Category: महाराष्ट्र

Maharashtra News

देशानं काँग्रेसला नाकारलंय- मोदी

नाशिक : काँग्रेस आणि घटकपक्ष असेल तर घोटाळेच होणार आहे. राज्यात तुम्ही यांना पापं करु देणार का? संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलं आहे, ती ऑल इंडिया नाही, ती परजीवी आहे. इतर पक्षांच्या पायघड्यांवरच ती जिवंत आहे.  बिहार, झारखंड अशा राज्यात दुसऱ्यासोबतच…

महाराष्ट्रवादी घोषणापत्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे घोषणापत्र येत्या तीन दिवसात जाहीर केले जाईल – आनंद परांजपे अनिल ठाणेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘महाराष्ट्रवादी घोषणापत्र’ या जाहिरनाम्याचे प्रकाशन व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. लाडकी बहीण योजनेची रक्कम रुपये २१०० पर्यंत वाढवणार, शेतकरी कर्जमाफी, भात शेतकऱ्यांसाठी रुपये २५ हजार प्रति हेक्टर बोनस, २.५ दशलक्ष नोकर्‍या, ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करणार असून मतदारसंघनिहाय जाहिरनामा आणि राज्यव्यापी आश्वासने ही जाहीरनाम्याची वैशिष्टे असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यानी दिली. यावेळी माध्यमांसमोर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले की, येत्या दोन ते तीन दिवसात १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघासाठीचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल. यावेळी महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला हे उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाने निवडणूक लढवीत असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघासाठी आपला जाहिरनामा जाहीर केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबईत तर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते गोंदियात जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. माझी लाडकी बहीण योजनेतील रक्कम सध्याच्या रुपये १५०० वरुन प्रति महिना रुपये २१०० पर्यंत वाढवणार असल्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे. हा उपक्रम महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे मासिक डीबीटी हस्तांतरण असेल जे २.३ कोटी महिलांना प्रतिवर्षी रुपये २५ हजाराचा लाभ देईल. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात ११ नवीन आश्वासने आहेत. ज्यात वृद्धापकाळ निवृत्ती वेतन रुपये १५०० वरुन रुपये २१०० प्रति महिना वाढविण्यात येणार आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या समर्थनासह शेतकरी सन्मान निधी प्रति वर्ष रुपये १२ हजारावरुन रुपये १५ हजारापर्यंत वाढविण्यात येणार आहे.शेतकरी कर्जमाफी, भात शेतकऱ्यांसाठी रुपये २५ हजार प्रति हेक्टर बोनस, एमएसपी अंतर्गत विकल्या गेलेल्या सर्ध पिकांसाठी २० टक्के अतिरिक्त अनुदान, ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करणार असून ग्रामीण कृषी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ही सर्वात मोठी योजना आहे. २.५ दशलक्ष नोकर्‍या, प्रशिक्षणाद्वारे १ दशलक्ष विद्यार्थ्यांना रुपये १० हजार मासिक स्टायफंड प्रदान करण्याचे वचन देण्यात आले आहे. अंगणवाडी व आशा वर्कर्स कर्मचाऱ्यांना रुपये १५ मासिक वेतन, सौर आणि अक्षय उर्जेला प्राधान्य देताना वीज बिल ३० टक्के कमी करण्याचे वचन. सरकार स्थापनेच्या १०० दिवसात नवीन महाराष्ट्र व्हिजन सादर करण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर अंकुश ठेवण्यात येईल, असे वचन महाराष्ट्रवादी घोषणापत्रात देण्यात आले आहे. ०००००

मराठ्यांचा लढा वाया जाऊ देणार नाही- जरांगे

जालना : आम्ही अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा दिलेला नाही. राखीव असो किंवा इतर जागा असोत तेथे आमचा पाठिंबा अद्याप तरी जाहीर केलेला नाही. मित्रपक्षाची यादी आलेली नाही. एका जातीवर निवडणूक लढणे आणि…

लाडक्या बहिणींना वंचित ३५०० देणार !

मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने लाडक्या बहीण योजनेत उडी घेत आता ३५०० रुपये महीना देण्याची घोषणा करीत आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहिरनाम्यात आरक्षणाबाबत वंचित सुरक्षितता देईल,  बोगस आदिवासी दाखले रद्द…

मनसेचे सरकार कुणालाच काही फुकट देणार नाही- राज ठाकरे

लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल यवतमाळ : लाडक्या बहीणींना फुकटात कीती जास्तीत जास्त पैसे द्यायचे यावरून सर्वच पक्षात चढाओढ सुरु असताना मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मात्र मनसेचे सरकार आल्यास या…

उद्धव ठाकरेंनीही कोल्हापुरातून विधानसभेचे रणशिंग फुंकलं

ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही अशीच आहे,  गद्दारांना गाडणार म्हणजे गाडणारचं राधानगरी : एकीकडे महायुतीने आज कोल्हापूरातून प्रचाराचा नारळ फोडला तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही आपल्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातूनच फोडला. ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख…

प्रचाराचा नारळ फुटला !

लाडक्या बहि‍णींना महिना २१००, वृध्दांना महिना २१००, शेतकऱ्यांना वर्षाला १५००० – एकनाथ शिंदेंच्या बंपर घोषणा कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर येथून आई अंबाबाईच्या आशीर्वादाने…

ह्युमॅनिटी ग्लोबल फाऊंडेशनतर्फे आश्रमातील मुले व व वृद्धांना कपडे व मिठाई वाटप

राजेंद्र साळसकर संगमनेर : ह्युमॅनिटी ग्लोबल फाऊंडेशन घाटकोपर, मुंबई यांच्यावतीने दिवाळीनिमित्त स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्था, रायतवाडी फाटा, संगमनेर येथील आश्रमातील सर्व मुले व वयोवृद्ध तसेच नवजीवन वीट भट्टी उद्योगातील वंचित मुलांना नवीन कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले. स्वयंप्रेरित संस्थेच्या आश्रमातील मुले व वीटभट्टी वरील मुले अशा एकूण १०० मुलांना कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले.यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता.  ह्युमॅनिटी ग्लोबल फाउंडेशनने आपली दिवाळी सर्व मुलांसमवेत साजरी करून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. याप्रसंगी ह्युमॅनिटी ग्लोबल फाउंडेशन चे सदस्य श्री दिपक पवार, राजेन्द्र पुजारी, अनंत खडतरे,जितेंद्र पवार,प्रभाकर कुटे, उदय पुजारी, अनिल माशिट्टे तसेच नवजीवन विटभट्टी उद्योगाचे मालक दिलीप शेठ जोर्वेकर स्वयंप्रेरीत संस्थेचे नामदेव राहणे, संतोष पवार, नवजीवन उद्योगातील परिवार इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

