Category: होम

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे मंजुषा पाटील यांचे गायन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभांतर्गत मंजुषा पाटील यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात हा कार्यक्रम रविवार दिनांक…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत अर्ज केलेल्या महिलांनी बँक खाते आधारकार्डशी संलग्न करावे – अशोक शिनगारे

ठाणे : मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेसाठी ठाणे जिल्ह्यातून एकूण ५ लाख ३ हजार ८० अर्ज पात्र ठरले असून ३७ हजार अर्ज त्रुटीयुक्त आहेत. मात्र अद्याप ज्या महिलांचे बँक खाते…

राजन राजे यांच्यामुळे प्रोटेगो इंडिया कंपनीतील कामगारांना मिळणार ८० हजारांची भरघोस पगारवाढ

ठाणे : ऑईल-गॅस, औषधे, रासायनिक खते उत्पादक कंपन्यांना, ‘फ्लेम-ॲरेस्टर, ब्रीदर-व्हाॅल्व्ह’सारख्या औद्योगिक-सुरक्षा उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या, नवी मुंबईतील ‘प्रोटेगो इंडिया’ या जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीत ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष, कामगार…

अनिता बिर्जे यांचा शिवसेना शिंदेगटामध्ये प्रवेश

 शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या अनिल ठाणेकर ठाणे : गडकरी रंगायतन येथील शिवसेना उबाठा गटाचा मेळावा संपता संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जोर का झटका दिलाय. उबाठा गटाच्या उपनेत्या आणि आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या कट्टर शिवसैनिक अनिता बिर्जे यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदेगटामध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात अनित बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहचवली होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमातही अनिता बिर्जे यांनी पक्षासाठी केलेले कार्य ठळकपणे दाखवण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांनी पक्षात उठाव करून पुन्हा सत्तास्थापना केली तेव्हा अनिता बिर्जे यांनी या निर्णयाला ठाम विरोध करून उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. उबाठा गटात कायम राहिल्यामुळे त्यांची उबाठा सेनेत उपनेतेपदी वर्णी लावण्यात आली होती. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने उबाठा गटाची ठाण्यात वाताहत झाली ती पाहता ठाण्यातील उबाठा गटाचे अनेक पदाधिकारी नाराज आहेत. एकनाथ शिंदे हेच स्वर्गीय आनंद दिघे अभिप्रेत असलेला जनसेवेचा वारसा पुढे चालवत आहेत हे पटल्यामुळेच त्यांनी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बिर्जे यांनी यावेळी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करत असून ते पटल्यामुळेच आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनिता बिर्जे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे. शिवसेनेची वाघीण पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होत असल्याचा आनंद आहे असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. बिरजेबाईंच्या आजवरच्या अनुभवाचा फायदा आगामी काळात पक्षाला नक्की होईल. ठाणे जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी अधिक मजबूत होऊन जोमाने काम करेल अशी अपेक्षा यावेळी शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळी ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक रमाकांत मढवी, टेंभी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे  आणि ठाणे शिवसेनेतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 00000

कर्जत उपविभागीय अधिकारीपदी प्रकाश सकपाळ झाले रुजू

अशोक गायकवाड कर्जत : कर्जत उपविभागीय अधिकारीपदी प्रकाश संकपाळ यांची प्रशासकीय बदलीने नियुक्ती झाली असून त्यांनी मंगळवार, ७ ऑगस्ट २०२४ रोजी उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. याप्रसंगी तहसीलदार डॉ.शीतल रसाळ यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी डी.डी. टिळे, कर्जत उपविभागीय अधिकारी कार्यालय नायब तहसीलदार प्रसाद पाटील, कर्जत तहसील कार्यालय निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत, खालापूर तहसील कार्यालय निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, कर्जत तहसील कार्यालय महसूल नायब तहसीलदार सोपान बाचकर, खालापूर तहसील कार्यालय नायब तहसीलदार मिलिंद तिऱ्हेकर, कर्जत पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, नेरळ पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे, माथेरान पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने, मंडळ अधिकारी माणिक सानप, संतोष जांभळे, वैशाली पाटील, बाबासो शेटे, तलाठी दत्ता ठोकळ, अभिजित हिवरकर, शिपाई बाळू आढाव, नथू गायकवाड, उघडा, मनोहर वाघ, राहुल गायकवाड यांनीही पुष्पगुच्छ देवून प्रशासकीय भवनामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयात संकपाळ यांचे स्वागत केले. 00000

आचार्य अत्रे पुरस्कारासाठी पत्रकार श्री. रमेश झवर यांची निवड

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणाऱ्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी यंदा निवड समितीने एकमताने ज्येष्ठ पत्रकार  श्री. रमेश झवर यांची निवड केली आहे. प्रत्यक्ष आचार्य अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक मराठा मध्ये काम केलेले श्री. झवर हे पन्नास वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय आहेत. दैनिक मराठा ते दैनिक लोकसत्ता असा त्यांचा सलग प्रवास आहे.  या कालावधीत उपसंपादक, वार्ताहर, मुख्य उपसंपादक, वृत्त संपादक, सहसंपादक अशा पदांवर त्यांनी काम केले आहे. दैनिक लोकसत्ता मध्ये व्यापार उद्योग पुरवणी (कॉमर्स विभाग) व प्रादेशिक विभाग हेही त्यांनी समर्थपणे सांभाळले होते. संपादकीय पानावरील लेख, स्फुट तसेच लोकसत्ताचे अनेक अग्रलेखही त्यांनी लिहिले आहेत. निवडणुका, साहित्य संमेलने, देश विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे त्यांनी वृत्तांकन केले आहे. वयाची ८० वर्षे पार केलेल्या झवर यांचे आजही समाज माध्यमांवर माहितीपूर्ण लिखाण चालू आहे. त्यांचा ब्लाॅग लोकप्रिय झाल्यावर rameshzawar.co.in ही स्वत:ची वेबसाईट त्यांनी सुरू केली. ह्या साईटलाही देश विदेशात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष म्हणूनही अनेक वर्षे ते कार्यरत होते. श्री. झवर यांचे मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे अभिनंदन. निवड समितीने केलेल्या सहकार्याबद्दलही मुंबई मराठी पत्रकार संघ आभारी आहे. 00000

 महाराष्ट्रातील रेशन दुकानात आनंदाचा शिधा गायब

ओरिसात रेशन दुकानात २४ तास धान्य ए टी एम   मुंबई / रमेश औताडे ओरिसाची राजधानी भुवनेश्वर मध्ये देशातील पहिले धान्य एटीएम (धान्य वितरण मशीन) लाँच करण्यात आले. तर महाराष्ट्रातील दुकानातून घोषित केलेला आनंदाचा शिधा गायब होत आहे. अशी भ्रष्टाचारी अवस्था असताना, देशातील ८० कोटी जनतेला रेशन व्यवस्था परिपूर्ण असल्याची केंद्रीय शिधावाटप यंत्रणा जाहिरात करत आहे. असा आरोप करत रेशन हक्क समिती ने खंत व्यक्त केली आहे. अनेक शिधावाटप दुकानात सर्व्हर डाऊन मुळे रांगेतील ग्राहक मोकळ्या हाताने घरी जातात. सर्व्हर आला तर वीज जाते, वीज आली तर थम मशीन बंद पडते, अशी तांत्रिक अडचण असताना सडके किडके धान्य, दुकानदार वेळेवर येत नाही, शिधा घेतल्यानंतर पावती देत नाही असे प्रकार अनेक दुकानात पाहायला मिळत आहेत. मागील श्री रामनवमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आनंदाचा शिधा अनेक दुकानात मिळाला नाही. आता गणेशोत्सव काळात आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली आहे. नुसत्या घोषणा करण्यापेक्षा शिधा वाटप दुकानात किमान कॅमेरे तरी लावा जेणे करून मनमानी उजेडात येईल. ओरिसामध्ये आठवड्याचे सात दिवस २४ तास शिधा देणारी ए टी एम मशीन व महाराष्ट्रात मात्र आंधळ दळतंय अन् कुत्रे पीठ खातंय अशी अवस्था आहे.

 ठाण्यात राडा

शिवसेना मनसे आमने सामने   ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शनिवारी सायंकाळी ठाण्यातील गडकरी रंगायतनात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी मोठ्यासंख्येने पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्येकर्त्यांनी गर्दी केली होती. बीड मध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्यामुळे आक्रमक झालेल्या ठाण्यातील मनसैनिकांनी गडकरी रंगायतन परिसरात गोंधळ घालण्यासाठी गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांचा ताफा ठाण्यात येताच, काही मनसैनिकांनी उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यातील सभेसाठी येत असताना मुलुंड चेक नाक्याजवळ ठाकरे यांच्या गाडीवर  शेण फेकले. तसेच पुढे त्यांचा ताफा आल्यानंतर ताफ्यावर नारळही फेकण्यात आले पाच ते सहा जण मोठ्या पिशवीतून नारळ भरुन घेऊन आले होते. भर रस्त्यात उद्धव यांच्या ताफ्यावर हे नारळ फेकले जात होते. यावेळी सर्वसामान्य नागरिक देखील वाहनातून प्रवास करत होते. त्यामुळे नारळ नागरिकांना लागून दुर्घटना होण्याची शक्यता होती. त्यानंतर त्यांची गाडी गडकरी रंगायतन मध्ये पोहोचताच त्यांच्या गाडीच्या मागून मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या गाडीवर बांगड्या फेकण्यास सुरुवात केली. यावेळी मनसे आणि उद्धव सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी नौपाडा पोलीसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी मनसे व शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी ‘उद्धव ठाकरे मुर्दाबाद’ अशाच्या घोषणा दिल्या. तसेच उद्धव ठाकरे यांना पुन्हा कधी ठाण्यात येऊ देणार नाही, असा इशारा देखील दिला. आमचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोटारीसमोर शुक्रवारी उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या. त्यामुळे मनसैनिकांमध्ये खदखद होती. आमच्या १५० ते २०० मनसैनिकांनी आंदोलन करून उद्धवसेनेला चोख प्रत्युत्तर दिले. मनसे जशास तसे उत्तर द्यायला मागेपुढे पाहणार नाही.- अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष, मनसे, ठाणे-पालघर 000000

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचा एक सलाम वर्दीला

राजेंद्र साळसकर     मुंबई : आपण जे स्वच्छंदी जीवन जगतो,निवांतपणे निद्रासुख घेतो त्यामागे असंख्य दृश्य- अदृश्य पाठिराख्यांचे हात असतात हे कदापि विसरून चालणार नाही.हे पाठिराखे आपल्यासाठी देवदूतासमान आहेfत.आपल्या देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून ऊन,वारा,पाऊस,थंडी कशाचीही पर्वा न करता अहोरात्र जागून त्याचबरोबर वेळप्रसंगी आपल्या प्राणांची बाजी लावून सीमेचं रक्षण करतात ते आपल्या देशाचे जवान त्याचप्रमाणे कोणाही नागरिकाला कोणताही गंभीर आजार असो त्या रूग्णाला वाचविण्यासाठी आपले सारे वैद्यक कसब पणाला लावून व त्याची अहोरात्र सेवासुश्रुषा करून त्याचे प्राण वाचवितात हेे आपल्या साठी माणसातील देवमाणूसच आहेत.या देवमाणसाची प्रचिती आपण सर्वांनी कोरोना महामारी काळात घेतली आहेच. अशा या माणसातील देव माणसांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहेच.म्हणूनच आपल्याला अभिमानास्पद  असणा-या माणसातील देव माणसाची सेवा म्हणून त्यांच्या युनिफॉर्मची (वर्दीची) ड्रायक्लिनींग सुविधा १५ऑगष्ट ह्या स्वातंत्र्यदिनी केवळ एक रूपया सेवामूल्य घेऊन करण्याचे कॉर्पोरेट तसेच मध्यम वर्गात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आयन फिल या लॉंड्री सेवा देणा-या संस्थेमार्फत ड्रायक्लिनींग सेवा देण्यात येणार आहे.आयन फिल ने गतवर्षीही ही योजना राबविली होती तेव्हा यास प्रचंड प्रतिसाद लाभला होता. वर्दीतील देवमाणसांच्या कार्याला सलाम म्हणून यंदाच्या स्वातंत्र्यदिनीही ही योजना राबविण्याचे ठरविले असून देशाची सेवा करणारे जवान, पोलीस,डॉक्टर,परिचारिका यांनी या ड्रायक्लिनींग सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आयन फिल चे उदय पवार यांनी आग्रहाचे आवाहन केले आहे.   अधिक माहितीसाठी ७३०४६७८४८४/८४२२८९८९०२ या क्रमांकावर संपर्क करावा. 0000

मर्द असता तर समोर आले असते, हल्ला करून पळून का गेले?

ठाकरे गटाचे राजन विचारे यांची मनसेवर टीका     ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शनिवारी ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळ फेकून हल्ला केला. तसेच गडकरी रंगायतन परिसरात त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न झाला. या घटनेनंतर ठाण्यात ठाकरे गटाकडून संताप व्यक्त केला जात आहे. महिलांना पुढे करून हा प्रकार झाला आहे. मर्द असता तर समोर आला असतात. पळून कशाला गेलात, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आले होते. यावेळी नितीन कंपनी भागात मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याच्या दिशेने नारळ फेकले होते. या हल्ल्यात ताफ्यातील एका वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. तसेच गडकरी रंगायतन परिसरात उद्धव ठाकरे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी केला. या हल्ल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. रात्री उशीरा ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच मनसेच्या या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला. महिलांना पुढे करून हा प्रकार झाला आहे. मर्द असता तर समोर आला असतात. पळून कशाला गेलात. गडकरी रंगायतनमध्ये दोन ते तीन हजार शिवसैनिक होते. हे शिवसैनिक खाली उतरले असते तर वेगळ काही घडल असतं, शिवसैनिकांवर हल्ले करण्याची भाषा करू नका, असे राजन विचारे म्हणाले. लहान मुले सुद्धा दगडफेक करून पळून जातात. तसाच हा प्रकार आहे. ही मर्दाची लक्षणे नाहीत. नारळ फेकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे तिथून जीवघेत पळत सुटले अशी टीका विचारे यांनी केली. ही घटना अत्यंत निंदनीय आहे. स्टंट करण्यासाठी, पक्षासाठी काही तरी करतोय हे दाखविण्यासाठी असले प्रकार करण्यात आले आहेत. नारळ फेक करताना सर्वसामान्य नागरिक ये-जा करत होते. त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना हे नारळ लागून गंभीर दुखापत झाली असती. त्याला कोण जबाबदार असते असा प्रश्न केदार दिघे यांनी उपस्थित केला.