई : मुंबई महानगरपालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, म्हाडा आणि एमएमआरडीए च्या अधिका-यांसोबत बुधवारी झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये उत्तर मुंबई आणि मुंबईतील रखडलेले विविध प्रकल्प कामे मार्गी लावण्यासंदर्भात तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी बुधवारी दिली. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, योगेश सागर, मनीषा चौधरी, सुनील राणे, भाजपा प्रदेश प्रवक्ता गणेश खणकर, ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. गोयल यांनी सांगितले की,या बैठकीमध्ये कांदिवली येथे 37 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याबाबतचा प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या 20-25 वर्षांपासून रखडलेल्या या राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्याचा मार्ग आजच्या बैठकीनंतर मोकळा झाला आहे. याठिकाणी भविष्यात आशियाई, राष्ट्रीय, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक स्तरावरचे खेळाडू प्रशिक्षित केले जातील. या बैठकीत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांमुळे मुंबईकरांचे जीवन सुखकर होणार आहे असेही गोयल यांनी नमूद केले. गोयल यांनी सांगितले की उत्तर मुंबई आणि उर्वरित मुंबईमध्ये अर्धवट आणि रखडलेले विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून युद्धस्तरावर काम करत आहे.बोरिवली येथील बाळासाहेब ठाकरे उद्यान आणि प्रमोद महाजन क्रीडा संकुल यांच्या सर्वांगीण विकासासाठी विस्तृत चर्चा करून त्याबाबत अहवाल लवकरच सादर करून तेथे क्रीडा सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खेळाडूंच्या उज्वल भविष्यासाठी असे प्रकल्प महत्वाचे असून ते पूर्ण करण्यासाठी वेगाने कामे सुरू आहेत अशी माहिती गोयल यांनी दिली. कांदिवली येथील कौशल्य विकास केंद्र येत्या दोन महिन्यांत आणि शिंपोली येथील कौशल्य विकास केंद्र येत्या 6-8 महिन्यांत सेवेत रुजू होईल अशी ग्वाही गोयल यांनी दिली.या बहुविद्याशाखीय केंद्रांमुळे पालघरपर्यंतच्या रहिवाशांना लाभ होणार आहे. मुबईकरांची वाहतुकीची समस्या सोडवून जीवन सुखकर करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचे गोयल यांनी सांगितले. आकुर्ली पश्चिम द्रूतगती मार्गावरील अंडरपासचे काम रखडले होते त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या होती. मात्र बैठकीमध्ये एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी ते काम येत्या 15 दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी टाटा कंपनीला वाहतूक व्यवस्थापन आराखडा बनवण्याची विनंती केली असल्याची माहिती गोयल यांनी दिली. सहपोलीस आयुक्तांशी चर्चा करून वाहतूक कोंडी होणा-या ठिकाणी अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात करण्याची विनंती करून एक सर्वसमावेशक योजना तातडीने आखली जाणार आहे. प्रत्येकाला हक्काचे घर देण्याच्या दिशेने रखडलेल्या गृह आणि पुनर्विकास प्रकल्पांबाबतही बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ( एसआरए) नोडल एजन्सी म्हणून नियंत्रण ठेवून कामे पूर्ण करून घेणार असल्याची माहितीही गोयल यांनी यवेळी दिली. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतील ‘एक पेड मां के नाम’ या योजनेनुसार उत्तर मुंबईमध्ये मुंबई महानगर पालिकेतर्फे एक लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे, असेही ते म्हणाले. 0000

 पनवेल उरण महाविकास आघाडीची आज यलगार परिषद

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती     पनवेल : राज भंडारी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका केव्हाही लागण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीने पुरण…