Category: महाराष्ट्र

Maharashtra News

संसद चालवायची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची – सुप्रिया सुळे

पुणे : संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते. त्यांनी पुढाकार घेऊन चर्चा केली पाहिजे पण दुर्दैवाने देशातील मायबाप जनतेला मला हे सांगावे लागेल की, यावेळी संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्यात सरकार अपयशी ठरले आहे,…

वाल्मिक कराडसह आरोपींवर मोक्काची कारवाई होणारच !

नागपूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून याप्रकरणी आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर केलं. हत्या प्रकरणातील आरोपी कोणाशीही संबंधित असतील तरी…

कांदा दर गडगडल्याने शेतकरी संतप्त

हरिभाऊ लाखे नाशिक : अवघ्या काही दिवसात कांद्याचे दर क्विंटलला दोन हजार रुपयांनी गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अर्धा…

जरंडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत निबंध स्पर्धा;-ग्रामपंचायतीचा पुढाकार

छायाचित्र ओळ-जरंडी जिल्हा परिषदेच्या शाळेत निबंध स्पर्धा घेतांना सोयगाव : जरंडी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने बुधवरी (ता.१८) दुपारी दोन वाजता येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत पाचवी ते आठवी या गटात…

बीडमध्ये राजकीय आशिर्वादाने सुरु असलेल्या गुंडगिरीचा बिमोड करा;

बीड घटनांमागे हात असलेल्या मंत्र्याला बाहेर करा. काँग्रेसचे नाना पटोले यांची मागणी केतन खेडेकर परभणी व बीड जिल्ह्यात झालेल्या घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला व संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव,…

रत्नागिरी जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित-रुपाली चाकणकर

अशोक गायकवाड रत्नागिरी :महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठीच हा दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, रत्नागिरी जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित आहे असे गौरवोद्गार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष…

रत्नागिरी जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित-रुपाली चाकणकर

अशोक गायकवाड रत्नागिरी : महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठीच हा दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, रत्नागिरी जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित आहे असे गौरवोद्गार राज्य महिला आयोगाच्या…

भुजबळांनी सत्तेतच राहावं

समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सुर हरिभाऊ लाखे नाशिक: मंत्रिपद नाकारण्यात आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. नागपुरात सुरु असलेलं विधिमंडळाचे अधिवेशन सोडून भुजबळ सोमवारी रात्री नाशिकमध्ये…

आपले सरकार पोर्टल’वरील २ हजार ३०१ तक्रारी निकाली – रोहन घुगे

अनिल ठाणेकर राज्य सरकारने सुरु केलेल्या आपले सरकार २.० वरील तक्रारी निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषद, ठाणे सामान्य प्रशासन विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात आले आहे. जिल्हा परिषदेस १९ सप्टेंबर, २०२३ रोजी…

रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात मोहीम

  मेनरोड, शालिमार भागात कारवाई नाशिक : शहराची मुख्य बाजारपेठ असलेला मेनरोड, शालिमार आणि सराफ बाजार परिसरात सोमवारी सायंकाळी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने मोहीम राबवण्यात आली. यामुळे व्यावसायिकांसह परिसरात आलेल्या ग्राहकांची धावपळ उडाली. सायंकाळी उशीरापर्यंत ही मोहीम सुरू होती. गर्दीच्या वेळी काही काळ का होईना रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. अशीच परिस्थिती कायम ठेवावी, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, शालिमार परिसरात लहान व्यावसायिकांनी बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यांवर आपले बस्तान बसवले आहे. यामुळे पायी चालणाऱ्यांसह वाहनचालकांनाही कसरत करावी लागते. शालिमार परिसरात सध्या हिवाळा असल्याने लहान मुलांच्या उबदार कपड्यांपासून सर्व वयोगटाच्या लोकांसाठी स्वेटर, कानटोपी, मोजे, विविध प्रकारचे स्कार्फ, महिला वर्गासाठी आभुषणे, पर्स, वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख, पादत्राणे, चादर, ब्लँकेट आदींची विक्री रस्त्यावर करण्यात येत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक थेट रस्त्यावर उतरत असल्याने वाहतूक कोंडीला मदत होत आहे. त्यातच हातगाड्यावाल्यांची भर पडते. शालिमार परिसरात संदर्भ सेवा रुग्णालय तसेच नाशिकरोड, इंदिरानगर, देवळालीकडे जाण्यासाठी वाहन व्यवस्था आहे. शहर बससेवेचा थांबाही आहे. अडथळ्यांची ही शर्यत पार करत वाहनचालक किंवा पादचाऱ्यांना बाहेर पडावे लागते. व्यावसायिकांनी या सर्व जागेवर अतिक्रमण करुन ग्राहकांची लुटमार सुरू केली आहे. हे विक्रेते पोलिसांनाही जुमानत नसल्याचे वारंवार उघड झाले आहे. मागील आठवड्यात एका विक्रेत्याने महिला आणि बरोबर असलेल्या पोलिसाला मारहाण केली होती. अशीच परिस्थिती मेनरोड तसेच सराफ बाजारात आहे. लहान विक्रेत्यांची गर्दी तर असतेच. शिवाय, मोठ्या दुकानदारांकडून सेलच्या नावाखाली काही सामान बाहेर विकण्यासाठी काढले जाते. भाजी विक्रेते, फुल विक्रेते यांची त्यात भर पडते. गर्दीमुळे बऱ्याचदा वादाचे प्रसंग उद्भवतात. कधी कधी हे प्रकरण हाणामारीपर्यंत जाते. या पार्श्वभूमीवर कोंडलेल्या रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा, ही या परिसरात येणाऱ्या ग्राहकांची अपेक्षा असते. संबंधित परिसराला पडलेला अतिक्रमणाचा विळखा पाहता, सुस्तावतेल्या नाशिक महापालिकेला अखेर सोमवारी जाग आली. सोमवारी सायंकाळी शालिमार, मेनरोड, सराफ बाजार परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. या कारवाईची पूर्वसूचना नसल्याने व्यावसायिकांची धावपळ उडाली. मोहिमेतून माल वाचावा, यासाठी विक्रेत्यांची पळापळ सुरू झाली. काहींनी पुढे जात अन्य लोकांना मोहिमेची पूर्वकल्पना दिली. या धावपळीत बांबुवरील कपडे किंवा अन्य सामान काढताना बांबु रस्त्यात पडले, सामान रस्त्यावरच पडल्याने ग्राहकांना रस्त्याने मार्ग काढणे कठीण झाले. कारवाईत सातत्याचा अभाव शहरातील शालिमार, मेनरोड या परिसरात महापालिकेकडून अधूनमधून अतिक्रमण निर्मूलन कारवाई केली जाते. परंतु, पथकाची गाडी पुढे गेली की लगेचच मागे परिस्थिती पूर्ववत होते. महापालिकेकडून सातत्याने कारवाई करण्यात येत नसल्याने अतिक्रमणधारकांचे चांगलेच फावते. शालिमार परिसरात फळविक्रेते, कपडे विक्रेते यांच्या अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असतानाही पोलिसांकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येते.