नाशिकमध्ये बहुसंख्य जागांवर बहुरंगी लढती

१५ मतदारसंघात १९६ उमेदवार हरिभाऊ लाखे नाशिक : माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमधील चित्र स्पष्ट झाले असून एकूण १९६ उमेदवार रिंगणात आहेत. मालेगाव बाह्य, बागलाण व इगतपुरीत सर्वाधिक प्रत्येकी १७ तर, कळवणमध्ये सर्वात कमी सात उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती होणार असून काही ठिकाणी बंडखोरी कायम राहिल्याने महायुती, महाविकास आघाडीसमोर त्यांचे आव्हान राहणार आहे. जिल्ह्यातील १५ मतदारसंघातून सोमवारी १४१ जणांनी माघार घेतल्याने आता निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या १९६ वर आली आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी प्रयत्न करूनही चांदवडमधून नाराज केदा आहेर यांनी माघार घेतली नाही. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्या विरोधात त्यांचे बंधू केदा आहेर आणि महाविकास आघाडीचे शिरीष कोतवाल हे प्रमुख उमेदवार आहेत. तशीच स्थिती नांदगावमध्ये आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे (अजित पवार) मुंबईचे माजी अध्यक्ष समीर भुजबळ यांची अपक्ष उमेदवारी कायम आहे. महाविकास आघाडीचे गणेश धात्रक यांच्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढतीची चिन्हे आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव बाह्य मतदारसंघात सर्वाधिक १७ उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीचे भुसे विरुध्द महाविकास आघाडीचे अद्वय हिरे यांच्या लढाईत बंडूकाका बच्छाव यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे चुरस निर्माण झाली आहे. नाशिक मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीचे वसंत गिते आणि महायुतीच्या देवयानी फरांदे यांच्यात मुख्य लढत आहे. नाशिक पश्चिममध्ये महायुतीच्या सीमा हिरे, महाविकास आघाडीचे सुधाकर बडगुजर, मनसेचे दिनकर पाटील यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात आहेत. देवळालीत महायुतीत वेगळाच तिढा निर्माण झाला. पक्षाने उमेदवारी मागे घेण्याबाबत सादर केलेले पत्र तांत्रिक कारणास्तव ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) उमेदवार राजश्री अहिरराव यांची उमेदवारी कायम राहिली. या ठिकाणी महायुतीतीलच अहिरराव आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) सरोज अहिरे परस्परांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. महाविकास आघाडीतर्फे योगेश घोलप आणि वंचितचे अविनाश शिंदे हेही रिंगणात आहेत. येवल्यात महायुतीचे छगन भुजबळ, महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे यांच्यासह १३ जण रिंगणात आहेत. निफाडमध्ये दिलीप बनकर आणि अनिल कदम या आजी-माजी आमदारांमध्ये पारंपरिक लढत होणार आहे. कळवणमध्ये महायुतीचे नितीन पवार, महाविकास आघाडीचे जे. पी. गावित यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहेत. बागलाणमध्ये महाविकास आघाडीच्या दीपिका चव्हाण आणि महायुतीचे दिलीप बोरसे यांच्यासह १७ उमेदवार आहेत. इगतपुरीत महायुतीचे हिरामण खोसकर, महाविकास आघाडीचे लकी जाधव, मनसेचे काशिनाथ मेंगाळ, माजी आमदार निर्मला गावित (अपक्ष) यांच्यासह १७ जण मैदानात आहेत. सिन्नरमध्ये महायुतीचे माणिक कोकाटे, महाविकास आघाडीचे उदय सांगळे यांच्यासह १२ उमेदवार आहेत. अनेक जागांवर बंडखोर, अपक्षांची लक्षणीय संख्या असल्याने तिरंगी वा चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे. कळवणमध्ये सात उमेदवार विधानसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य, इगतपुरी व बागलाण या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी २१ तर, कळवण या राखीव मतदारसंघात सर्वात कमी सात उमेदवार रिंगणात आहेत. नांदगावमध्ये (१४), मालेगाव मध्य (१३), बागलाण (१७), चांदवड (१४), येवला (१३), सिन्नर (१२), निफाड (नऊ), दिंडोरी (१३), नाशिक मध्य (१०), नाशिक पूर्व (१३), नाशिक पश्चिम (१५), देवळाली (१२) आणि इगतपुरी (१७) असे जिल्ह्यात एकूण १५ मतदारसंघात १९६ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली.

 पंतप्रधान मोदी यांची शुक्रवारी नाशिकमध्ये सभा

 ग्रामीण भागासाठीही पदाधिकारी प्रयत्नशील हरिभाऊ लाखे नाशिक: विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर प्रचाराला जोर येत असून, राज्यातील निवडणूक प्रतिष्ठेची लोकसभेप्रमाणेच विधानसभेसाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. सभा पंचवटीतील तपोवनात असलेल्या मोदी ग्राऊंडवर होणार आहे. सदरची सभा ठक्कर डोम येथे घेण्यासंदर्भातही प्रस्ताव होता. मात्र ती जागा सुयोग्य नसल्याने हा प्रस्ताव मागे पडला. त्यामुळे पंचवटीतील तपोवन येथील नेहमीची जागा निवडण्यात आली आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जागेची पाहणी केली. आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ६ नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये येणार आहे. सत्ताकारणात दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचे संबंध असल्याने राज्यातील जागावाटपासह इतर सर्व घटनांमध्ये गृहमंत्री अमित शाह यांचा हस्तक्षेप राहिला आहे. त्यामुळे राज्यातील जागा निवडून आणण्यासाठी तिन्ही पक्षांचे स्टार प्रचारक म्हणून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी महायुतीतर्फे या दोन्ही नेत्यांच्या सभा संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात येणार असून, जिल्ह्यातही त्यांच्या दोन सभा व्हाव्यात, यासाठी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. त्यापैकी नाशिकमध्ये मोदी मैदानावर ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांची सभा आयोजित करण्याचा प्रयत्न सुरू असून, तपोवनातील मोदी मैदानातच ही सभा होणार आहे. याशिवाय ग्रामीण भागातही एखादी मोठी सभा घेण्याचा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली.